vinod लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
vinod लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

पुर्ण सोसायटी क्वारंटाइन

 आज आजीने मुलांची नजर उतरवायला मिर्चीचा वापर केला


अनं ...

जश्या मिर्च्या चुलीत टाकल्या...पूर्ण सोसायटी खोकायला लागली


मग काय
.
.
.
महापालिका आरोग्य विभाग आले

अनं......

आज पुर्ण सोसायटी क्वारंटाइन आहे

मराठी उखाणे भाग १

देवयानी :
कधी सरळ चाले कधी उलटा वळॆ एकदम
काय म्हणू सांगा याला विक्रम की चक्रम

प्रिय दर्शिनी :
स्वतःला म्हणवून राजे, चालतात उंटासारखे तिरके
फ़ुटक्या माझ्या नशिबी आले रणवीर राजेशिर्के 

रागिणी :
तळ्यामधल्या चिखलात जणू उगवलय कमळ
राजेशिर्के असून देखील नील माझा निर्मळ

साक्षी :
काय सांगू तळोबा वाटे मला लाज
असा कसा अतिरेकी झाला माझा राज


chandichya tatat jilebiche tukade
ghas bharavate melya thobad kar ikade

anyways bakichehi chan aahet

आजकाल च्या लग्न ठरलेल्या मुलीसाठी..

मोबाईल वर एफ़ एम् एकते कानात हेडफोन टाकुन ......
मोबाईल वर एफ़ एम् एकते कानात हेडफोन टाकुन ......

आणि ....... रावना मिस कॉल देते एक रूपया बैलेंस राखून..



आजघर माजघर माजघराला नाही दार
गणपतरावांच्या घरात मात्र विंडोज दोन हजार


सचीनच्या बॅट ला करते नमस्कार वाकून
***** रावांचे नाव घेते पाच गडी राखून

इराण्याच्या चहा बरोबर मिळतो मस्का पाव
**** रावांची बाहेर किती लफडी ते विचारू नका राव !!


bashit bashi kachechi bashi...............
bashit bashi kachechi bashi...
Mazi bayko sodun sarv Mhashi..................






झक्कास मराठी विनोद

बाई : सांगा पाहू ताजमहाल हि जगातील आश्चर्यकारक , वास्तू का आहे ? : : : ... : : : : : : : :
बंड्या : कारण शाहजहान ने कुठलही लोन न घेता तो बांधला होता म्हणून


सोनिया अमेरिकेत आपल्या मित्राच्या घरी जाते.... सोनिया - तुझं घर तर फार चांगलं आहे.... मित्र -तो समोरचा पूल पाहताय??? सोनिया- हो... मित्र- त्यात १०% कमीशन मी खाल्लय.... . . . . मित्र भारतात सोनियाचा घरी येतो.... मित्र-तुझं घर तर माझ्या घरापेक्षाही चांगलं आहे..... सोनिया- तो समोरचा पूल दिसतोय??? मित्र- कुठे तिथे तर काहीच नाहिये.... सोनिया- तेच तर दाखवत आहे......! !!

एकदा शरद पवार,राजा आणि कलमाड़ी हेलिकॉप्टर मधून प्रवास करत होते पवार १००रु.ची नोट खाली टाकतात.आणि म्हणतात.. "मी एका गरीब भारतीयाला सुखी केले" मग राजा ५०रु च्या दोन नोट टाकतात आणि म्हणतात.. "मी दोने गरीब भारतीयाना सुखी केले" मग कलमाड़ी १रु च्या १००नाणी टाकतो आणि म्हणतात.. "मी १००गरीब भारतीयाना सुखी केले" हे ऐकून पायलट म्हणतो "मी तुम्हा तिघाना टाकुन देईन आणि १२५कोटि भारतीयाना निरंतर सुखी करेन"

लोक सभा चे कामकाज
11:00 am : entry
11:05 am : " बैठ जायीये "
11:06 am : " शोर मत माचायीये "
11:07 am : " शांत रहिये "
11:09 am : " प्लीज शांत रहिये "
11:10 am : " सब घर जयीये , House is adjourned for day"
जय हो�! भारतीय लोकशाही ची!!


एका पार्टीत एक सुंदर मुलगी एका गृहस्थाकडे येते,
मुलगी: तुम्ही नाचणार का?
ग्र्रुहास्थ (एकदम खुशीत): "हो"!!
मुलगी: बरं, तुमची खुर्ची देता का मला?!

नवरा : जेवण तयार आहे?
बायको : थोडा वेळ लागेल!
नवरा : मग मी बाहेर जाऊन जेवतो.
बायको : पाच मिनिटं थांब.
नवरा : पाच मिनिटांत होईल ?
बायको : नाही. पटकन तयार होऊन येते !


चिंगी : मंग्या, कालपासून बघत आहे कि तू रक्त या विषयावर खूप पुस्तक वाचत आहेस . काही विशेष कारण ? . . .
मंग्या : चिंगे, डॉक्टर ने मला उद्या ब्लड टेस्ट आहे म्हणून मला सांगितले आहे, आणि मला त्या टेस्ट मध्ये चांगले गुण मिळवून पास व्हायचे आहे....


माझी बालपणीची शौर्यकथा : .
 मी एका सिंहाच्या कानाखाली लावली ......... .
एका वाघाच्या पेकाटात लाथ घातली ......... . .
एका चित्त्याचा तंगडा मोडला ..... . .
एका हत्तीला फेकून दिला . .
.
.
.
.
.
.
मग मात्र मला त्या खेळण्याच्या दुकानाच्या मालकाने दुकानाबाहेर काढला........

marathi zakkas jokes


नवरा - तुझी बहीण तुझ्या मानाने किती सुंदर आहे.

बायको - मग तिच्याशीच करायचे होते लग्न. मला कशाला गटवलीत?

नवरा - तीच म्हणाली ताईचे झाल्याशिवाय मी नाही जा :P 

----------------------------------------------------------------------

स्मार्ट मुलगा + स्मार्ट मुलगी = रोमान्स

स्मार्ट मुलगा + ढ मुलगी = लफडं

ढ मुलगा + स्मार्ट मुलगी = लग्न

ढ मुलगा + ढ मुलगी = विवाहपूर्व 'संकट

 -----------------------------------------------------------------
बायकोच्या सततच्या बडबडीमुळे चंदू जाम वैतागला होता.


चंदू : तू जर पाच मिनिटं गप्प बसलीस ना तर मी तुला पाचशे रुपये देईन.

चंदूची बायको गप्प बसली. जेमतेम दोन मिनिटांनंतर तिने चंदूला विचारलं, 'अहो, जरा घड्याळ बघा ना, पाच मिनिटं झाली का ते?'

 ----------------------------------------------------------------------------------
एकदा सांताला  त्याच्या गर्लफ्रेण्डचा एसएमएस आला.

' आय मिस यू!'

  सांताने खूप विचार करून त्याला उत्तर लिहिले,

' आय मिस्टर यू!!'


-----------------------------------------------------------------------------------------

बायको : काय हो...इतक्या हळू आवाजात कोणाशी बोलताय?

नवरा : बहिणीशी

बायको : अहो मग, बहिणीशी इतक्या हळू आवाजात कशाला बोलायला हवं?

नवरा : अगं माझ्या नाही, तुझ्या बहिणीशी बोलतोय.

 ----------------------------------------------------------------------------------------
झंप्या   : डॉक्टर, माझ्या कानात सतत गुणगुण ऐकू येते.

डॉक्टर : असं कधी होतं तुम्हाला?

झंप्या : वॉकमन लावल्यावर!

 -------------------------------------------------------------------------------

शिरप्याचं गाढव हरवलं. तरीही तो देवाला धन्यवाद देऊ लागला.

गणा : काय रं शिरप्या, तुझं गाढव हरवलं आनि तरी बी तू देवाचे आभार मानतुयंस?

शिरप्या : आरं बाबा, देवाचीच किरपा की मी त्या गाढवावर बसलो नव्हतो, न्हाय तर मी बी हरवलो असतो की.

 -------------------------------------------------------------------------------
पती : तू आणि फक्त तूच या घराला स्वर्ग बनवू शकतेस?

पत्नी : कसं काय?

पती : माहेरी जाऊन!!

 -------------------------------------------------------------------------------
न्यूटनचा मृत्यू कसा झाला???
.
.
.
.
.
त्याने रजनीकांतचे पिक्चर बघितले आणि आपण स्वत: तयार केलेल्या नियमांची वाट लागताना बघून त्याला धक्का बसला :D :D


------------------------------------------------------------------------------------
बांता  : अरे, या टीव्हीवाल्यांना कसं काय कळतं?


सांता  : काय कळतं?

बांता  : की, आप देख रहे है 'स्टार प्लस'?

 ----------------------------------------------------------------------------------------
गर्लफ्रेण्ड : आपण कुठे चाललोय?

बॉयफ्रेण्ड : लाँग ड्राइव्हवर!

गर्लफ्रेण्ड : (लाडात येऊन) मग आधी का नाही सांगितलंस?

