मराठी उखाणे भाग १२

कुत्र्यात कुत्र अल्सेशिअन कुत्र, …. नी माझ्या गळ्यात बांधले मंगळ्सूत्र

पावाबरोबर खाल्ले अमूल बटर, …. चे नाव घ्यायला अडलय माझ खेटर

रेशमी सदर्‍याला प्लास्टीकचे बक्कल, …. ना आहे टक्कल, पण डोक्यात नाही अक्कल

रेडिओ मीर्ची एकते कानात हेडफोन टाकून
…. रावांना मिस कॉल देते १ रुपया राखून

मराठी उखाणे भाग ११

चांदीच्या ताटात जिलेबीचे तुकडे, घास भरवते मरतुकड्या, थोबाड कर इकडे

सचीनच्या बॅटला करते नमस्कार वाकून, …. चे नाव घेते पाच गडी राखून

एक होती चिऊ एक होती काऊ, …. चे नाव घेते , डोक नका खाऊ

लग्नाच्या पंक्तीत घेतला उखाणा खास, अन …. च्या घशात अडकला घास

मराठी उखाणे भाग १०

दुधाचे केले दहि, दह्याचे केले ताक,
ताकाचा केला मठ्ठा, …. चे नाव घेतो …. रावान् चा पठ्ठा

सासऱ्याच्या मांडवात पंचपक्वांनाच्या राशी,
पोट्टे पाट्टे जेवुन गेले, जावई राहीला उपाशी.

वड्यात वडा बटाटा वडा, XXXX रावांनी मारला खडा म्हणून जमला आमचा जोडा

अत्रावळ पत्रावळ , पत्रावळीवर होती वान्ग्याची फोड
…. हसतात गोड, पण डोळे वटारायची भारीच खोड्

मराठी उखाणे भाग ९

सकाळी सकाळी बागेत तोडत होते काळ्या
….रावांचे दात म्हणजे दुकानातल्या फळ्या

महादेवाच्या पिंडी समोर उभा आहे नंदी, महादेवाच्या पिंडी समोर उभा आहे नंदी
XXXX रावांचे नाव घेते, आयताचे क्षेत्रफळ – लांबी गुणिले रुंदी

चांदीच्या किचन मध्ये सोन्याच्या ओटा
XXXX चे नाव घेते, केसात माझ्या हजार पाचशेच्या नोटा

तिच्याकडे मोबाईल नव्हता म्हणून त्याने दिला LAVA
तिच्याकडे मोबाईल नव्हता म्हणून त्याने दिला LAVA
नंतर ती त्याला फोन करून म्हणते, “धन्यवाद भावा”

निळे निळे डोंगर आणि हिरवे हिरवे रान
XXXX रावांचा आवडता छन्द म्हणजे सतत मदिरापान

सप्तपदीच्या या वाटेवर मी नेहमीच तुला साथ देईन
तुझ्यासाठी एखादा शर्ट घेताना माझ्यासाठीही दोन साड्या आणि चार ड्रेस घेईन

पौर्णिमेच्या चंद्राची वाट पाहते रजनी
…. चे नाव घेते मी त्यांची साजणी

अंगणात लावली फुलझाडे, कुंडीत लावली तुळस
…. चे नाव घ्यायला कसला आलाय आळस?

तेलाच्या दिव्याला तुपाची वात
XXXX रावांशी केले लग्न, आता आयुष्याची वाट

काश्मीरहून आणलाय रेशमी सुंदर रुमाल
…. बरोबर असले की हवाय कशाला हमाल

रंगीत सुंदर हरणाचे फेगडे फेगडे पाय
… राव आजून नाही, कुठे पडले की काय?

मराठी उखाणे भाग ८

सोन्याचे मंगळसूत्र सोनाराने घडविले,
…. रावांचे नाव घ्यायला सगळ्यांनी अडविले

 चंद्राच्या महालात रोहिणीची चाहूल,
XXXX रावांच्या जीवनात टाकते मंगलमई पाऊल.

शुभमंगल प्रसंगी अक्षदा पडतात माथी
XXXX राव म्हाजे माझ्या जीवनसाथी

मराठी उखाणे भाग ७

मंगळसूत्राच्या दोन वाट्या सासर माहेरची खूण,
…. रावांचे नाव घेत …. ची सून

 फुल आहे गंध भाव आहे अंतरी,
…. रावांसह चालले सात पावलांवरी

लग्नासारख्या गोड दिनी आज्ञा कशी मोडू
XXXX रावांना घास देताना मला येई गोड हसू

 फुलासंगे मातीस सुवास लागे,
…. राव आणि माझे जन्मो जन्माचे धागे

 तु्ळजा भवानीची कृपा आणि खंडोबाचा आशिर्वाद
माहेरचे निरांजन आणि सासरची फूलवात
…. रावांचे नाव घेउन करते संसाराला सूरवात

मराठी उखाणे भाग ६

गुलाबाच्या झाडाला कळ्या येतात दाट
….  व घेते सोडा माझी वाट

माझ्या जीवनरुपी अंगणात काढीन रांगोळीच्या सुबक रेषा
…. रावांनीनी त्यात विविध रंग भरावे हीच माझी मनिषा

 मंगळसुत्रातील दोन वाटया सासर आणि माहेर
…. रावांनी दिला सौभाग्याचा आहेर

 बारिक मणी घरभर पसरले, …. रावांसाठी माहेर विसरले

राजहंसाच्या पिल्लास चारा हवा मोत्याचा
…. रावांचे नाव घेते आशीर्वाद द्यावा सौभाग्याचा

प्राजक्ताच्या फुलांनी भरले आंगण
…. रावांचे नाव घेऊन सोडले कंकण

मराठी उखाणे भाग 5

अर्जुनाला श्रीकृष्णाने केलेल्या उपदेशातून निर्माण झाला ग्रंथ गीता
…. रावांचे नाव घेऊन येते मी आता

चिवड्यात घालतात खोबऱ्याचे काप
…. रावां समवेत ओलांडते माप

लग्न मंडपामध्ये पसरले सनईचे मंजुळ सूर
…. च्या साठी माहेर केले दूर

सासरच्या निरांजनात तेवते माहेरची फुलवात
…. च्या बरोबर आ संसाराला करते सुरवात

माहेरची नाती जणू रेशमाच्या गाठी
रेशीमबंध सोडून सासरी आले …. च्या साठी

मेंदीने रंगले हात, दागिन्यांचा चढविला साज
…. शी विवाह केला, नववधू बनले आज

जन्म दुसऱ्याने दिला.

जन्म दुसऱ्याने दिला.
नाव दुसऱ्याने दिले.
शिक्षण दुसऱ्या कडून घेतले.
लग्न दुसऱ्याने जुळवले.
कामावर दुसऱ्याने लावले.
शेवटी स्मशनातही दुसरेच नेणार ... 
तरीही माणूस इतका घमंड का करतो?

हरवलेल्या वस्तू

हरवलेल्या वस्तूही सापडू शकतात.
पण, एकच गोष्ट अशी आहे की जी एकदा हातातून निसटली की,
कोणत्याही उपायानं पुन्हा मिळू शकत नाही..
आणि ती असते.. "आपलं आयुष्य"..
म्हणूनच.. ....मनसोक्त जगा !!! 

जीवनातिल कडवे सत्य

"जीवनातिल कडवे सत्य"
अनाथ आश्रमात मूले असतात, "गरीबांचे"...
आणि...
वृद्धाश्रमात म्हातारे असतात " "श्रीमंतांचे"....!!!

मी दुनियेबरोबर "लढु" शकतो

मी दुनियेबरोबर "लढु" शकतो
पण "आपल्या माणसांबरोबर" नाही,
कारण "आपल्या माणसांबरोबर"
मला "जिकांयचे" नाही तर जगायचे आहे... !! 

समुद्रातील तुफानापेक्षा मनातील वादळे

समुद्रातील तुफानापेक्षा मनातील वादळे
अधिक भयानक असतात
म्हणुन मनातल्या गोष्टी
जवळच्या व्यक्तींना नक्की सांगा
कारण त्याने मन हलके तर होईलच
आणि लढण्याची ताकद पण येईल...!

जपून टाक पाउल ...

जपून टाक पाउल ... 
इथे प्रत्येक वाट आपली नसते 
जपून ठेव विश्वास 
इथे प्रत्येक माणुस आपला नसतो 
जपून घे निर्णय
इथे प्रत्येक पर्याय आपला नसतो 
जे भांडल्यावर आधी क्षमा मागतात, 
त्यांची चुक असते म्हणून नव्हे,
तर त्यांना आपल्या माणसांची पर्वा असते म्हणून.. 
जे तुम्हाला मदत करायला पुढे सरसावतात 
ते तुमचे काही देणे लागतात म्हणून नव्हे, 
तर ते तुम्हाला आपलं मानतात म्हणुन......!

कुणाच्या सांगण्यावरुन

कुणाच्या सांगण्यावरुन आपल्या मनात 
एखाद्या व्यक्तीबाबत चांगले वा वाईट 
मत बनवण्यापेक्षा, 
आपण स्वतः चार पावले चालुन 
समोरासमोर त्या व्यक्तीशी संवाद साधुन 
मगच खात्री करा. 
नाती जपण्यासाठी संवाद आवश्यक आहे ... 
बोलताना शब्दांची उंची वाढवा 
आवाजाची उंची नाही. 
कारण.. पडणाऱ्या पावसामुळे शेती पिकते, 
विजांच्या कडकडाटामुळे नाही..
आणि वाहतो तो झरा असतो 
आणि थांबतं ते डबकं असतं..
डबक्यावर डास येतात 
आणि झऱ्यावर राजहंस!! 
“निवड आपली आहे.." 
कुणा वाचून कुणाचे काहीच आडत नाही 
हे जरी खरे असले तरी कोण कधी उपयोगी पडेल 
हे सांगता येत नाही. 
डोक शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत, 
अन्... भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत.

