एक रहस्य

जीवनात नाती तशी अनेकच असतात,
पण ती जपणारी लोक फार कमीच असतात......

काही नाती असतात रक्ताची,
तर काही हृदयाची......

काही नाती असतात जन्मो-जन्मीची,
तर काही.. ' काही क्षणापुरतीची '.......

काही नाती असतात,
केसांसारखी न तुटणारी,
पण वेळ आलीच तर वाकणारी.....

काही नाती असतात,
लांबुनच आपले म्हनणारी,
जवळ गेल्यावर मात्र दूर करणारी.....

काही नाती असतात,
पैशाने विकत घेता येणारी,
तर काही प्रेमाने आपलेसे करणारी......

काही नाती असतात,
न जोडता सुद्धा टिकणारी,
तर काही जोडून सुद्धा तुटणारी......

जीवनात नाती तशी अनेकच असतात....

म्हणुनच म्हणतात ना.....

" हे जीवन एक रहस्य आहे,
तिथे सर्व काही लपवावं लागतं....
मनात कितीही दुःख असले,
तरी जगा समोर हसावं लागतं...."

कपडे स्वच्छ ठेवून कधी, चिखलात पडता येत नाही

कपडे स्वच्छ ठेवून कधी, चिखलात पडता येत नाही
आरसा पुढे ठेवून स्वतः पासून दडता येत नाही

प्रेम आणि स्वात्यंत्र हे विरूध्दार्थी शब्द आहेत
पंखात पंख घालून कधी, गगनात उडता येत नाही

मनात जिद्द असेल तर "एव्हरेस्ट" सुद्धा पार होतो
मेलेल्या मनाला साधा, जिना चढता येत नाही

आयुष्य धरायला गेलात तर, चावतं एखाद्या कुत्र्यासारखं
पण पळून जाईल ह्या भितीने, त्याला सोडता येत नाही

पूल बांधा, धरण बांधा, कालवे काढा उपयोग नाही
जेव्हा तुम्हाला माणसाला, माणूस जोडता येत नाही

आले जर माझ्या डोळ्यात पाणी तर हारलो मी म्हणून दैव सुखावेल
म्हणूनच मला ईच्छा असून, मोकळं रडता येत नाही

डोळ्यातील अश्रू पडतात

डोळ्यातील अश्रू पडतात
तेव्हा त्यांचा आवाज होत नाहि
याचा अर्थ असा नाहि की
तु दुरावल्यावर मला दुःख होत नाहि





शब्दांनाहि कोड पडावं
अशीही काही माणस असतात
किती आपलं भाग्य असत
जेव्हा ती आपली असतात

कुणीच आपल नसतं
मग आपण कुणासाठी असतो
आपलं हे क्षणिक समाधान
इथ प्रत्येक जण एकटा असतो

डहाळीवरूण ओथंबणारे पावसाचे थेंब
उगाचच का अडकून बसतात
काहि क्षण फ़ाद्यांशी नातं जोडून
किती निष्ठूरपणे सोडून जातात

नजरेत जे सामर्थ्य आहे
ते शब्दांना कसे मिळणार
पण प्रेमात पडल्याशिवाय
ते तुम्हाला कस कळणार

जिवनात काहितरी मागण्यापेक्षा
काहितरी देण्यात महत्व असत
कारण मागितलेला स्वार्थ
अन दिलेलं प्रेम असतं

शब्दांनी कधितरी
माझी चौकशी केली होती
मला शब्द नव्हे
त्यामागची भावना हवी होती

स्वप्नातील पावलांना
चालणे कधी कळलेच नाहि
पाऊलवाट चांगली असली तरी
पाऊल हे वळलेच नाही

अस्तित्वाची किंमत
दूर गेल्याशिवाय कळत नाही,
सगळ कळतय मला
पण तुला सोडून दुरही जाववत नाही.......