बॉयफ्रेण्ड : मला पण आत्ताच कळलं की, ब्रेक फेल झालेत!!
----------------------------------------------------------------------------------
अभिषेक बच्चन :तुला माहित आहे का माझ तुझ्यावर किती प्रेम आहे ते ?
ऐश :- No idea.
अभिषेक:  Get idea
.
.
.
ऐश :गप्प माकडा :D :D :D

स्वप्न

स्वप्न  संपल की सत्य बोचु लागतं उदबत्या जळुन गेल्या तर मागे राखेचा सडा ऊरतो . राखेला सुंगंध नसतो. स्वप्नाला सुत्र  नसत. तरी मी त्याला विचारलं "स्वप्नांवर माणुस जगतो का रे ?" तो म्हणाला "नाही ! स्वप्नांवरच माणुस झोपतो, रमतो. पण जाग येईपर्यंत ! जागेपणीही स्वप्नच ऊराशी बाळगली तर परत झोपण्याची वेळ येते माणसावर "

"मी बुवा स्वप्नांवरच जगतो. स्वप्नांचा आणि सुंगंधाचा फ़ार जवळचा संबंध असतो"
"बरोबर आहे, शेवटी दोन्हीची राख होते"

व. पु. प्रेमींसाठी...विशेषता वपुर्झा वर आधारी


भक्तीभाव...असामान्य असं काही नसतं. ज्याला जसं परवडेल तसा तो राहतो. 
पूजेसाठी कुणी फुलं घेतो, कुणी सुवर्ण घेतो. 
स्वत:च्या कुवतीप्रमाणे जो तो साधनं निवडतो.
ती गौण नसतातच . ती नाममात्र असतात. 
प्रश्न असतो भक्तीभावाचा! शंभर वर्ष तप करून शंकराला एकेक शीर
अर्पण करणारा लंकाधिपती असतो, 
तर तुळशीच्या पाणावर दैवताला जिंकणारेही असतात

सौंदर्य...
'स्त्री? ला जन्माला घालताना परमेश्वराने तिला विचारलं,
'तुला बुद्धी हवी का सौंदर्य??
तेंव्हा ती स्त्री म्हणाली,
'बुद्धीची गरज नाही, सौंदर्यच दे!?
'का??
'बुद्धीच्या सामर्थ्यावर सौंदर्य मिळवता येत नाही, 
पण सौंदर्याच्या जोरावर बुद्धी विकत घेता येते.? 

ज्योत...
?ज्योत? म्हटलं की ती झंझावातात विझणारच असं माणलं जातं.
सगळ्या ज्योती विझतात. विझत नाही तो प्रकाशाचा धर्म. 
कायम उरतो तो प्रकाश. आणि ज्योतीचा जय होणार नाही असं कशावरून? 
आयुष्य केवळ ज्योतीला असतं असं नाही, 
झंझावातालाही असतं. 


स्वाभाविक....
त्यांनी बघावं म्हणून मी इथं येत नाही. इट् इज अ पार्ट ऑफ द् गेम! पुरूष पाहणारच.
स्वाभाविक गोष्टींवर् चिड्ण्यात अर्थच नसतो. 
भुंगे जमावेत म्हणून कमळ फुलत नाही, अणि एखादं कमळ पकडायचं असं ठरवून भुंगे भ्रमण करत नाही. 
फुलणं हा कमळाचा धर्म, भुलणं हा भुंग्याचा धर्म. जाणकारानी, रसिकांनी कमळाकडे पहावं, भुंग्याकडे पहावं आणि फुलावं कसं आणि भुलावं कसं हे शिकावं. 



जबाबदारी...
?जबाबदारी आणि ओझं, ह्यातला नेमका फरक सांगाल??
"ओझं म्हणजे खांद्यावर दिलेला बोजा. पण कधीकधी दहा-बारा हजारांचा एखादा
दागिना सांभाळायचा असतॊ. ते इतरांनाही माहित नसतं. त्याला जबाबदारी म्हणतात. आयुष्यापासून मघाशी मी सांगितलेली यादी.."
"प्रेम, मैत्री, संगोपण, शुश्रूषा ह्या सगळ्या जबाबदारया. 
त्यांचं ओझं वाटलं की सहजता गेली."

"ओझं हीदेखील जबाबदारी नसते का?"

"ओझं दिसतं कारण ते लादलेलं असतं. जबाबदारी स्वीकारलेली असते. 
ओझं बाळगणारयाला कदाचित मदतीचा हात मिळतो. तसं जबाबदारीचं नसतं." 






पार्टनर
पोरगी म्हणजे झुळुक! अंगावरून जाते. अमाप सुख देऊन जाते. पण धरून ठेवता येत नाही.

आपल्याला हवा तेव्हा तिसरा माणुस न जाणं हाच नरक.

तुला मी हाक कशी मारु? पार्टनर ह्याच नावाने.
आपल्याला खरं तर नावच नसतं. बारशाला नाव ठेवतात ते देहाचं.

लक्षात ठेव दोस्त, तुला मी हवा आहे म्हणुन मला तू हवा आहेस.

कुणाचा तरी मुलगा होणं टाळता येत नाही. कुणाचा तरी बाप होणं टाळता येतं.

दु:खं, आनंद, जय, पराजय, हसु, आसु, जन्म, मरण, विरह-मिलन, सगळं तसच असतं .प्रत्येक क्षणी माणसाचं मन नवा जन्म घेतं, एवढच काय ते नविन. पुन्हा जन्म घेण्याची ही क्रिया थांबणं हेच मरण.

समुद्राची ताकद टिटवीला समजत नाही.
आकाशाची व्याप्ती गरुडाला समजत नाही.
सुगंधाचं कोडं फ़ुलाला उमलत नाही.
एवढासा तू, त्याहुन एवढासा मी मला जिवनाचा अर्थ कसला विचारतोस?आणी त्याहीपेक्षा संभोगाचा अर्थ लावायचा असतो, हे तुला कोणी सांगितले?
पाणी म्हणजे एच टू ओ.इथचं सगळे थांबलेले आहेत.मुर्ख म्हणुन नव्हे तर जाणकार म्हणुन थांबले.
पृथ:करण पाण्याचं करायचं असतं, तहानेचं नाही हे त्यांना समजलं म्हणुन.
कोणता आनंद क्षणजीवी नाही?
दोन इंच लांबीच्या जिभेवर पदार्थ असतो तोवर चव. खाली उतरला की घास.
सुगंधाचं नातं नाकाशी.घशातुन आत गेल्यावर ति फ़क्त हवा.
खरं तर सगळ्या पंचेंद्रियांचं नातं रसिकतेशी नसुन तृप्तीशी असतं. तो क्षण संपला की रसीकता संपली.
इतर अनेक गरजांप्रमाणे "तृप्ती" जी एक गरज आहे.
जो गरजु आहे त्याला व्यवहार सांभाळावा लागतो.व्यवहार नेहमी साधतोच असं नाही.तो सत्यासारखा कटू असतो.
ज्या मनात रसिकता असते त्याच मनात कटूता निर्माण होते.
सध्या एकच वर्तमान्काळ सांभाळ. 


निर्णय घेता न येन ह्यासरखा दुसरा घातक दोष नाही. निर्णय न घेता येण्या पेक्षा चुकीचा निर्णय घेणे अधिक बरे. चुकीचा निर्णय घेनारया मानासनी जीवनात यश मिलावलेले आहें. परन्तु जो निर्णय घेवु शकत नाही त्याचे मन हे करू की ते करू ह्या गोंधलात घुन्तलेले असते. मात्र हा मनुष्य कधीही यशस्वी ज़ल्याचे ऐकिवीत नाही. त्याला कृति करता येत नाही आणि ज्याला कृति करता येत नाही त्याला कोणत्याही क्षेत्रात यश मिलवता येत नाही. 
-व पु 


चांदणं चांदणंच असतं. त्याला ग्रेड्स नाहीत. डिग्री नाही. डिग्री नाही म्हणुन अहंकार नाही. म्हणुनच गोंगाट नाही. ते नम्र असतं. उन्हाप्रमाणे चांदण्याजवळ तरतमभाव नाही. ते जितकं प्रखर, तितकं सौम्य. चंद्राइतकं औदार्य माणसांना मिळवता येईल का? अमावस्येला स्वत:चं अस्तित्वही न दर्शवण्याचा निरहंकार फ़क्त चंद्रासारख्या महान ग्रहाजवळच असू शकतो!
माणसं चंद्रासारखी शीतल का होत नाहीत? एकच कारण.
ती चंद्राची उपेक्षा करतात. रात्री झोपा काढतात. एका चतुर्थीत सगळं देणं चुकवतात. त्यातही भक्ती किती? आणी अहंकार किती?
उपवास करणार्यांचा परिवारावर एक अनामिक पगडा असतो. दडपण असतं. चंद्राची शीतलता उचलणं हेच व्रत. त्याच्या शीतलतेचं अनुकरण केलं तर घरात चांदणं पहुडेल.
पण त्या शीतलतेशी घनिष्ठ मैत्री हवी. ती झोपून कशी मिळणार?
त्यासाठी हे असं चांदण्यांशी संधान जुळवलं पाहिजे.
समुद्रासारखा जीवही चंद्र दिसला की झेपावतो. मिठाला जागतो. मग माणसं अशी थंड का? ती शांत असतील तर उत्तम. पण ती थंड म्हणजे निर्विकार असतात. 