गुलाबी थंडीत

गुलाबी थंडीत, तुझ्या कुशीत शिरावे,
काळ्याभोर केशसंभारात हात गुंफावे,
तुझ्या टपोरी डोळ्यात हरवून जावे,
देवाजवळ एकच प्रार्थना, हे सगळे खरे व्हावे
 


गुलाबी थंडीत दोघं,
अन हा गार गार वारा,
फक्त तुझ्या मिठीत...
दिसे स्वर्ग सारा



बर्फासारख्या थंडीमद्धे,
तुझ्या मिठीत लपावस वाटत
एका जन्माचं आयुष्य,
एका क्षणात जगावस वाटत...!!




तुझ्या मिठीत आल्यावर अस वाटत
वेळेन पण थोड थांबाव ...
आणि तुझ्या माझ्या प्रेमाच हे नात..
आयुष्यभर असच राहव.....



झोंबते हि गार हवा
बघ कसा माझ्या तनी.
सांगु कसे साजना तुजला
मज आता लाज येते मनोमनी.


ओथंबलेला गारवा सांगुनी गेला
मज काही सारे...
तुझ्या उबदार स्पर्शालाही
भिजुनी टाकतात हे गार वारे.!!

मैत्री

मैत्री म्हंटली की
आठवतं ते बालपणं
आणि मैत्रीतून मिळालेलं ते
खरंखुरं शहाणपण.



कोणी कितीही बोललं तरी
कोणाचं काही ऐकायचं नाही
कधीही पकडले गेलो तरी
मित्रांची नावं सांगायची नाही.



मैत्रीचं हे नातं
सगळ्या नात्यात श्रेष्ठं
हे नातं टिकवण्यासाठी
नकोत खुप सारे कष्टं



मैत्रीचा हा धागा
रेशमापेक्षाही मऊ सूत
मैत्रीच्या कुशीतच शमते
मायेची ती सूप्त भूक



मैत्रीच्या सहवासात
श्रम सारे विसरता येतात
पण खऱ्या मैत्रिणी मिळवण्यासाठी
काहीदा कितीतरी पावसाळे जातात



मैत्री म्हणजे
रखरखत्या उन्हात मायेची सावली
सुखाच्या दवात भिजून
चिंब चिंब नाहली



मैत्रीचे बंध
कधीच नसतात तुटणारे
जुन्या आठवणींना उजाळा देऊन
गालातल्या गालात हसणारे

पाऊस

कातर वेळचा गार वारा,
तुझी स्मृती घेऊन भेटतो,
मिट्ट काळोख येता गारवा,
पाऊस अलगद मनात दाटतो.



मला आवडतो पाऊस,
गुलमोहराला फुलावणारा,
अन, तेवढ्याच मायेने,
बाभळीला हि झुलवणारा.



जसे अतूट नाते असते पाऊस आणि छत्रीचे,
तसेच काही नाते तुज माझ्या मैत्रीचे,
पाऊस येतो आणि जातो
साथ छत्रीची असू दे असेच तो सांगतो.



मी मुद्दामच छत्री आणत नाही,
पाऊस येणार म्हणून,
मला भिजताना पहिले,
तू छत्रीत घेणार म्हणून.



कोसळणारा पाऊस पाहून,
मला नेहमीच एक प्रश्न पडतो,
माझे तर ठीक आहे,
पण हा कोणासाठी रडतो......



तू दिलेल्या अश्रुना हिर्या सारखा जपेन,
तुझ्या डोळ्यात येऊ,
पाहणारा अश्रूंचा पाऊस,
तुला माझ्या डोळ्यात दिसेल.



पाऊस कधीचा पडतो,
झाडाची हलती पाने,
हलकेच मला जाग आली,
दु:खाच्या मंद स्वराने.



ढग येतात पण पाऊस पडत नाही,
आठवणी येतात पण चेहरा दिसत नाही,
काय मी बोलू तुला पुढे गाय मागे वासरू,
संग प्रिये मी तुला कसे विसरू.



तू अस्स कशी पाहिलास कि वाटल,
खरच पाऊस पडायला हवा,
मी अंग चोरताना तुझा,
धिटाईचा स्पर्श घडायला हवा.





नसती उत्तरे द्यावी लागतात,
वेड्यासारखं वागल्यावर,
पण वेड्यासारखं वागायला होत,
पाऊस पडायला लागल्यावर.



पाऊस पडत असताना, तो मातीचा सुगंध,
आणि गार गार वारा......
मला नेहमीच आवडतात झेलायला,
मुसळधार पावसाच्या त्या बरसणाऱ्या धारा....



रात्री वारा सुटलेला,
आणि पाऊस पडत होता,
सहज वर पहिले तर चक्क,
चंद्र रडत होता.



आठवणीतला पाऊस नेमका,
तुझ्या घरापाशी बरसतो,
माझा वेडा चातक पक्षी इथे,
एका थेंबासाठी तरसतो



ओल्या तुझ्या त्या स्पर्शाला,
मंद-मंद असा सुवास आहे,
आजही आठवतोय तोच पाऊस,
अडकलेला ज्या मध्ये माझा श्वास आहे.



अचानक पाऊस आल्यावर
काही थेंब तुझ्या ओठांवर थांबले.... :)
मग क्षण भर मी पाहतच राहिलो...
आणि आयुष्यात पहिल्यांदा मला थेंब व्हावेसे वाटले.... ;) <3

प्रेम

प्रेम करावे डोळसपणे
त्यात नको घाई,
फसवणूक झालीच तर
त्याला ग्राहक मंच नाही.

बंध तुझे माझे
असेच जुळुनी राहू देत,
तुझे डोळे माझ्या नयनी
मैत्री सतत पाहू देत.

होकारांला शब्दांना
महत्व नसते
दाटल्या भावानांना
काही बंध नसते,
डोळेच सांगून जातात
हाल हृदयाचे,
प्रेमात शब्दांची
गरज नसते .

चंद्र आणि चांदण्याचे खेळ
आता जुने झाले
तुझ्या येण्याने माझ्या
गजबजलेल्या शहराचे रस्ते
आता तुझ्या जाण्याने सुने झाले

रात्रभर तूझ्या आठवणीत मी
ताऱ्यानांसुध्या झोपू दिले नाही
रातभर त्या जागल्या पण
माझा विरह त्यांना कळलाच नाही

तू बरोबर नसतांना तुझ्या सोबत
फक्त तुला पाहनं
आणि नसताना तुझ्यासोबत
आठवणीच्या हिंदोळ्यावर झुलण.

छोट्याशा या आयुष्यामध्ये
खूप काही हव असत,
असंख्य चांदण्या भरूनसुद्धा
आपल आभाळ रिकाम असत.

चंद्राच्या रुपात मला
तुझं मनमोहक रूप दिसाव,
माझं मन त्यात मग
तुकडा तुकडा फसाव .

घालीन लोटांगण

घालीन लोटांगण, वंदीन चरण ।
डोळ्यांनी पाहीन रुप तुझें ।
प्रेमें आलिंगन, आनंदे पूजिन ।
भावें ओवाळीन म्हणे नामा ।।१।।

त्वमेव माता च पिता त्वमेव।
त्वमेव बंधुक्ष्च सखा त्वमेव ।
त्वमेव विध्या द्रविणं त्वमेव ।
त्वमेव सर्वं मम देवदेव।।२।।

कायेन वाचा मनसेंद्रीयेव्रा, बुद्धयात्मना वा प्रकृतिस्वभावात ।
करोमि यध्य्त सकलं परस्मे, नारायणायेति समर्पयामि ।।३।।

अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरिम।
श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं, जानकीनायकं रामचंद्र भजे ।।४।।

हरे राम हर राम, राम राम हरे हरे ।
हरे कृष्ण हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे ।

श्री मारुतीची आरती

सत्राणें उड्डाणें हुंकार वदनीं ।
करि डळमळ भूमंडळ सिंधूजळ गगनीं ॥
गडबडिलें ब्रह्मांड धाकें त्रिभुवनीं ।
सुरवर नर निशाचर त्यां झाल्या पळणी ॥ १ ॥
जय देव जय देव जय हनुमंता ।
तुमचे नि प्रसादें न भीं कृतांता ॥ ध्रु० ॥

दुमदुमिलीं पाताळें उठिला प्रतिशब्द ।
थरथरला धरणीधर मानीला खेद ॥
कडकडिले पर्वत उड्डगण उच्छेद ॥
रामीं रामदासा शक्तीचा बोध ॥ जय देव० ॥ २ ॥

विठुमाऊली तू माऊली जगाची

विठुमाऊली तू माऊली जगाची
माऊलीत मूर्ति विठ्ठलाची, विठ्ठला मायबापा ||

काय तुझी माया सांगु शिरीरंगा
संसाराचि पंढरी तू केली पांडुरंगा
डोळ्यांतून वाहे माय चंद्रभागा
अमृताची गोडी आज आलीया अभंगा
विठ्ठला पांडुरंगा
अभंगाला जोड टाळचिपळ्यांची
माऊलीत मूर्ति विठ्ठलाची, विठ्ठला मायबापा ||

लेकरांची सेवा केलीस तू आई
कसं पांग फेडू, कसं होऊ उतराई
तुझ्या उपकारा जगी तोड नाही
ओवाळीन जीव माझा सावळे विठाई
विठ्ठला मायबापा
जन्मभरी पूजा तुझ्या पाऊलांची
माऊलीत मूर्ति विठ्ठलाची, विठ्ठला मायबापा ||

दुर्गा आरती

दुर्गे दुर्घट भारी तुजवीण संसारी
अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी
वारी वारी जन्म मरण तेवारी
हारी पडलो आता संकट नेवारी
जय देवी जय देवी जय महिषासुर मर्दिनी
सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी
जय देवी जय देवी||1||

तुजवीण भुवनी पाहत तुज ऐसे नाही
चारी श्रमले परंतु न बोलवे काही
साही विवाद करिता पडिलो प्रवाही
ते तू भक्ता लागे ते तू दस लागे पावस लवलाही
जय देवी जय देवी जय महिषासुर मर्दिनी
सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी
जय देवी जय देवी||2||

प्रसन्न वदने प्रसन्न होशी निजदासा
क्लेशांपासून तोडी होई भोपाषा
आंबे तुजवाचून कोण पुरवी आशा
नरहर तल्लीन झाला पद पंकज लेशा
जय देवी जय देवी जय महिषासुर मर्दिनी
सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी
जय देवी जय देवी||3||