आकाशी 'चांदणे' होते

ते हताश येथे झाले,बेकारीच्या नांदीने
खुणविले तयांना तेथे, चरीतार्थाच्या संधीने
परदेशी म्हणुनी गेले, ते सात समुद्रापार
आपुली ती मायभूमी अन आपुले सोडूनी घरदार
त्या अनोळखी भूमीवर ओळखीचे काही न्हवते,
परी नित्य ओळखीचे आकाशी 'चांदणे' होते.
सारेच निराळे होते,अन तऱ्हा तेथली आगळी
गतिमान जीवनापुढती, माणसे धावती सगळी
ते निटनेटके रस्ते, स्वच्छता पाहण्याजोगी
हिरवळहि भासे तिथली, ती चैन विलासी भोगी
हिरवाईत पण तुळशीचे एकले रोपही न्हवते
परी नित्य ओळखीचे ते आकाशी 'चांदणे' होते.
आपुलेपण दाखविणारा, न्हवता तेथे शेजार
आपुल्या मातीची याद, करी त्यांना नित बेजार
भासला किती समृद्ध, जरी नवा देश हा न्यारा
तरी आता आठवे आपुली, धरती अन तिथला वारा
'INSTANT' खावया सारे,परी पुर्णब्रम्ह ते न्हवते
परीनित्य ओळखीचे आकाशी 'चांदणे' होते &a mp;n bsp;
मनी येता आठव घरचा, नित दृश्य विसावे नजरी
ते आपुले प्रिय घरकुल ,अन माय तयातील हसरी
गारठ्यात आणण्या उब, कृत्रिम तिथे उपकरणे
ना तिथे उब मायेची, ना मायेचे पांघरणे
धनप्राप्तीच होती जमेला, ममतेचे कुणीच न्हवते
परी नित्य ओळखीचे आकाशी 'चांदणे' होते.

आठवण माझी कधीतरी येईलच तुला

आठवण माझी कधीतरी येईलच तुला
तु कदाचीत रडशीलही
हात तुझे जुळवुन ठेव तु
सगळी आसवं तुझी त्यात सामावतील
जो थांबला तुझ्या हातावर
नीट बघ त्याच्याकडे
एकटाच राहीलेला तो थेंब मीच असेन ..!

माझ्या आठवणी एखदयाला
सांगताना तु कदाचीत हसशीलही
जो थांबेल तुझ्या ओठावर येता-येता
नीट वापर त्याला
अडखळलेला तो शब्द मीच असेन ..!

कधी जर पाहशील पौर्णिमेच्या तु चंद्राला
त्याच्या तेजाला तु निखरत राहशील
मध्येच गर्द काळ्या ढगांनी जर त्याला घेरलं
नीट बघ त्याच्याकडे घेरलेला तो ढग मीच असेन ..!

कधी जर सुटला बेधुंद गार वारा
मोहक डोळे तुझे मिटुन तु घेशील
मध्येच स्पर्शली तुला
जर उबदार प्रेमळ झुळुक
नीट बघ जाणवुन ती झुळुक मीच असेन .

हो ..... मलाही !

तिला ठाऊक होतं ...त्याचं आपल्यावर अतोनात प्रेम आहे
तिचंही होतंच, कदाचित त्याच्यापेक्षा जास्तच !
दोघंही प्रेम करत होते एकमेकांवर जीवापाड ...
दोघांना ही होती मनापासून याची जाणीव ...
त्यालाही काही विचारायचं होतं ,
तिलाही काहीतरी बोलायचं होतं ,
पण ... दोघांनी सारं मनातच ठेवलं होतं !
शेवटी तिला सुचली एक कल्पना ...
नेहमीप्रमाणे भेटले दोघे एकदा एकांतात ...
ती लाडात येऊन म्हणाली ,
काल मला एक स्वप्नं पडलं ...
स्वप्नात कोणीतरी मला propose केलं ...
" will you marry me ? "
त्याने न राहवून विचारलं, मग उत्तर काय दिलंस ?
ती म्हणाली " हो शिवाय दुसरं काही सुचलंच नाही "
त्याने उत्सुकतेने विचारलं " कोण होता ? सांगशील का ? "
ती लाजून म्हणाली " वेड्या ! तूच , आणखी कोण ? "
तो खूश झाला, तिचा चेहरा आपल्या हातात धरून म्हणाला
" खरंच ? माझ्या प्रश्नाचं उत्तर मला मिळालं "
ती गालातल्या गालात हसली ... आणि म्हणाली
" हो ..... मलाही ! "

कथा सुकलेल्या गुलाबाची

ही कथा आहे , एका 'त्या'ची , एका 'ति'ची,
आणि , हसरया , खेळत्या , ताज्या , टवटवीत गुलाबाची.

