येई हो विठ्ठले माझे माऊली ये

येई हो विठ्ठले माझे माऊली ये ॥

निढळावरी कर ठेऊनी वाट मी पाहे ॥ धृ. ॥

आलिया गेलीया हातीं धाडी निरोप ॥
पंढरपुरी आहे माझा मायबाप ॥ येई. ॥ १ ॥

पिंवळा पीतांबर कैसा गगनी झळकला ॥
गरुडावरी बैसून माझा कैवारी आला ॥ येई. ॥ २ ॥

विठोबाचे राज आम्हां नित्य दिपवाळी ॥
विष्णुदास नामा जीवेंभावे ओंवाळी ॥ येई हो. ॥ ३ ॥

आरती ज्ञानराजा

आरती ज्ञानराजा |महाकैवल्यतेजा |

सेविती साधुसंत ||मनु वेधला माझा || आरती || धृ ||

लोपलें ज्ञान जगी |हित नेणती कोणी |
अवतार पांडुरंग |नाम ठेविले ज्ञानी || १ || आरती || धृ ||

कनकाचे ताट करी |उभ्या गोपिका नारी |
नारद तुंबर हो ||साम गायन करी || २ || आरती || धृ ||

प्रकट गुह्य बोले |विश्र्व ब्रम्हाची केलें |
रामजनार्दनी |पायी मस्तक ठेविले |

आरती ज्ञानराजा |महाकैवल्यतेजा || सेविती || ३ ||

गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

मोदकांचा प्रसाद केला
लाल फुलांचा हार सजवला
मखर नटून तयार झाले
वाजत गाजत बाप्पा आले
गुलाल फुले अक्षता उधळे
बाप्पाच्या स्वागतासाठी जमले सगळे…

सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा 

गणेश चतुर्थीच्या हार्दीक शुभेच्छा

वंदन करतो गणरायाला,
हात जोडतो वरद विनायकाला..
प्रार्थना करतो गजाननाला,
सुखी ठेव नेहमी..!
सर्व गणेश भक्तानां
“गणेश चतुर्थीच्या हार्दीक शुभेच्छा”

ओळखलात का सर मला

 ओळखलात का सर मला  पावसात आला कोणी..

कपडे होते कर्दमलेले केसांवरती पाणी

क्षणभर बसला, नंतर हसला, बोलला वरती पुन्हा..
गंगमाई पाहुनी आली, गेली घरट्यात राहुन
माहेरवाशीण पोरीसारखी ,चार भिंतित नाचली..
मोकळ्या हाती जाईल, कशी बायको मात्रा वाचली
भिंत खचली , चूल भिजली, होते नव्हते नेले..
प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे  ठेवले

कारभारणीला घेऊन सांगे, सर आता लढतो आहे..
चिखल गाल काढतो आहे  ,पडकी भिंत बांधतो आहे
खिशाकडे हात  जातच, हसत हसत उठला..
पैसे नकोत सर,  जरा एकटेपणा वाटला
मोडुं पडला संसार तरी मोडला नाही कणा..
पाठीवरती हात  ठेऊन नुसते 'लढ' म्हणा

-- कवी कुसुमाग्रज

संकटनाशक गणेश स्तोत्र

 गौरीपुत्रं विनायकम।

भक्तावासं: स्मरैनित्यंमायु:कामार्थसिद्धये।।1।।

प्रथमं वक्रतुंडंच एकदंतं द्वितीयकम।
तृतीयं कृष्णं पिङा्क्षं गजवक्त्रं चतुर्थकम।।2।।

लम्बोदरं पंचमं च षष्ठं विकटमेव च।
सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्ण तथाष्टकम् ।।3।।
नवमं भालचन्द्रं च दशमं तु विनायकम।
एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननम।।4।।

द्वादशैतानि नामानि त्रिसंध्य य: पठेन्नर:।
न च विघ्नभयं तस्य सर्वासिद्धिकरं प्रभो।।5।।

विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनम्।
पुत्रार्थी लभते पुत्रान् मोक्षार्थी लभते गतिम् ।।6।।

जपेद्वगणपतिस्तोत्रं षड्भिर्मासै: फलं लभेत्।
संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशय: ।।7।।
अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वां य: समर्पयेत।
तस्य विद्या भवेत्सर्वा गणेशस्य प्रसादत:।।8।।

।।इति संकटनाशनस्तोत्रं संपूर्णम्।।

श्रीगणपती स्तोत्र

  साष्टांग नमन हे माझे गौरीपुत्रा विनायका । 

भक्तीनें स्मरतो नित्य आयुःकामार्थ साधती ॥ १ ॥

प्रथम नांव वक्रतुंड दुसरें एकदंत ते ।

तिसरे कृष्णपिंगाक्ष चवथे गजवक्र ते ॥ २ ॥

पांचवे श्रीलंबोदर सहावें विकट नांव ते ।

सातवे विघ्नराजेंद्र आठवे धुम्रवर्ण ते ॥ ३ ॥

नववे श्री भालचंद्र दहावे श्री विनायक ।

अकरावे गणपती बारावे श्री गजानन ॥ ४ ॥

 देवनांवे अशी बारा तीन संध्या म्हणे नर ।             

 विघ्नभीती नसे त्याला प्रभो ! तू सर्व सिद्धिदे ॥ ५ ॥

विद्यार्थ्याला मिळे विद्या धनार्थ्याला मिळे धन ।

पुत्रार्थ्याला मिळे पुत्र मोक्षार्थ्याला मिळे गति ॥ ६ ॥

जपता गणपती स्तोत्र सहा मासांत हे फळ ।

एक वर्ष पुर्ण होतां मिळे सिद्धी न संशय ॥ ७ ॥

नारदांनी रचिलेले झाले संपू्र्ण स्तोत्र हें ।

श्रीधराने मराठींत पठण्या अनुवादिले ॥ ८ ॥

॥ श्रीगणपती स्तोत्र संपूर्ण ॥

आरती तुकारामा |

  आरती तुकारामा | स्वामी सद्गुरुधामा |

 सच्चिदानंद मूर्ती | पायी दाखवीं आम्हां || धृ || 

 

राघवें सागरांत | जैसे पाषाण तारिले |

  तैसे हे तुकोबाचे | अभंग उदकीं रक्षिले | आरती तुकारामा|| १ ||


तुकितां तुलनेसी | ब्रम्ह तुकासी आलें |

  म्हणोनी रामेश्वरें | चरणी मस्तक ठेविलें || आरती तुकारामा || २ ||


श्री गणेश अथर्वशीर्ष स्तोत्र

॥ श्रीगणेशाय नमः ॥ 


शान्ति मन्त्रः॥

ॐ भद्रं कर्णेभिः श्रृणुयाम देवा ।
भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः ।
स्थिरैरङ्गैस्तुष्टुवांसस्तनूभिः ।
व्यशेम देवहितं यदायुः ।
ॐ स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः ।
स्वस्ति नः पुषा विश्वैवेदाः ।
स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः ।
स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु ।
ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः ।

अथर्वशीर्ष

ॐ नमस्ते गणपतये ।
त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि ।
त्वमेव केवलं कर्तासि ।
त्वमेव केवलं धर्तासि ।
त्वमेव केवलं हर्तासि ।
त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि ।
त्वं साक्षादात्मासि नित्यम् ॥१॥

ऋतं वच्मि ।
सत्यं वच्मि ॥२॥

अव त्वं माम् ।
अव वक्तारम् ।
अव श्रोतारम् ।
अव दातारम् ।
अव धातारम् ।
अवानूचानमवशिष्यम्‌‍ |
अव पश्चात्तात् ।
अव पुरस्तात् ।
अवोत्तरात्तात् ।
अव दक्षिणात्तात् ।
अव चोर्ध्वात्तात् ।
अवाधरात्तात् ।
सर्वतो मां पाहि पाहि समन्तात् ॥३॥

त्वं वाङ्‌मयस्त्वं चिन्मयः ।
त्वमानन्दमयस्त्वं ब्रह्ममयः ।
त्वं सच्चिदानन्दाद्वितीयोऽसि ।
त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि ।
त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि ॥४॥

सर्वं जगदिदं त्वत्तो जायते ।
सर्वं जगदिदं त्वत्तस्तिष्ठति ॥
सर्वं जगदिदं त्वयि लयमेष्यति ।
सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति ।
त्वं भूमिरापोऽनलोऽनिलो नभः ।
त्वं चत्वारि वाक्पदानि ॥५॥

त्वं गुणत्रयातीतः ।
त्वं देहत्रयातीतः ।
त्वं कालत्रयातीतः ।
त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यम् ।
त्वं शक्तित्रयात्मकः ।
त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यम् ।
त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्त्वंरुद्रस्त्वमिन्द्रस्त्वमग्निस्त्वं
वायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमास्त्वं ब्रह्मभूर्भुवःस्वरोम् ॥६॥

गणादिं पूर्वमुच्चार्य वर्णादिं तदनन्तरम् ।
अनुस्वारः परतरः ।
अर्धेन्दुलसितम् ।
तारेण ऋद्धम् ।
एतत्तव मनुस्वरूपम् ।
गकारः पूर्वरूपम् ।
अकारो मध्यमरूपम् ।
अनुस्वारःश्चान्त्यरूपम् ।
बिन्दुरूत्तररूपम् ।
नादः सन्धानम् ।
संहितासन्धिः ।
सैषागणेशविद्या ।
गणकऋषिः ।
निचृद्‌गायत्री छन्दः ।
गणपतिर्देवता ।
ॐ गं गणपतये नमः ॥७॥

एकदन्ताय विद्‌महे ।
वक्रतुण्डाय धीमहि ।
तन्नो दन्ती प्रचोदयात् ॥८॥

एकदन्तंचतुर्हस्तंपाशमङ्कुशधारिणम् ।
रदं च वरदं हस्तैर्बिभ्राणं मूषकध्वजम् ।
रक्तं लंबोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससम् ।
रक्तगन्धानुलिप्ताङ्गं रक्तपुष्पैः सुपूजितम् ।
भक्तानुकंपिनं देवं जगत्कारणमच्युतम् ।
आविर्भूतं च सृष्ट्यादौ प्रकृतेः पुरुषात् परम् ।
एवं ध्यायति यो नित्यं स योगी योगिनां वरः ॥९॥

ॐ नमो वातप्रतये ।
नमो गणपतये ।
नमः प्रमथपतये ।
नमस्ते अस्तु लम्बोदरायैकदन्ताय विघ्ननाशिने
शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमः ॥१०॥

फलश्रुती

एतदथर्वशीर्षं योऽधीते स ब्रह्मभूयाय कल्पते ।
स सर्वविघ्नैर्न बाध्यते ।
स सर्वतः सुखमेधते ।
स पंचमहापापात् प्रमुच्यते ।
सायमधीयानो दिवसकृतं पापं नाशयति ।
प्रातरधीयानो रात्रिकृतं पापं नाशयति ।
सायंप्रातः प्रयुंजानो अपापो भवति ।
सर्वत्राधीयानोऽपविघ्नोभवति
धर्मार्थकाममोक्षं च विन्दति ।
इदमथर्वशीर्षमशिष्याय न देयम् ।
यो यदि मोहाद् दास्यति स पापीयान् भवति ।
सहस्त्रावर्तनात् ।
यं यं काममधीते तं तमनेन साधयेत् ॥११॥