श्री हनुमान चालीसा

॥दोहा॥
श्री गुरु चरन सरोज रज, निज मनु मुकुर सुधारि।
बरनउं रघुबर विमल जसु, जो दायकु फल चारि॥
बुद्धिहीन तनु जानिकै, सुमिरौं पवन-कुमार।
बल बुद्धि विद्या देहु मोहिं, हरहु कलेश विकार॥
॥चौपाई॥
जय हनुमान ज्ञान गुण सागर। जय कपीस तिहुँ लोक उजागर॥
राम दूत अतुलित बल धामा। अंजनि-पुत्र पवनसुत नामा॥
महावीर विक्रम बजरंगी। कुमति निवार सुमति के संगी॥
कंचन बरन बिराज सुवेसा। कानन कुण्डल कुंचित केसा॥
हाथ वज्र औ ध्वजा बिराजै। काँधे मूँज जनेऊ साजै॥
शंकर सुवन केसरीनन्दन। तेज प्रताप महा जग वन्दन॥
विद्यावान गुणी अति चातुर। राम काज करिबे को आतुर॥
प्रभु चरित्र सुनिबे को रसिया। राम लखन सीता मन बसिया॥
सूक्ष्म रुप धरि सियहिं दिखावा। विकट रुप धरि लंक जरावा॥
भीम रुप धरि असुर संहारे। रामचन्द्र के काज संवारे॥
लाय सजीवन लखन जियाये। श्रीरघुवीर हरषि उर लाये॥
रघुपति कीन्ही बहुत बड़ाई। तुम मम प्रिय भरतहि सम भाई॥
सहस बदन तुम्हरो यश गावैं। अस कहि श्री पति कंठ लगावैं॥
सनकादिक ब्रह्मादि मुनीसा। नारद सारद सहित अहीसा॥
जम कुबेर दिकपाल जहां ते। कवि कोबिद कहि सके कहां ते॥
तुम उपकार सुग्रीवहिं कीन्हा। राम मिलाय राज पद दीन्हा॥
तुम्हरो मन्त्र विभीषन माना। लंकेश्वर भये सब जग जाना॥
जुग सहस्त्र योजन पर भानू । लील्यो ताहि मधुर फ़ल जानू॥
प्रभु मुद्रिका मेलि मुख माहीं। जलधि लांघि गए अचरज नाहीं॥
दुर्गम काज जगत के जेते। सुगम अनुग्रह तुम्हरे तेते॥
राम दुआरे तुम रखवारे। होत न आज्ञा बिनु पैसारे॥
सब सुख लहै तुम्हारी सरना। तुम रक्षक काहू को डरना॥
आपन तेज सम्हारो आपै। तीनों लोक हांक तें कांपै॥
भूत पिशाच निकट नहिं आवै। महावीर जब नाम सुनावै॥
नासै रोग हरै सब पीरा। जपत निरंतर हनुमत बीरा॥
संकट ते हनुमान छुड़ावै। मन क्रम वचन ध्यान जो लावै॥
सब पर राम तपस्वी राजा। तिन के काज सकल तुम साजा॥
और मनोरथ जो कोई लावै। सोइ अमित जीवन फ़ल पावै॥
चारों जुग परताप तुम्हारा। है परसिद्ध जगत उजियारा॥
साधु सन्त के तुम रखवारे। असुर निकन्दन राम दुलारे॥
अष्ट सिद्धि नवनिधि के दाता। अस बर दीन जानकी माता॥
राम रसायन तुम्हरे पासा। सदा रहो रघुपति के दासा॥
तुम्हरे भजन राम को पावै। जनम जनम के दुख बिसरावै॥
अन्तकाल रघुबर पुर जाई। जहाँ जन्म हरि-भक्त कहाई॥
और देवता चित्त न धरई। हनुमत सेई सर्व सुख करई॥
संकट कटै मिटै सब पीरा। जो सुमिरै हनुमत बलबीरा॥
जय जय जय हनुमान गोसाई। कृपा करहु गुरुदेव की नाई॥
जो शत बार पाठ कर सोई। छूटहिं बंदि महा सुख होई॥
जो यह पढ़ै हनुमान चालीसा। होय सिद्धि साखी गौरीसा॥
तुलसीदास सदा हरि चेरा। कीजै नाथ ह्रदय महँ डेरा॥
॥दोहा॥
पवनतनय संकट हरन, मंगल मूरति रुप।
राम लखन सीता सहित ह्रदय बसहु सुर भूप॥

श्री विठोबाची आरती

युगें अठ्ठावीस विटेवरी उभा।
वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा।
पुण्डलिकाचे भेटी परब्रह्म आलें गा।
चरणी वाहे भीमा उद्धरी जगा॥

जय देव जय देव जय पाण्डुरंगा।
रखुमाईवल्लभा राईच्या वल्लभा पावें जिवलगा॥

तुळसीमाळा गळां कर ठेवुनि कटीं।
कांसे पीताम्बर कस्तुरि लल्लाटी।
देव सुरवर नित्य येती भेटी।
गरुड हनुमन्त पुढे उभे राहती॥

जय देव जय देव जय पाण्डुरंगा।
रखुमाईवल्लभा राईच्या वल्लभा पावें जिवलगा॥

धन्य वेणुनाद अनुक्षेत्रपाळा।
सुवर्णाची कमळे वनमाळा गळां।
राही रखुमाबाई राणीया सकळा।
ओवाळिती राजा विठोबा सांवळा॥

जय देव जय देव जय पाण्डुरंगा।
रखुमाईवल्लभा राईच्या वल्लभा पावें जिवलगा॥

ओवाळूं आरत्या कुर्वण्ड्या येती।
चन्द्रभागेमाजी सोडुनियां देती।
दिंड्या पताका वैष्णव नाचती।
पंढरीचा महिमा वर्णावा किती॥

जय देव जय देव जय पाण्डुरंगा।
रखुमाईवल्लभा राईच्या वल्लभा पावें जिवलगा॥

आषाढी कार्तिकी भक्तजन येती।
चन्द्रभागेमाजी स्नाने जे करिती।
दर्शनहेळामात्रें तयां होय मुक्ती।
केशवासी नामदेव भावे ओंवाळिती॥

जय देव जय देव जय पाण्डुरंगा।
रखुमाईवल्लभा राईच्या वल्लभा पावें जिवलगा॥

श्री शंकराची आरती

लवथवती विक्राळा ब्रह्माण्डी माळा।
वीषे कण्ठ काळा त्रिनेत्री ज्वाळा।
लावण्य सुन्दर मस्तकी बाळा।
तेथुनिया जळ निर्मळ वाहे झुळझुळा॥

जय देव जय देव जय श्रीशंकरा।
आरती ओवाळू तुज कर्पुरगौरा॥

कर्पुर्गौरा भोळा नयनी विशाळा।
अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा।
विभुतीचे उधळण शितिकण्ठ नीळा।
ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा॥

जय देव जय देव जय श्रीशंकरा।
आरती ओवाळू तुज कर्पुरगौरा॥

देवी दैत्यी सागरमन्थन पै केलें।
त्यामाजी अवचित हळाहळ जें उठिले।
ते त्वां असुरपणे प्राशन केलें।
नीलकण्ठ नाम प्रसिद्ध झालें॥

जय देव जय देव जय श्रीशंकरा।
आरती ओवाळू तुज कर्पुरगौरा॥

व्याघ्राम्बर फणिवरधर सुन्दर मदनारी।
पंचानन मनमोहन मुनिजन सुखकारी।
शतकोटीचें बीज वाचे उच्चारी।
रघुकुळटिळक रामदासा अन्तरी॥

जय देव जय देव जय श्रीशंकरा।
आरती ओवाळू तुज कर्पुरगौरा॥

श्री गणपतीची आरती

सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची।
नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची।
सर्वांगी सुन्दर उटि शेंदुराची।
कण्ठी झळके माळ मुक्ताफळांची॥

जय देव जय देव जय मंगलमूर्ति।
दर्शनमात्रे मनकामना पुरती॥

रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा।
चन्दनाची उटि कुंकुमकेशरा।
हिरे जड़ित मुकुट शोभतो बरा।
रुणझुणती नूपुरे चरणी घागरिया॥

जय देव जय देव जय मंगलमूर्ति।
दर्शनमात्रे मनकामना पुरती॥

लम्बोदर पीताम्बर फणिवर बन्धना।
सरळ सोण्ड वक्रतुण्ड त्रिनयना।
दास रामाचा वाट पाहे सदना।
संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवरवन्दना॥

जय देव जय देव जय मंगलमूर्ति।
दर्शनमात्रे मनकामना पुरती॥

ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले

ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले
मला हे दत्तगुरू दिसले

माय उभी ही गाय हो‍उनी, पुढे वासरू पाहे वळुनी
कृतज्ञतेचे श्वान बिचारे पायावर झुकले

चरण शुभंकर फिरता तुमचे, मंदिर बनले उभ्या घराचे
घुमटामधुनी हृदयपाखरू स्वानंदे फिरले

तुम्हीच केली सारी किमया, कृतार्थ झाली माझी काया
तुमच्या हाती माझ्या भवती औदुंबर वसले

इंद्रायणी काठी, देवाची आळंदी

इंद्रायणी काठी, देवाची आळंदी
लागली समाधी, ज्ञानेशाची

ज्ञानियाचा राजा भोगतो राणीव
नाचती वैष्णव, मागेपुढे

मागेपुढे दाटे ज्ञानाचा उजेड
अंगणात झाड कैवल्याचे

उजेडी राहिले उजेड होऊन
निवृत्ती, सोपान, मुक्ताबाई

दिगंबरा दिगंबरा

दिगंबरा दिगंबरा
श्रीपादवल्लभ दिगंबरा

दत्तगुरूंचे नाम स्मरा हो
दत्तगुरूंचे भजन करा

हे नामामृत भवभयहारक
अघसंहारक त्रिभुवनतारक
आत्मसुखाचा मोक्ष लुटाया
अमोल ठेवा हाति धरा

दत्तचरण माहेर सुखाचे
दत्तभजन भोजन मोक्षाचे
कवच लाभता दत्तकृपेचे
कळिकाळाचे भय न जरा

हा उत्पत्ति-स्थिति-लयकर्ता
योगज्ञान-उद्गाता, त्राता
दत्तचरित मधु गाता गाता
भवसागर हा पार करा

आता तरी देवा मला पावशील का

आता तरी देवा मला पावशील का ?
सूख ज्याला म्हनत्यात ते दावशील का ?

