अजुन तिचं मन काही.........वळलं नाही......!

काल तिच्या सोबत चालत होतो...

चालता चालता बोलत होतो...

बोलता बोलता रस्ता कधी संपला कळलं नाही...

अजुन तीच मन काही.........वळलं नाही......!



नविन बुटामुले पाय दुखत होता...

चालता चालता हाडाला खुपत होता...

तिच्या आनंदात पायाच दुःखण कळलं नाही...

अजुन तिचं मन काही.........वळलं नाही......!





काल खुप खुश होती.......म्हणाली मजा आली

आज का तू थाम्बलास.......माझ्यासाठी....

का थाम्बलो...... तिला काय हे कळलं नाही...?

अजुन तिचं मन काही.........वळलं नाही......!



होटेलात गेलो.......खुप खल्ल

उशीर झाला तिला......पण वेळ कसा गेला नाही कळलं

का तिने इतका वेळ घालवला.......तिला काय हे कळलं नाही...?

अजुन तिचं मन काही.........वळलं नाही......!



मग असेच चालत राहिलो रस्त्यावर........

घर तिचे जवळ येउच नये असे वाटत राहिले.....

बसस्टॉप येताच मी थाम्ब्लो

तेंव्हा डोळ्यांत तिच्या मी......आनंदाचे क्षण पाहिले



काही क्षण स्तब्ध झालो........आम्ही

एकमेकांना टाटा.......बाय नाही म्हणालो

कोणास ठाउक........का ते कळलं नाही...?

अजुन तिचं मन काही.........वळलं नाही......!

प्रेम आणि आकर्षण

प्रेम हि एक टु वे प्रोसेस आहे .पण जेव्हा ती एकाच बाजुने होते तेव्हा त्याला आकर्षण (attraction) असे म्हणतात.आपण असे कसं काय प्रेम करु शकतो जर ती आपल्याशी प्रेमचं करत नसेल?
असं म्हणतात "खरं प्रेम परताव्यात कशाचीच अपेक्शा करत नाही"('True love does not expect anything in return') इथे 'खरं प्रेम'(True love) एवजी 'आकर्षण'(attraction) वापरा.
तुम्ही एखादिच्या व्यक्तिमत्वाकडे किंवा दिसण्याकडे किंवा आवाजाकडे किंवा तिच्या गुणांकडे आकर्षित होतात आणि तिला पसंद करु लागतात. असे पसंद करु लागणे ह्यालाच तुम्ही प्रेम म्हणत असाल तर ते प्रेम नाही त्याला आकर्षण असे म्हणतात.
आपण काही करिना,कतरिना आणि दिपिकाच्या प्रेमात पडत नाही तर त्यांच्याकडे आकर्षित होतो.
अनेक जणं म्हणतात 'आम्ही आमच्या पहिल्या भेटितचं एकमेकांच्या प्रेमात पडलो.'
खरं तर ते एक आकर्षण आहे जे तुम्हाला जवळ येण्यास मदत करते.आणि जेव्हा तुम्ही दोघं एकमेकांना ओळ्खायला लागतात तेव्हा तुम्ही समोरच्या व्यक्तिच्या प्रेमात पडतात.इथे तुम्ही शकतात कि आकर्षण हि प्रेमाची पहिली पायरी आहे पण तरिही ह्या दोन्हि वेगळ्या गोष्टी आहे.
यासाठी दोन उदाहरणे बघा.–
१) A जर B कडे आकर्षित झाला आणि B ला संकेत देऊ लगला.तिनेसुद्धा त्याला response दिला.मग ते एकमेकांच्या जवळ येतिल, एकमेकांना समजतील,एकमेकांचा आदर करतिल.तेव्हा एक दिवस ते एकमेकांच्या प्रेमात पडतिल.
२)A जर B कडे आकर्षित झाला आणि B ला संकेत देऊ लगला.परंतु ती जर interested नसेल तर ती त्याला टाळु लागेल.जर परताव्यात A ला प्रेम किंवा response मिळत नसेल तर तो आणखि खचेल.
तो त्याची सहनशिलतेनुसार वाट पाहिल. पण काहि काळाने मग A हा C कडे आकर्षित होईल आणि मग B ला पुर्णत: विसरेल.
म्हणुन प्रेम हे काहि पाहिल्या-पाहिल्या होत नाहि तर ते होण्यासाठी आणि नष्ट होण्यासाठीहि थोडा वेळ लागतो.