अनेन गणपतिमभिषिञ्चति ।
स वाग्मी भवति ।
चतुर्थ्यामनश्वन्‌जपति ।
स विद्यावान भवति ।
इत्यथर्वणवाक्यम् ।
ब्रह्माद्यचरणं विद्यात् ।
न बिभेति कदाचनेति ॥१२॥

यो दूर्वाङ्कुरैर्यजति ।
स वैश्रवणोपमो भवति ।
यो लाजैर्यजति ।
स यशोवान् भवति ।
स मेधावान् भवति ।
यो मोदकसहस्त्रेण यजति ।
स वांछितफलमवाप्नोति ।
यः साज्यसमिद्‌भिर्यजति ।
स सर्वं लभते स सर्वं लभते ॥१३॥

अष्टौ ब्राह्मणान् सम्यग् ग्राहयित्वा सूर्यवर्चस्वी भवति ।
सूर्यग्रहे महानद्यां प्रतिमासंनिधौ वा जपत्वा ।
सिद्धमन्त्रो भवति ।
महाविघ्नात् प्रमुच्यते ।
महापापात् प्रमुच्यते ।
महादोषात प्रमुच्यते ।
स सर्वविद् भवति स सर्वविद् भवति ।
य एवं वेद ।
इत्युपनिषत् ॥१४॥

ॐ सह नाववतु ।
सह नौ भुनक्तु ।
सह वीर्यं करवावहै ।
तेजस्विनावधीतमस्तु ।
मा विद्‌विषावहै ॥
॥ ॐ शान्ति: शान्ति: शान्ति: ॥

इति श्रीगणपत्यथर्वशीर्षोपनिषद् !!

शिव चालीसा

 ॥ दोहा ॥

जय गणेश गिरिजा सुवन, मंगल मूल सुजान ।
कहत अयोध्यादास तुम, देहु अभय वरदान ॥

॥ चौपाई ॥

जय गिरिजा पति दीन दयाला । सदा करत सन्तन प्रतिपाला ॥
भाल चन्द्रमा सोहत नीके । कानन कुण्डल नागफनी के॥
अंग गौर शिर गंग बहाये । मुण्डमाल तन क्षार लगाए ॥
वस्त्र खाल बाघम्बर सोहे । छवि को देखि नाग मन मोहे ॥
मैना मातु की हवे दुलारी । बाम अंग सोहत छवि न्यारी ॥
कर त्रिशूल सोहत छवि भारी । करत सदा शत्रुन क्षयकारी ॥
नन्दि गणेश सोहै तहँ कैसे । सागर मध्य कमल हैं जैसे॥
कार्तिक श्याम और गणराऊ । या छवि को कहि जात न काऊ ॥
देवन जबहीं जाय पुकारा । तब ही दुख प्रभु आप निवारा ॥
किया उपद्रव तारक भारी । देवन सब मिलि तुमहिं जुहारी ॥
तुरत षडानन आप पठायउ । लवनिमेष महँ मारि गिरायउ ॥
आप जलंधर असुर संहारा। सुयश तुम्हार विदित संसारा ॥
त्रिपुरासुर सन युद्ध मचाई । सबहिं कृपा कर लीन बचाई ॥
किया तपहिं भागीरथ भारी । पुरब प्रतिज्ञा तासु पुरारी ॥
दानिन महँ तुम सम कोउ नाहीं । सेवक स्तुति करत सदाहीं ॥
वेद माहि महिमा तुम गाई । अकथ अनादि भेद नहिं पाई ॥
प्रकटी उदधि मंथन में ज्वाला । जरत सुरासुर भए विहाला ॥
कीन्ही दया तहं करी सहाई । नीलकण्ठ तब नाम कहाई ॥
पूजन रामचन्द्र जब कीन्हा । जीत के लंक विभीषण दीन्हा ॥
सहस कमल में हो रहे धारी । कीन्ह परीक्षा तबहिं पुरारी ॥
एक कमल प्रभु राखेउ जोई । कमल नयन पूजन चहं सोई ॥
कठिन भक्ति देखी प्रभु शंकर । भए प्रसन्न दिए इच्छित वर ॥
जय जय जय अनन्त अविनाशी । करत कृपा सब के घटवासी ॥
दुष्ट सकल नित मोहि सतावै । भ्रमत रहौं मोहि चैन न आवै ॥
त्राहि त्राहि मैं नाथ पुकारो । येहि अवसर मोहि आन उबारो ॥
लै त्रिशूल शत्रुन को मारो । संकट ते मोहि आन उबारो ॥
मात-पिता भ्राता सब होई । संकट में पूछत नहिं कोई ॥
स्वामी एक है आस तुम्हारी । आय हरहु मम संकट भारी ॥
धन निर्धन को देत सदा हीं । जो कोई जांचे सो फल पाहीं ॥
अस्तुति केहि विधि करैं तुम्हारी । क्षमहु नाथ अब चूक हमारी ॥
शंकर हो संकट के नाशन । मंगल कारण विघ्न विनाशन ॥
योगी यति मुनि ध्यान लगावैं । शारद नारद शीश नवावैं ॥
नमो नमो जय नमः शिवाय । सुर ब्रह्मादिक पार न पाय ॥
जो यह पाठ करे मन लाई । ता पर होत है शम्भु सहाई ॥
ॠनियां जो कोई हो अधिकारी । पाठ करे सो पावन हारी ॥
पुत्र होन कर इच्छा जोई । निश्चय शिव प्रसाद तेहि होई ॥
पण्डित त्रयोदशी को लावे । ध्यान पूर्वक होम करावे ॥
त्रयोदशी व्रत करै हमेशा । ताके तन नहीं रहै कलेशा ॥
धूप दीप नैवेद्य चढ़ावे । शंकर सम्मुख पाठ सुनावे ॥
जन्म जन्म के पाप नसावे । अन्त धाम शिवपुर में पावे ॥
कहैं अयोध्यादास आस तुम्हारी । जानि सकल दुःख हरहु हमारी ॥

॥ दोहा ॥

नित्त नेम उठि प्रातः ही, पाठ करो चालीसा ।
तुम मेरी मनोकामना, पूर्ण करो जगदीश ॥
मगसिर छठि हेमन्त ॠतु, संवत चौसठ जान ।
स्तुति चालीसा शिवहि, पूर्ण कीन कल्याण ॥

श्री महालक्ष्मीची आरती

जय देवी जय देवी जय महालक्ष्मी।
वससी व्यापकरुपे तू स्थूलसूक्ष्मी॥
करवीरपुरवासिनी सुरवरमुनिमाता।
पुरहरवरदायिनी मुरहरप्रियकान्ता।
कमलाकारें जठरी जन्मविला धाता।
सहस्त्रवदनी भूधर न पुरे गुण गातां॥

जय देवी जय देवी...॥
मातुलिंग गदा खेटक रविकिरणीं।
झळके हाटकवाटी पीयुषरसपाणी।
माणिकरसना सुरंगवसना मृगनयनी।
शशिकरवदना राजस मदनाची जननी॥

जय देवी जय देवी...॥
तारा शक्ति अगम्या शिवभजकां गौरी।
सांख्य म्हणती प्रकृती निर्गुण निर्धारी।
गायत्री निजबीजा निगमागम सारी।
प्रगटे पद्मावती निजधर्माचारी॥

जय देवी जय देवी...॥
अमृतभरिते सरिते अघदुरितें वारीं।
मारी दुर्घट असुरां भवदुस्तर तारीं।
वारी मायापटल प्रणमत परिवारी।
हें रुप चिद्रूप दावी निर्धारी॥

जय देवी जय देवी...॥
चतुराननें कुश्चित कर्मांच्या ओळी।
लिहिल्या असतिल माते माझे निजभाळी।
पुसोनि चरणातळी पदसुमने क्षाळी।
मुक्तेश्वर नागर क्षीरसागरबाळी॥
जय देवी जय देवी...॥

श्री रामाची आरती

 त्रिभुवनमंडितमाळ गळां।

आरती ओवाळूं पाहूं ब्रह्मपुतळा॥

श्रीराम जय राम जय जय राम।

आरती ओवाळूं पाहूं सुन्दर मेघश्यामा॥

ठकाराचे ठाण वारीं धनुष्यबाण।

मारुती सन्मुख उभा कर जोडून॥

श्रीराम जय राम जय जय राम।

आरती ओवाळूं पाहूं सुन्दर मेघश्यामा॥

भरत शत्रुघ्न दोघे चामर ढाळिती।

स्वर्गाहून देव पुष्पवृष्टि करिती॥

श्रीराम जय राम जय जय राम।

आरती ओवाळूं पाहूं सुन्दर मेघश्यामा॥

रत्नजडित हार वर्णू काय मुकुटी।

आरती ओवाळूं चौदां भुवनांच्या कोटी॥

श्रीराम जय राम जय जय राम।

आरती ओवाळूं पाहूं सुन्दर मेघश्यामा॥

विष्णुदास नामा म्हणे मागतो तूतें।

आरती ओंवाळूं पाहूं सीतापतीतें॥

श्रीराम जय राम जय जय राम।

आरती ओवाळूं पाहूं सुन्दर मेघश्यामा॥

श्री कृष्णाची आरती

 ओवालू आरती मदनगोपाळा।

श्यामसुन्दर गळा लं वैजयन्तीमाळा॥

चरणकमल ज्याचे अति सुकुमार।

ध्वजवज्रानकुश ब्रीदाचा तोडर॥

ओवालू आरती मदनगोपाळा...॥

नाभीकमळ ज्याचेब्रह्मयाचे स्थान।

ह्रीदयीन पदक शोभे श्रीवत्सलांछन॥

ओवालू आरती मदनगोपाळा...॥

मुखकमळा पाहता सूर्याचिया कोटी।

वेधीयेले मानस हारपली धृष्टी॥

ओवालू आरती मदनगोपाळा...॥

जडित मुगुट ज्याच्या देदीप्यमान।

तेणे तेजे कोदले अवघे त्रिभुवन॥

ओवालू आरती मदनगोपाळा...॥

एका जनार्दनी देखियले रूप।

रूप पाहों जाता झालेसें तद्रूप॥

ओवालू आरती मदनगोपाळा...॥

श्री दत्ताची आरती

त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा।
त्रिगुणी अवतार त्रैलोक्यराणा।
नेती नेती शब्द न ये अनुमाना।
सुरवर मुनिजन योगी समाधि न ये ध्याना॥
जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता।
आरती ओवाळीतां हरली भवचिन्ता॥

सबाह्य अभ्यंतरी तू एक दत्त।
अभाग्यासी कैसी न कळे ही मात।
पराही परतली तेथे कैचा हेत।
जन्ममरणाचा पुरलासे अन्त॥
जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता।
आरती ओवाळीतां हरली भवचिन्ता॥

दत्त येऊनियां ऊभा ठाकला।
सद्भावे साष्टांगे प्रणिपात केला।
प्रसन्न होऊनी आशीर्वाद दिधला।
जन्ममरणाचा फेरा चुकविला॥
जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता।
आरती ओवाळीतां हरली भवचिन्ता॥