एक मांजर सकाळी रस्त्यावर आलं. सूर्याच्या तिरक्या किरणांमुळं मांजराला स्वत:ची लांबपर्यंत पसरलेली सावली दिसली. मांजर म्हणालं,'आज कमीत कमी एखादा घोडा मारून खाल्ल्याशिवाय भूक भागायची नाही.'सूर्य वरवर येऊ लागला.सावलीकडे पाहून मांजर म्हणालं,'घोड्याची काही जरूरी नाही. एखादी शेळी सुद्धा चालेल.'सूर्य आणखी वर आला. सावलीची लांबीही त्याप्रमाणात कमी झाली.मग मांजर म्हणालं,'एखादा ससाही चालेल.'ऐन दुपारी सावली पायांतळीच आली. तेंव्हा मांजर व्याकूळ होत म्हणालं,'फक्त एक उंदराचं पिल्लू पुरे.'

व्याकुळावस्थेत स्वत:ची जी ओळख होते, ती 'वास्तवता'. स्वत:ची ओळख. त्या प्रमाणातच प्रत्येकाची 'पूर्णत्वाची' व्याख्या वेगळी असणार.एखाद्या कलाकृतीत कोणत्याही माणसाला कुठलाही पर्याय किंवा बदल सुचवता येत नाही, तेंव्हा ते 'पूर्णत्व'. 

व. पु. ची काही वाक्ये

प्रत्येक माणूस हे एक कोड आणि प्रत्येक माणूस एकदाच हे आणखी एक कोड
- आपण सारे अर्जुन 


आम्ही 'सहन करतो, सहन करतो', हे इतका वेळ तुम्ही सांगीतलेत...
ह्याचा अर्थ तुम्ही काहीच सहन करत नाही. तुम्ही दु:ख वाटत सुटलात. 
जो सहन करतो, तो बोलत नाही...... 


Success is a relative term. More success, more relatives. 


चांगुलपणाच्या कृतीचं, कृती संपताक्षणीच विस्मरण व्हावं. कापूर जळतो, तशा त्या आठवणी जलून जाव्यात....
कापूर जळला की, राखेच्या रुपाने ही त्याचं अस्तित्व रहात नाही. त्याप्रमाने सत्कृत्याच्या आठवणीचं पुढच्याच क्षणी विस्मरण व्हावं. 


"आम्ही कोरडे पाषाण असतो म्हणुनच आम्ही रडवू शकतो. ज्याला दगड लागतो, ठेच लागते तो विव्हळतो. ज्याच्यामुले ठेच लागली त्या दगडाला पाझर फुटल्याचं कधी पाहिलंस का..????" 


कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही....... पण गगन भरारीच वेड रक्तातच असाव लागत.... कारण आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही ! 


आकाशात जेंव्हा एखादा कृत्रिम ग्रह सोडतात तेंव्हा गुरूत्वाकर्षणाच्या सीमेबाहेर त्याला पीटाळून लावे पर्यंतच सगळा संघर्ष असतो. त्याने एकदा स्वता गती घेतली की उरलेला प्रवास आपोआप होतो. 

असच माणसाच आहे... 
समाजात विशिष्ट उंची गाठे पर्यंत जबर संघर्ष असतो. पण एकदा अपेक्षित उंचीवर पोचलात की आयुष्यातल्या अनेक समस्या ती उंचीच सोडवते. 


प्रयत्नात ढिलेपणा नको
कष्ट करतांना सवलत नको 
महत्वकांक्षेला मर्यादा नको
आणि
आपल्याइतक्याच पॊटतिड्केन दुसरी व्यक्ती
आपल काम करेल ही भ्रांत नको
प्रयत्न करत असतांना निर्णय घेणारी आणखी एक
शक्ति आहे, ह्याच भान ठेवाव.आपण प्रयत्नात ढिलाई केली नाहि
हे समाधान कोणीही हिरावुन घेउ शकत नाहि. 



यश म्हणजे ताटाभोवती ची रांगोळी.सतत अस्तित्व दर्शवणारी.रांगोळीचा भुकेशी संबंध नाही.म्हणुनच ती पचवण्याचा प्रश्न उदभवत नाही. अपयश हे वाढलेल्या ताटासारख.अन्नावर वासना नसली तरी ते वाढ्ण गिळाव लागत, पचवाव लागत. चेहरयाची रंगोळी विस्कटु न देता. 



माणसाने मनात काही ठेवू नये, नाहीतर डोक्यावर परिणाम होतो. 


पावसातून भटकताना अंगावरचा शर्ट भिजतो तेवा काही वाटत नहीं ..
तो अंगावरच सुकतो तेव्हा त्याचंही काही वाटत नाही..
सुकला नाही तरी ओल्याची सवय होते..
पण म्हणुन कुणी ओलाच शर्ट अंगात घाल म्हटलं तर कसा वाटतं?? 

तप्तपदी व.पु.काळे

"आयुष्यात जो अत्यंत महत्वाचा निर्णय असतो,की ज्या निर्णयामुळे सगळ्या भवितव्याला कलाटणी मिळण्याची शक्यता आहे,अशा क्षणी कुणावरही विसंबुन रहायचं नाही.आपला बेत फ़सला किंवा कुणीतरी उधळुन लावेल अशी परिस्थिती निर्माण होऊ द्यायची नाही.निर्णयाच्या क्षणी आपण स्वतंत्र असलं पाहीजे."

"लग्नासारखा एक निर्णय आबाद किंवा बरबाद करायला पुरेसा असतो.अशा वेळी व्यक्ती स्वतंत्र हवी."

"समस्या आणि उत्तर ह्यात वेळ म्हणजे Time Factor असतो.Forth Dimension म्हणतात तो Factor.म्हणुनच एका उत्तराची वेळ टळली की दुसरं उत्तर शोधावचं लागतं."

"उत्तम आणि उच्च पदवी हीसुद्धा ऎपतच आहे.नुसत स्वाभिमान आहे,पण कोणतीच पात्रता नाही ती माणसं जास्तीत जास्त मग्रुर असतात."

"एखादी व्यक्ती जाता-जाता जेव्हा आपल्याला अपेक्षित नसलेला कॉमेंट करते.तेव्हा त्यांच फ़क्त नवल वाटतं.पण केव्हातरी सगळ्या आयुष्याचा पट उलगडुन बसण्याचा क्षण येतो तेव्हाच त्या माणसाचे खरे विचार समजतात.पृष्ठभागावरुन नुसतचं वाहुन गेलेलं पाणी किती आणि जमिनीने धरुन ठेवलेलं किती हे ’बोअरवेल’ खणल्याशिवाय कळत नाही.वर्ष संपलं की आपण नवीन Calender आणतो.काही वाणसामानाबरोबर फ़ुकट येतात.कधीकधी Calender साठी आपण अनावश्यक वस्तुही घेतो.प्रत्येक महीन्याला वेगवेगळं चित्र असलेलं,कधी जाहीरपणे लावता न येणारं किंवा लावता येणारं,भारी Calender ही आपण पळवलेलं असतं.कितीही आकर्षक -आकर्षक म्हटलं तरी त्याच नाविन्य किती काळ?
नाविण्याइअतकी चटकन शिळी होणारी दुसरी कोणतीही वस्तु नसेल.भिंतीकडेच पाहत आयुष्य घालवणार्‍या रिकामटेकड्यांना Calender वर कुठलही चित्र चालतं.व्यक्तीमत्व घडवणार्‍या माणसांच्या बाबतीत,तारखांचे चौकोन जास्त सचित्र असतात.प्रत्येक चौकोनावर वेगळं चित्र,वेगळा विचार,वेगळी प्रगती,वेगळं शिखर.तो पट जेव्हा जेव्हा उलगडला जातो तेव्हाच समोरच्या माणसाला जाणवतं की,प्रत्येक श्वासाचं दाम मोजुन श्याम विकत घेणारी गदिमांची नायिका आणि समोरचा माणुस एकच आहे.बुद्धी,मन आणि शरीराच दान करुन ह्या माणसाने Calender चा कालनिर्णय स्वतः विकत घेतला आहे."

kapus joke

कापूस
डोक्टर कडे फोन ची बेल वाजते पलीकडचा माणूस : डोक्टर साहेब, कापूस आहे का? 
डोक्टर: हो आहे की. 
पलीकडुन: थोडा काढा आणि खीशात ठेवा. 
परत १० मी. फोन येतो. 
पलीकडचा माणूस : डोक्टर साहेब, कापूस आहे का? 
डोक्टर: हो आहे की. 
पलीकडुन: थोडा काढा आणि खीशात ठेवा. 
अस ३ ते ४ वेळा झाल्यावर डोक्टर फ़ार चिडतो.. मनात म्हणतो आता येवू देत फोन 
बघतोच त्याच्याकडे. 
१० मी. पुन्हा बेल वाजते… 
पलीकडचा माणूस : डोक्टर साहेब, कापूस आहे का? 
डोक्टर: जोरात ओरडतो.. नाहीये का? 
पलीकडचा माणूस : आहो मग चिडता कशाला खिशातला काढा की। 
हा हा हा हा !!!! 

driver traffic police joke

ट्रॅफिक पोलिसांनी कार थांबवली. 'अभिनंदन, रस्ते सुरक्षा सप्ताह सुरू
आहे... तुम्ही सीटबेल्ट लावून गाडी चालवत आहात, म्हणून तुम्हाला ५०००
रु.चं बक्षिस मिळतंय.
या रकमेचं तुम्ही काय कराल?'
कार ड्रायव्हर: मी त्यातून माझं ड्रायव्हिंग लायसन्स बनवून घेईन.
ड्रायव्हरची आई (मागच्या सीटवरून): त्याचं काही एक ऐकू नका.. दारू पिऊन
तो काय वाट्टेल ते बोलतो...
ड्रायव्हरचे बाबा: मला वाटलंच होतं... चोरीच्या गाडीतून आपण जास्त लांब
जाऊ शकणार नाही...
तेवढ्यात डिकीतून आवाज आला: भाई, आपण बॉर्डर पार केली का???