तो तिला पहायचा , आणि सारं जग विसरायचा,
ती सुद्धा त्याला पहायची , पण न पाहिल्यासारखं करायची.

बसमधल्या गर्दीत सुद्धा ती त्याला सहजपणे दिसायची,
बसमधल्या गर्दीत सुद्धा , ती , त्याला दिसेल , असंच बसायची.

कॉलेजमधल्या गलक्यामध्ये त्याला फक्त तिचाच आवाज ऐकू यायचा,
चोरट्या नजरेतून तिनं टिपलेल्या त्याच्या नजरेतल्या भावना तिला समजायच्या.

गर्दीतल्या प्रत्येकीच्या चेहऱ्याची जागा तिच्या चेहऱ्यानं घेतली,
ती नसतानाही तिथं , हळूच त्याच्याकडं बघून हसू लागली.

पुरे झालं मौनव्रत , बस्स झालं आता,
तिचाच विचार करून करून भणभणउ लागला माथा.

आणि एक दिवस त्यांना मनाशी पक्का निश्चय केला,
बागेतल्या गुलाबंपैकी एक गुलाब कमी झाला.

हातात गुलाब , मनात निश्चय , आणि छातीत ढोल बडवत तो निघाला,
पण , बंद पडली शब्दांची factory पाहताच समोर तिला.

' माझ्या हातातल्या गुलाबाचा अर्थ तिला उमजेल काय ?
शब्दांविना डोळेच तिला ह्याचा अर्थ समजावतील काय ? '

तिच्या डोळ्यांनी हेरला अर्थ त्याच्या डोळ्यांचा,
पण , शब्द बाहेर पडले , " गुलकंद छान होतो ह्याचा ! "

त्याचा अर्थ त्याला समजल्यावर शब्दही दचकले,
आजूबाजूचे सारे जग पोट धरून हसू लागले.

त्याच्याच शब्दांनी दगा दिला त्याला ,
हातातला गुलाब नाहीसा कधी झाला , समजलंच नाही त्याला.

तो आजही तिला गर्दीत शोधात राहतो,
असली तर दिसते , नसली तर पूर्वीप्रमाणे हळूच हसते

तो मान खाली घालून जातो , समोरून जाताना बागेच्या,
तो दिसताच गुलाब ओरडतात , " गुलकंद छान होतो आमचा ! "

हि कथा होती त्याची , तिची आणि ........
आणि एका हसऱ्या , खेळत्या , पण आता सुकलेल्या , तिच्या पुस्तकात जपून ठेवलेल्या , गुलाबाची .......

पहिला दिवस...!

अजूनही आठवतोय मला तो पहिला दिवस...!
ज्या दिवशी आम्ही दोघे पहिल्यांदा भेटलो होतो..!

तिला भेटण्याच्या अतुर्तेमध्ये मला त्या
आदल्या रात्री झोओप आली नाही

कधी एकदाची ती रात्र संपते... आणि
सकाळ होते.. आणि कधी एकदाचा
मी तिला भेटायला जातोय असं मला झाले होते.!

सकाळ झाली मी उठलो, अघोळ केली..!
फुटलेल्या आरशा समोर उभा राहून

जुना पण,स्वच असा ड्रेस मी घातलेला होता..!
केस व्यवसित करून तयार झालो.

आदल्या दिवशी मित्राकडून,
आणलेली सेंट ची अर्धी बॉटल मी,
माझ्या कपड्यावर ओतली.

