मनातल सार पुन्हा कागदावर गिरवल
तीचासाठी मनात बरच काही ठरवलं
पण तिने अजून काहीच नाही कळवलं
मनाला दुसरीकडे बरंच रूळवल
पण ते कोनाच्याने अडवलंय
पुन्हा तिच्या आठवणीत ते डुबल
जणु मासं पाण्यावाचून तरफडल
स्पेशल फोर मराठा......
तलवारीची जागा आता Android ने घेतली,
त्या नादातच आजकालची कारटी ऊशिरा झोपली...
माहीत नाही शहाजीराजे कोण,जिजाऊ कोण,
मात्र प्रत्येक हातात Latest आय फोन....
पुस्तकाची PDF झाली,
रोज वेगळा BF
अन रोज नवी GF आली...
प्रगती होतेय सांगत
घडणारी / बिघडणारी
नवीन Online पिढ़ी आली...
अंगठे दुखतायत आता Type करून
माणसं भेटतायतं आता Skype वरुन...
पाहुण्यांना भेटणं,पत्र लीहिणं जुनं झालं आता,
काका,Plzz ज़रा तुमचा Email ID देता...
मॉर्निंग Walk कधीचाच बंद झालाय,
Android Market मध्ये Temple Run जो आलाय...
व्हर्चुअल जमान्यात लांबचे सगळे झाले 'Connected',
पण शेजारधर्म 'Was Totally Disconnected'...
आई वडिलांचे संस्कार सुद्धा Download केले जातील आता,
'देव देव' काय करता, पूजा करायचं पण App आलाय आता....
या 'Technology' मागे पळता पळता,
लोकांनी पळणंच बंद केलय आता....
विसरले सारे चव आईच्या भाजीची, अन्
शुर गाथा शिवऱायानची .
साथ पसरलीय सावध रहा
Latest आलेल्या 'Technology' ची...
तुळशी" ची जागा आता "Money Plant" ने
घेतलीय...!!
"काकी" ची जागा आता Aunt ने घेतलीय...!!
वडील जिवंतपणिचं"डैड" झाले,
अजुन बरचं काही आहे
आणि तुम्ही आत्ताचं Glad झाले....??
भाऊ "Bro" झाला आणि बहीण "Sis"...!!
दिवसभर मुलगा CHATTING च नाही करत,
तर रात्री झोपताना Mobile वर SETTING पण करतो...!!
दुध पाजणारी आई, जिवंतपणीचं "Mummy"
झाली...!!
घरची भाकरं आता कशी आवडणार हो... ५ रु. ची Maggi
आता किती"Yummy" झाली...!!
माझा मराठी माणूसच मराठी ला विसरू लागलाय....
बघा जमल्यास विचार करुन
रामायण घडले |महाभारत घडले |
त्यांना कारणीभूत |होते कुजके शब्द ||
म्हणून शब्द जपावा |शब्द पुजावा |
शब्द पुसावा |बॊलण्या आधी ||
घासावा शब्द |तासावा शब्द |
तोलावा शब्द |बोलण्या पूर्वी ||
शब्द हेचि कातर |शब्द सुईदोरा |
बेतावेत शब्द |शास्त्राधारे ||
बोलावे मोजके |नेमके ,खमंग ,खमके |
ठेवावे भान |देश ,काळ ,पात्राचे ||
बोलावे बरे |बोलावे खरे |
कोणाच्याही मनावर |पाडू नये चरे ||
कोणाचेही वर्म |व्यंग आणि बिंग |
जातपात धर्म |काढूच नये ||
थोडक्यात समजणे |थोडक्यात समजावणे |
मुद्देसुद बोलणे |हि संवाद कला ||
शब्दांमध्ये झळकावी |ज्ञान ,कर्म ,भक्ती |
स्वानुभवातून जन्मावा |प्रत्येक शब्द ||
शब्दां मुळे दंगल |शब्दां मुळे मंगल |
शब्दांचे हे जंगल |जागृत राहावे ||
जीभेवरी ताबा |सर्वासुखदाता |
पाणी ,वाणी ,नाणी |नासू नका ||
आज म्हटलं आयुष्य विणायला घेउया
जमतंय का ते बघुया
वाटलं अगदी सोपं असेल!
रंगसंगती जमून आली की आयुष्यही सुंदर दिसेल!
प्रश्न पडला धागे कोणकोणते घ्यायचे
एक दोनच की सगळेच वापरायचे!!
मग ठरवलं फक्त छान छानच धागे घेऊ
एक काय दोन काय सगळेच एकमेकांत विणू !
सुरुवात केली वात्सल्याच्या धाग्याने
धागा होता फार उबदार आणि मुलायम
म्हटलं छान आहे हा धागा
धाग्याने ह्या विण राहील कायम!
मग घेतला मैत्रीचा धागा
म्हणता म्हणता ब-याच भरल्या जागा!
थोडं थोडं आयुष्य आकार घेऊ लागलेलं
पण अजूनही बरंचस विणायचं बाकी रहिलेलं!
एक एक धागा आशेचा, सुखाचा आणि आनंदाचा घेतला!
प्रत्येक धाग्यात तो आपसूकच गुंफत गेला!
हळू हळू विण घट्ट होत होती
तरीदेखील कसली तरी कमी मात्र होती!
मग घेतला एक नाजुक प्रेमाचा धागा
धागा होता सुंदर आणि रेशमी
धाग्याने त्या आयुष्याला
अर्थ आला लागुनी!
एक एक घेतला धागा
यशाचा, कीर्तीचा आणि अस्तित्वाचा
आयुष्याला त्यामुळे एक नवा
उद्देश्य मिळाला!
सगळेच धागे छान, सुंदर आणि प्रसन्न होते!
तरीदेखील त्यांच्यातल्या एकसारखीपणाने मन मात्र खिन्न होते!
थोड़े धागे पडले होते
निवांत बसून असेच!
म्हटल बघुया तरी ह्यांच्यामुळे
आयुष्य होतंय का सुरेख!
मग घेतला एक धागा दुःखाचा एक निराशेचा
एक धागा अपयशाचा आणि एक धागा पराजयाचा!!
हे चारही धागे विणता एकमेकांमधे
आयुष्याला खरा अर्थ लाभला त्यांच्यामुळे!
अपयशाशिवाय यश नाही
दुःखाशिवाय सुख नाही!
पराजयाशिवाय जय नाही
आणि निराशेशिवाय आशा नाही!
महत्व पटलं आहे सर्व धाग्यांच आज मला
सुंदर सुंदर धाग्यांनीच फक्त मजा नसते आयुष्याला!
साध्या सुध्या लोकरीच्या विणकामातही
रंगसंगती ही लागतेच!
मग आयुष्य विणतानाच
आपल्याला भीती का वाटते?
सर्व धागे एकमेकांत विणूनच
एक परिपूर्ण आयुष्य बनतं!
कुठला धागा कुठे,
कसा वापरायचा
हे मात्र ज्याचं त्याच्यावर असतं !!