पैसा तो अन्यायाचा करी खळबळ
दावी कोणी मजुराला मारुतीचे बळ
न्यायासाठी मदतीला धावशील का ?
सूख ज्याला म्हनत्यात ते दावशील का ?

चोरी करून चोर दूर पळतो
संशयाने गरिबाला मार मिळतो
लाच घेती त्यांना आळा घालशील का ?
सूख ज्याला म्हनत्यात ते दावशील का ?

दिले निवडून जरी आमुचे गडी
जनता पाठीशी त्यांच्या आहे खडी
भलं आमचं करण्याला सांगशील का ?
सूख ज्याला म्हनत्यात ते दावशील का ?

5 स्टार हॉटेल

5 स्टार हॉटेल मध्ये पहिल्यांदा गेलेल्या एका माणसान चहाची ऑर्डर दिली.

वेटरन गरम पाणी, टी ब्याग, साखर, दुध आणून त्याच्या समोर ठेवले ...

कसाबसा चहा पेल्यावर

वेटरन विचारल "अजुन काही घेणार का?"

माणूस म्हणाला "भज्जी खायाची व्हती , पण राहू दे. तू कढई, तेल, बेसन, कांदे आणून ठेवशील. "😳😁😂😂😂😂😂😂😂

बायको आई

बायको : माझ्या आईचं ऐकलं असतं आणि तुम्हाला नकार दिला असता ना, तर सुखी झाले असते.
नवरा : काय सांगतेस … तुझ्या आईचा विरोध होता आपल्या लग्नाला?
बायको : हो
नवरा : अरे देवा … आणि मी त्या माऊलीला आतापर्यंत वाईट समजत होतो
😀😝😆😜🙄😅

लग्न

बायको : माझं लग्न जर एखाद्या राक्षसाशी झालं असतं ना तरी मी आयुष्याला एवढी कंटाळले नसते जेवढी तुझ्याबरोबर कंटाळलेय
नवरा : अगं वेडी, रक्ताच्या नात्यांमध्ये कुठे लग्नं होतात काय?
😃😄😜😜😝😝😁

इलेक्ट्रिक वायर

गुरुजी - सांगा बरं भारतात इलेक्ट्रिक वायर एवढ्या उंचीवर का असतात ??

गण्या - कारण भारतातील बायका त्यावर पण कपडे वाळत घालायला कमी करणार नाहीत..

लागीर झालं जी...

तिकड आज्या ची मामी आज्यान जयडी बर लगीन कराव मणुन काय काय गेमा करत्या ......
😇😇😇😇😇😇

















आणि आमची मामी नुसतं घरी गेलो तरी असं तोंड ☹☹ करत्या की तिच्या पोरीला पळवून च न्याला आलोय ....

😆😆😆😆😆😆😆
😂😂😂😂😂😂😂

सर्वात उंच उडणारा पक्षी कोणता?

शिक्षक :- सांगा, सर्वात उंच उडणारा पक्षी
              कोणता?
पप्या    :- हत्ती
शिक्षक :- नालायक हत्ती हा पक्षी आहे का?
              घरी अभ्यास कोण घेतं तुझा?
पप्या    :- आई
शिक्षक :- मगं वडील काय करतात?
पप्या    :-  ते सांगली पोलिस मध्ये आहेत
शिक्षक :- मुलांनो, लिहा हत्ती हा सर्वात उंच
              उडणारा पक्षी आहे.

    
😂😂😂😝😝😝👌👌👌😳😄🔫🔫🔫🔫🔫🔫🔫

तानाजीराव मालुसरे पोवाडा

स्वातंत्र्यसंगरीं अर्पुनि शिरकमलाला, स्वातंत्र्यदेविच्या पदीं लीन जो झाला,
तो धन्य धन्य ! नरवीर कीर्तियुत होई, ईश्वर त्यावरि संतोषला ॥ध्रु०॥

चौक १
एके दिवशीं जिजाई पहाटेला । बोलत शिवाजीला ।
“कोंडाणा जंवा दिधला । यवनाला घाला तंवा पडला ।
राज्याला मोंगल काळ झाला । चित्ताचा धीर सकळ सुटला ॥
सारा मुलुख ताब्यांत ठेवण्याला । किल्ला पाहिजे झाला ।
स्वाधीन; आपणाला । ना तरी सदा काळिमा लागला ।
राज्याला तसाच कीर्तीला ॥ पाहिजे विचार हा केला ॥
रामकृष्ण तुमचे पूर्वज । जनक धर्मराज ।
धरावी त्यांची लाज । रावणाला धाक ज्यांचा पडला ।
कंसाला धाक ज्यांचा पडला; । पृथ्वीचा भार कमी हो केला ॥
ज्यांनीं धर्म सकळ बुडविला, । देश चिरडिला, ।
त्यांच्या नाशाला । घेतसे देव नविन अवतार; ।
दुष्टांचा पूर्ण करित संहार; । लक्षांत घ्यावा तोचि व्यवहार ॥
चाल
हें राज्यपद बहु कठीण पृथ्वीवरी ॥ ती भोगलालसा सदा जगीं वावरी ॥
षड्‌विकार होती बहु प्रबळ अंतरीं ॥ मग शुद्धबुद्ध होईल कावरीबावरी ॥
मग दृष्टि राहिल सदैव पापावरी” ॥ ऐकून आईचे बोल ।
शिवराज चित्तिं व्याकुळ, । म्हणे “माय । काय आम्हि केलं ? ।
कधिं पाप नाहीं बघितलं, । धर्मास नाहीं सोडलं ।
गर्वास उभं कापलं । आळसास नाहीं पद दिलं ।
मन तुमच्या अर्ध्या वचनांत सदा राहिलं” ॥
मग जिजामाउलिनं पुन्हां त्यास सांगितलं, ॥
“जर किल्ला घेण्या ऊशिर । शिवराया ! लागला फार ।
तर हिंदुधर्माचं शिर । तर महाराष्ट्राचं शिर ।
मोंगल उडवि सरसर । धर्माचा होइल चूर । पापाचा वाहिल पूर” ।
डोळ्यांत अश्रु सांठले कंठ दाटला ॥ गहिंवरल्या कंठामधून शब्द उमटला ॥
“माघाच्या वद्य नवमीला । तो किल्ला पाहिजे सर झाला ।
करि पूर्ण आस ही बाळा ” । शिवराज बोलले नमून मातृपदाला ॥
चाल
“जर पूर्व-पुण्याई केली । असेल लाभली ।
होइल शिव वाली । माउली । आज निश्च्य केला ।
माघाच्या वद्य नवमीला । जोडिन किल्ला मराठेशाहीला” ॥१॥

चौक २
उमराठं गांव छानदार । सुरेख घरदार ।
लावली तलवार । कमरेला, धाक यमाला पडला ।
पाताळीं काळ जाउन दडला । सौख्याला सदा मोहोर आला ॥
जसा जयंत शोभत इंद्राला । अभिमन्यु अर्जुनाला ।
स्कंद शंभूला । रायबा तसा तानाजीला ।
रायबा तसाच जनतेला । सौख्याला सदा बहर भरला ॥
शेलारमामा सांगत तानाजीला । “रायबा थोर झाला ।
आला हो लगिनाला । कराव औंदा लगिन ह्याचं ।
पाहुंद्या लगिन नातवाचं । चार इसावर हो वय आमुचं” ॥
तानाजिनं होकार तंवा दिला । सोयरा बघितला ।
मुहुर्त मग ठरला । माघाच्या वद्य नवमीचा ।
थाट लइ झाला तय्यारीचा । वर्णील कुठवर ही वाचा ॥
चाल
तंवा सम्द लोक जमुनशान बोलती तान्यास ॥
“लइ तान्या मोठा झालास शिवबाचा दास ॥
त्येचं थोरपण नावरुप सांगशि आम्हांस ॥
त्या शिवरायाच्या पायीं वाहिलं जीवास ॥
घरदार सोडून दिलं त्याच्या कार्यास ॥
त्यास आम्ही कधीं पाहावं ? । त्यास आपण कधीं देखावं ?

डोळ्याचं पारणं फेडावं ? । ’हा ताना शिवरायाच्या मर्जीतला’ ॥
असं कौतुकानं सदानीदा सांगशि आम्हांला ॥
या वेळेस त्यास आणवावं । त्येनं आमचं गांव पहावं ।
त्येनं आपलं राहाणं देखावं । हें असं ध्येनांत धरावं ।
जा शेलारमामा ! तुम्ही तुम्ही त्यास आणावं” ॥
चाल
तानाजिनं इचार जरा केला । मामास सांगितला ।
रायबा संग घेतला । तिघेहि झाले घोडयावर स्वार ।
बाळ तरुण म्हातारपणाचा अवतार । जाहला जगांत जयजयकार ॥२॥चौक ३
ऐका तंवाच राजगडावर । झालेला प्रकार ।
युद्धास घनघोर । आलं हो मूळ, प्रसंग थोर ।
ऐकावं शांत होऊन सारं । चित्ताचा सोडुं नव्हे धीर ॥
’युगत करुन शिवाजी सुटुन गेला । दिल्लीहून आला ।
मराठया प्रांताला । होईल राग त्याचा अनिवार ।
करिल गट्ट मोंगल सरकार । दक्षिणेंत होईल मराठा कारभार’ ॥
औरंगजेबानं विचार असा करुन । पन्नास हजार देऊन ।
शिपाई शिस्त करुन । धाडिला उदयभान सरदार ।
कोंडाणा किल्ल्याचा सम्दा अधिकार । शाहानं दिला तयास बहुकाळ —-॥
असा कागद घेऊन हेजिब आला । जयसिंगानं धाडियेला ।
त्याच समयाला । रायाच्या चैन मनाला पडेना ।
तान्ह्याच्या राया करित स्मरणा । नव्हते कां दुसरे सरदार नाना ? ॥
चाल
हा विचार करिती शिवबा किल्ल्यावरी ॥ तों तानाजी पोंचले राजगडावरी ॥
ती अक्षत देण्या झाली त्यांची तय्यारी ॥ ती जिजामाउली त्यांची इचारपुस करी ॥
हें जाणून ताना चपापला अंतरीं ॥ हें असें कसं आज झालं ।
शिवरायानं नाहिं देखिलं । त्येच्या मनांत काय हो आलं ।
तें अजून नाहिं समजलं । लगिनास आलों आम्ही त्याला बोलावायला ॥
परि येत्या वेळेला सकून सुभ नाहिं झाला ॥ तर त्यास जाऊन भेटावं ।
त्येचं मन सम्द वोळखावं । शिवबानं सदा म्होरं यावं ।
आधि कडकडून भेटावं । मग आमचा हात धरुन किल्ल्यावर न्यावं ॥
परि असं कसं आज व्हावं । याचं कारण त्याला पूसावं ।
मग मामा ! लगिनामंदि एकमन व्हावं’ ॥मग तडक तिघे निघाले । सरासर गेले ।
जेथे शिव बसले । युद्धाचा करित सकळ विचार ।
देशाचा होते करित संसार । आयास म्हणुन पडतोय फार ॥३॥