दत्त दत्त ऐसे लागले ध्यान।
हरपलें मन झालें उन्मन।
मी तू पणाची झाली बोळवण।
एका जनार्दनी श्रीदत्तध्यान॥
जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता।
आरती ओवाळीतां हरली भवचिन्ता॥

शेंदुर लाल चढ़ायो

 शेंदुर लाल चढ़ायो अच्छा गजमुखको।

दोंदिल लाल बिराजे सुत गौरिहरको।

हाथ लिए गुडलद्दु सांई सुरवरको।

महिमा कहे न जाय लागत हूं पादको ॥1॥


जय जय श्री गणराज विद्या सुखदाता।

धन्य तुम्हारा दर्शन मेरा मन रमता ॥धृ॥


अष्टौ सिद्धि दासी संकटको बैरि।

विघ्नविनाशन मंगल मूरत अधिकारी।

कोटीसूरजप्रकाश ऐबी छबि तेरी।

गंडस्थलमदमस्तक झूले शशिबिहारि ॥2॥


जय जय श्री गणराज विद्या सुखदाता।

धन्य तुम्हारा दर्शन मेरा मन रमता ॥


भावभगत से कोई शरणागत आवे।

संतत संपत सबही भरपूर पावे।

ऐसे तुम महाराज मोको अति भावे।

गोसावीनंदन निशिदिन गुन गावे ॥3॥


जय जय श्री गणराज विद्या सुखदाता।

धन्य तुम्हारा दर्शन मेरा मन रमता ॥ 

हरितालिका साहित्य

हरितालिका साहित्य 

साहित्य
फुले, दूर्वा, तुलसीपत्रे, विड्याची पाने १२, सुपार्‍या ६, बदाम ५, खारका ५, नारळ २, फळे / केळी ५, पेढे ५ / खडीसाखर पत्री (पत्रपूजेतील क्रमानुसार)- बेल, आघाडा, मधुमालती, दूर्वा, चाफा, कण्हेर, बोर, रुई, तुळस, आंबा, डाळिंब, धोतरा, जाई, मरवा, बकुळ, अशोक .(उपलब्धीप्रमाणे)

सौभाग्यवायनसाहित्य
परडीत / पत्रावळीवर – हळदकुंकू, तांदूळ, वस्त्र, पानसुपारी, नाणे, नारळ, गजरा/वेणी, शिधा तसेच; फणी, काजळ, गळेसरी, कांकणे, आरसा इत्यादी सौभाग्यद्रव्ये.

गृह्यसाहित्य
अत्तरफाया, हळदकुंकू, चंदनगंध, अष्टगंध, गुलाल, बुक्का, अक्षता, रांगोळी, उदबत्ती, कापूर, आगपेटी, सुटीनाणी ६, तुपाच्या व तेलाच्या वाती, कापसाची मालावस्त्रे – १६ मण्यांचे १ व ५ मण्यांचे १, तांदूळ ( वाटीभर ) पंचामृत ( दूध, दही, तूप, मध, साखर ) गूळखोबरे, नैवेद्य, सुंठवडा (डिंकवडा), चौरंग / पाट, आसन, पाण्याचा कलश, शंख, घंटा, समई, नीराजने, कापूरारती, पळीपंचपात्र, ताम्हण, देव पुसण्याचे वस्त्र, हातपुसणे, तसराळे, पेलाभर उष्णोदक.

व्रतोद्देश
कुमारीना सुयोग्य वरप्राप्ती, सुवासिनींना अखंडसौभाग्यप्राप्ती.

पूजार्ह देवता
पार्वती व हरिताली : ( मृत्तिकेच्या मूर्ती व वाळूचे शिवलिंग )
पूजाकाल :भाद्रपद शुद्ध तृतीयेस प्रथम प्रहरात ही पूजा करावी
व्रताचार : ही पूजा अविवाहित व विवाहित अशा सर्वच स्त्रिया करतात . ह्या दिवशी उपवास करावा . रात्रौ यथाशक्ति जागरण करून देवीची आरती करावी .

हरितालिका पूजेची मांडणी –
चौरंगावर/पाटावर तांदळाच्या सपाट ढिग करून, त्यावर गौरी व हरिताली ह्यांच्या मूर्ती ठेवून त्यासमोर वाळूचे लिंग तयार करावे किंवा आपापल्या प्रथेप्रमाणे पूजेची मांडणी करावी. उजव्या बाजूस तांदळाच्या एका ढिगावरील सुपारीवर किंवा नारळावर गणपती मांडावा. समोर पाच विडे मांडून तेथे सुपारी, खारीक, बदाम, नाणे, फळ ठेवावे.

प्रथमसुवासिनीकडून/कुमारिकेकडून/स्वत: हळदकुंकूलावूनघ्यावे. त्यानंतर घरातील देवांसमोर विडे ठेवून, अक्षता व हळदकुंकू वाहून नमस्कारपूर्वक प्रार्थना करावी. तसेच घरातील वडीलधार्‍या मंडळींना नमस्कार करून नंतर पूजाप्रारंभ करावा.

 

हरितालिकेची आरती

 जयदेवी हरितालिके सखी पार्वती अंबिके ।

आरती ओवाळीत ज्ञानदीपकळिके ।।ध्रु *।।
हरअर्धांगी वससी ।
जासी यज्ञा माहेरासी ।
तेथे अपमान पावसी ।
यज्ञकुंडी गुप्त होसी ।। 1 ।। *जय देवी *।।

रिघसी हिमाद्रिच्या पोटी ।
कन्या होसी तू गोमटी ।
उग्र तपक्ष्चर्या मोठी ।
आचरसी उठाउठी ।। 2 ।। *जय देवी *।।

तपपंचाग्निसाधने ।
धूम्रपानें अधोवदनें केली बहू उशोषणे ।
शंभू भ्रताराकारणे ।। 3 ।।* जय देवी * ।।

लीला दाखविसी द्रुष्टी ।
हे व्रत करिसी लोकांसाठी ।
पुन्हा वरिसी धूर्जटी ।
मज रक्षावे संकटी ।। 4 ।।*जय देवी * ।।

काय वर्णू तव गुण ।
अल्पमती नारायण ।
मातें दाखवी चरण ।
चूकवावे जन्ममरण ।। 5 ।।*जय देवी *।।

चंदेरी सागरात

 चंदेरी सागरात, रुपेरी लाटा,

… रांवाच्या सुखदुःखात अर्धा माझा वाटा.

नाजुक अनारसे

 नाजुक अनारसे साजुक तुपात तळावे,

…रावांसारखे पती जन्मोजन्मी मिळावे.

दीन दुबळ्यांचे गाहाने

 दीन दुबळ्यांचे गाहाने परमेश्वरानी ऐकावे,

… रावा सारखे पत्ती मिळाले आणखी काय मागावे.

डाळिंब ठेवले

 डाळिंब ठेवले फोडून, संत्र्याची काढली साल,

.. रावांच्या नावाने कुंकु लावते लाल.

गोऱ्या गोऱ्या हातावर

 गोऱ्या गोऱ्या हातावर रेखाटली मेहंदी,

…रावांचे नाव घेण्याची वारंवार येवो संधी.

गुलाबाच्या झाडाला

 गुलाबाच्या झाडाला फूल येतात दाट,

…रावांचे नाव घेते सोड़ा माझी वाट.

नदीच्या काठावर

 नदीच्या काठावर कृष्ण वाजवितो बासरी,

…रावां सोबत आली मी सासरी.

अभिमान नाही

 अभिमान नाही संपत्तीचा, सर्व नाही रुपाचा,

… रावाना घास घालते वरण-भात-तुपाचा

ताजमहाल बांधायला

 ताजमहाल बांधायला; कारागीर होते कुशल,

… रावांचे नांव घेते, तुमच्या साठी स्पेशल.

माझें माहेर पंढरी

माझें माहेर पंढरी ।
आहे भीवरेच्या तीरीं ॥१॥

बाप आणि आई ।
माझी विठ्ठल रखुमाई ॥२॥

पुंडलिक आहे बंधू ।
त्याची ख्याती काय सांगूं [१] ॥३॥

माझी बहीण चंद्रभागा ।
करीतसे पाप भंगा ॥४॥

एका जनार्दनीं शरण ।
करी माहेरची आठवण ॥५॥

नको वाजवू श्रीहरी मुरली

नको वाजवू श्रीहरी मुरली
तुझ्या मुरलीने तहान-भूक हरली रे

खुंटला वायुचा वेग, वर्षती मेघ
जल स्थिरावली

घागर घेऊन पाणियासी जाता
डोईवर घागर पाझरली
एका जनार्दनी पूर्ण कृपेने
राधा गौळण घाबरली

काया ही पंढरी

काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल ।
नांदतो केवळ पांडुरंग ॥१॥