मुन्नाभाई आणि सर्किट


एकदा मुन्नाभाई आणि सर्किट अमेरीकेला जात असतात.
तेव्हा ते इंग्लिश ची प्रॅक्टीस कशी करतात ते पहा...

सर्किट :-भाई!अमेरिका मे पता पुछनेका तो क्या बोलनेका?
मुन्ना :-धोबी घाट.
सर्किट :-भाय!इंग्लिश मे बोलनेका तो ?
मुन्ना :-अरे क्या तु तेरेको इतना नही आता.
सर्किट :-बोलो ना भाय.
मुन्ना :-Washington.....


सर्किट :-भाय! इधर आ कैसा बोलने का ?
मुन्ना :-Come here.
सर्किट :-फ़िर उधर जा कै्सा बोलने का?
मुन्ना :-पहले उधर जाने का और बोलनेका Come here.


सर्किट :-भाय! ये कैसे बोलने का,
"चल ए हवा आने दे "
मुन्ना :-simple hai,"Hey you move sideways,
late the Airforce come in.."


मुन्ना :-अभी मै पुछता हू तु बोल .
"ए मामू भेजा मत फ़िरा."
सर्किट :-"Mother's brother dont rotate my brain."


मुन्ना:-ये बोल,"इधर आ खजूर देता हू खर्चापानी"
सर्किट :-"खजूर याने date,"
"Come with me for a date i will pay u."

मुन्ना:-"अब ये बोल,अपून को बहोत सर्दि हो गएली है."
सर्किट :-"I got big winter in small nose..."
प्रोफ़ेसर:-"अकल बडी के भैस बडी?"
मुन्नाभाई:-"बोले तो पहले'DATE OF BIRTH'तो बता मामू...


मुन्नाभाई:-सर्किट, बोले तो ये’FORD'क्या है?
सर्किट:- क्या भाई!’FORD' गाडी है.
मुन्नाभाई:-तो फ़ीर ये 'OXFORD'क्या है?
सर्किट:-बोले तो सिंपल है भाई.
’OX’बोले तो बैल,’FORD'बोले तो गाडी.
"बैलगाडी"...........


मुन्नाभाई:-ए मामू! तु कितना पढा है ?
मामू :- B.A.
मुन्नाभाई:- साला दो अक्षर पढा है और वो भी उलटा.......

pulanche vinodi kisse

पु . लं. चे विनोदी ५० किस्से

 
१) 
त्यांच्या ओळखीच्या एक मुलीचे लग्न ठरले. योगायोगाने माहेरचे 
आणि सासरचे आडनाव एकच होते. हे कळल्यावर पु.लं. म्हणाले 
"बाकी काही म्हणा, पण मुलीने घराण्याचे नाव राखलं हो". 

२) 
माहेर चा एक जुना अंक वाचताना, भारती आचरेकरांची मुलाखत 
वाचली. त्यात त्या म्हणतात, त्यांची आई माणिक वर्मा ह्यान्चे लग्न 
ठरल्याची बातमी कळल्यावर पु.लं. पटकन म्हणाले 'हिने तर वर्मावरच 
घाव घातला' . 

३) 
वसंत सबनीस हे तळवलकरांचे मित्र. एकदा ते सबनिसांच्या घरी गेले, 
तेव्हा तेथे पु.लं. बसलेच होते. वसंतरावांनी ओळख करून दिली, 
"हा मझा मित्र शरद तळवलकर" 
"हो का? अरे व्वा!" पु.ल म्हणाले होते, "चांगला मनुष्य दिसतो! नव्हे, 
हा चांगलाच असरणार!" 
"हे कशावरून म्हणतोस तू?" वसंतरावांनी पु.लं. ना विचारलं. 
"अरे, याच्या नावावरून कळतेय ते!" पु.ल. म्हणाले. याच्या नावात 
एकही काना, मात्रा, वेलांटी, उकार काही नाही. 
म्हणजे, हा माणूस सरळ असणारच!" 

४) 
पु.लं.च्या "उरलंसुरलं" ह्या पुस्तकातील एक मजेदार संवाद 

" मित्रा कर्कोटका, मी तुला आता ह्या फोनवर भडकून बोलणा-यांचा 
आवाज लगेच खाली आणण्याचं एक गुह्य शास्त्र सांगतो. त्यानी तिकडे 
भडकून मोठ्याने आवाज चढवला की आपण इथनं फक्त, ' प्लीज जरा 
मोठ्याने बोलता का? ' असं म्हणायचं की तो आऊट. दोन वाक्यात आवाज 
खाली येतो की नाही बघ." 

५) 
पुलंच्या लहानपणचा एक प्रसंग त्यांची चुणुक दाखविणारा आहे. ते पंधरा 
र्षाचे असताना लोकमान्य सेवा सघांत साहीत्य सम्राट न.चीं केळकराचं व्याख्यान 
होत. व्याख्यानानंतर श्रोत्यांना प्रश्न विचारण्याची मुभा होती. 

त्या काळी भारतांन फेडरेशन स्वीकारावं की स्वीकारु नये, यावर चर्चा चालु होती. 
शाळकरी पुरषोत्तम उभा राहीला आणी त्यानं तात्यासाहेबांन फेडरेशन स्वीकारावं, 
की स्वीकारू नये, असा प्रश्न धीटपणे विचारला. 

त्यावर तात्यासाहेबांनी उत्तर दिलं. "स्वीकारू नये, पण राबवावं" यावर पुरुषोत्तम म्हणाला, "मला आपलं उत्तर कळलं नाही." 
तेव्हा समजावणीच्या सुरात ते म्हणाले, "बाळ, आपल्याला कळेल, असाच प्रश्न लहान मुलांनी विचारावा." ह्यावर पुरुषोत्तम लगेच म्हणाला, 
"पुण्याला सध्या अंजीरांचा भाव काय आहे" तात्यासाहेबांच काही उत्तर येण्यापुर्वीच सभागह श्रोत्यांच्या हसण्यानं भरुन गेलं. 

६) 
एका समारंभात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि पुलंची गाठ पडली. 
बाबासाहेब बोलण्याच्या ओघात बोलुन गेले. "तुमच्या घरी काय, तुम्ही आणी सुनीताबाई सारखे खो खो हसत असणार". 

ह्यावर गंभीरपणे पु.ल. ही त्यांना म्हणाले. 
"तुमच्या घरी सुद्धा बायको तुमच्यावर तलवरीचे सारखे वार करतेय आणि तुम्ही ते ढाल हाती घेउन चुकवताहात, असंच सारखं चित्र असतं का हो?" 

७) 
पुलंच्या हजरजबाबीच्या अनंत कथा बिरबलाच्या गोष्टीप्रमाणे सांगितल्या जातात. 
'आनदंवनातल्या ग्रामभोजनाच्या थाटात चाललेल्या एका भोजन समारंभात विविध क्षेत्रातली मातब्बर मंडळी सहभागी झाली होती. 
समोरच्या पंगतीत 'किर्लोस्कर' मासिकाचे संपादक मुकंदराव किर्लोस्कर बसलेले होते. 
मधुनच ते उठले व तो सुखसोहळा आपल्या केमे-यात बंद करण्याच्या कामात लागले. परत येऊन पाहतात, तर ह्यांच पान गेलेलं 
ह्यांची शोधक नजर पु.ल. लगेच उद,गारले, "मुकुंदराव, इथं संपादकीय पान नाहीये." 

८) 
मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या एका वर्धापनदिन सोहळ्यात पु.लं. यांनी सरकारी कामकाजातील दुबोध मराठी भाषेचा खरपूस समाचार घेतला. 
ते म्हणाले,"रेडिओवरच्या मराठीतीन 'अमूक वृत्त पोलीस सुत्रांनी दिल' असं मी जेव्हा ऎकलं, तेव्हा पोलीससुत्र हे काय प्रकरण आहे, ते मल्ल कळेना! आता कळलं. 'सुत्र' हे इंग्रजी सोर्स चं भाषांतर आहे. पोलीस कचेरीतुन ही माहीती मिळाली, असं सांगितलं असतं, तर वृत्तनिवेदकला काय पोलिसांनी पकडलं असतं? म्हणजे आता आपल्या बायकोकडुन एखादी बातमी कळली, तरी ती 'मंगळसुत्रा'कडुन कळली, असं म्हणायला हरकत नाही!" 