चौक ४
पाहुन तान्याला शिवाजि पुढं झाला । हातानं धरियेला ।
आणुन बसवीला । विचारी क्षेम तानाजीरावाला ।
मामाला आणिक रायबाला । येण्याचं तसं कारण त्याला ॥
चिंतेच्या अधीन पुरा । रायाचा चेहरा । तानाजीस दिसला ।
बोलला शूर मराठा सरदार । धैर्याचा मूर्तिमंत अवतार ।
प्राणाचा नाहिं तयास दरकार ॥ “तुमचं कुशल आधीं ऐकावं ।
मनानं आनंदावं । नंतर परिसावं । आमुचं; हाच उचित व्यवहार ।
राच्याचा दिला देवानं अधिकार । सांगावा आपला कुशल समाचार ॥
जसं प्रसन्न तुम्हां पाहिलं । पूर्वी मन धालं ।
नाहीं तसं देखिलं । भेटिच्या आजच्या समयाला ।
चंद्राला राहू चिंतेचा लागला । चित्तान असा कयास केला” ॥
शिवराज छत्रपति बोले । “विशेष नाहीं झालं ।
विचार सारं चुकलं । आपुलं, असे कुशळ आमचं ।
आतांच तानाजीराव येण्याचं । सांगावं काय कारण तुमचं ” ॥
चालमालुसरे लागले बोलण्याला, आनंद जरा झाला,
तांदुळ पुढं केला, चित्ताचा हो बाग; परि गेला ।
घटकेंत वाळुनी सारा ! ॥ “शेलारमामानं सांगितलं आम्हांला,
रायबा थोर झाला, आला हो लगिनाला, सोयरा बघितला,
मुहूर्त मग ठरला, माघाच्या वद्य नवमीला ॥
सारे लोक बोलले आम्हांला, ’ऐशा समयाला,
शिवबा पाहिजे आला, आमच्या गांवाला भेट देण्याला,
होईल तोष डोळ्याला’ ॥ सारीं कामं ठेवून बाजूला,
जिजाईमाईला, घेऊन गांवाला यावं लगिनाला,
तोष, दासाला । होईन, धन्य भूपाला” ।
खळबळे प्रेम चित्तांत, आनंद मिळत दुःखांत ॥
शिवराज बोलले तान्यास, ॥ “आमचं मन धांवे येण्यास, ॥
चाल
पर शरीर दुसर्‍या कामावर । झालं तय्यार ।
घेऊन समशेर । कोंडाणा किल्ला कराया सर ।
माउलिनं घातली शपथ घोर । पुरवावी हीच आशा थोर” ॥४॥

चौक ५

’माघाच्या वद्य नवमीला । किल्ला पाहिजे झाला ।
आपला जन्माला ! ना तरी गनिम खास बसला ।
काळिमा लागेल कीर्तीला । जन्मुन काय उपयोग केला’ ॥
अशि शपथ घातली माउलिनं । प्राणहि अर्पुन ।
करिन स्वाधीन । कोंडाणा, जावें तुम्ही परतून ।
रायबाचं लग्न टाकावं उरकून । थाटानं यावं नंतर परतून ॥
या वेळेस स्वारिवर जावं । स्वताच अनुभवावं ।
युद्ध करावं । आशा ही झाली आम्हां अनिवार ।
हातांत घेतलि भवानी तलवार । आम्हां श्रीअंबाबाई आधार” ॥
हे शब्द हृदयिं झोंबले । मर्मिं लागले । ताना मग बोले ।
संचरे आर्यतेज हृदयांत । संचरे क्षात्रतेज अंगांत ।
उपमा नाहीं तिनहि लोकांत ! ॥ “आधीं लग्न लाविन कोंडाण्याचं ।
नंतर रायबाचं । हेंच ब्रिद आमुचं । वाहिला देह त्याच कार्यास ।
युद्ध मोक्षाचं दार आम्हांस ! । आपलं साह्य दीन दासास ॥
चाल
जरि आमच्यासारखं पडतिल लोक रणावर ॥ महाराज !
तरी मिळतील रोज भाराभर ॥ रंगेल लाल रक्तानं त्यांची समशेर ॥
आपण जर जाल बिनिवर । बरंवाईट झालं तर ।
मिळतील काय अवतार । दिसतात सूर्य कां फार ।
दिसतात तारे भरपूर । आमच्यासारख लोक घरोघर ।
तुमच्यासारख येक होणार । राहो लोभ तुमचा आम्हांवर ।
करो दया आज शंकर । सोडा हुकूम जाण्या रणावर ।
माघाच्या वद्य नवमीला किल्ला हो सर ॥
झालाच असं समजावं तरिच हा वीर ॥
ना तरी अंबेच्या पायीं वाहिन शीर !” ॥
चाल
अशि प्रतिज्ञा करुन निघाला । सुचेना अन्य त्याला ।
गात कवनाला । बंधुनो ! ऐका चरित्र त्याचं ।
शूराचं प्रतापि पुरुषाचं । पावन होईल मन आमुचं ! ॥५॥

चौक ६

लगिनाचा बेत रद्द केला ॥ घेऊन सूर्याजिला ।
टेहळणी करण्याला । चालला वेश करुन न्यारा ।
वळविलं रायाजी नाईकाला । ऐकावं त्येच्या पोवाडयाला ॥
घेरेसरनाईक रायाजी । मोठा रणगाजी । म्हणतो परी ’हां जी !’ ।
यवनाला, मोह मनाला पडला । मोंगलाचा दीन चाकुर बनला ।
मर्दाचा सम्दा इचार चुकला ॥ त्येच्या मुलीच्या लग्नामंदि गेला ।
तान्हा गोंधळाला । गात कीर्तीला । शिवबाच्या, झाला सारा लोक गार ।
चित्ताला त्यांच्या त्यानं केला वार । हातांत ओढली त्यांनीं तलवार ॥
रायाजी नाईक बोलला । तंवाच गोंधळ्याला । जाणलं त्येनं त्याला ।

ज्याची हो खूण त्याला कळणार । चित्ताचा झाला त्याच्या निर्धार ।
यवनाचा आला त्यास तिटकार ॥
चाल
“अक्षि रावजी ! तानू गोंधळ्याला ।
वळखिलं सम्दं ! तुम्हाला ! गोंधळ्याचा पोशाख केला ।अन् माझं मन पाहण्याला आला व्हय ? । केल आज पुनित देहाला
दयेचा समिंदर झाला । काय हुकूम सांगावा मला ।
लइ दिसानं योग हा आला । आज जीव आमचा वाहिला शिवबादादाला ॥
देवलोक सम्द खाली आलं वाटतं आम्हाला ॥ राखाया गोरगरिबाला ।
राखाया गाय माउलीला । राखाया आपल्या धर्माला ।
धन्य धन्य तोड गावना तुमच्या कीर्तीला ! ॥”
तानाजी लागला बोलण्यला । “दावावा बुरुज आम्हाला ।
पाहुं द्या तट आम्हांला । रोखुं द्या जागा आम्हांला ।
जिथ्‌नं चढुनशान गांठावं उदयभानाला” ॥
चाल
घेरेसर रायाजि नाइकाला । घेऊन संगातीला ।
रोखुन बुरुजाला । परतले तानेराव सरदार ।
भवानी साह्य ज्यास करणार । वर्णन त्याचं कसं हो सरणार ॥६॥चौक ७
तीन इसा मावळं संगातीला । घेऊन जाण्याला ।
सांगुनशान भावाला । चालला ताना कोंडाण्याला ।
पूजिलं शंभुभवानीला । घेतलं तीस आपल्या मदतीला ! ॥
निघतांना सांज लइ झाली । दौड परि केली ।
गांठली जाळी । राच्चं नौधाव्या घटकेला ।
काळोख सर्वामंदि भरला । घुबडांनीं गोंधळ लइ केला ॥
झुंजार बुरुज गांठला । येशीच्या शेंपटीला ।
लावुन सोलाला । बोलला तान्हा घोरपडीला ।
चित्ताला त्याच्या घोर पडला । पडलेला दूर तिनं हो केला ॥
’यशवंती ! सदा यश दिलस । म्हणुन ठेवलं ।
नांव तुझं भलं । देइ ग आज बी तेंच मजला ।
पुरविन तुझ्या कौतुकाला । घालिन खायला ग्वाड तुजला !’ ॥
असं म्हणुन सोडलं वर तिला । गेली सरसरा । आला पर फेरा ।
दैवाचा, बाई खालतं फिरली । पहिल्यांदा तिनं ही कच खाल्ली ।
असली ती गोष्ट कधिं न झाली ! ॥
चाल
मग तान्हा बोलला रागानं येशवंतिला ॥
“आज इचार काय ग तूं हा केलास ?
असा कधिं नाहीं बघितला । अपशकुन आज मला झाला ।
पर आमचा देह कधिं मागं नाहीं परतला ॥
आणि एकदां सोडतो वर तुला । ततं चिकाट धरुन धीराला ।
नाहिंतर उडविल तलवार तुझ्या ग मुंडक्याला” ॥
घोरपड धांवली सरसरा । वर बसली पाहुनी थारा ।
मग तान्हा झाला सामोरा । त्यानं घट्ट धरलं सोलाला ।
हिस्का मारुन् पाहिलं दोराला । सरसर चढाया लागला ।
जीवाची फिकीर नाहिं त्याला । ’चला या हो’ बोलला लोकाला ।
झरझरा मावळा चालला ! वर भगवा झेंडा चालला ! ।
झट्‌कनं तान्हा झुंजार-बुरजावर गेला ! ॥
अक्षि वायसा सुद्धां गलबला । मावळ्यांनी बघावा नाहीं केला ।
तत मांसारक्ताचा काला । मावळ्यांनीं बघावा लई केला ।
असा धुमाकूळ माजला । तंवा कळल त्येंच्या लोकाला ।
खडबडून जागा मग झाला । मोंगलभाई बोलला ।
सैतान किल्ल्यावर आला’ । ’या कोणि राखा आम्हाला ’ ।
चाल
आतां कोण कसला येणार । तुजला राखणार ।
ताना घेणार । नरडिचा घोट होउनि लाल ।
केल्या पापाच फळ भोगाल । आला या मर्तभूमिवर काळ ॥७॥