भाव-भक्ति भीमा उदक तें वाहे ।
बरवा शोभताहे पांडुरंग ॥२॥

दया-क्षमा-शांति हें चि वाळुवंट ।
मिळालासे थाट वैष्णवांचा ॥३॥

ज्ञान-ध्यान-पूजा विवेक आनंद ।
हाचि वेणुनाद शोभतसे ॥४॥

दश इंद्रियांचा एक मेळ केला ।
ऐसा गोपाळकाला होत असे ॥५॥

देखिली पंढरी देहीं-जनीं-वनीं ।
एका जनार्दनी वारी करी ॥६॥

रूपें सुंदर सांवळा गे माये

रूपें सुंदर सांवळा गे माये ।
वेणु वाजवी वृंदावना गोधनें चारिताहे ॥१॥

रुणझुण रुणझुण वाजवी वेणु ।
वेधीं वेधलें आमुचें तनमनु वो माये ॥२॥

गोधनें चारी हातीं घेऊनि काठी ।
वैकुंठीचा सुकुमार गोपवेषें जगजेठी ॥३॥

एका जनार्दनीं भुलवी गौळणी ।
करिती तनुमनाची वोवाळणी वो माये ॥४॥

माझें माहेर पंढरी

माझें माहेर पंढरी ।
आहे भीवरेच्या तीरीं ॥१॥

बाप आणि आई ।
माझी विठ्ठल रखुमाई ॥२॥

पुंडलिक आहे बंधू ।
त्याची ख्याती काय सांगूं [१] ॥३॥

माझी बहीण चंद्रभागा ।
करीतसे पाप भंगा ॥४॥

एका जनार्दनीं शरण ।
करी माहेरची आठवण ॥५॥

कांदा-मुळा-भाजी

कांदा-मुळा-भाजी ।
अवघीं विठाबाई माझी ॥१॥

लसुण-मिरची-कोथिंबिरी ।
अवघा झाला माझा हरीं ॥२॥

ऊस-गाजर-रातळू ।
अवघा झालासें गोपाळू ॥३॥

मोट-नाडा-विहींर-दोरी ।
अवघीं व्यापिली पंढरी ॥४॥

सावता ह्मणें केला मळा ।
विठ्ठल पायीं गोविंला गळा ॥५॥

आमुची माळियाची जात

आमुची माळियाची जात । शेत लावूं बागाईत ॥१॥

आम्हां हातीं मोट नाडा । पाणी जातें फुलझाडां ॥२॥

शांति शेवंतीं फुलली । प्रेम जाई-जुई व्याली ॥३॥

सांवत्याने केला मळा । विठ्ठल देखियेला डोळां ॥४॥

दळितां कांडितां

दळितां कांडितां । तुज गाईन अनंता ॥१॥

न विसंबे क्षणभरी । तुझें नाम गा मुरारी ॥२॥

नित्य हाचि कारभार । मुखीं हरि निरंतर ॥३॥

मायबाप बंधुबहिणी । तूं बा सखा चक्रपाणी ॥४॥

लक्ष लागलें चरणासी । ह्मणे नामयाची दासी ॥५॥

जनी उकलिते वेणी

तुळशीचे बनीं ।
जनी उकलिते वेणी ॥१॥

हातीं घेऊनियां लोणी ।
डोई चोळी चक्रपाणि ॥२॥

माझे जनीला नाहीं कोणी ।
ह्मणुनी देव घाली पाणी ॥३॥

जनी सांगे सर्व लोकां ।
न्हांऊं घाली माझा पिता ॥४॥

येग येग विठाबाई

येग येग विठाबाई । माझे पंढरीचे आई ॥१॥

भीमा आणि चंद्रभागा । तुझे चरणींच्या गंगा ॥२॥

इतुक्यासहित त्वां बा यावें । माझे रंगणीं नाचावें ॥३॥

माझा रंग तुझे गुणीं । ह्मणे नामयाची जनी ॥४॥

धरिला पंढरीचा चोर

धरिला पंढरीचा चोर । प्रेमें बांधुनियां दोर ॥१॥

हृदयी बंदिवान केला । आंत विठ्ठल कोंडला ॥२॥

शब्दें केली जडाजडी । पायीं विठ्ठलाचे बेडी ॥३॥

सोहं शब्द नाद केला । विठ्ठल काकुळती आला ॥४॥

जनी ह्मणे बा विठ्ठला । जीवें सोडीं न मी तुजला ॥५॥

जनी ह्मणे पांडुरंगा

जनी ह्मणे पांडुरंगा । माझ्या जीवींच्या जिवलगा ।
विनविते सांगा । महिमा साधुसंतांचा ॥१॥

कैसी वसविली पंढरी । काय महिमा भीमातीरीं ।
पुंडलिकाच्या द्वारीं । कां उभा राहिलासी ॥२॥

कैसा आला हा गोविंद । कैसा झाला वेणुनाद ।
येउनी नारद । कां राहिला ॥३॥

कृपा करा नारायणा । सांगा अंतरींच्या खुणा ।
येऊं दे करुणा । दासी जनी विनवितसे ॥४॥

घनु वाजे घुणघुणा

घनु वाजे घुणघुणा । वारा वाहे रुणझुणा ।
भवतारकु हा कान्हा । वेगीं भेटवा कां ॥१॥

चांदु वो चांदणे । चांपे वो चंदने ।
देवकीनंदनेविण । नावडे वो ॥२॥

चंदनाची चोळी । माझे सर्व अंग पोळी ।
कान्हो वनमाळी । वेगीं भेटवा कां ॥३॥

सुमनाची सेज । सितळ वो निकी ।
पोळे आगीसारिखी । वेगीं विझवा कां ॥४॥

तुह्मी गातसां सुस्वरें । ऐकोनि द्यावी उत्तरें ।
कोकिळें वर्जावें । तुह्मीं बाईयांनो ॥५॥

दर्पणीं पाहतां । रूप न दिसे वो आपुलें ।
बाप रखुमादेवीवरें । मज ऐसें केलें ॥६॥

तुज सगुण ह्मणों कीं निर्गुण रे

तुज सगुण ह्मणों कीं निर्गुण रे ।
सगुण-निर्गुण एकु गोविंदु रे ॥१॥

अनुमाने ना अनुमाने ना ।
श्रुति 'नेति नेति' ह्मणती गोविंदु रे ॥२॥

तुज स्थूळ ह्मणों कीं सूक्ष्म रे ।
स्थूळसूक्ष्म एकु गोविंदु रे ॥३॥

तुज आकारु ह्मणों कीं निराकारू रे ।
आकारुनिराकारु एकु गोविंदु रे ॥४॥

तुज दृश्य ह्मणों कीं अदृश्य रे ।
दृश्यअदृश्य एकु गोविंदु रे ॥५॥

तुज व्यक्त ह्मणों कीं अव्यक्तु रे ।
व्यक्तअव्यक्त एकु गोविंदु रे ॥६॥

निवृत्ती प्रसादें ज्ञानदेवो बोले ।
बाप रखुमादेविवरू विठ्ठलु रे ॥७॥

देवाचिये द्वारीं

देवाचिये द्वारीं उभा क्षणभरी ।
तेणें मुक्ति चारी साधिलिया ॥१॥

हरि मुखें ह्मणा हरि मुखें ह्मणा ।
पुण्याची गणना कोण करीं ॥२॥

असोनि संसारीं जिव्हे वेगु करीं ।
वेदशास्‍त्र उभारी बाह्या सदा ॥३॥

ज्ञानदेवो ह्मणे व्यासाचिये खुणे ।
द्वारकेचे राणे पांडवां घरीं ॥४॥

अरे अरे ज्ञाना

अरे अरे ज्ञाना झालासी पावन ।
तुझें तुज ध्यान कळों आले ॥१॥

तुझा तूंचि देव तुझा तूंचि भाव ।
फिटला संदेह अन्यतत्त्वी ॥२॥

मुरडूनियां मन उपजलासी चित्तें ।
कोठें तुज रितें न दिसे रया ॥३॥

दीपकीं दीपक मावळल्या ज्योती ।
घरभरी वाती शून्य झाल्या ॥४॥

वृत्तीचि निवृत्ति अपणांसकट ।
अवघेंची वैकुंठ चतुर्भूज ॥५॥

निवृत्ति परमानुभव नेमा ।
शांतिपूर्ण क्षमा ज्ञानदेवो ॥६॥

अवचिता परिमळू

अवचिता परिमळू, झुळुकला अळुमाळू ।
मी ह्मणु गोपाळू, आला गे माये ॥१॥

चांचरती चांचरती बाहेरी निघाले ।
ठकचि मी ठेलें काय करू ॥२॥

तो सावळा सुंदरू कांसे पीतांबरू ।
लावण्य मनोहरू देखियेला ॥३॥

बोधुनी ठेलें मन तव जालें आन ।
सोकोनी घेतले प्राण माझे गे माये ॥४॥

बाप रखुमादेवीवरू विठ्ठल सुखाचा ।
तेणें काया मने वाचा वेधियेलें ॥५॥

मोगरा फुलला

मोगरा फुलला मोगरा फुलला ।
फुलें वेंचितां बहरू कळियांसी आला ॥१॥

इवलेंसे रोप लावियलें द्वारी ।
त्याचा वेलु गेला गगनावेरी ॥२॥

मनाचिये गुंती गुंफियेला शेला ।
बाप रखुमादेविवरी विठ्ठलें अर्पिला ॥३॥

रुणुझुणु रुणुझुणु रे भ्रमरा

रुणुझुणु रुणुझुणु रे भ्रमरा ।
सांडीं तूं अवगुणु रे भ्रमरा ॥१॥

चरणकमळदळू रे भ्रमरा ।
भोगीं तूं निश्चळु रे भ्रमरा ॥२॥

सुमनसुगंधु रे भ्रमरा ।
परिमळु विद्गदु रे भ्रमरा ॥३॥

सौभाग्यसुंदरू रे भ्रमरा ।
बाप रखुमादेविवरू रे भ्रमरा ॥४॥

आजि सोनियाचा दिनु

आजि सोनियाचा दिनु ।
वर्षे अमृताचा घनु ॥१॥

हरि पाहिला रे हरि पाहिला रे ।
सबाह्याभ्यंतरी अवघा व्यापक मुरारी ॥२॥

दृढ विटे मन मुळी ।
विराजित वनमाळी ॥३॥

बरवा संतसमागमु ।
प्रगटला आत्मारामु ॥४॥

कृपासिंधु करुणाकरु ।
बाप रखमादेविवरू ॥५॥

पैल तो गे काऊ कोकताहे

पैल तो गे काऊ कोकताहे ।
शकुन गे माये सांगताहे ॥१॥

उड उड रे काऊ तुझे सोन्यानें मढवीन पाऊ ।
पाहुणे पंढरीरावो घरा कैं येती ॥२॥

दहिंभाताची उंडी लावीन तुझे तोंडी ।
जीवा पढिये त्याची गोडी सांग वेगी ॥३॥

दुधें भरूनी वाटी लावीन तुझें वोंठी ।
सत्य सांगे गोठी विठो येईल कायी ॥४॥

आंबया डहाळी फळें चुंबी रसाळीं ।
आजिचे रे काळीं शकुन सांगे ॥५॥

ज्ञानदेव ह्मणे जाणिजे ये खुणें ।
भेटती पंढरीराये शकुन सांगे ॥६॥

अवघाचि संसार सुखाचा करीन

अवघाचि संसार सुखाचा करीन ।
आनंदें भरीन तिन्ही लोक ॥१॥

जाईन गे माये तया पंढरपुरा ।
भेटेन माहेरा आपुलिया ॥२॥

सर्व सुकृताचें फळ मी लाहीन ।
क्षेम मी देईन पांडुरंगी ॥३॥

बाप रखुमादेविवरु विठ्ठलेचे भेटी ।
आपुले संवसाटी करुनी राहे ॥४॥

कन्या सासुर्‍यासीं जाये

कन्या सासुर्‍यासीं जाये ।
मागें परतोनी पाहे ॥१॥

तैसें जालें माझ्या जीवा
केव्हां भेटसी केशवा ॥२॥

चुकलिया माये ।
बाळ हुरुहुरु पाहे ॥३॥

जीवनावेगळी मासोळी ।
तैसा तुका तळमळी

खेळ मांडीयेला

खेळ मांडीयेला वाळवंटी घाई ।
नाचती वैष्णव भाईं रे ।
क्रोध अभिमान गेला पावटणी ।
एक एका लागतील पायीं रे ॥१॥

गोपीचंदनउटी तुळसीच्या माळा
हार मिरविती गळां ।
टाळ मृदुंग घाई पुष्प वर्षाव ।
अनुपम्य सुखसोंहळा रे ॥२॥

वर्णअभिमान विसरली याती
एकएकां लोटांगणीं जाती ।
निर्मळ चित्तें जालीं नवनीतें ।
पाषाणा पाझर सुटती रे ॥३॥

होतो जयजयकार गर्जत अंबर
मातले हे वैष्णव वीर रे ।
तुका ह्मणे सोपी केली पायवाट ।
उतरावया भवसागर रे ॥४॥

आणिक दुसरें मज नाहीं आतां

आणिक दुसरें मज नाहीं आतां ।
नेमिलें या चित्तापासुनियां ॥१॥

पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनीं ।
जागृतीं स्वप्‍नीं पांडुरंग ॥२॥

पडिलें वळण इंद्रियां सकळां ।
भाव तो निराळा नाहीं दुजा ॥३॥

तुका ह्मणे नेत्रीं केलीं ओळखण ।
साजिरें तें ध्यान विटेवरी ॥४॥

आह्मी जातो आपुल्या गावा

आह्मी जातो आपुल्या गावा ।
आमचा राम राम घ्यावा ॥१॥

तुमची आमची हेचि भेटी ।
येथुनियां जन्मतुटी ॥२॥

आतां असों द्यावी दया ।
तुमच्या लागतसें पायां ॥३॥

येतां निजधामीं कोणी ।
विठ्ठल विठ्ठल बोला वाणी ॥४॥

रामकृष्ण मुखी बोला ।
तुका जातो वैकुंठाला ॥५॥

आनंदाचे डोही आनंदतरंग

आनंदाचे डोही आनंदतरंग ।
आनंदचि अंग आनंदाचे ॥१॥

काय सांगो जालें कांहींचियाबाही ।
पुढें चाली नाहीं आवडीनें ॥२॥

गर्भाचे आवडी मातेचा डोहळा ।
तेथींचा जिव्हाळा तेथें बिंबे ॥३॥

तुका ह्मणे तैसा ओतलासे ठसा ।
अनुभव सरिसा मुखा आला ॥४॥

पावडर

एकदा एक बाई दुकानात जाऊन मुंग्यांची पावडर मागते,
शेजारी उभी असनारी बाई तिला म्हणते'
अहो मुंग्यांचे एवढे लाड करु नका,
आज पावडर मागितली उद्या लिपस्टीक मागतील !