प्रेम म्हणजे काय असतं ?………..
प्रेम म्हणजे असतो
एकच श्वास दोघांसाठी…..
प्रेम म्हणजे असतो
एकच विश्वास, कधीही न संपणारा…
प्रेम म्हणजे असते
एकच गाणे, दोघांनी गुणगुणायचे….
प्रेमात नसावी काही
मिळव्ण्याची भाषा……..
प्रेमात असावी एकच अभिलाषा……
न बोललेले शब्द ऎकायची…..
प्रेमात नसावे रुसवे फ़ूगवे
असावा फ़क्त आनंदी आनंद गडे……….
इकडे तिकडे चोहीकडे……..
एकदा तरी प्रेम जरुर करावे
पण ते आंधळे नसावे………..
कोणी तरी बोललेच आहे
"प्रेम म्हणजे प्रेम असतं
तुमचं आमचं same असतं"…………..

आलीस माझ्या आयुश्यात...

आलीस माझ्या आयुश्यात सोनेरी पहाट बनुन,
देशील मला आयुष्यभराची साथ् माझी प्रेयसी बनुन............

मन माझे उदास होते जणु कोमेजलेले फुल,
आता तुझ्याच सोबत मांडायचि आहे मला जन्मो-जन्मीची चुल.........

कशी अवतरलिस तु या भुतालावर काय सांगु,
सर्व अपेक्षा पूर्ण झाल्या आता देवाकडे काय मागु...........

असायचो एकटाच मी विरहाच्या क्षणात बुडालेला,
कस समजवु तुला प्रेमावरचा विश्वासच माझा उडालेला.......

तुझ्या येण्याने परत मनात अंकुर फुलवला आहे,
माझ्या अंगणात मी परत स्वप्नांचा झूल़ा झुलवला आहे.........

ह्या झुल्यावर आयुष्यभर तुझ्यासंगे मला झुलू दे.....
आणि तुझ्या मिठीतच नेहमी हि सोनेरी पहाट मावळू दे.

प्रेम नावाचा "टाईमपास"

प्रेम नावाचा "टाईमपास"

त्याची अन तिची पहिली भॆट
दोघांची होणाऱी "नजऱभेट"
काळजाला जाऊन भिडणारी थेट
दोघांचं एकमेकांना पाहून हसणं
अन नाजुकशा जाळ्यात अलगद फसणं...
या हसण्या या फसण्याची
सवय झालीय सगळयांना...

नजऱभेटीचं रूपांतर चोरून भॆटीत
भेटीचं रूपांतर हळुवार मिठीत
अन त्याहीपुढे कित्येक पटीत
नात्यातल्या या वेगाची
सवय झालीय सगळयांना...

मग रंगू लागतात स्वप्नं
एक त्याचं,एक तिचं फक्त दोन मनं
त्याचं हसणं तेव्हा तिचं हसणं
तिचं रडणं तेव्हा त्याचं रडणं
या हसण्या या रडण्याची
सवय झालीय सगळयांना...

दिल्या जातात वेळा,पाळल्याही जातात वेळा
घेतल्या जातात शपथा दिल्या जातात उपमा
त्याला ती वाटते "रांझ्याची हीर"
तिलाही तो वाटतो "कपूरांचा रणबीर"
या शपथा या उपमांची
सवय झालीय सगळयांना...

मग येतो असाही एक दिवस
पूनवेची रात्र वाटू लागते अवस
दोघांनाही येऊ लागतो एकमेकांचा कंटाळा
हीर वाटू लागते "बधीर" अन
रणबीर वाटू लागतो चक्क "काळा"
या अवसेची या पूनवेची
सवय झालीय सगळयांना...

पहिल्या भेटीच्या चौकातच
फूटतात "नव्या वाटा"
दोघंही करतात एकमेकांना "टाटा"
अहो तु्म्ही कशाला होताय डिस्टर्ब
दुःख वैगरे विसरा
त्याला भॆटते दूसरी
तिलाही भॆटतो दूसरा
पुन्हा होते देवाणघेवाण,पुन्हा होते "दिलफेक"
पुन्हा जुन्या कहानीचा नव्याने "रिटेक"
बदलत्या प्रेमाच्या रंगाची
सवय झालीय सगळयांना...

खरं सांगायचं अगदी मनापासून तर
प्रेम नावाचा "टाईमपास" करण्याची
सवय झालीय सगळयांना....._,___

तू राहशील का माझी...

तू राहशील का माझी...

उरलेल्या ह्या श्वासांची शप्पत
साथ तुझी सोडणार नाही
हा पाऊस नसला तरी
माझे बरसने थाबंनार नाही || १ ||

डोळे मिटून घे अन्
घे हा मातीचा सुगंध
त्यातही शेवटी येईल तुला
फ़क्त माझाच मंद गंध || २ ||

तू असे म्हणतेस
की तुझ्या आठवणीवर जगायचेय
माझ्या आठवणी असताना
मला सोबतीला का घ्यायचेय ? || ३ ||

तू नाही आता एकटी
मीही तुझ्या साथीला आहे
मृगजळ नाही तर
माझ्या प्रेमाचा वर्षाव आहे || ४ ||

म्हणुन खरे सांगतो तुला
मला हवीय सोबत तुझी
मी आहे फ़क्त तुझा
तू राहशील का माझी ? || ५ ||

तू नव्हतीस तेव्हा
जीवन माझे होते व्यर्थ
तुझ्या साथीमधेच माझ्या
जीवनाला आहे अर्थ || ६ ||

वाटणारी प्रत्येक गोष्ट .......