चौक ८

अशी कत्तल करुनि सरसरा । सांठवुनि शिरा ।
करुन मलमाला । आईच्या तान्हा लावि हृदयास ।
आला हो आला पूर शौर्यास । देखिलं त्यानं उदयभानास ॥
“हरहर महादेव” बोला । आला ऊत भला ।
खोर्‍यामदिं भरला । भानाला तान्हा सिंहापर खास ।
थरथरे काळ पाहुनी ज्यास । धांवला तो पारतंत्र्य चिरण्यास ॥
उदयभान वीर खळवळे । लाल झाले डोळे । तान्हा मग बोले ।
भानुला, देहभान नुरे त्यास । धर्माचा लागे त्याच्या मनीं ध्यास ।
भानुच्या उदयिं गुंतली आस ॥
चाल
“तूं उदयभान सरदार । रजपूत जातिचा वीर ।
तू हिंदुधर्मा आधार । तू हिंददेशा आधार ।
रामकृष्ण तुमचे पूर्वज होते नरवीर ॥
गायिवासरं पाळुनी कृष्ण झाला लइ थोर ॥
आज शिवानं घेतला अवतार । त्यास यश खास येणार ।
तू मातिमोल होणार । घरची बाईल ओढुन नेती ।
टकटका बघाया लावती । चरचरा गाय कांपिती ।
घटघटा रगात पिती । आमचं देव समदं फोडिती ।
धर्मास दुष्ट तुडविती । तोंडांत मांस घालती ।
साधुसंता त्रास लई देती । बायकाच्या अंगा झोंबती ।
त्यांची करणी सांगावी किती ? । अभिमान गेला शौर्याची झाली बघ माती ! ॥
चाल
तूं शूर मर्द सरकार । धर्मा आधार ।
जातिशीं वैर । साधुनी जाशि घोर नर्कांत ।
येउं दे आंर्यतेज अंगांत । होईल कीर्ती तिनही लोकांत ॥८॥

चौक ९

उपदेश गेला परि वाया । सत्तेची माया ।
सूडाची छाया । पसरली उदयभानावर खास ।
मोगलाचा धरला त्यानं विश्वास । जोरानं धांवला वार करण्यास ॥
तानाजी सिंह खवळला । धावुन गेला ।
पट्टा लइ फिरला । युद्धाला आला रंग अनिवार ।
बिजलिची करणी करित तलवार । दोघेही होते मोठे लढणार ॥
दैवाची करणी परि न्यारी । फिरला माघारी ।
देव कंसारी । भानानं केला तान्यावर वार ।
डाव्या हाताला रक्ताची धार । लागली; पडली भूमिवर ढाल ॥
गुंडाळून हाताला मुंडासा । झाला कसाबसा ।
सज्ज, परि फांसा । दैवानं घातला, कोण काढणार ? ।
दैवाला दया न कधिं येणार । भाळीं जें लिवलं तसंच घडणार ! ॥
तो धैर्यमेरु उमळला । धरणीला आला ।
झाला जीव गोळा । सोडुन देह गेला स्वर्गास ।
भानानं हाणली लाथ डोक्यास; । पापाची भरली त्याच्या घडी खास ॥
चाल
इतक्यांत टोळी घेऊन सूर्या वर आला ॥ त्येनं पाहिलं पळत्या लोकाला ।
त्येनं पाहिलं पळत्या मावळ्याला । “कुठं जाता ?” बोलला तो त्याला ।
सूर्याला मावळा बोलला । ’अहो ताना पडला धरणीला मोठा घात झाला’ ।
डोळ्यांत अश्रु दाटला । पर मोठा धीराचा तो पडला ।
तलवार रोंखुन बोलला पळत्या लोकांला ॥ “अर भित्र्या लोकांनो ?
जरा । ईचार मनामंदी करा ! । अर लढुनशान तरि मरा ।
इथनं पळुनशान जाऊन अमर काय झाला ? ॥
जो भ्याड पळपुटा झाला । तो खास गेला नर्काला ।
ठेवावं खालतं भाल्याला । नेसावं चोळीलुगडयाला ।
कमरेच्या सोडून शेल्याला । नेसावं बायकी शालुला ।
डोक्याला लावुन कुंकवाला । हातात भरुन बांगडीला ।
मग पळुनशान जाऊन राखा जीवाला ॥ काय आल्या धरुन दोराला ।
जाणार सांगाव मला ? । तो दोर तुमच्या आधींच झुंजुन मेला ! ॥
लइ जपुनशान जीवाला । कायमचं काय राहिला ।
इथनं जाउन्‌शान गांवाला । सांगाल काय राजाला ? ।
हर हर महादेव’ बोला । चला घुसूनशान् उडवुया लाख मुंडक्याला” ॥
चाल
धन्य ! धन्य ! सूर्याजीराव ! उतराई व्हावं ।
कशानं सांगावं । भावाचं दुःख लोटुनी पार ।
देण्याला जीव झाला तय्यार । घेऊन याल कधीं हो अवतार ! ॥९॥

चौक १०

पुन्हां सारा उलटला भाला । मावळा एक झाला ।
केला मग हल्ला । मोंगलाची झाली तारपिट फार ।
पळती हो खाल्ला त्यांनीं लइ मार । घेण्याला लावली त्यांना माघार ॥
मामाची झुंज लागली । भानाशीं भली ।घालुन खालीं । भानुला धाडलं घोर नर्कांत ।
फडफडे भगवा झेंडा किल्ल्यांत । प्रसिद्ध झाला तिनहि लोकांत ॥
वृत्तांत सारा घडलेला । कळला राजाला ।
लागली डोळ्यांला । पाण्याची धार, गेला आधार ।
शिवबाला तान्हा प्राणापर प्यार । दुःखाचा झाला त्यास लइ भार ॥
हुंदक्यानं आला उमाळा, । शिवबा बोलला ।
हाय ! घात झाला । ठेवुन पृथ्वीवरती आम्हांस ।
सोडुन गेला । तान्हा स्वर्गास ! । दैवाला नाहिं दया लव खास ॥
चाल
स्वातंत्र्यदेविच्या गळ्यामधुन मणि गळला ॥
काय एकदांच सद्भाग्यचंद्र मावळला ॥
तो देशभक्तिचा सिंधु कोरडा पडला ! ॥
माणीक एक हरपला ! । स्वातंत्र्यहंस तो मेला ।
ताब्यांत आला गड परी सिंह तो गेला ! ॥
पांडुरंग शाहीर गातो त्याच्या कवनाला ॥१०॥

 – शाहीर पां.द.खाडिलकर

संभाजीराजांचा पोवाडा

जयजयकार महाराष्ट्राचाऽऽऽ
हे हे हे आऽऽऽ
जयजयकार महाराष्ट्राचा
शूर शिवबाचा
शंभू राजांचा शंभू राजांचा शंभू राजांचा
शौर्य सळसळले रोमारोमात..
शौर्य सळसळले रोमारोमात
मुजरा तुम्हा करतो स्वाभिमानास जी ही जी
मुजरा तुम्हा करतो स्वाभिमानास जी ही जी
मुजरा तुम्हा करतो स्वाभिमानास जी ही जी

शिवराज सुर्यास्ता गेला
शंभू गादीला रायगडाला

शिवाजी महाराजांच्या मृत्युनंतर संभाजी राजे हिंदवी स्वराज्याच्या गादीवर बसलेले आहेत.

संभाजी राजे हिंदवी स्वराज्याच्या गादेवर बसले असताना,

याचवेळेला दख्खन भागावरती स्वारी करण्याकरता मोघलांची फौज आलेली आहे.

नामशेष करण्या दख्खनाला
आलमगिरे चंग बांधलेला
न् मोघली फौज मराठी मुलखाला
धिंगाणा त्यांनी घातलेला!
मोघलांचं ठाणं कोल्हापूरला होतं कोल्हापूरला
होतं कोल्हापूरला जी रं जी
होतं कोल्हापूरला जी रं जी
होतं कोल्हापूरला जी रं जी

औरंगजेबाची फौज… एक आदिलशहाच्या राज्यामध्ये गोवळकोंड्यापर्यंत पोहचलेली आहे.

अन् दुसरी फौज कोल्हापूरला ठाणं मांडून बसलेली आहे.

आन् कोल्हापूरला आलेल्या या खानाचं नाव आहे – खान मुखरब.

खान मुखरब याच समयाला
घेऊन फौजेला
वेढा करवीरला होता करवीरला
खान मुखरब याच समयाला
होता करवीरला… कोल्हापुराला न्….

शंभूराजे याच समयाला….

आमची मराठी फौज…! मोघलांच्या फौजेवर तुटून पडायला लागलेली आहे!
ज्या ज्या ठिकाणी शत्रूचा सामना करता येईल,

मराठ्यांनी त्यांना पाणी पाजायचं काम सुरू केलेलं आहे!
हंबीरराव मोहित्यांनी तरी कहरच केलेला आहे!
आणि याच्यामध्ये हंबीरराव मोहिते खलास झाले.