देश आपला सोडो न कोणी

देश आपला सोडो न कोणी..
नातं आपलं तोडो न कोणी...
हृदय आपलं एक आहे, देश आपली जान आहे...
ज्याबद्दल आपल्याला अभिमान आहे.
स्वातंत्र्यदिनाच्या 
हार्दिक शुभेच्छा.

सलाम वीरांना

आज सलाम आहे त्या वीरांना

ज्यांच्यामुळे आज हा दिवस पाहिला...

ती आई आहे भाग्यशाली

जिच्यापोटी जन्मलेल्या वीरांमुळे

हा देश अखंड राहिला...

स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

शिवाजी महाराजांचा पोवाडा - शाहिर: महात्मा ज्योतिबा फुले

शिवाजी महाराजांचा पोवाडा - शाहिर: महात्मा ज्योतिबा फुले

चौक १

कुळवाडी-भूषण पवाडा गातो भोसल्याचा । छत्रपती शिवाजीचा ॥ध्रु०॥

लंगोटयांस देई जानवीं पोषींदा कूणब्याचा । काल तो असे यवनांचा ॥

शिवाजीचा पिता शहाजी पुत्र मालोजीचा । असे तो डौल जहागिरीचा ॥

पंधराशें एकूणपन्नास साल फळलें । जुन्नर तें उदयासी आलें ॥

शिवनेरी किल्ल्यामध्यें बाळ शिवाजी जन्मलें । जिजीबाईस रत्न सांपडलें ॥

हातापायांचीं नखं बोटं शुभ्र प्याजी रंगीलें । ज्यांनीं कमळा लाजिवलें ॥

वरखालीं टिर्याख पोटर्याय गांठी गोळे बांधले । स्फटिकापरि भासले ॥

सान कटी सिंहापरी छाती मांस दुनावलें । नांव शिवाजी शोभलें ॥

राजहौंसी उंच मान माघें मांदे दोंदीलें । जसा का फणीवर डोले ॥

एकसारखे शुभ्र दंत चमकूं लागले । मोतीं लडीं गुंतविलें ॥

रक्तवर्ण नाजूक होटीं हासूं छपिवले । म्हणोन बोबडें बोले ॥

सरळ नीट नाक विशाळ डोळ्या शोभलें । विषादें मृग वनीं गेले ॥

नेत्र तीखे बाणी भवया कमठे ताणीले । ज्यांनी चंद्रा हाटिवलें ॥

सुंदर विशाळ भाळवटी जावळ लोंबलें । कुरळे केंस मोघीले ॥

आजानबाहू पायांपेक्षां हात लांबलेले । चिन्ह गादिचें दिसलें ॥

जडावाचीं कडीं तोडे सर्व अलंकार केले । धाकटया बाळा लेविवलें ॥

किनखाबी टंकोचें मोतीं घोसानें जडलें । कलाबतुचे गोंडे शोभले ॥

लहान कुंची पैरण बिरडी बंद लावले । डाग लाळीचे पडलेले ॥

हातापायांचे आंगठे चोखी मुखामधी रोळे । पायीं घुंगरुं खुळखुळे ॥

मारी पाठोपाठ लाथाबुक्या आकाश शोभले । खेळण्यावर डोळे फिरवीले ॥

मजवर हा कसा खेळणा नाहीं आवडले । चिन्ह पाळणीं दिसलें ॥

टाहीपेटे रडूं लागला सर्व घाबरले । पाळण्या हलवूं लागले ॥

धन्य जिजाबाई जिनें जो जो जो जो जो केलें । गातों गीत तिनें केलें ॥

चाल 

जो जो जो जो जो जो गाऊ, जी जी जी जी जीजी गाऊं । 

चला वेरुळास जाऊं, दौलताबादा पाहूं ॥

मूळ बाबाजीस ध्याऊं, कीर्ति आनंदाने गाऊं ।

सरदारांत उमराऊ, सोबतीस जाधवराऊ ॥

पाटील होते गांवोगाऊ, पुत्रावरी अती जीऊ ।

थोर विठोजी नांव घेऊं, सान मालोजी त्याचा भाऊ ।

दीपाबाई त्यास देऊं, छंदाजोगा गिती गाऊं ॥

चाल 

मालोजी राजा । तुझा बा आजा ॥

यवनी काजा । पाळिल्या फौजा ॥

लाविल्या ध्वजा । मारिल्या मौजा ॥

वेळेस मुक्का । साधल्या बुक्का ॥

विचारी पक्का । जाधवा धक्का ॥शेशाप्पा नायका । ठेविचा पैका ।

द्रव्याची गर्दी । चांभारगोंदी ॥

देवळें बांधी । तळीं ती खांदी ॥

आगळी बुद्धि । गुणानें निधि ॥

लिहिलें विधि । लोकांस बोधी ॥

संधान साधी । जसा पारधी ॥

भविषी भला । कळलें त्याला ॥

सांगोनी गेला । गादी बा तुला ॥

चाल 

उपाय नाहीं जाणोन चाकर झाला यवनाचा । शिपाई होता बाणीचा ॥

खोटया दैवा कोण खोडी बेत देवाजीचा । पवाडा गातो शिवाजीचा ॥

कुळवाडी-भूषण पवाडा गातो भोसल्याचा । छत्रपती शिवाजीचा ॥१॥

चौक २

वडील बंधु संभाजीनें लळे पुरवीले । धाकटयासवें खेळले ॥

उभयतांचें एक चित्त तालमींत गेले । फरीगदग्या शिकले ॥

आवडीनें खमठोकीं कुस्ती पेंचानें खेळे । पवित्रे दस्तीचे केले ॥

द्वादशवर्षी उमर आली नाहीं मन धालें । घोडी फिरवूं लागले ॥

आट्टल घोडेस्वार भाला बोथाटी शीकले । गोळी निशान साधले ॥

कन्या वीर जाधवाची जिनें भारथ लावलें । पुत्रा नीट ऐकविलें ॥

अल्पवयाचे असतां शिकार करुं लागले । माते कौतुक वाटलें ॥

नित्य पतीचा आठव डोंगर दुःखाचे झाले । घर सवतीनें घेतले ॥

छाती कोट करुन सर्व होतें साटिवलें । मुखमुद्रेनें फसविले ॥

चतुर शिवाजीनें आईचें दुःख ताडिले । पित्यास मनीं त्यागिले ॥

पुत्राचे डोळे फिरले माते भय पडलें । हीत उपदेशा योजिलें ॥

मनीं पतिभक्ति पुता बागेमधीं नेलें । वृक्षछायीं बसीवलें ॥

पूर्वजांचे स्मरण करुन त्यास न्याहाळीलें । नेत्रीं पाणी टपटपलें ॥

या क्षेत्राचे धनी कोणकोणी बुडविले । सांगतें मुळीं कसें झालें ॥

क्षेत्रवासी म्हणोन नांव क्षत्रिय धरलें । क्षेत्रीं सुखी राहिले ॥

अन्यदेशिचे दंगेखोर हिमालयीं आले । होते लपून राहिले ॥

पाठीं शत्रु भौती झाडी किती उपासी मेले । गोमासा भाजून धाले ॥

पाला फळें खात आखेर ताडपत्रा नेसले । झाडी उल्लंघून आले ॥

लेखणीचा धड शीपाया सैनापति केलें । मुख्य ब्रह्मा नेमलें ॥

बेफाम क्षत्रिय होते अचूक टोळ उतरले । कैदी सर्वांस केलें ॥

सर्व देशीं चाल त्याचें गुलाम बनीवले । डौलानें क्षुद्र म्हणाले ॥

मुख्य ब्रह्म राजा झाला जानें कायदे केले । त्याचे पुढें भेद केले ॥

ब्रह्मा मेल्यावर परशराम पुंड माजले । उरल्या क्षत्रिया पिडीले ॥महारमांग झाले किती देशोधडी केले । ब्राह्मण चिरंजीव झाले ॥

देश निक्षत्रिय झाल्यामुळें यवना फावलें । सर्वांस त्यांहीं पिडीलें ॥

शुद्र म्हणती तुझ्या हृदयीं बाण टोचले । आज बोधाया फावलें ॥

गाणें गातें ऐक बाळा तुझ्या आजोळीं शिकले । बोलीं नाहीं मन धालें ।

चाल 

क्षेत्र क्षत्रियांचें घर, तुझे पितृ माहावीर । सुखा नसे त्यांच्या पार, 

आल्या गेल्याचें माहेर ॥ शीखराकार डोंगर, नानावल्ली तरुवर ॥

परीं खोरीं वाहे नीर खळखळे निरंतर । झाडा फुलें झाला भार, 

सुगंधी वाहे लहर । पक्षी गाती सोळा स्वर, मंजूळ वाणी मनोहर ॥

नदी नाले सरोवर, शोभे कमळांचा भार । भूमी अती काळसर, 

क्षेत्र देई पीका फार ॥ धाव घेती दंगेखोर, दिला क्षेत्रियास मार ।

दास केले निरंतर, ब्रह्मा झाला मनीं गार ॥ लोभी मेले येथें फार, विधवा झाल्या घरोघर ।

उपाय नाहीं लाचार, स्त्रिया वंदी पाटावर ॥ दुसरा झाला शीरजोर, परशा तोबा कठोर ।

मार त्याचा अनीवार, केला क्षत्रियां संव्हार ॥ क्षत्रिय केले जरजर, भये कांप थरथर ।

दुःखा नाहीं त्यांच्या पार, ठाव नाहीं निराधार ॥ बहु केले देशापर, बाकी राहि मांगमाहार ।

निःक्षेत्रीं झाल्यावर, म्लेंच्छें केलें डोकें वर । आले सिंधुनदावर, स्वार्याि केल्या वारोंवार । 