तेवढ्यातच आई ने आवाज दिला,
नाश्ता तयार आहे खावून जा.,

आईला मला नाश्ता नको असे,
बोलत मी खिशामध्ये हाथ घातला,
बघतो तर काय माझाकडे,
फक्त २ नच रुपये होते,

मी आईला कॉलेजची फी भरण्यासाठी ,
५० रुप्ये मागितले तर तिने नकार दिला,

मी तसाच निराश होवून निघालो,
जाता जाता शेजाऱ्यांच्या बागेतील,
एक लाल गुलाबाचे फुल चोरून घेतले.

कधीही लवकर कॉलेजला न जाणारा मी,
आज मात्र सगळ्याच्या अगोदर आलो होतो.

तिला भेटण्याचा एक एक क्षण,
जवळ जवळ येत होता तस-तशी,
माझा मनातली भीती वाढतच जात होती,

पण आज मी निचय करूनच आलो होतो की,
आज तिला विचारल्याशिवाय जायच नाही.

सकाळचे ८ वाजले ती ठरलेल्या वेळेप्रमाणे आली,
नि माझा समोर येवून उभी राहिली.

मी घाबरत घाबरत तिला गुड मोर्निंग बोललो,
तिने पण मला गुड मोर्निंग केले.
तेव्हा कुटे तरी मला थोडेसे बरे वाटले,

नंतर मी तिला बोललो ,
मला तुला काही तरी सांगायचे आहे,

ती लाजत लाजत बोली "बोल"
मी डोळे मिटून धीर धरून तिला
आय लव यु ...! म्हटलं.

तसं तिने खाली वाकून sandal,
पकडणार एवढ्यातच मी तीचापासून,
दूर अंतरावर गालावरती हाथ ठेवून उभा, राहिलो

पण ती sandal ची पट्टी लावत ,
मला सेम टु यु...!!! म्हणाली.

ही कथा आहे , एका 'त्या'ची , एका 'ति'ची

ही कथा आहे , एका 'त्या'ची , एका 'ति'ची,
आणि , हसरया , खेळत्या , ताज्या , टवटवीत गुलाबाची.

तो तिला पहायचा , आणि सारं जग विसरायचा,
ती सुद्धा त्याला पहायची , पण न पाहिल्यासारखं करायची.

बसमधल्या गर्दीत सुद्धा ती त्याला सहजपणे दिसायची,
बसमधल्या गर्दीत सुद्धा , ती , त्याला दिसेल , असंच बसायची.

कॉलेजमधल्या गलक्यामध्ये त्याला फक्त तिचाच आवाज ऐकू यायचा,
चोरट्या नजरेतून तिनं टिपलेल्या त्याच्या नजरेतल्या भावना तिला समजायच्या.

गर्दीतल्या प्रत्येकीच्या चेहऱ्याची जागा तिच्या चेहऱ्यानं घेतली,
ती नसतानाही तिथं , हळूच त्याच्याकडं बघून हसू लागली.

पुरे झालं मौनव्रत , बस्स झालं आता,
तिचाच विचार करून करून भणभणउ लागला माथा.

आणि एक दिवस त्यांना मनाशी पक्का निश्चय केला,
बागेतल्या गुलाबंपैकी एक गुलाब कमी झाला.

हातात गुलाब , मनात निश्चय , आणि छातीत ढोल बडवत तो निघाला,
पण , बंद पडली शब्दांची factory पाहताच समोर तिला.

' माझ्या हातातल्या गुलाबाचा अर्थ तिला उमजेल काय ?
शब्दांविना डोळेच तिला ह्याचा अर्थ समजावतील काय ? '

तिच्या डोळ्यांनी हेरला अर्थ त्याच्या डोळ्यांचा,
पण , शब्द बाहेर पडले , " गुलकंद छान होतो ह्याचा ! "

त्याचा अर्थ त्याला समजल्यावर शब्दही दचकले,
आजूबाजूचे सारे जग पोट धरून हसू लागले.

