आभाळातून पडणारा पावसाचा प्रत्येक थेंब...

आभाळातून पडणारा पावसाचा प्रत्येक थेंब आपल् याला काही ना काही देऊन जातो, शिकवून जातो ...

जेंव्हा तो तहानलेल्या धरती वर पडतो... तेंव्हा तो मातीला एक वेगळाच गंध देऊन जातो... ओल्या मातीचा गंध...
'देण्यात' किती सामर्थ्य असतं हेच तो नकळत आपल्याला सांगून जातो...

जेंव्हा तो झाडांच्या पानांवर पडतो... जास्त वेळ थांबत नसेलही तो तिथे... पण तरीही तो त्या पानांना अगदी टवटवीत करून जातो...
'ओझरता स्पर्श'... ओझरत्या स्पर्शाची ताकद दाखवून जातो तो आपल्याला ...
कारण त्यात 'लालसा' नसते... त्यात असते एक अनामिक 'ओढ'... अन तीच आपल्याला टवटवीत ठेवते...

अन जेंव्हा तो तिच्या चेहऱ्यावर पडतो... तेंव्हा ....
तेंव्हा राहतंच काय हो ;)...

तिच्या गालावरून खाली येतांना तर तो खुद्द बेभान होऊन जातो...
बेधुंद 'जगणं' काय असतं हेच तो आपल्याला सांगून जातो...


मला कुणी सांगेल का पाहिले प्रेम कस करायच असत

मला कुणी सांगेल का पाहिले प्रेम कस करायच असत
मला कुणी सांगेल का पाहिले प्रेम कस करायच असत

दिवस रात्र २४ तास फक्त तिलाच पुजयाच असत
तिच्याच आठवणीने स्वताला विसरायच असत
कॉलेज रूम रास्ता यात फक्त तिला शोधयाच असत
अन देवाकडे फक्त तिच्या दर्शानाच साकड़ घलायाच असत
हे नाही तर मला कुणी सांगेल का पाहिले प्रेम कस करायच असत

जळी तळी आभाळी अन आरश्यात तिचे प्रतिबिम्ब बघायच असत
बघता बघता तिला आपण स्वताला हरवायच असत
कधी चुकून नजर भिडली तर नजरेला खाली झुकवायाच असत
अन चोरून फक्त तिला एकटक बघत बसयाच असत
हे नाही तर मला कुणी सांगेल का पाहिले प्रेम कस करायच असत

ती रोज स्वप्नात येते म्हणुन रोज सजुन लवकर झोपायच असत
अन स्वप्नात सुद्धा तिला फक्त बघून दुरून हसयाच असत
रोज सकाळी हातांच्या ओंजाळीत तिला पहयाच असत
देवाच्या आधी चुकून तिचेच नाव वदयाच असत
हे नाही तर मला कुणी सांगेल का पाहिले प्रेम कस करायच असत

ती समोर नसतांना तिच्यावर सिंहा सारख काव्य म्हणयाच असत
ती वर्गात येताच मग सश्या सारख बेंच खाली लापयाच असत
आपण स्वत मुद्दाम चुकून आपल्या चुकान्वर तिला हसवायाच असत
ती हसताना तिच्या हास्य मोतिंना हळूच हृदयावर झेलायाच असत
हे नाही तर मला कुणी सांगेल का पाहिले प्रेम कस करायच असत

तिला सांगायला घाबरत असंलो तरी एकदा आवसान एकवटायच असत
भले ती स्वीकारो व ना स्वीकारो पाहिले प्रेम तिलाच अर्पायाच असत
हे नाही तर मला कुणी सांगेल का पाहिले प्रेम कस करायच असत

जेव्हा काही चुकत असेल...

जेव्हा काही चुकत असेल.....तेव्हा माझी आठवण कर......

तुला आठवेल बरोबर असलेल....

जेव्हा कधी संकटात असेल.........तेव्हा माझी आठवण कर........

तुझ्या मनात असेल तुला सावरायला.....

जेव्हा तुझ्या डोळ्यात अश्रू असेल.....तेव्हा माझी आठवण कर........

मी येईल वाऱ्‍याची झुळूक बनून तुझे अश्रू पुसायला........ ..

जेव्हा तू झोपला असेल.........तेव्हा माझीआठवण कर........

मी येईल जवळ तुझ्या तुला निजवायला....... ..

जेव्हा तू एकटा असशील तेव्हा माझी आठवण कर........

मी येईल तुझ्या एकांतात तुझ्याशी गप्पा मारायला........ .

जेव्हा तू मला आठवशील तेव्हा माझी आठवण कर.......

मी येईल एक आठवण बनून तुझ्या आठवणीत रमायला......

कारण प्रत्यक्षात तर मी येऊ शकत नाही.....

माझ तस अस्तिव हि नाही......

पण जेव्हाही तुला माझी गरज लागेल....

तेव्हा माझी आठवण कर........मी येईल....नक्की येईल....

तुझे अश्रू बनून......

तुझ्या वेदना घालवायला....... ♥♥♥

वाट....

कळत नाहीत वाटा,
तिकडे कशाला जायचं..?
आपले नव्हते जे,
त्यांना का आठवायचं..?

ज्यांना विश्वास कधी,
समजला नाही..
त्यांना का आपण,
खास काही सांगायचं..?

आहेत आपल्याकडे
शब्द मांडायला,
न ऐकनार्यांसाठी,
का ओरडायचं..?

भावना आहेत मनी,
त्यांना फक्त मांडायचं,
आपला काही चुकतं,
म्हणून गप्प का राहायचं..?

नाही सापडलं उत्तर,
तर प्रश्नांना नाही टाळायचं,
जगासमोर एक,
आपलं उदाहरण ठेवायचं..!!