गातें कटावांत सार, लक्ष देई अर्थावर ।

चाल 

काबुला सोडी । नदांत उडी ॥

ठेवितो दाढी । हिंदूस पीडी ॥

बामना बोडी । इंद्रियें तोडी ॥

पिंडीस फोडी । देवळें पाडी ॥

चित्रास तोडी । लेण्यास छेडी ॥

गौमांसी गोडी । डुकरां सोडी ॥

खंडयास ताडी । जेजूरी गडी ॥

भुंग्यास सोडी । खोडीस मोडी ॥

मूर्तीस काढी । काबूला धाडी ॥

झाडीस तोडी । लुटली खेडीं ॥

गडास वेढी । लावली शीडी ॥

हिंदूस झोडी । धर्मास खोडी ॥

राज्यास बेडी । कातडी काढी ॥

गर्दना मोडी । कैलासा धाडी ॥

देवळें फोडी । बांधीतो माडी ॥

उडवी घोडी । कपाळा आढी ॥

मीजास बडी । ताजीम खडी ॥

बुरखा सोडी । पत्नीखस पीडी ॥

गायनीं गोडी । थैलीतें सोडी ॥

चाल 

माताबोध मनीं हसतां राग आला यवनांचा ।

बेत मग केला लढण्याचा ॥ तान्हाजी मालुसरे बाजी फसलकराचा ।

स्नेह येशजी कंकाचा ॥ मित्रा आधीं ठेवी जमाव केला मावळ्यांचा ।

पूर करी हत्यारांचा ॥ मोठया युक्तीनें सर केला किल्ला तोरण्याचा ।

रोविला झेंडा हिंदूचा ॥ राजगड नवा बांधला उंच डोंगराचा ।

भ्याला मनीं विजापुरचा । दुसरा भ्याला मेला बेत नव्हता पूर्वीचा ।

दादोजी कोंडदेवाचा ॥ मासा पाणीं खेळे गुरु कोण असे त्याचा । 

पवाडा गातो शिवाजीचा ॥ कुळवाडी-भूषण पवाडा गातो भोसल्याचा ।

छत्रपती शिवाजीचा ॥२॥

चौक ३

जाहागीरचा पैसा सारा लावी खर्चास । चाकरी ठेवी लोकांस ॥

थाप देऊन हातीं घेई चाकण किल्ल्यास । मुख्य केले फिङ्‌र्गोजीस ॥

थोडया लोकांसहीत छापा घाली सुप्यास । कैद पाहा केलें मामास ॥

सुप्यासोबत हातीं घेतलें तीनशें घोडयास । करामत केली रात्रीस ॥

मुसलमानां लाच देई घेई कोंडाण्यास । सिंहगड नांव दिलें त्यास ॥

पुरंधरी जाई जसा भला माणूस न्यायास । कैद पाहा केलें सर्वांस ॥

गांव इनाम देऊन सर्वां ठेवी चाकरीस । मारलें नाहीं कोणास ॥

वाटेमधीं छापा घालून लुटी खजीन्यास । सांठवी राजगडास ॥

राजमाचीं लोहगडीं लढे घेई तिकोण्यास । बाकी चार किल्ल्यांस ॥

मावळ्यांस धाडी कोकणीं गांव लुटायास । धूर्त योजी फितूरास ॥ 

सन्मान कैद्यां देई पाठवि वीजापूरास । मुलान्या सुभेदारास ॥

विजापुरीं मुसलमाना झाला बहु त्रास । योजना केली कपटास ॥

करनाटकीं पत्र पाठवी बाजी घोरपडयास । कैद तुम्ही करा शहाजीस ॥

भोजनाचें निमित्त केलें नेलें भोसल्यास । दग्यानें कैद केलें त्यास ॥

थेट शहाजी कैदी आणिला विजापूरास । खुशी मग झाली यवनास ॥

चिरेबंदी कोठडीमध्यें बंद केलें त्यास । ठेविलें भोक वार्या स ॥

शहाजीला पिडा दीली कळलें शिवाजीस । ऐकून भ्याला बातमीस ॥

पिताभक्ति मनीं लागला लागला शरण जायास । विचारी आपला स्त्रियेस ॥

साजे नांव सईबाई स्त्री सुचवी पतीस । ताडा दंडीं दुसमानास ॥

स्त्रीची सुचना सत्य भासली लिहिलें पत्रास । पाठवी दिल्ली मोगलास ॥

चाकर झालों तुमचा आतां येतों चाकरीस । सोडवा माझ्या पित्यास ॥

मोलग थैली गेली थेट मुसलमानास ठेविले किल्ल्यावर त्यास ॥

बाजी शामराज का लाजला जात सांगायास । धरुं पाही शिवाजीस ॥

धेड म्हणावा नाक नाही द्यावा कोणास । अडचण झाली बखरीस ॥

सिद्धिस बेत गेला नाहीं अंतीं भ्याला जिवास । काळें केलें महाडास ॥

शाहाजीचा बाजी आखेर घेईल बक्षीस । हा पाजी मुकला जातीस ॥

करनाटकीं आज्ञा झाली शाहाजीस । यवन भ्याला सिंहास ॥ 

वर्षे चार झालीं शिवला नाहीं कबजास । पिताभक्ति पुत्रास ॥

चंद्रराव मोर्या स मारी घेई जावळीस । दुसरे वासोटा किल्ल्यास ॥

प्रतापगड बांधी पेशवा केला एकास । नवे योजी हुद्यास ॥

आपली बाकी काढी धाडी पत्र तगाद्यास । चलाखी दावी मोंगलांस ॥

रात्रीं जाऊन एकाएकीं लुटी जुन्नरास । पाठवी गडी लुटीस ॥

आडमाग करी हळूंच गेला नगरास । लुटी हत्तीघोडयांस ॥

उंच वस्त्रे, रत्नेंु होन कमती नाहीं द्रव्यास । चाकरि ठेवि बारगिरांस ॥

समुद्रतीरीं किल्ले घेई पाळी गलबतांस । चाकरी ठेवि पठाणास ॥

सिद्दि पेशव्या आपेश देई घेई यशास । उदासी लाभ शिवाजीस ॥

आबझूलखान शूर पठाण आला वांईस । शोभला मोठा फौजेस ॥

हातीं बारा हजार घोडा त्याचे दिमतीस । कमी नाहीं दारुगोळीस ॥

कारकुनाला वचनीं दिलें हिवरें बक्षीस । फितविलें लोभी ब्राह्मणांस ॥

गोपीनाथ फसवी पठाणा आणि एकांतास । चुकला नाहीं संकेतास ॥

मातेपायीं डोई ठेवी, लपवी इत्यारास । बरोबर आला बेतास ॥

समीप येतां शिवाजी जसा भ्याला व्याघ्रास । कमी करी आपल्या चालीस ॥

गोपीनाथ सुचना देई भोळ्या यवनास । भ्याला तुमच्या शिपायांस ॥

वर भेटभाव वाघनख मारीं पोटास । भयभित केलें पठाणास ॥

पोटीं जखम सोसी केला वार शिवाजीस । झोंबती एकमेकांस ॥

हातचलाखी केली बिचवा मारी शत्रूस । पठाण मुकला प्राणास ॥

स्वामीभक्ती धाव घेई कळले शिपायास । राहिला उभा लढण्यास ॥

त्याची धोप घेई शिवाजी बचवी आपल्यास । तान्हाजी भिडे बाजूस ॥

दांती दाढी चावी तोडी घेई धनी सूडास । घाबरें केलें दोघांस ॥नांव सय्यदबंधू साजे शोभा आणी बखरीस । लाथाळी जीवदानास ॥

तान्हाजीला हूल देई मारी हात शिवाजीस । न्याहाळी प्रेतीं धण्यास ॥

उभयतांसीं लढतां मुकला आपल्या प्राणास । गेला जन्नत स्वर्गास ॥

छापा घाली मारी करी कैद बाकी फौजेस । पठाणपुत्र खाशा स्त्रियेस ॥

चार हजार घोडा लूट कमी नाहीं द्रव्यास । दुसर्याख सरंजामास ॥

अलंकार वस्त्रें देई सर्व कैदी जखम्यांस । पाठवि विजापूरास ॥

वचनीं साचा शिवाजी देई हिवरें बक्षीस । फितुर्या गोपीनाथास ॥

नाचत गात सर्व गेले प्रतापगडास । उपमा नाहीं आनंदास ॥

चाल 

शिवाचा गजर जयनामाचा झेंडा रोविला ॥ 

क्षेत्र्याचा मेळा मावळ्याचा शिकार खेळला ॥

मातेपायीं ठेवी डोई गर्व नाहीं काडीचा ।

आशिर्वाद घेई आईचा ॥ आलाबला घेई आवडता होता जिजीचा ।

पवाडा गातो शिवाजीचा ॥ कुळवाडी-भूषण पवाडा गातो भोसल्याचा ।

छत्रपती शिवाजीचा ॥३॥

चौक ४

लढे रांगणीं विशाळगडीं घेई पन्हाळ्यास । केले मग शुरु खंडणीस ॥

रुस्तुल जमाना आज्ञा झाली विजापूरास । नेमिला कोल्हापूरास ॥

स्वार तीन हजार घेई थोडया पायदळास । आला थेट पन्हाळ्यास ॥

मार देत शिवाजी पिटी कृष्णा पैलतडीस । अती जेर केलें त्यास ॥

खंडणी घेत गेला भिडला विजापूरास । परत मग आला गडास ॥

राजापुर दाभोळ लुटी भरी खजीन्यास । मात गेली विजापुरास ॥

सिद्दी जोहरा नेमी मोठी फौज दिमतीस । सावंत सिद्दी कुमकेस ॥

बंदोबस्त करी शिवाजी राही पन्हाळ्यास । करी मग जमा बेगमीस ॥

वारंवार छापे घाली लुटी भौंती मुलखास । केलें महाग दाण्यास ॥

त्रासानें खवळून वेढा घाली शिवाजीस । कोंडिले गडीं फौजेस ॥

चार मास लोटले शिवाजी भ्याला वेढयास । योजना करी उपायास ॥

कोंकणामधीं सिद्दी झोडी रघुनाथास । उपद्रव झाला रयतेस ॥

फासलकर बाजीराव पडले वाडीस । दुःख मग झालें शिवाजीस ॥

सिद्दी जोहरा निरोपानें गोंवी वचनास । खुशाल गेला भेटीस ॥

वेळ करुन गेला उरला नाहीं आवकास । कच्चा मग ठेवी तहास ॥

सिद्दीस लाडी गोडी मधी मान डुकलीस । गेला थाप देऊन गडास ॥

सिद्धया पोटीं खुष्याली जाई झोपीं सावकास । हयगय झाली जप्तीस ॥

तों शिवाजी पळून गेला घेई पाठी रात्रीस । फसविलें मुसलमानास ॥

सिद्दी सकाळीं खाई मनीं लाडू चुरमुर्या्स । स्वार दळ लावी पाठीस ॥

चढत होता खिंड शिवाजी गांठलें त्यास । बंदुका लावी छातीस ॥

बाजीपरभु मुख्य केला ठेवि मावळ्यास । एकटा गेला रांगण्यास ॥

स्वामीला वेळ दिला बाजी भिडला शत्रूस । हरवी नित्य मोगलास ॥

दोन प्रहर लढे वाट दिली नाहीं त्यास । धन्य त्याच्या जातीस ॥

मोठी मोगल फौज दाखल झाली साह्यास । खवळला बाजी युद्धास ॥

अर्धे लोक उरले सरला नाहीं पाउलास । पडला परभू भूमीस ॥तो शिवाजी सुखी पोहंचला कान सुचनेस । अंती मनीं हाच ध्यास ॥