त्याच्याच शब्दांनी दगा दिला त्याला ,
हातातला गुलाब नाहीसा कधी झाला , समजलंच नाही त्याला.

तो आजही तिला गर्दीत शोधात राहतो,
असली तर दिसते , नसली तर पूर्वीप्रमाणे हळूच हसते

तो मान खाली घालून जातो , समोरून जाताना बागेच्या,
तो दिसताच गुलाब ओरडतात , " गुलकंद छान होतो आमचा ! "

हि कथा होती त्याची , तिची आणि ........
आणि एका हसऱ्या , खेळत्या , पण आता सुकलेल्या , तिच्या पुस्तकात जपून ठेवलेल्या , गुलाबाची .......

सुंदर मुलीशी ऒळख व्हावी

सुंदर मुलीशी ऒळख व्हावी

सुंदर मुलीशी ऒळख व्हावी,
आम्हा दोघांची मने जुळावी ।
हातात हात घालून फ़िरणारी,
मलाही girl friend मिळावी ॥

हास्याच्या पहिल्या किरणाने,
प्रितीची खळी उमलावी ।
डोळ्यात जिच्या ऐश्वर्य असावे,
रूपाची ती राणी असावी ॥
अशीच माझी स्वप्नसुंदरी,
ह्र्दयाच्या नगरात रुळावी ।
हातात हात घालून फ़िरणारी,
मलाही girl friend मिळावी ॥

चौपाटीवर पाणीपूरीतून,
प्रणयाचेच घास भरवू ।
रिक्षात मीटरला साक्षी मानून,
प्रेमाच्याच शपथा घेऊ ॥
आयुष्यातील सारी दु:खं,
जिच्या सहवासात टळावी ।
हातात हात घालून फ़िरणारी,
मलाही girl friend मिळावी ॥

द्वीधा मनं मग मध्येचं म्हणत,
आधी girl की आधी friend ।
आयुष्यभराचं नातं हवं,
देव करो तीच्याकडूनचं,
प्रेमाची ख्ररी व्याख्या कळावी ।
हातात हात घालून फ़िरणारी,
मलाही girl friend मिळावी...!

माझ्या या नजरेची भाषा तुला कळता कळेना

माझ्या या नजरेची भाषा तुला कळता कळेना,
काय चाललाय हा खेळ मन जुळता जुळेना,
माझ्या या वेड्या मनाला वेड का तुझे लागावे,
तू होणार नाहीस माझी या वेड्या मनाला कुणी सांगावे,

तू आहेस माझी स्वप्न परी,
नाही भाळलो फक्त तुझ्या रुपावरी,
फुलनार्या फुलाला घेऊन जाईल कुणीतरी,
मी मात्र तसाच राहील वार्यावरी,

येतील तुझ्या आठवणी एक एक करूनी,
ढाल हास्याची करूनी मन जळतय आतुनी,
फुलांचा गंध साठवून ठेवते मधुराणी,
तसाच तुझ्या प्रीतीचा गंध ठेवला आहे जतुनी,

माझ्या या नजरेची भाषा तुला कळता कळेना,
काय चाललाय हा खेळ मन जुळता जुळेना,
माझ्या या वेड्या मनाला वेड का तुझे लागावे,
तू होणार नाहीस माझी या वेड्या मनाला कुणी सांगावे...!!!

मन हे चंचल, मन हे निर्मल

मन हे चंचल, मन हे निर्मल

तु मला आवडतेस.

तु मला आवडतेस


तु मला आवडतेस
ही कविता असेल असे मलाही वाटत नाही, आणी याला कोणी कविता म्हणावी अशी
माझी इच्छाही नाही. हे नुसतेच जुळलेले शब्द आहेत, भावना दर्शवण्यासाठी
एकत्र जमलेले. तुम्हास शब्दांपलीकडचे वाचता आले तर तुमची जीत, पण आवडली
नाही तर माझी हार.