९) 
माणिक वर्मा या प्रसिद्ध गायिका. 
एका संगीत कार्यक्रमात सुधीर गाडगीळ त्यांची मुलाखात घेत होते. प्रेक्षकांच्या पहिल्या रांगेत बसून पु.लं. ही मुलाखात ऎकत होते. 
हसत खेळत चाललेल्या त्या मुलाखतीत गाडगीळांनी माणिक वर्मा यांना, त्यांच्या पतीबद्दल प्रश्न विचारला, "तुमची अन, त्यांची पहिली भेट नेमकी कुठं झाली होती?" 
लग्नाला खुप वर्षे होऊनही माणिक वर्मा या प्रश्नाला उत्तर देताना टाळाटाळ करीत होत्या. 
ते पाहुन पहिल्या रांगेतील पु.लं. उत्स्फुर्त्पणे मोठ्यानं म्हणाले, "अरे सुधीर, सारखं सारखं त्यांच्या 'वर्मा'वर नको रे बोट ठेवुस!" 

१०) 
कोल्हापूर आणी तेथील एकूणच भाषा व्यवहार म्हणजे पु. ल. च्या मर्मबंधातील ठेव. कोल्हापूरी समाजाइतकाच कोल्हापूरी भाषेचा बाज सागंताना ते म्हणाले, 'इथे रंकाळ्याला रक्काळा म्हणतात पण नगर्याच्या नंगारा करतात. कोल्हापूरातलं इंग्रजी शेक्सपीयरला देखील कबरी बाहेर येऊन आपल्या छातीवर हात बडवायला लावील असं आहे. त्यानं शेतात ऊसं लावला' याच इग्रंजी रूपांतर इथल्या मुन्सफानं एकदा ' He applied U'S In his farm असं केलं होतं आणि त्यावेळच्या शुध्दलेखनच्या नियमाप्रमाणं 'यू' वरती अनुस्वार द्यायलाही तो विसरला नव्हता. 

११) 
एकाने आपल्या बायकोच्या पहिल्या डोहाळजेवणाला तिला पाताळाऎवजी पु.ल. चे 'हसवणूक' हे पुस्तक दिले. पुस्तकावर त्याने लिहीले, 'प्रिय __हिस, तुझ्या पहिल्या दोहदभोजनाप्रसगीं पाताळाऎवजी पुस्तक देण्यामागील विशुध्द हेतु फसवणूक नसून हसवणूक हाच आहे. तुझाच__!' त्यावर ही त्याची पत्नी चिडली. तिने थेटं पु.ल. कडेच धाव घेतली. पु.ल. नी त्याच अर्पण पत्रीकेखाली स्वाकक्ष्ररीनिशी त्याला समजावले, 'आपल्याकडे नवर्यानं पत्नीवरील आपलं दाट प्रेम पातळानंच व्यक्त करायचं असतं, हे विसरायचं नसतं मिस्टर!" 

१२) 
नवीन शुध्दलेखनाचे नियम जर उच्चारानुसारी केले तर त्यानुसार होणारे शुध्दलेखन अधिक सुलभ व बिनचूक होईल, असं महामंडाळात घाटत होतं. त्यावर पु.ल. नी खालील छेद दिला, 'मी नुकताच एका ग्रामीण शाळेत गेलो होतो. तिथं मास्तर मुलांना शुध्दलेखन घालीत होते. ते म्हणाले, 'पोरांनो लिवा. कयाssssळs!' 

१३) 
हिंदुह्र्द्ययसम्राट बाळासाहेब ठाकरे यानां काही कारणास्तव हिंदुजा होस्पिटल मध्दे दाखल करण्यारत आले होते. ते ऎकताच पु.ल. उध्दारले, 'त्यांच्या खोलीच्या दरवाज्यावर आता 'गर्वसे कहो हम हिदंजा मे हे' असं लिहालया हरकत नाही.' 

१४) 
साहीत्य सघांत कुठल्याशा रटाळ नाटकाचा पहिलाच प्रयोग चालू होता. पु.ल. ना आर्वजुन बोलावले होते. नाटकाचा पहिला अकं चालू असता- नांच पडल्याचा आवाज झाला. शेजारचा घाबरुन पु.ल. ना म्हणाला, ' काय पडलं हो?' 'नाटक दुसरं काय?' पु.ल. उत्तरले. 

१५) 
कोल्हापुरला एकदा आमच्या नाटकाचा प्रयोग असतांना नाटकात काम करणारी एक मेत्रीण नुकतीच बाजारात जाऊन आली होती व अगदी रंगात येऊन मला सागंत होती, काय सुदंर सुदंर कोल्हापुरी साज आहेत गं इथल्या बाजारात., अप्रतीम नमुने आणि सूदंर कलाकुसर, अनं भरगच्च तर इतके की एक साज घातला गळ्यात की दुसंर काहीच घालायला नको.' हे ऎकत जवळपास असलेले भाई मीश्कीलपणे हळुच म्हणाले, 'खरं सागंतेस की काय?' क्षणभराने त्यातली खोच लक्षात आल्यावर ऎत्रिणीचीं लाजुन व आमची हसुन मुरकुंडी वळली. 

१६) 
'वॆद्यकातली एकच गोष्ट या क्रीकेटमध्ये येऊन चपखल बसली आहे. ती म्हणजे त्रिफळा. खेळणारांचे येथे चुर्ण व्हावे. गोट साफ.' - इती पु.ल. 

१७) 
एकदा वसतंराव देशपांडे पु.लं. ना म्हणाले "हि मुलगी (सुनिताबाई) म्हणजे एक रत्न आहे'. ह्यावर पु.लं. लगेच म्हणाले 'म्हणुनच गळ्यात बांधुन घेतलय!! 

१८) 
एकदा आपली आणी सुनिताबाईंची ओळख करुन देताना पु.लं. म्हणाले की "मी 'देशपांडे' आणी ह्या 'उपदेशपांडे" 

१९) 
एकदा एक भोजन समारंभात पु.लं. च्या एक बाजुला श्रि ना.ग. गोरे आणि दुस-या बाजुला श्रि भुजंगराव कुलकर्णी बसले होते. पु.लं. म्हणाले, "आफतच आहे. एकिकडे नाग आहे तर दुसरीकडे भुजंग! !!" 

२०) 
एकदा पु.लं. ना एक कुकरी सेट गिफ्ट म्हणुन मीळाला. तो सेट सुनिता देशपांडे आपल्या भाचीला दाखवत होत्या. 
सुनिताबाईंचा 'सर्व काही जपुन ठेवण्याचा " स्वभाव माहित असल्यामुळे भाची सुनिताबाईंना म्हणाली 
" अगं, एवढा सुदंर सेट फुटु नये या भितीने तु तो कधी वापरणारच नाहीस का?" 
त्यावर पु.लं. पटकन म्हणाले "हो तर !! सुनीता मला कधी ओमलेट सुद्धा करुन देत नाही ... अंडी फुटतील म्हणुन !!!" 

२१) 
पु.लं. चा वाढदिवस होता, 
एका मार्केट यार्डाच्या व्यापारी चाहत्याने त्यांच्या गळ्यात सफरचंदाचा हार घातला. 
पु.लं. त्या वजनाने थोडे झुकले. 
हे बघुन व्यापारी म्हणाला "काय राव, काय झाले येवढे"? 

पु.लं. म्हणाले, "बरे झाले तुम्ही नारळाचे व्यापारी नाही" 

घरात हशा पिकला होता ! 

२२) 
एकदा पु.लं. प्रवासात असताना त्यानां कोणीतरी भेटला, 
तो त्याचां चाहता होता. तो म्हणाला की 
माझी फक्त दोन व्यक्ती वर श्रद्धा आहे, एक ञानेश्वर आणी दुसरे तुम्ही. 

माझ्या खोलीत मी ञानेश्वरा च्या फोटो समोर तुमचा ही फोटो ठेवलाय. 

तर पु.लं. म्हणाले "अहो असं काही करु नका नहीतर लोक विचारतील, ञानेश्वरानी ज्याच्या कडुन वेद म्हणुन घेतले तो रेडा हाच का म्हणुन?" 

२३) 
पुलं एकदा चितळ्यांच्या दुकानात गेले, मिठाई खरेदी केली आणि खोक्यात बांधून द्यायला सांगीतले. दुकानातील व्यक्ती म्हणाली "खोक्याचा चार्ज पडेल". त्यावर पुलं म्हणाले (म्हणे), "अरे वा, म्हणजे मिठाई फुकट?" 

२४) 
एकदा पु.ल. एक खेड्यात उतरले होते. तिकडच्या शाळेच्या प्रिन्सिपलनी त्यांना शाळेत बोलावून त्यांचा सत्कार केला. पुलंनी दिलेल्या खुर्चीवर बसतच त्या खुर्चीचा हात मोडला. सगळी पोरं खो खो हसायला लागली. 
ओशाळलेले प्रिन्सिपल पुलना म्हणाले, "माफ करा पण हजारवेळा सांगूनही इकडच्या सुतारांकडून नीट कामच होत नाही." 

पुल मिश्किलीत म्हणाले, "अहो करवत (!) नसेल" 
२५) 
डो. श्रीरंग आडारकर यांचे चिंरजीव अशोक यांना त्याच्या विवाहनिमित्त पु.लनी पाठविलेले पत्र. 