बार गडीं ऐकून सुखी म्हणे आपल्यास । नीघून गेला स्वर्गास ॥

सय्यद मागें सरे जागा देई बाजीरावास । पाहून स्वामीभक्तीस ॥

विजापुरीं मुसलमान करी तयारीस । खासा आला लढण्यास ॥

कराडास डेरे दिले घेई बहू किल्ल्यांस । वश करी चाचे लोकांस ॥

दळव्यासीं लडून घेई शृंगारपुरास । मारलें पाळेगारांस ॥

लोकप्रीतिकरितां करी गुरु रामदासास । राजगडीं स्थापी देवीस ॥

मिष्ट अन्न भोजन दिलें सर्वां बक्षीस । केली मग मोठी मजलस ॥

तानसैनी भले गवय्या बसवी गायास । कमी नाहीं तालस्वरास ॥

चाल 

जीधर उधर मुसलमानी । बीसमिलाही हिंमानी ॥

सच्चा हरामी शैतान आया । औरंगजीब नाम लिया ॥

छोटे भाइकूं कैद हूल दिया । बडे भाईकी जान लिया ॥

छोटेकूंबी कैद किया । लोक उसके फितालिया ॥

मजला भाई भगा दिया । आराकानमें मारा गया ॥

सगे बापकूं कैद किया । हुकमत सारी छिनलीया ॥

भाईबंदकूं इजा दिया । रयत सब ताराज किया ॥

मार देके जेर किया । खाया पिया रंग उडाया ॥

आपण होके बेलगामी । शिवाजीकू कहे गुलामी ॥

आपण होके ऐशआरामी । शिवाजीकूं कहे हरामी ॥

बरे हुवा करो सलामी । हिंदवाणी गाव नामी ॥

चाल 

आदी आंत न । सर्वां कारण ॥ 

जन्ममरण । घाली वैरण ॥

तोच तारण । तोच मारण ॥

सर्व जपून । करी चाळण ॥

नित्य पाळण । लावी वळण ॥

भूतीं पाहून । मनीं ध्याईन ॥

नांव देऊन । जगजीवन ॥ 

सम होऊन । करा शोधन ॥

सार घेऊन । तोडा बंधन ॥

चाल 

सरनौबती डंका हुकूम पालेकराचा । घेई मुजरा शाईराचा ॥

सुखसोहळे होतां तरफडे सावंत वाडीचा । पवाडा गातो शिवाजीचा ॥

कुळवाडी-भूषण पवाडा गातो भोसल्याचा । छत्रपती शिवाजीचा ॥४॥

चौक ५

सावंत पत्र लिही पाठवी विजापूरास । मागे फौज कुमकेस ॥

बाजी घोरपडा बल्लोळखान येती साह्यास । शिवाजी करी तयारीस ॥

त्वरा करुन गेला छापा घाली मुधोळांस । मारिलें बाजी घोरपडयास ॥

भाऊबंद मारिलें बाकी शिपाई लोकांस । घेतलें बाप सूडास ॥

सावंताची खोड मोडून ठेवी चाकरीस । धमकी देई पोर्च्युग्यास ॥

नवे किल्ले बांधी डागडुजी केली सर्वांस । बांधिलें नव्या जाहाजास ॥

जळीं सैनापती केले ज्यास भीती पोर्च्युग्यीस । शोभला हुद्दा भंडार्याीस ॥

विजापूरचा वजीर गुप्त लिही शिवाजीस । उभयतां आणलें एकीस ॥

व्यंकोजी पुत्रा घेई शाहाजी आला भेटीस । शिवाजी लागे चरणास ॥

शाहाजीचे सद्‌गुण गाया नाहीं आवकास । थोडेसे गाऊ अखेरीस ॥

सुखसोहळे झाले उपमा लाजे मनास । उणें स्वर्गी सुखास ॥

अपूर्व वस्तू घेऊन जाई विजापूरास । भेट मग देई यवनास ॥

पराक्रमी शिवाजी पाळी पाऊण लक्षास । साजे यवनी स्नेहास ॥

विजापूरचा स्नेह होता लढे मोगलास । घेतले बहूतां किल्ल्यास ॥

सर्व प्रांतीं लूट धुमाळी आणिलें जेरीस । घावरें केलें सर्वांस ॥

संतापानें मोंगल नेमी शाइस्तेखानास । जलदि केली घेई पुण्यास ॥

चाकणास जाऊन दावी भय फिङ्‌र्गोजीस । फुकट मागे किल्ल्यास ॥

मास दोन लढला घेऊन सर्व फौजेस । खान खाई मनास ॥

अखेर दारु घालून उडवी एका बुर्जास । वाट केली आंत जायास ॥

वारोंवार हल्ले गर्दी करुं पाहे प्रवेश । शाइस्ता पठाण पाठीस ॥

मागें पळति सर्व कोणी मानिना हुकूमास । भीति आंतल्या मर्दास ॥

लागोपाठ मार देत हटवि पठाणास । खचला खान हिंमतीस ॥

प्रातःकाळीं संतोषानें खाली केले किल्ल्यास । देई मुसलमानास ॥

फिङर्गोजीला भेट देती खुषी झाली यवनास । देऊन मान सोडी सर्वांस ॥

शिवाजीची भेट घेतां सन्मान दिला त्यास । वाढवी मोठया पदवीस ॥

फिड्‌र्गोजीचें नांव घेतां मनीं होतो उल्हास । पीढीजाद चाकरीस ॥ 

येशवंतशिंग आले घेऊन मोठया फौजेस । मदत शाईस्तेखानास ॥

सरनौबत भौती लुटी नगरी मुलखास । जाळून पाडिला ओस ॥

पाठी लागून मोंगल भारी त्याच्या स्वारांस । जखमा केल्या नेटाजीस ॥

राजगड सोडून राहीला सिंव्हगडास पाहून मोगलसेनेस ॥

जिजाबाईचें मुळचें घर होतें पुण्यास । खान राही तेथें वस्तीस ॥

मराठयांस चौकी बंदी गांवांत शिरण्यास । होता भीत शिवाजीस ॥

लग्नवर्हाचडी रुपें केला पुण्यांत प्रवेश । मावळे सोबत पंचवीस ॥

माडीवर जाऊन फोडी एका खिडकीस । कळालें घरांत स्त्रीयांस ॥

शाइस्त्यास कळतां दोर लावी कठडयास । लागला खालीं जायास ॥

शिवाजीनें जलदी गांठून वार केला त्यास । तोडीलें एका बोटास ॥

स्त्रिपुत्रां सोडून पळे पाठ दिली शत्रूस । भित्रा जपला जिवास ॥

आपल्या पाठिस देणें उणें शिपायगिरीस । उपमा नाहीं हिजडयास ॥

सर्व लोकांसहित मारिलें खानपुत्रास । परतला सिंहगडास ॥

डौलानें मोंगल भौती फिरवी तरवारीस । दावी भय शिवाजीस ॥

समीप येऊं दिले हुकूम सरबत्तीस । शत्रू पळाला भिऊन मारास ॥

करनाटकी बदली धाडी शाइस्तेखानास । मुख्य केलें माजमास ॥

राजापुरीं जाई शिवाजी जमवी फौजेस । दावी भय पोर्च्यूग्यास ॥

सर्व तयारी केली निघाला नाशिक तीर्थास । हुल कसी दिली सर्वांस ॥

मध्यरात्रीं घेई बरोबर थोडया स्वारांस । दाखल झाला सुर्तेस ॥

यथासांग साहा दिवस लुटी शहरास । सुखी मग गेला गडास ॥

बेदनूराहून पत्र आलें देई वाचायास । आपण बसे ऐकायास ॥

शिपायाचे बच्चे शाहाजी गेले शिकारीस । लागले हरणापाठीस ॥

घोडया ठेंच लागे उभयतां आले जमीनीस । शाहाजी मुकला प्राणास ॥

पती कैलासा गेले कळलें जिजीबाईस । पार मग नाहीं दुःखास ॥

भुमी धडपडे बैसे रडून गाई गुणांस । घेई पुढे शिवाजीस ॥

चाल 

अतीरुपवान बहु आगळा । जैसा रेखला चित्री पूतळा ॥

सवतीवर लोटती बाळा । डाग लाविला कुणबी कुळा ॥

सवतीला कसें तरी टाळा । कज्जा काढला पती मोकळा ॥

खर्याा केंसानें कापि का गळा । नादीं लागला शब्द कोकिळा ॥

मूख दुर्बळ राही वेगळा । अती पिकला चिंतेचा मळ ॥

झाला शाहाजी होता सोहळा । मनीं भूलला पाहूनी चाळा ॥

बहुचका घेती जपमाळा । जाती देऊळा दाविती मोळा ॥

थाट चकपाक नाटकशाळा । होती कोमळा जशा निर्मळा ॥

खर्याा डंखिणी घाली वेटोळा । विषचुंबनीं देती गरळा ॥

झाला संसारीं अती घोटाळा । करी कंटाळा आठी कपाळा ॥

मनीं भिऊन पित्याच्या कुळा । पळ काढला गेले मातुळा ॥

छातीवर ठेवल्या शिळा । नाहीं रुचला सवत सोहळा ॥

चाल 

कमानीवर । लावले तीर ॥

नेत्रकटार । मारी कठोर ॥

सवदागर । प्रीत व्यापार ॥

लावला घोर । सांगतें सार ॥

शिपाई शूर । जुना चाकर ॥

मोडक्या धीर । राखी नगर ॥

आमदानगर विजापूरकर ॥ मंत्री मुरार ॥

घेई विचार ॥ वेळनसार ।

देई उत्तर ॥ धूर्त चतुर ।

लढला फार ॥ छाती करार ॥

करी फीतूर ॥ गुणगंभीर ।

लाविला नीर ॥ होता लायक ।

पुंडनायक ॥ स्वामीसेवक ।

खरा भाविक ॥

चाल

सिंहगडावर गेला बेत केला क्रियेचा । बजावला धर्म पुत्राचा ॥

रायगडी जाई राही शोक करी पित्याचा । शत्रु होता आळसाचा ॥

दुःखामधीं सुरु बंदोबस्त करी राज्याचा । पवाडा गातो शिवाजीचा ॥

कुळवाडी-भूषण पवाडा गातो भोसल्याचा ॥ छत्रपती शिवाजीचा ॥५॥

चौक ६

सर्व तयारी केली राजपद जोडी नांवास । शिक्का सुरु मोर्तबास ॥

अमदानगरीं नटून पस्त केलें पेठेस । भौतीं औरंगाबादेस ॥

विजापूरची फौज करी बहुत आयास । घेई कोकणपट्टीस ॥सावध शिवाजी राजे आले घेऊन फौजेस । ठोकून घेई सर्वांस ॥