वाटणारी प्रत्येक गोष्ट
शब्दांत मांडता आली तर...
मनातली प्रत्येक भावना
बोलुन दाखवता आली तर...

तुझ्यावर प्रेम आहे,
हे सहज सांगता आलं तर..
तुझ्याशिवाय जगुच शकत नाही,
हे पटवुन देता आलं तर...

तुझी खुप आठवण येते
हे विसरुन जाता अलं तर....
तुझ्या पलिकडे सुध्दा आहे
हे जाणुन घेता आलं तर...

माझं सुध्दा अस्तित्व आहे,
हे समजुन घेता आलं तर...
तु फक्त माझीच आहेस,
हे तुला न सांगता कळलं तर..

तु अशिच जवळ रहा,
हे स्पर्शानं सांगता आलं तर...
तु जवळ नसतेस तेंव्हा,
तुझा स्पर्श जाणता आला तर..

किती बरं होईल,
जर मन वाचता अलं तर...
शब्दांपलिकडलं काही
तरीनजरेनच जाणता आलं तर...

हे सगळेच "तर" नाहीसे होतील
एकदाच म्हणालीस जर...
"मी सुखी होईन,
जर तु माझाच झालास तर..!"

तूच एक असशील ना ?

शब्दांत नाही सांगता येणार
डोळ्यांतुन समजुन घेशील ना ?

अस्वस्थ होइन मी जेव्हा
धीर मला देशील ना ?

माझ्याही नकळत दुखावले तुला तर
माफ़ मला करशील ना ?

ओघळले अश्रु माझे तर
अलगद टिपून घेशील ना ?

आयुष्याच्या वाटेवर एकटे वाटले तर
हात माझा धरशील ना ?

सगळे खोटे ठरवतील मला तेव्हा
विश्वास माझ्यावर ठेवशील ना ?

चुकतोय मी असे वाटले कधी तर
हक्काने मला सांगशील ना ?

हरवलो मी कुठे कधी जर
सावरून मला घेशील ना ?

कितीही भांडलो आपण तरीही
समोर आल्यावर सारे विसरून जाशील ना ?

मी आता विसरणे शक्य नाही तुला
तू मला लक्षात ठेवशील ना ?

जीव तयार आहे तुझ्यासाठी
गरज पडेल तेव्हा मागुन घेशील ना ?

मला तुझी गरज आहे, हे
न सांगता ओळखशील ना ?

आजवर तुझ्यासाठी काही नाही करू शकलो,
पण माझ्यासाठी एवढे एक करशील ना ?

तुझ्यासाठी मी कित्येकांपैकी एक असलो
तरी माझ्यासाठी..........
तूच एक असशील ना ?

तिच्या प्रेमात पडतांना

तिच्या प्रेमात पडतांना
तिला प्रेमात पाडायचं राहून गेलं
तोंड दुखेपर्यंत बडबडलो
पण हवं ते सांगायचं राहूनच गेलं.


तिनं माझ्या नजरेतून जग पाहिलं
तिच्या नजरेला नजर भिडवतांना
तिला डोळ्यात साठवायचं राहूनच गेलं.

तिच्या हाताचा, ओठणीचा,
स्पर्श हवाहवासा वाटतो
सांगेन तिला कधीतरी म्हणतांना
हा विषय काढायचं राहूनच गेलं.


हसत राहीलो, हसवत राहिलो
तिला दरवेळी, दर भेटीला.
तिच्या हसण्यामागचे अर्थ शोधतांना
माझ्या हसविण्याचा मतितार्थ सांगायचं राहूनचं गेलं.


ती आली की वेळही
उडून जायचा मला न समजता.
पण,
त्या दिवशी ती आली आणि निघाली
त्यावेळी तिला नेमकं अडवायचं राहून गेलं...