"आजचा दिवस तुझ्या कोमल आयुष्याचा महत्त्वाचा.सुमारे चौतीस वर्षापूर्वी, जून महिन्यातच असाच एक महत्त्वाचा दिवस माझ्या आणि तुझ्या सुनीतामावशीच्या आयुष्यात आला होता." 

२६) 
स्वत:च्या खास विनोदी पध्द्तीत पु.ल.एके ठिकाणी म्हणतात," मुलगी अगर मुलगा सरळ वळणाची अगर वळणाचा कसा असतो कोण जाणे ! कारण वळण म्हटल्यावर ते सरळ कसे असणार ? भूमितीला बुचकळ्यात ढकलणारी ही सरळ वळणाची आड्वळणी व्याख्या आहे" 

२७) 
आपल्या पत्नीच्या सतत उपदेश करण्याच्या तथाकथित सवयीमुळे पु.ल. एकदा आपल्या पत्नीला-सुनीताईंना -म्हणाले," या घरात मी तेवढा देशपांडे आहे.तू ’उपदेश-पांडे’ आहेस." 

२८) 
भारती मंगेशकर ह्या दामु अण्णा मालवणकर ह्या प्रसीध्द्य विनोदी कलाकाराची कन्या.त्या दिसायला अतिशय सुरेख होत्या आणी दामू अण्णा तसे दिसायला खास नव्हते!त्यामुळे पु.लं. नी जेव्हा तीला पाहिले तेव्हा म्हणाले " हि मुलगी बापाचा डोळा चुकवुन जन्माला आली आहे !!!" 

२९) 
पु.लं.च्या एका सभेला अत्रे अध्यक्ष होते. आपल्या भाषणात ते म्हणाले, पु.ल. थोर साहित्यीक आहेत, त्यांनी खुप साहित्य नीर्मीती केली आहे. नंतर त्यांच्या कडें बघत ते पुढे म्हणाले सहाजिक आहे, त्यांच्या नांवात पु आणि ल दोन्ही आहे,मग निर्मीतिस काय कमी? 

३०) 
पुलं एका समारंभाला जाण्यासाठी तयार होत असताना म्हणाले," मी कुठल्याही समारंभाला 'बो'लावल्याशिवाय जात नाही. 

३१) 
एकदा पु लं चे पाय खूप सुजले होते. तेव्हा आपल्या सुजलेल्या पायांकडे बघत ते म्हणाले," आता मला कळले,पायांना पाव का म्हणतात ते!" 

३२) 
पुण्यात भानुविलास नावाचे चित्रपटगृह होते. तर सुरुवातीला त्याला पत्र्याचे छप्पर होते. आणि त्याच्या छतातून 
उन्हाचे कवडसे पडत असत. एकदा पु.ल.(?) तिथे गेले होते आणि ते कवडसे पाहून म्हणाले "अगदी 
बरोबर नाव ठेवले आहे, भानुविलास!" 

३३) 
'वाऱ्यावरची वरात'चा रवींद नाट्य मंदिरातला रात्रीचा प्रयोग. दुसऱ्या दिवशी बोहल्यावर चढायचे होते. लालजी देसाई आपले काम आटपून घाईघाईने निघाले. विंगेत उभे असलेल्या पुलंनी अंधारातच हात धरला आणि म्हणाले... 'प्रयोग संपेपर्यंत थांब!' लालजींना कळेना. प्रयोग संपला. पण पुलंनी पडदा पुन्हा उघडायला लावला. लालजींचा हात धरून ते त्यांना रंगमंचावर घेऊन आले आणि प्रेक्षकांना म्हणाले, 'उद्या याची 'वरात' निघणार आहे, पण तो आजच 'वाऱ्यावर' स्वार होऊन आला आहे'...आणि प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. 

३४) 
पुणे आकाशवाणीवर १९५५ मध्ये पु.ल. विशेष कार्यक्रमांसाठी प्रमुख म्हणून कार्यरत होते. जागेची अडचण असल्यामुळे एकाच मोठ्या खोलीत सगळे निर्माते एकत्र बसत असे. त्यांत पु.ल., कविवर्य बोरकर, व्यंकटेश माडगूळकर, मिरासदार अशी मंडळी असायची. त्यावेळचा एक प्रसंग . 
महात्मा गाधींची जयंती जवळ आली होती. तेव्हा २ ऑक्टोबरचे कार्यक्रम ठरवण्यासाठी केंद्र्संचालकानी निर्मात्यांच्या बैठकीत सूचना विचारल्या. कुणी काही कुणी काही कार्यक्रम सुचवले पु.ल. म्हणाले "गांधाजींना मौन प्रिय होते. तेव्हा आपण २ ऑक्टोबरला मौन पाळावे व एकही कार्यक्रम ठेवू नये." यावर संचालकांसह सर्व जण खळखळून हसले. 

३५) 
एकदा एक 'कदम' नावाचे गृहस्थ पु लं कडे मुलगा झाल्याचे पेढे घेऊन आले.....पु लं नि आशीर्वाद दिला ....... 
'कदम कदम बढाये जा' 

३६) 
सुनीताबाईंसह वसंतराव देशपांडे आणि पुलंचा गाडीतून प्रवास सुरू असताना जेव्हा समोर एक मोठा गवा आक्रमक भूमिकेत येतो आणि वसंतराव सुनीताबाईंना इंग्रजीत काही तरी सूचना करतात, हे ऐकून "पुलं' म्हणतात, "त्या गव्याला इंग्रजी समजत नाही म्हणून वसंतराव इंग्रजीत बोलतात।' 

३७) 
एका सगींत संमेलनाच्या भाषणात पु.ल. नी एक किस्सा सांगितला होता. 

’एकदा एका शेताच्या बांधावरुन जात असताना एक शेतकरी शेतात काहीतरी काम करताना दिसला. आम्हा लेखकांना कुठे गप्पा केल्याशीवाय राहवत नाही. त्या स्वभावानुसार मी त्या शेतकराला विचारलं "काय हो शेतकरी बुवा, या झाडाला कोणते खत घातले तर त्याला चांगले टॉमेटो येतील?" त्यावर तो शेतकरी चटकन म्हणाला "या झाडाला माझ्या हाडांचे खत जरी घातलेत तरी त्याला टॉमेटो कधीच येणार नाहीत कारण ते झाड वांग्याचे आहे।" 

३८) 
काळ बदलला, तशी माणसंही बदलली. स्पर्धेच्या जगात पाश्चात्त्य संस्कृतीचे वारे वाहू लागले. माणसं इंग्रजाळलेली झाली. अमेरिकन संस्कृती झपाट्यानं रुजू लागली. गणेशोत्सवाचा मूळ उद्देश दूर झाला आणि उत्सवाचं एकंदर स्वरुपच पालटलं. 

गणपतीच्या मिरवणुकीत चालणारे रोंबा, सोंबा, डिस्को नाच पाहून आणि प्रदुषणात भर घालणारी गाणी ऐकून ' पुलं ' गंभीर झाले. यावरची आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना ते एकदा गंमतीनं म्हणाले, 
' आजकाल मला आपला गणपतीबाप्पा ' गणपतीपप्पा ' झाल्यासारखा वाटत 

३९) 
आणीबाणीनंतरच्या निवडणुकांच्या प्रचारधुमाळीत तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी इंदिरा गांधींच्या वीस कलमी कार्यक्रमाची भगवद्गीतेशी तुलना केली होती. परंतु गीतेचे अध्याय अठरा असताना अशी तुलना मुख्यमंत्र्यांनी का केली असावी, असा प्रश्न पडल्याचं सांगून पु.ल. म्हणाले, 
' मी पुन्हा गीता उघडली. सुरुवातीलाच ' संजय उवाच ' असे शब्द आढळले आणि मग मला सगळा उलगडा झाला !' 
पुलंनी जनता पक्षाच्या प्रचारसभेतून भाषण सुरू करताच ' त्यांना आत कंठ फुटला आहे ' असे उद्गार यशवंतराव चव्हाणांनी काढले होते. 
त्याचा समाचार घेताना पु.ल. म्हणाले, ' गळा यांनीच दाबला आणि बोलू दिलं नाही, आणि आता म्हणतात, कंठ फुटला. ते असो, पण निदान मी गळ्यात पट्टा तरी घातलेला नाही ! 

४०) 
एक गाजलेल्या संगीत नाटकात एक सुप्रसिद्ध गायक नट कित्येक वर्षं श्रीकृष्णाची भूमिका करत होता. खरं तर, उतारवयामुळं ती भूमिका त्याला शोभत नव्हती, तरीही त्याचं आपलं श्रीकृष्णाची भूमिका करणं सुरूच होतं. 
प्रश्न होता, त्याला हे सांगायचं कुणी ? 
एका रात्री त्या नाटकाचा प्रयोग होता. प्रयोगापूर्वीची नेहमीची गडबड सुरू होती. तो नट पीतांबर नेसून, रत्नजडित अलंकार लेवून आणि डोक्यावर मुकूट चढवून, श्रीकृष्णाच्या संपूर्ण पेहरावात हातावरचा शेला आणि सुटलेलं पोट सावरत रंगपटात उभा होता. 
तेवढ्यात पु.लं. आपल्या काही मित्रांबरोबर रंगपटांत आले. क्षणभर त्या सजलेल्या श्रीकृष्णाकडे पाहतच राहिले. कदाचित त्या नटाचं त्याच्या तारुण्यातील देखणं रुप त्यांच्या डोळ्यासमोर क्षणभर तरळलं असावं. पु.लं.च्या मित्रांना त्यांचं हे त्याला न ओळखण्यासारखं पाहणं थोडं नवलाईचं वाटलं. न राहवून त्यांनी विचारलं, ' हे काय, भाई, ह्यांना ओळखलं नाही का ? अहो, हे आपले... ' 
पुलं त्यांना मध्येच थांबवत म्हणाले, ' अरे व्वा ! ओळखलं नाही, कसं म्हणता ? ह्यांना पाहूनच तर आज देवाला ' अवतार ' ध्यान का म्हणतात, ते समजल. 