तु मला आवडतेस.
नाही !
मी प्रेम करत नाही तुझ्यावर !
पण होय तु मला आवडतेस.
याचा अर्थ असा नाही की मी तुझ्यावर प्रेम करतो.
मला कोणाचं बोलणं आवडतं, कोणाचं चालणं.
कोणाचे डोळे आवडतात, तर कोणाचं हसणं.
याचा अर्थ असा नाही कि मी त्या सा-यांवर प्रेम करतो.
कारण, आवड नी प्रेम यात फरक आहे.
आवड मर्यादीत.
म्हणुनच त्याला विशेषणांची गरज आहे.
उगाच का म्हणतो आपण,
थोडं आवडतं जास्त आवडतं.
कधी म्हणताना ऎकलंय ?
माझं थोडंसच प्रेम होतं !

पण प्रेम ? प्रेम म्हणजे?
आयुष्यभर एखाद्याची सोबत करावीशी वाटणं,
आयुष्याच्या टोकापर्यंत त्याच्या सोबत चालणं !
मग वाट कशीही असो,
काट्याकुट्यांची वा मखमलीची, त्यात अंतर नाही.
आणी तुझ्या सोबत आयुष्य वाटुन घ्यावं
असंतर मला कधीच वाटलं नाही.
म्हणुनच म्हणलोना,
मी तुझ्यावर प्रेम करत नही.
पण, तु मला आवडतेस.
तु मला आवडतेस, तुझ्या दिसण्यामुळं !
नव्हे.. तर तुझ्या असण्यामुळं.
होय, तुझ्या असण्यामुळं.
नुसतं असण्यामुळं म्हणण्यापेक्षा.
सोबत असण्यामुळं.
हे जास्त बरोबर आहे.
बस्स ! अशीच सोबत रहा.
कारण
तु मला आवडतेस

एकदा तरी आयुष्यात कुणी असे भेटावे

एकदा तरी आयुष्यात कुणी असे भेटावे,
ज्याला आपल्या मनातले सर्व काही सांगावे,
सांगता सांगता आयुष्य पूर्ण सरुन जावे,
आणि सर्तानाही आयुष्य पुन्हा पुन्हा जगावे........

एकदा तरी आयुष्यात कुणी असे भेटावे,
ज्याला घेऊन सोबतीने खूप खूप चालावे,
चालता चालता दूरवर खूप खूप थकावे,
पण थकल्यावरही आधारसाठी तीच्याकडेच पहावे........

एकदा तरी आयुष्यात कुणी असे भेटावे,
दुख तीचे आणि अश्रू माझे असावेत,
सोबतीने तीच्या खूप खूप रडावे,
आणि अश्रूंच्या हुंदक्यात सर्व दुख विरून जावे.........

एकदा तरी आयुष्यात कुणी असे भेटावे,
आनंद त आणि हसू माझे असावे,
तीच्यासाठी मी जगतच राहावे, जगतच राहावे,
आणि तीच्यासाठी जगतानाच आयुष्य संपून जावे.......

एकदा तरी आयुष्यात कुणी असे भेटावे,
ज्याच्या सोबतितल्या प्रत्येक क्षणाने सुखवावे,
उन्हात तीने सावली तर पावसात थेंब व्हावे,
आणि मायेच्या थेंबानी मी चिंब भिजून जावे...........

एकदा तरी आयुष्यात कुणी असे भेटावे,
सूर तीचा आणि शब्द माझे असावे

तुझी चांदण्याची हौस.

काळ्या कुट्ट आकाशात
चांदण्याचा सडा पडला होता..
माझ्या सोबत चालताना
तुला तो नक्षत्राचा तारा आवडला होता..

मनात आलं माझ्या..
अन वाटल की
तु म्हणावस मला..
तो तारा घेवून ये माझ्या राजा..

कदाचित माझ्या मनातलं
तुला अचुक कळत होतं..
तुझ न माझ प्रेम ..
किती तंतोतंत जुळत होत..

तु हसून म्हणालीस
घेवून येशील का रे ते तारे..
मी म्हणालो कठीण आहे पण
प्रयत्नाचे घालीन वारे..