शंभूराजाचा पराक्रम…

एका मागं एक विजयाला एक विजयाला एक विजयाला
आन् धक्का बसला मोघली फौजेला

मराठ्यांचा विजय!!!

ही वार्ता कळता राजाला
आलमगिराला
आलमगिराला
न् शंका बादशहाला

ही वार्ता कळता राजाला आलमगिराला..

या अल्ला! मैने सोचा था,
शिवाजी के जाने के बाद, हम महाराष्ट्र हमारे हाथ मे लेंगे!

हमारा राज उधर ही बनेगा! पन कापर शंभूने तो कहर कर दिया!

आलमगिरी याच समयाला
याच समयाला याच समयाला याच समयाला याच समयाला
अकलूज होता मुक्कामाला
होता मुक्कामाला
होता मुक्कामाला जी रं ह जीजी
होता मुक्कामाला जी रं ह जीजी
होता मुक्कामाला जी रं ह जीजी

आलमगीर.. औरंगबादशहा आकलूज मुक्कामाला तळ ठोकून बसलेला आहे!

महाराज होते गडालाऽऽऽ
आ आ आ आऽऽऽऽऽ ह ह ह ह ह ह अ.ऽऽऽऽऽ
महाराज होते गडालाऽऽऽ होते गडाला
आराधना केली देवीला
न् यश द्यावे आम्हा मराठ्याला

आबासायबांची शक्ती आमच्यात असू द्या…

बोलावून घेतलं गोंधळ्याला
बोलावून घेतलं गोंधळ्याला
देवीचा जागर करण्याला…. देवीचा जागर करण्याला
गोंधळी काय बोलला?
न् गोंधळी काय बोलला
संबळ लागे वाजण्याला
गोंधळ घातला आंबेला घातला आंबेला घातला आंबेला

शंभूराजे याच समयाला
न् सवे घेऊन संताजी घोरपड्याला!

रणमर्द! पटांगणामध्ये गनिमीकाव्याने लढणारा संताजी घोरपडे!

सवे घेऊन संताजी घोरपड्याला
बहेरव नाईक होता जोडीला
महलोजीबाबा सेनापती शोभलेला
राया अंता होता संगतीला

न् राजानी हल्ला चढविला
राजानी हल्ला चढविला

संभाजीच्या पराक्रमाला
संभाजीच्या पराक्रमाला
शत्रूनी पळ काढीला
पळ काढीला जी र ह जीजी
पळ काढीला जी र ह जीजी
पळ काढीला जी र ह जीजी

आमचा संभाजीराजे होता कसा म्हणाल..

भरदार छातीचा बांधा अन्
असा होता आमचा संभूराजा जी र ह जीजी
आमचा संभूराजा जी र ह जीजी
आमचा संभूराजा जी र ह जीजी

भरदार पोटरी मांड
न् पीळदार शोभती दंड
शोभती दंड जी र ह जीजी
शोभती दंड जी र ह जीजी
शोभती दंड जी र ह जीजी

हाडपेर ज्याचं दणकट
न् पोहलाद कांब मनगट ह जी र ह जीजी
कांब मनगट ह जी र ह जीजी
कांब मनगट ह जी र ह जीजी
कांब मनगट ह जी र ह जीजी

जटाभार…!
जटाभार शोभे राजाला

पीळदार…!

राजे कसे होते म्हणाल?

जणू मदनाचा पुतळा
महाराज शंभूराजे म्हणजे मदनाचा पुतळा!

माथी जाटाभार
शीवगंध कपाळाला
कोरीव दाढी शोभे राजाला
पीळदार मिशा शंभूला

जर राजांनी कुणाकडं पाहिलं… त्याचवेळेला त्याला कापरं भरायचं!

समोर पाहता शंभू राजाला
कैकांनी प्राण सोडला
प्राण सोडीला जी रं ह जीजी
प्राण सोडीला जी रं ह जीजी
प्राण सोडीला जी रं ह जीजी

शरीरवृष्टी शंभूराजालाऽऽऽऽऽऽऽ
शंभूराजाला शंभूराजाला
लाजवत होते मदनाला
गरुड भासे उमेदालेला
चंद्रावर्त घोडा बसण्याला
न् वर राजे स्वार समयाला
शंभूराजे स्वार समयाला

संभाजीराजे त्या चंद्रावर्तावर स्वार झालेले आहेत.
मराठ्यांना विजयापाठोपाठ विजय मिळू लागलेला आहे.

धाक बसला बघा मोघलाला
धाक बसला बघा मोघलाला
झोप येत नव्हती फिरंग्याला
नव्हती फिरंग्याला जी रं ह जीजी
नव्हती फिरंग्याला जी रं ह जीजी
नव्हती फिरंग्याला जी रं ह जीजी

संभाजीराजे!

मोघली फौज पळायला लागलेली आहे!
फिरंग्याच्या डोळ्याची झोप उडालेली आहे!
मराठ्यांना विजया पाठोपाठ विजय मिळू लागलेले आहेत.
संभाजीराजाच्या पराक्रमाची वार्ता आलमगिराच्या कानावर जाऊ लागलेली आहे!

विजयाची धुंदी मराठ्याला
विजयाची धुंदी मराठ्याला

गडावर काही ठिकाणी आमचे मराठे…
विजय मिळालेला आहे, आन् थोडे सुस्त झालेले आहेत
संभाजीराजांनी जरा तळकोकणात जायचं ठरवलं
अन् त्यांचं लक्ष गेलं जंजिर्‍याकडं!

संभाजी याच समयाला
संभाजी याच समयाला
अन् विश्रान्ती घ्यावी देहाला
विश्रान्ती घ्यावी देहाला

थोडी विश्रांती असावी म्हणून….

संगमेश्वरी आले मुक्कामाला
आले मुक्कामाला जी रं ह जीजी
आले मुक्कामाला जी रं ह जीजी
आले मुक्कामाला जी रं ह जीजी

संभाजीराजे आपल्या निवडक माणसांच्या बरोबर संगमेश्वरला येऊन पोचलेले आहेत.
सरदेसायांच्या वाड्यामध्ये मुक्काम आहे. सरदेसायांच्या वाड्यात मुक्कामाला असताना…

फितुरीनं घात बघा केला..
घात बघा केला.. घात बघा केला..
न् गणोजी शिर्का फितूर झालेला

गणोजी शिर्के फितूर झाले,

आन् या कोल्हापुरच्या ठाण्यावर खान मुखरब याला गणोजी शिर्के काय म्हणत आहे?

– मुखरब खान! संभाजीला आम्ही धरून दिले तर आम्हाला बक्षीस काय मिळेल?

इकलास बोलला समयाला
आपल्या बापाला आपल्या बापाला
खान मुखरबाला

इकलास.. खान मुखरबाचा मुलगा काय म्हणत आहे?

अब्बाजान! गनोजी शिर्के क्या कहता है सुना तुमने?

आमिस लावलं ओठाला
आमिस लावलं ओठाला
न् गनूजी फितूर झाला
गनूजी फितूर झाला
कैद करण्या शंभूराजाला
शंभूराजाला जी रं ह जीजी
शंभूराजाला जी रं ह जीजी
शंभूराजाला जी रं ह जीजी

कुर्‍हाडीचा दांडा गोतास काळ म्हणतात, काय खोटं नाही!

गणोजी शिर्के दुसरे कुणी नव्हते
शंभूजीराजांचे मेव्हणे होते
रक्ताची नाती ज्यांच्याशी जोडली होती
हे रक्ताचंच नातं रक्ताला खलास करायला तयार झालं होतं!

स्वार्थानं..
स्वाहर्थानं मोह टाकलेला
लालचीनं फिदा बघा झाला
आमिश लावलं ओठाला
वचन दिलं खानाला
खान मुखरबाला.. खान मुखरबाला.. खान मुखरबाला.. खान मुखरबाला
पकडून देतो शंभूला
शंभूराजाला जी रं ह जीजी
शंभूराजाला जी रं ह जीजी
शंभूराजाला जी रं ह जीजी

आमिश लावलं ओठाला
पकडून देतो शंभूला
शंभूराजाला जी रं ह जीजी
शंभूराजाला जी रं ह जीजी
शंभूराजाला जी रं ह जीजी

खान मुखरब… कोल्हापुराहून आपली फौज घेऊन निघालेला आहे
रातोरात त्याला तळकोकणात यायचे आहे
राजे विश्रांती घेण्यासाठी सरदेसायांच्या वाड्यात थांबलेले आहेत

रायां अन्ता महालोजीबाबा बहेरजी
संताजी घोरपडे आणि शाहीर कलेश
हे महाराजांच्या बरोबर आहेत

घाट उतरून खाली आल्यानंतर गणोजी शिर्के काय म्हणत आहे?

-कांदा फोडला तर डोळ्याला पाणी येतं..
पण कांदा फोडण्यावाचून भाकर जात न्हाई!

याचा अर्थ असा होता..
शंभूराजाला कैद केल्यानंतर मलाही रडावं लागेल
रडलं तरी चालेल, पण आपणाला सत्तेची जागा भोगायची आहे

. (शिवाजीराव सावंतानी संभाजीची पूर्वीची पाटी पुसून काढली.शंभूराजे होते कसे आजमावचे असेल छावा वाचा.)

फितुरीनं घात बघा केला
हेर बाजाराला
बोलतो राजाला

धनी!
धनी घात झाला!
धनी घात झाला!

मोघली फौज तळकोकणात उतरली!
मोघली फौज तळकोकणात उतरली!

गणोजी शिर्के काय म्हणत आहेत?

राजे, विश्वास ठेऊ नका!
मोघल तरी दिल्लीला पळून गेला
आपणच त्याला पळवून लावलं
आपल्या पराक्रमानं ते पळून गेले
ते येतील कसे?

विश्वास वाटला राजाला
विश्वास वाटला राजाला
वाटला राजाला वाटला राजाला
जरा अंग टाकलं धरणीला
जरा अंग टाकलं धरणीला
न् ही काळरात्र राजाला
न् गाढ झोप लागली शंभूला
शत्रूनं वेढा बघा दिला
शत्रूनं वेढा बघा दिला
संगमेश्वराला संगमेश्वराला संगमेश्वराला

राजाना गाढ झोप लागलेली आहे
खान मुखरबाची फौज… या फौजेनं संगमेश्वराला वेढा दिलेला आहे
बाहेर गडबड चालू झाली
एक नजरबाज परत आलेला आहे
आणि काय म्हणत आहे-

धनी!
धनी, घात झाला!