४१) 
एकदा पुल कुटुंब आणि वसंतराव कुठल्याशा अभयारण्यात गेले होते बहुधा राधानगरी. तिथे त्यांच्या कारसमोर एक महाकाय आणि मस्तवाल रानरेडा आला आणि त्यांच्याकडे खुनशीपणे बघू लागला. तेव्हा वसंतराव म्हणाले भाई, आय थिकं ही इस गोइंग टु चार्ज. पुल त्यांना म्हणाले, रेड्याला कळू नये म्हणून इंग्लिशमधे बोलतोयस वाटतं? हे ऐकल्यावर त्या भीतीदायक प्रसंगातही जोरदार हशा पिकला.

४२) 
एकदा पुलं पुण्यातील एका मिठाईच्या दुकानातून मिठाई आणायला गेले. त्या मिठाईवाल्यानं कागदात बांधून ती मिठाई दिली. कागदातल्या मिठाईकडे पाहत पुलंनी ' बॉक्स मिळेल का ?' म्हणून विचारलं. 
' हो पण त्या बॉक्सला पैसे पडतील. ' दुकानदारानं टिपिकल पुणेरी पद्धतीनं उत्तर दिलं. ' अरे वा ! म्हणजे मिठाई फुकट , वाटतं ? लगेच पुलं उद्गारले. 

४३) 
गप्पांच्या ओघात पुल एकदा म्हणाले, ' मामा या नावाची गंमतच आहे. त्याला शकुनी म्हणावं, तरी पंचाईत आणि अपशकुनी म्हणावं तरी पंचाईत. ' 

४४) 
हौसेसाठी प्रवास करणा-या टूरिस्टला मराठीत काय म्हणावं, असा प्रश्न पुलंना कुणी तरी विचारला. त्यावर पटकन पुल म्हणाले, ' त्यात काय ? ' सफरचंद ' म्हणावं. ' 
मराठी प्रतिशब्दांच्या बाबतीत असंच एकदा बोलणं चाललं असताना पुलंनी विचारलं, ' एअरहोस्टेसला आपण ' हवाई सुंदरी ' म्हणतो, तर नर्सला ' दवाई सुंदरी ' का म्हणू नये ? आणि वाढणा-याला आपण जर ' वाढपी ' म्हणतो, तर वैमानिकाला ' उडपी ' का म्हणू नये ?' 
त्याच सुरात पुलं खूप दारू पिणा-याला ' पिताश्री ' किंवा ' राष्ट्रपिता ' म्हणतात 

४५) 
अरुण आठल्ये आणि पुलं एकदा चायनीज रेस्टॉरंटमध्ये जेवण्यासाठी म्हणून गेले. चायनीज फूडचं वैशिष्ट्य सांगताना पुलं म्हणाले, 
' चायनीज फूड स्टार्टस वुईथ चिलीज अॅण्ड एण्डस वुईथ लिचीज. 
' चायनीज फूड पाहताच त्यांना आजची शिक्षणपद्धती आठवते. 
जेवण घेताना खूप जेवल्यासारखं वाटतं, पण थोड्याच वेळात भूक लागते, हे लक्षात घेऊन पुलं म्हणतात, ' आपल्या शिक्षणासारखं हे चिनी जेवण घेताना खूप घेतल्यासारखं वाटतं, पण प्रत्यक्षात पोट रिकामंच राहतं. ' 

चिनी स्वीट कॉर्न सूप फार प्रसिद्ध आहे. या जेवणात मका फार वापराला जातो. त्यावर पुलंचं भाष्य : ' चिनी भोजनाला सर्वात्मका म्हणायला हवं !' 


४६) 
पुलंच्या ' सुंदर मी होणार ' या नाटकावर आधारित असलेला ' आज और कल ' हा हिंदी चित्रपट यशस्वी झाला नाही. त्याबद्दल बोलताना पुल म्हणाले, ' हा चित्रपट त्याच्या नावाप्रमाणं दोनच दिवस चालला. ' आज और कल !' 

४७) 
१९६५ साली पु.लं. नांदेडच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले. ती बातमी ऐकल्यावर अत्यानंदाच्या भरात श्री. श्रीराम मांडे यांनी ' पुलायन ' ही दिर्घ कविता एकटाकी लिहून काढली. त्यात त्यांनी ' पुलंकित ' शब्द प्रथम वापरला आणि नंतर तो खूपच लोकप्रिय झाला. 

४८) 
' माझे खाद्यजीवन ' या लेखात चिवड्यासंबंधी लिहिताना पुलं म्हणतात , '' चिवडा सोलापूरपेक्षा कोल्हापूरचा ! छत्रे यांचा ! महाराष्ट्रावर या तीन छत्र्यांचे अनंत उपकार आहेत . एक चिवडेवाले , दुसरे सर्कसवाले आणि तिसरे केरूनाना गणिती ! उपकार उतरत्या श्रेणीने घ्यावे ! कारण चिवडेवाल्या छत्र्यांनी कोल्हापूरच्या ' रम ' ला जी झणझणीत साथ दिली , ती असंख्य उघडे शेमले आणि काही चोरट्या झिरमिळ्या अस्मानात पोहोचवून आली ....'' हे वाचल्यानंतर कोल्हापुरी संगीत चिवड्याचे आद्य निर्माते छत्रे गहिवरून गेले . त्यांनी आपले वार्धक्य विसरुन स्वतःच्या हातांनी पुलंसाठी चिवडा केला . पंधरा - सोळा वर्षापूर्वीची गोष्ट आहे . त्यांनी पुलंना सांगितले , कित्येक वर्षांनंतर मी स्वतः खास चिवडा बनवतो आहे . तो स्विकारा . 
त्यांनी त्यापूर्वी स्वतःच्या हातांनी तयार केलेल्या चिवड्याचा डबा पाठवला होता . कुणाला ? लोकमान्य टिळकांना ! लोकमान्य विलायतेला निघाले होते तेव्हा ! 


४९) 
'' हॅलो , शान्ताबाई ना ? मॉस्कोहून गोर्बाचेव्ह तुमच्याशी बोलू इच्छितायत . तुमच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी ... '' 

'' काय भाई , तुम्ही नाव कधी बदललंत ? अं ?'' 
फोनवरील व्यक्तीचा सुपरिचित आवाज बरोबर ओळखून , हसू आवरत शान्ताबाई पु . लं . ना दाद द्यायच्या ... 
बारा ऑक्टोबर हा ज्येष्ठ कवयित्री शान्ता ज . शेळके यांचा आणि आठ नोव्हेंबर हा मराठी माणसांचे लाडके व्यक्तिमत्त्व पु . ल . देशपांडे यांचा वाढदिवस . उभा महाराष्ट्र दरवर्षी ते आपलेपणाने साजरे करीत ; तर साहित्यक्षेत्रातील ही दोन मोठी माणसं एकमेकांच्या अशा ' खोड्या काढीत ' साजरा करीत . पण पु . लं . आणि सुनीताबाईंच्या विवाहाचा ' बारा जून ' हा ( भाईंचा स्मृतिदिनही हाच ) खास दिवस शान्ताबाईंनी आवर्जून सुनीताबाईंना भेटण्याचा दिवस असायचा . 

50) 
एकदा पु ल शाळेत असताना त्यांना कोणीतरी म्हणाले, 
" ए देशपांडे तुमचे पूर्वज शेण वीकायचे ना ? " 
त्यावर पु ल लगेच म्हणाले, 
" हो ना तुमच्या पूर्वजांना शेण खायला लागायचा ना म्हणून वीकायचो आम्ही. "

धम्माल मराठी विनोद

पक्क्या : तू धरती पे चाहे जहा भी रहेगी तुझे तेरी खुशबू हे पेहचान लुंगा..
चिंगी : आई शप्पथ, मला आधीपासूनच शंका होती कि तू तर साल्या कुत्राच आहेस...
----------------
मन्या पाटील लंगडत लंगडत शाळेत ऊशीरा पोचला.
इंग्रजीचे सर ओरडले." व्हाय आर यू लेट?"
इंग्रजीत सुमार मन्या म्हणाला, "सर रस्त्यावर चिख्खल झाला होता आणि तिथे उभ्या बैलाने ढुशी मारली. माझा पाय मोडला. म्हणून ऊशीर झाला."
सर पुन्हा ओरडले, "टॉक इन इंग्लिश!"...
हजरजबाबी मन्याने म्हटले ,"सर देयर वॉज चिखलीपिकेशन ऑन रोड. काऊज हसबण्ड केम. ह...ी मारिंग मी शींगडा मेड मी लंगडा. सो आय कम लेट!"
----------------
काल मला १० जणांनी खूप मारला..
संता : मग तू काय केलास?
बंता : मी म्हटलं, साल्यानो दम असेल तर एक एक जण या..
संता : मग?
बंता : मग काय, साल्यांनी एकेकाने येऊन परत मारलं.....
----------------
गण्या : अरे मित्रा " अरेंज मॅरेज " म्हणजे काय ?
बंड्या : सोप्प आहे रे , समज... तू रस्त्यावरून चालला आहेस आणी अचानक तुला नागीण चावते ..
गण्या : ठीक आहे ...आणी " लव मॅरेज " म्हणजे काय?
...
बंड्या : लव मॅरेज " म्हणजे तू त्या नागीण कडे जातो आणी तीला बोलतो " फूस फूस ... चाव ना मला ..चाव .."
----------------
इंग्लिश मॉम म्हणते गुड नाइट
हिंदी मा म्हणते शुभ रात्री
मुस्लीम मा म्हणते शब्बा खैर
...
आणि आपली मराठमोळी आई म्हणते, अरे आग लाव त्या मोबाईलला आणि झोप आता..
----------------
पक्क्याच बायकोबरोबर भांडण चाललं होते....