तुझ्यासाठी वेडा झालो,
चांदण्याशी संवाद करायला निघालो
तु मात्र मला हसत होती
काय चाललय तुझ म्हणून विचारत होती..

मी विचारले चांदण्याना
माझ्या साजनीच्या केसात
सडा पडेल का तुमचा..

त्या म्हणाल्या का नाही?
पण एक अट आहे..
मी म्हणालो माझ्या साजनी साठी
मरणासमोर सुध्दा माझी मान ताठ आहे..

आम्हाला तु हवाय ..
येशील का?
तुझ्या साजनीला विचार ..
आमच्या प्रेमाला ह्याच्यासारख जपशील का..

तेवढ्यात माझी साजनीच्या
डोळ्यातून अश्रू धारा वाहू लागल्या
त्या आवरताना माझ्या पापण्यांच्याही
कडा ओलसर होऊ लागल्या

मला काही नको
तारा नको चांदण्या नको
मला फक्त तु पाहिजे..

आयुष्य असं जगायच असतं,

आयुष्य असं जगायच असतं,



जे घडेल ते सहन करायचं असतं,




बदलत्या जगा बरोबर बदलायच असतं,




कुठून सुरू झालं हे माहीत नसलं तरी कुठेतरी थांबायच असतं,




कुणासाठी काही तरी निस्वार्थ पणे करायचं असतं,




स्वत:च्या सुखा पेक्षा इतराँना सुखवायचं असतं,




दु:ख आणि आश्रूनां मनात कोंडून ठेवायच असतं !

मैत्रीण

मैत्रीण

एक तरी मैत्रीण अशी हवी
जरी न बघता पुढे गेलो तरी
मागून आवाज देणारी
आपल्यासाठी हसणारी
वेळ आलीच तर अश्रुही पुसणारी
स्वतःच्या घासातला घास
आठवणीने काढून ठेवणारी
वेळप्रसंगी आपल्या वेडया मित्राची
समजूत काढणारी
वाकडं पाऊल पडताना मात्र
मुस्काटात मारणारी
यशाच्या शिखरांवर
आपली पाठ थोपटणारी
सगळ्यांच्या गलक्यात
आपणास सैरभैर शोधणारी
आपल्या आठवणीनं
आपण नसताना व्याकूळ होणारी
खरचं ! अशी एक तरी जीवा भावाची
'मैत्रीण' हवी जी आपणास मित्र
म्हणवणारी

सांगांयच होत बरच काहि

सांगांयच होत बरच काहि,
धाडस मात्र झाल नाहि.
मनात लपलेल प्रेम माझ
ओठांवरति आलच नाहि

तुझ्या कडे पहाताना
दिवस संपला कळलाच नाहि
तु दुर जातना,थांबवयच
धाडस झालच नाहि.

दुस~याचि तु होतना,
शब्दच मला सुचले नाहि
अव्यक्त माझे प्रेमं मला
व्यक्तच करता आले नाहि...

पहिल्याच भेटीत माझे हृदय मी तुला दिले

पहिल्याच भेटीत माझे हृदय मी तुला दिले
हृदयातच नव्हे तर मनासुद्धा तुलाच बसविले
परंतू खरच प्रेमात मला फ़क्त फ़सविले
कधी न रडणार मी, पण मला तू रडविले

फ़ुलात मी खेळून होतो काट्यात मला टाकायचे होते का?
प्रेमाच्या या सुंदर जगात मला दु:ख द्यायचे होते का...

माझे तुझ्यावर प्रेम होते, आहे, आणि यापुढेही असणार
पण एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्याशिवाय ते कुणावरहि नसणार
माझी तर तू झाली नाहिस, पण आता मीही नाही कुणाचा होणार
आणि खरच प्रेम करण्याची शिक्षा मला नक्कीच मिळणार

फ़क्त एकच प्रश्न करतो,
खरच मला तुझ्यावर प्रेम करायला हवे होते का?
प्रेमाच्या या सुंदर जगात मला दु:ख द्यायचे होते का.?