गमीन… आलेला आहे!
धनी, घात झाला! गमीन आलेला आहे!

पण काळरात्रीनं राजाला गाढ झोप लागलेली होती
राजांची हालचाल काहीच नव्हती
तो दोन मिनिटं तसाच उभा राहिला आहे
आणि परत गेलेला आहे

एवढ्यात मुखरबाची फौज सरदेसायांच्या वाढ्याच्या बाहेर आलेली आहे
अन् बाहेर एकच दंगा सुरू झाला!
कापाकापी सुरू झाली!
शाहीर कलुश पळत आलेला आहे
स्वामीजी! स्वामीजी! उठा गनीम आ गया!
स्वामीजी, उठा गनीम आ गया!

राजे उठून बघतात, सरदेसायांच्या वाड्याला चारी बाजूनं वेढा दिलेला आहे

हे कसं घडलं?

गणोजी शिर्क्यानी आमच्याशी अशी बैमानी का केली?
शत्रूतरी दिल्लीला पळून गेलान्… तो… तो सरदेसायांच्या वाड्याच्या बाजूनं कसा आला?

संगमेश्वराला वेढा कसा दिला? म्हणजेच गणोजी शिर्के फितूर झाला!

राजांनी हाताच्या मुठी वळलेल्या आहेत
राजे सरदेसायांच्या वाड्यामध्ये चकरा मारायला लागलेले आहेत
एवढ्यात दरवाजाच्या बाहेरच रणकंदन सुरू झालेले आहे

हर हर महादेव!

राया अंता याच समयाला
याच समयाला
याच समयाला
घेऊन चंद्रावर्ताला

राया अंतानी महाराजांचा चंद्रावर्त आणलेला आहे
ती खुंटीला अडकवलेली समशेर राजांनी घेतली
जिरेटोप माथ्यावर चढवला
आणि राजे चंद्रावर्तावर स्वार झालेले आहेत
संताजी आणि बहेरजी…
आलेल्या खानाच्या फौजेशी सामना करू लागलेले आहेत.
महलोजीबाबा… भोवती, पोत आपल्या अंगाभोवती फिरवतो,

गरगरा पट्टा फिरवायला लागलेला आहेत

महलोजी याच समयाला
याच समयाला याच समयाला
बोलले राजाला बोलले राजाला

धनी!
चंद्रावताचा लगाम खेचा
नावडी नदी जवळ करा
धनी भांगा काढा
धनी भांगा काढा

गरगरा फिरवीत पट्ट्याला
फिरवीत पट्ट्याला फिरवीत पट्ट्याला
महलोजी याच समयाला
जणू शेलारमामा भासे सर्वाला

साठी ओलांडलेले महलोजी बाबा जगदंबेचा पोत फिरावा याप्रमाणे…
सपासप तलवार फिरायला लागलेली आहे
जीवाची बाजी करून हिंदवी स्वराज्याच्या दौलतीची जपणूक करत आहेत
बहेरजी आणि संताजी हे मोघलांच्या फौजेशी टक्कर देऊ लागलेले आहेत

राया अन्ता होते जोडीला
राया अन्ता होते जोडीला
न् शाहीर कलेश होता संगतीला

शाहीर कलेश हाही हातामध्ये समशेर घेऊन लढायला लागलेला आहे
ही लढाई चाललेली आहे
या लढाईला आता चार तास झालेले आहेत
सरदेसायांच्या वाड्यापासून ही लढाई नावडीपर्यंत येऊन पोचलेली आहे
काही मराठे त्या नावडीमध्ये नौका घालून आपल्या राजाची वाट बघत आहेत
महलोजी सावलीसारखे धन्याच्या पाठीमागे आपली समशेर फिरवायला लागलेले आहेत
कोण कुणाला कापतो आणि कोण कुठे चाललेला आहे
मात्र हे डोळ्यात वात घालून आपल्या धन्याच्या पाठीमागे आहेत

धनी!
भांगा काढा धनी भांगा काढा
नावडी जवळ करा
धनी भांगा काढा

घामेघूम झालेला महलोजी पुन्हापुन्हा आपल्या धन्याची राखण करतो
इकलास मुखरबच्या लक्षात आलं
आणि इकलास मुखरबनं विचार केला
हे म्हातारं अडवल्याशिवाय आपल्याला संभाजीला घेरता येणार नाय

घेऽऽर डालो बुढ्ढे को ऽऽऽ!

इकलासचा आवाज कानावर येताच महलोजीबाबांच्या बाजूनं मोघली नंग्या तलवारी चमकू लागल्या
शंभूराजापासून महलोजीला बाजूला नेण्यात आलं !
हाताचे पट्टे झडत होते
साठी ओलांडून गेलेला म्हातारा…
किती वेळ पट्टा फिरणार
साडेचार तास हे हात चालू होते

आणि महलोजीला…. बाण लागला…

महलोजीला बाण लागताच महलोजी घोड्यावरनं कोसळले गेले…..

राजांच्या कानावर शब्द आले,
राजे! महलोजी बाबा गेले!

एक क्षणासाठी राजांची तलवार थांबली गेली
राजांचं लक्ष पाठीमागं जाताच राजावर समशेरीचा वार करण्यात आला
राजांनी मान झुकवली
पण राजांच्या जिरेटोपाला ती तलवार लागली
अन् राजांचा जिरेटोप जमिनीवर कोसळला गेला
अपशकून होता
युद्धामध्ये शीरस्राण जमिनीवर पडायला नको होतं!

शंभूराजांचं मन चरकलं गेलं…

शंभूराजांचं मन चरकलं गेलं!

आणि शंभूराजे काय म्हणत आहेत…

संताजीऽऽऽ.
तुम्ही इथून भांगा काढा!
रायगड गाठा!
जीवाची बाजी लावा!
रायगडाला लढवा!
आमचं काही होवो..

संताजी घोरपडे आपल्या हातातली समशेर फिरवीत होते.
शत्रूच्या तावडीत धन्याला सोडून आम्ही रायगडाकडे जावं हे संताजीला मान्य नव्हतं
पुन्हा राजांनी आवाज दिला-
संताजी!
बहेरजी!
रायगडाला वाचवा!
जीवाची बाजी लावा!
आमचं काही होवो!
हा हुकूम संभाजीचा आहे !!!

संताजीनं मुजरा केला आणि संताजीनं निघायचा प्रयत्न करायला सुरुवात केलेली आहे
महाराजांचे पुन्हा पट्टे फिरत आहेत
आता मात्र दिसायला लागलेलं आहे
त्या नावडी नदीच्या काठाच्या माळावर रणकंदन चाललेलं आहे
एवढ्यात नेमबाजानी बाण मारला आन् तो बाण शाहिराच्या उजव्या दंडात येऊन घुसला
शाहीर घोड्यावरनं पडत म्हणताय

मै गिर गया हूं
मै गिर गया हूं

शंभूराजानं पाहिलं शाहीर कलोश घोड्यावरनं खाली कोसळलेला आहे
राजानं उडी टाकली!

कुशीत धरलं शाहिराला

शंभूराजांनी.. चंद्रावताहून उडी खाली मारली
शाहीर कलोशला पोटाशी धरलं
शाहीर कलोशने आपल्या दंडातला बाण केव्हाच फेकून दिला होता

पण एवढ्यात काय झालं
आता हे रणकंदन सुरू झालं होतं, आता ही लढाई सुरू झाली होती, जमिनीवली!
कुणीही घोड्यावर नव्हतं
माणसाला चालता येत नाय अशी शंभूराजाच्या बाजूनं गर्दी झालेली आहे
चारी बाजूनं नंग्या तलवारी आणि भाले आले
आणि शंभूराजाच्या देहाला भाले येऊन टोचले गेले
मुखरबचा तरणाबांड पोर्‍या इकलास शंभूराजांच्या जवळ आला
सप्तनद्या आणि सागराने ज्या राजाला अभिषेक झाला होता,

त्या राजाच्या जटा हातात धरल्या आणि काय म्हणत आहे-

हत्यार छोडो!
हत्यार छोड दो!

जीवनात अडचणी कितीही असो

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

               || *श्री स्वामी समर्थ* ||

*जीवनात अडचणी कितीही असो,*
*चिंता केल्यावर त्या अजून जास्त होतात,*
*शांत राहिल्यावर त्या कमी कमी होतात,*
*संयम राखल्यास त्या संपून जातात,*
*आणि परमात्मा चे आभार मानले तर*
*अडचणी आनंदात बदलून जातात...!!!*

           💐💐 🌹शुभ सकाळ🌹💐💐

सुंदर विचार

*🔆🌸🔅     सुंदर विचार        🔅🌸🔆*

        *माणसाच्या परिचयाची सुरुवात*
        *जरी चेहर्‍याने होत असली तरी,*
               *त्याची संपूर्ण ओळख*
       *वाणी,विचार आणि कर्मांनीच होते.*

       *कोणी आपल्याला वाईट म्हंटलं तर*
          *फारसं मनावर घेवु नये कारण,*
          *या जगात असा कोणीच नाही*
         *ज्याला सगळे चांगलं म्हणतील.*
    💐🌹शुभ  सकाळ🌹  💐
-----------------------------------------------------------

दुधाला" दुखावलं तर "दही" बनत

*"दुधाला" दुखावलं तर "दही" बनत,दह्याला त्रास दिला तर लोणी बनत,"लोणी" तापवल तर "तूप" बनत,दुधापेक्षा महाग दही दह्यापेक्षा महाग लोणी असत,आणि लोण्यापेक्षा महाग तूप आहे..*
*परंतु सर्वाचा रंग एक आहे "पांढरा" याचाच अर्थ वारंवार संकट येऊनसुद्धा जी व्यक्ती आपला रंग बदलत नाही,समाजात त्यांचीच "किंमत" वाढत असते...!!*
        
💐💐 *ll"शुभ सकाळ"ll*💐💐