बायको (वैतागून) : तुमच्या डोक्यात ना नुसतं शेण भरलय......

पक्क्या : अच्छा, आता मला कळले की तू इतका वेळ माझे डोके का खाते आहेस ते...
----------------
मुलगा : बाबा 1 ग्लास पाणी द्या ना ?
बाप : स्वतः उठुन घे...?
मुलगा : प्लीज द्या ना बाबा..
बाप : आता थोबाडित मारीन तुझ्या!
मुलगा : थोबाडीत मारायला याल तेव्हा येताना पाणी आणा.
----------------
बहिण : मुलगा कसा आहे?
भाऊ : मुलगा चांगला आहे, engineer आहे, दिसायला फिल्मचा हिरो वाटतो...
बहिण : कुठल्या फिल्मचा हिरो?
भाऊ : "पा".
----------------
मल्लिकाकडे एक नवीन नोकर कामाला लागतो, त्याला सकाळी मल्लिका किचन मध्ये दिसते, ती मिक्सर चालवत असते,
नोकर : काय म्याडम काय बनवता आहात?
मल्लिका : काही नाही रे कपडे धुते आहे.
----------------
नवरा : तू मला आत्ता कुत्रा म्हणालीस?
बायको लक्षच देत नाही,
नवरा पुन्हा विचारतो.
...
काहीच उत्तर नाही.
तो पुन्हा विचारतो.
बायको : नाही म्हणाले पण आता भुंकणे थांबवा जरा!!
----------------
बाप : या वेळी नापास झालास तर यापुढे मला 'बाबा'म्हणून हाक मारू नकोस चंद्या.
सालाबादाप्रमाणे याही वर्षी आपला चंद्या नापास झाला,
बाप : काय लागला निकाल?
चंद्या : माफ कर रे रम्या, तुला बाबा म्हणून हाक मारण माझ्या नशिबात नाहीये बहुतेक...
----------------
आजोबा : पिंट्या लप, तुला शोधत तुझी टीचर आली आहे.
पिंट्या : आजोबा तुम्हिच लपा.
आजोबा : का रे.. ???
पिंट्या : अहो आजोबा, तुम्ही मेलात म्हणुन आठ दिवस सूटी घेतली आहे मी....
----------------
संता : अरे यार बंते, हा sent message काय प्रकार आहे ?
बंता : काढलीस ना लाज, एवढं पण माहीत नाही..
sent message म्हणजे perfume वाला message...
  

रंग पंचमीचे हास्यरंग

झंप्या : ए पंप्या, एवढा घाबराघुबरा का झालायस बुवा तू?
पंप्या : अरे, थोडं कन्फ्युजन झालं यार.
झंप्या : म्हणजे?
पंप्या : अरे मी रस्त्यावरून चाललो असताना मला समोर काहीतरी दिसलं. मला वाटलं की साप आहे. पण नेमकी ती काठी होती.
झंप्या : हात्तिच्या...एवढंच ना.
पंप्या : हो रे...पण मग त्या सापाला मारण्यासाठी म्हणून मी जी काठी उचलली ना, तो खरा साप निघाला.


कावळा : चिऊताई, चिऊताई, दार उघड!
चिमणी : थांब माझ्या बाळाला पावडर लावते...
कावळा : माझ्या सोबत माझी मुलगी पण आहे..
बाळ : आई, पावडर मी लावतो, तू पहिले दार उघड!!!



कांदयाने कोबीशी प्रेम विवाह केला.
दुसरया दिवशी कांदयाला मित्र विचारायला लागले,

...काय मित्रा, लग्नाची पहिली रात्र कशी होती?

कांदा : अरे कसली डोंबल्याची रात्र, एकमेकांचे कपडे उतरवेपर्यंत सकाळ झाली.



प्रियकर - प्रिये, सांग ना मी तुझ्यासाठी काय करू?
प्रेयसी - काय करशील?
प्रियकर - तू सांगशील ते करीन!
प्रेयसी - मग आधी नोकरी कर.
प्रियकर - का?
प्रेयसी - म्हणजे एकदाचं लग्न तरी करता येईल!



एकदा संता बंताला स्वत:च्या घरी बोलावतो,
जेव्हा संता बंताच्या घरी जातो तेव्हा , बंताच्या घराला टाळे लावलेले असते आणि
तिथे लिहुन ठेवलेले असते " तुझा पोपट झालाय , चल फूट इथून "
संता खाली पड्लेला खडु उचलतो आणि लिहितो
"मी आलोच नव्हतो "



रामू - ए राजू, तुला मी एका सेकंदात अख्खे गाणे म्हणून दाखवू?
राजू - शक्यच नाही, चल म्हणून दाखव पाहू.
रामू - गा S S णे!
राजू - अरे वा! चल, मीसुद्धा तुला फटाका न फोडता अगदी तुझ्या दोन्ही कानांजवळ फटाक्याचा मोठा आवाज काढून दाखवतो.
रामू - दाखव की…त्याचे बोलणे पूर्ण होण्याआधीच राजू त्याच्या कानांखाली पेटवतो
फाट…. फाट…

…..........................................................


पुण्यातल्या पोरीला बर्थ डे गिफ्ट काय द्याल ????.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
१ डझन स्कार्फ :) :)

…..........................................................


मंग्या : मी तुझ्यावर जीवापाड प्रेम केले, तुला कधी स्पर्श देखील नाही केला
तरीही जर तू दुस-या मुलाशी लग्न केले तर मी काय समजायचे ?.
.
.
.
चिंगी : दैवाने दिले आणि कर्माने नेले..



'मित्राकडे गेलो होतो गं!' उशीरा घरी आलेला गंपू बायकोला कारण सांगतो.
खरं-खोटं तपासण्यासाठी बायको त्याच्या १० मित्रांना फोन करते.
पाच जण सांगतात, 'हो, आलेला ना इथे!'
तिघे सांगतात, 'हा काय, आत्ताच गेला..'
उरलेले दोघे म्हणतात, 'अहो वहिनी, हा काय इथेच आहे! देऊ का त्याच्याकडे फोन?



कामवाली गंगू रागारागात मालकिणीला म्हणाली,

मॅडम तुमची हि साडी परत ह्या,

मॅडम : अरे पण का?
...
गंगू : मग काय, हि साडी नेसली कि साहेबाना वाटत तुम्हीच आहात, ते लक्ष पण
देत नाहीत आणि माळ्याला पण वाटत तुम्हीच आहात, तर तो येता जाता चावटपणा
करतो...



दादा कोंडकेंनी आपल्या पणजीच्या स्मरणार्थ बैंक सुरु केली तीचे नाव ठेवले:
:
:
:
:
:
"आयच्या आयची आय ब्यांक "





संता मित्राच्या पार्टी मध्ये ड्रिंक घेत उभा होता, एवढ्यात त्याच लक्ष एका सुंदर मुलीकडे गेल,
संता : तू माझ्या बरोबर डान्स करशील का?
मुलगी (तुच्छतेने) : मै बच्चे के साथ डान्स नही करती....
संता : ओह्ह... माफ कर हा, मला माहित नव्हतं तू प्रेग्नन्ट आहेस.


…..........................................................



पक्या : डार्लिंग, तुझ्या आयुष्यात मी पहिलाच आहे ना, ज्याने तुझं चुंबन घेतलं?
चिंगी : अर्थातच सोन्या, पण मला हे कळत नाही कि सगळे जण हाच प्रश्न का विचारतात.



मराठी भाषा...!!

मराठी भाषा फारच अजब आहे ना...??
.
...गाडी 'बिघडली' असेल तर म्हणतात 'बंद' आहे.
.
आणि पोरगी बिघडली असेल तर म्हणतात 'चालू' आहे.......



एकदा एका कावळ्याने संताच्या डोक्यावर शी केली.

संता (चिडून ओरडतो) : तू चड्डी नाही घालत का रे ?

कावळा : तू चड्डीतच करतो का रे ??


बायकॊला "बडबड बंद कर" असं कधीच न सांगता
"ऒठ मिटल्यावर तू फार सुंदर दिसतेस" म्हणा.