रडा-रड

मी उठायचो
ती बसायची
मी हसायचो
ती रुसायची
मी इंग्लिश ऐकायचो
ती मराठी गाणी ऐकायची
मी action पाहायचो
ती DDLJ मध्ये रमायची
मी perfume दिला तर
ती गजरा आन म्हणायची
गजरा हातात दिला तर
केसात माळ म्हणायची
माळता येत नाही म्हणालो की
माझ्यावर चिडायची
वैताग आहे नुसता म्हणालो कि
रड रड रडायची
रात्री मधेच उठून
ती चारोळीचा sms पाठवायची
आणि नेमका त्याच वेळेस
मला एकही ओळ नाही आठवायची
मी blank sms पाठवला कि
ती माझ्यावर जाम चिडायची
आणि मग दुसर्या दिवशी फोन न उचलून
मला दिवसभर पिडायची
त्या दिवशी मग मी
एकटा होऊन राहायचो
आली असेल तिची चारोळी
म्हणून सारखा फोन पाहायचो
दुसर्या दिवशी पहाटेच तिचा फोन
असे काही तरी घडायचे
चुकले रे माझे सख्या
असे म्हणून तिनेच परत रडायचे
अश्या रडा-रडीला
कारणांची कमी नसते
कोणत्या गोष्टीवरून होईल भांडण
याची कधी हमी नसते

प्रेम तुझं खरं असेल तर....

ही कविता म्हणजे, प्रेमात हताश, निराश झालेल्या एका प्रेमवीराला, त्याच्या
मित्रा कडून दिलेला सल्ला, नवी उमेध, नवी चेतना…….

प्रेम तुझं खरं असेल तर
जीव तुझ्यावर ओवाळेल ती
स्वत:च्याचं भावनांचं मन
शेवटी ती मारेल तरी कीती..

भावना तुझ्या शुद्ध असतील, तर
तीही त्यात वाहून जाईल
मनावर अमृत सरी झेलत
तीही त्यात न्हाहून जाईल..

विचार तुझा नेक असेल, तर
तीही तुझा विचार करेल
हृदयाच्या तिच्या छेडून तारा
सप्तसूरांचा झंकार उरेल..

आधार तुझा बलवान असेल, तर
तीही तूझ्या कवेत वाहील
मग, कितीही वादळं आलीत
तरी प्रित तुमची तेवत राहील..

आशा सोडण्या इतकं
जिवन निराशवादी नाही रे
तिला न जिंकता यावं इतकं
मानवी हृदय पौलादी नाही रे..

पण, मित्रा जर ती नाहीचं आली
तरीही तू हार मानू नकोस
तू तर प्रामाणिकपणे खेळलास
आयुष्याला जुगार मानू नकोस..

शेवटी आयुष्य हे वाहतचं राहतं
थांबत नाही ते कोणासाठी
घे भरारी पुन्हा गगनी
नव्यानं कुणीचा तरी होण्यासाठी.

एका मुलीने ने देवाला विचारलं...... प्रेम काय असत ?..........एक छोटीसी प्रेमकहाणी

एका मुलीने ने देवाला विचारलं प्रेम काय असत ?
देव म्हणाला

बागेतून एक फुल घेवून ये.

ती मुलगी फूल आणायला गेली ,

तिला एक फूल आवडल ,

पन तिला त्यापेक्षा सुंदर फूल हव होत ,

ती पुढे चालली गेली ,

पण तिला चांगल फूल नाही मिळाल ,

जेव्हा ती परत तेच फूल आणायला गेली ,

तेव्हा ते फूल तिथे नव्हत ,

तिला खूप पश्चाताप  झाला ,

तिने देवाला येऊन सांगितलं ,

तेव्हा देव म्हणाला , " हेच आहे प्रेम "

जेव्हा प्रेम तुमच्याजवळ असत .

तेव्हा त्याची कदर नाही करत ,

पण जेव्हा ते निघून जाते  तेव्हा कळते  ते काय असत ..!!

साग न तू .........विसरू शकतो मला.......?

श्वासात तर तुही वसतो माझ्या
तू ऐकतो म्हणून बोलतेय मी
तू नसला की हृदयाच्या
कप्या- कप्यात फक्त काळोख पाहते मी
साग न तू ,
विसरू शकतो मला.......?

तुझे अश्रू ओघाल्न्याआधीच
मला समजलंय तू भावूक आहेस
माझ्यासाठी ............
विसरण्याचा प्रयत्नही करू नकोस
हृदयाचे ठोके चुकतील माझ्या ही
साग न तू ,
विसरू शकतो मला.......?

चांदण्याच्या राती अलगद उचकी लागते
मग मी तुझ नाव घेते
नाव घेताच तुझ, मग ती ही शांत होते
मग माझ्या वेड्या मनाला मीच सागते
बघ तो .......
विसरू शकत नाही मला .....

पावूल पुढे पुढे टाकतेय
तुझ्या कडे येण्यासाठी
फुलली आहे जी कविता ती ऐकण्यासाठी
हृदयाची साद हृदयाला देण्यासाठी
साग न तू ,
विसरू शकतो मला.......?