जळीं फौज लढे भौती मारी गलबतास । दरारा धाडी मक्केस ॥

माल्वणीं घेऊन गेला अवचित फौजेस । पुकारा घेतो मोगलास ॥

जाहाजावर चढवी फौज गेला गोव्यास । लुटलें बारशिलोरास ॥

जलदी जाऊन गोकर्णी घेई दर्शनास । लुटलें मोंगल पेठांस ॥

पायवाटेनें फौज पाठवी बाकी लुटीस । आज्ञा जावें रायगडास ॥

स्वतां खासी स्वारी आज्ञा लोटा जाहाजास । निघाला मुलखीं जायास ॥

मोठा वारा सुटला भ्याला नाहीं तुफानास । लागले अखेर कडेस ॥

औरंगजीब पाठवी राजा जयशिंगास । दुसरे दिलीरखानास ॥

ठेवले मोगल अमीर येऊन पुण्यास । वेढिलें बहुतां किल्ल्यांस ।

मानकरी शिवाजी घेई बसे मसलतीस । सुचेना कांहीं कोणास ॥

बाजी परभू भ्याला नाहीं दिलीरखानास । सोडिलें नाहीं धैर्यास ॥

हेटकरी मावळे शिपाइ होते दिमतीस । संभाळी पुरंधरास ॥

चातुर्यानें लढे गुंतवी मोगल फौजेस । फुरसत दिली शिवाजीस ॥

फार दिवस लोटले पेटला खान इर्षेस । भिडला किल्लया माचीस ॥

बुर्जाखालीं गेला लागे सुरंग पाडायास । योजी अखेर उपायास ॥ 

हेटकरी मावळे जाती छापे घालण्यास । पिडीलें फार मोगलास ॥

मोगलाने श्रम केले बेत नेला सिद्धीस । काबीज केलें माचीस ॥

यशस्वी भोसले लागले निर्भय लुटीस । चुकले सावधपणास ॥

हेटकर्यांसचा थाट नी मारी लुटार्यावस । मोगल हटले नेटास ॥

बाजी मावळ्यां जमवी हातीं घेई खांडयास । भिडून मारी मोगलास ॥

मोगल पळ काढी पाठ दिली मावळ्यास । मर्द पाहा भ्याले उंद्रास ॥

लाजे मनीं दिलीरखान जमवी फौजेस । धीर काय देई पठाणास ॥

सर्व तयारी पुन्हा केली परत हल्ल्यास । जाऊन भिडला मावळ्यास ॥

बाजी मार देई पठाण खचले हिमतीस । हटती पाहून मर्दास ॥

पराक्रम बाजीचा पाही खान खोच मनास । लावीला तीर कमानीस ॥

नेमानें तीर मारी मुख्य बाजी परभूस । पाडिला गबरु धरणीस ॥

सय्यद बाजी ताजीम देती घेती बाजूस । सरले बालेकिल्ल्यास ॥

मोगल चढ करती पुन्हा घेती माचीस । धमकी देती मावळ्यास ॥

हेटकरी मारी गोळी फेर हटवि शत्रूस । पळवी इशानी कोणास ॥

वज्रगडाला शिडी लाविली आहे बाजूस । वरती चढवी तोफांस ॥

चढला मोगल मारी गोळे बालेकिल्ल्यास । आणले बहू खराबीस ॥

हेटकरी मावळे भ्याले नाहीं भडिमारास । मोगल भ्याला पाऊसास ॥

मोगल सल्ला करी शिवाजी नेती मदतीस । घेती यवनी मुलखास ॥

कुलद्रोही औरंगजीब योजी कपटास । पाठवि थैली शिवाजीस ॥

शिवाजीला वचन देऊन नेई दिल्लीस । नजरकैद करी त्यास ॥

धाडी परत सर्व मावळे घोडेस्वारांस । ठेविले जवळ पुत्रास ॥

दरबार्यांस घरीं जाई देई रत्नव भेटीस । जोडिला स्नेह सर्वांस ॥

दुखणें बाहाणा करी पैसा भरी हकीमास । गूल पाहा औरंगजीबास ॥

आराम करुन दावी शुरु दानधर्मास । देई खाने फकीरास ॥

मोठे टोकरे रोट भरी धाडी मशीदीस । जसा का मुकला जगास ॥

दानशूर बनला हटवि हातिमताईस । चुकेना नित्यनेमास ॥

औरंगजीबा भूल पडली पाहून वृत्तीस । विसरला नीट जप्तीस ॥

निरास कैदी झाला शिवाजी भास मोगलास । चढला मोठया दिमाखास ॥

पितापुत्र निजती टोकरी बदली रोटास । बाकी सोपी चाकरास ॥

जलदी करीती चाकर नेती टोकरास । करामत केली रात्रीस ॥

दिल्ली बाहेर गेले खुलें केले शिवाजीस । नेली युक्ती सिद्धीस ॥

मोगल सकाळीं विचकी दांत खाई होटांस । लावी पाठी माजमास ॥

चाल 

औरंगजीबा धूर दीला । पुत्रासवें घोडा चढला ॥

मधींच ठेवी पुत्राला । स्वतां गोसावी नटला ॥

रात्रिचा दिवस केला । गाठलें रायगडाला ॥

माते चरणीं लागला । हळूच फोडी शत्रूला ॥

स्नेह मोगलाचा केला । दरारा देई सर्वांला ॥

चाल 

हैद्राबादकर । विजापूरकर ॥

कापे थरथर । देती कारभार ॥

भरी कचेरी । बसे विचारी ॥

कायदे करी । निट लष्करी ॥

चाल 

शिवाजीचा बेत पाहून जागा झाला गोव्याचा । बंदोबस्त केला किल्ल्याचा ॥

वेढा घालून जेर केला सिद्दी जंजिर्याचचा । पवाडा गाती शिवाजीचा ॥

कुळवाडी-भूषण पवाडा गातो भोसल्याचा । छत्रपती शिवाजीचा ॥६॥

चौक ७

शिवाजी तों मसलत देई मित्र तान्हाजीला । बेत छाप्याचा सुचवीला ॥

तान्हाजीनें भाऊ धाकटा सोबत घेतला । मावळी हजार फौजेला ॥

सुन्या रात्रीं सिंहगड पायीं जाऊन ठेपला । योजिलें दोर शिडीला ॥

दोरीची शिडी बांधली शिपाई कमरेला । हळुच वर चढवीला ॥

थोडी चाहूल कळली सावध उदेबानाला । करी तयार लोकांला ॥

थोडया लोकांसवें तान्हाजी त्यांवर पडला । घाबरा गडकरी केला ॥

रणीं तान्हाजी पडे मावळे पळती बाजूला । सूर्याजी येऊन ठेपला ॥

धीर मोडक्या देई परत नेई सर्वांला । उगवी बंधू सूडाला ॥

उदेबान मारिला बाकिच्या राजपुत्राला । घेतलें सिंहगडाला ॥

गड हाती लागला तान्हाजी बळी घेतला । झालें दुःख शिवाजीला ॥

सिंहगडीं मुख्य केलें धाकटया सुर्याजीला । रुप्याचीं कडीं मावळ्याला ॥

पुरंधर माहूली घेई वरकड किल्ल्याला ॥ पिडा जंजिरी सिद्दयाला ॥

सुरत पुन्हां लुटी मार्गी झाडी मोगलाला । मोगल जेरदस्त केला ॥

कैद करी शिवाजी बाकी उरल्या फौजेला । त्यांमधीं अनेक स्त्रीयाला ॥

सुंदर स्त्रीया परत पाठवी नाहीं भाळला । लाजवी औरंगजीबाला ॥

सरनौबत वीर पाठवी खानदेशाला । शुरु केलें चौथाईला ॥

जलदी मोगल धाडी मोहबतखानाला । देई मोठया फौजेला ॥

औंढापट्टा घेऊन वेढी साल्हेर किल्ल्याला । धिंगाणा दक्षिणेंत केला ॥

गुजर उडी घाली सामना शत्रूचा केला । मोरोबा पठाण पंक्तीला ॥

लढतां पळ काढी दावी भ्याला मोगलाला । जसा खरा मोड झाला ॥

तों मराठे पळती मोगल गर्वानें फुगला । आळसानें ढिला पडला ॥

गुजर संधी पाहून परत मुरडला । चुराडा मोगलाचा केला ॥

बेवीस उमराव पाडले रणभूमीला । नाहीं गणती शिपायांला ॥

लहान मोठे कैदी बाकी सर्व जखम्यांला । पाठवी रायगडाला ॥

मोगल वेढा झोडून मार देत पिटीला । खिदाडी औरंगाबादेला ॥रायगडीं नित्य शिवाजी घेई खबरेला । गोडबोल्या गोवी ममतेला ॥

एकसारखें औषधपाणी देई सर्वांला । निवडलें नाहीं शत्रुला ॥

जखमा बर्याष होतां खुलासा सर्वांचा केला । राहिले ठेवी चाकरीला शिवाजीची कीर्ती चौमुलखीं डंका वाजला ।

शिवाजी धनी आवडला ॥ मोगल यवनी शिपायी सोडी चाकरीला । 

हाजरी देती शिवाजीला ॥ पोर्च्युग्यास धमकी देई मागे खंडणीला ।

बंदरी किल्ला वेढीला ॥ मधींच इंग्रज भ्याला जपे मुंबै किल्ल्याला ।

बनया धर्मा आड झाला ॥ दिल्लीस परत नेलें सुलतान माजूमाला ।

दुजें मोहबतखानाला ॥ उभयतांचा बदली खानजाहान आला ।

मुख्य दक्षणेचा केला ॥ मोगलाला धूर देऊन लुटलें मुलखाला ।

गोवळकुंडीं उगवला ॥ मोठी खंडणी घेई धाकीं धरी निजामाला ।

सुखें मग रायगडीं गेला ॥ मोगलाचे मुलखीं धाडी स्वार लुटायाला ।

लुटलें हुबळी शहराला ॥ समुद्रकांठीं गावें लुटी घेई जाहाजांला ।

केलें खुलें देसाईला ॥ परळी सातारा किल्ले घेई पांडवगडाला ।

आणिक चार किल्ल्यांला ॥

चाल 

हुकूम विजापुरी झाला । सोडिलें बहुत फौजेला ॥

द्यावा त्रास शिवाजीला । घ्यावें त्याचे मुलखाला ॥

शिवाजी सोदी गुजराला । कोंडी आबदुल करीमाला ॥

केला माहग दाण्याला । शत्रु अती जेर केला ॥

आर्जव करणें शिकला । भोंदिलें सैनापतीला ॥

निघून विजापुरीं गेला । क्रोध शिवाजीस आला ॥

रागाऊन लिहिलें पत्राला । निषेधी प्रतापरावाला ॥

गुजर मनांत लाजला । निघून वराडांत गेला ॥

चाल 

आबदुल्यानें । बेशर्म्यानें ॥

फौज घेऊन । आला निघून ॥

रावा प्रताप । झाला संताप ॥

आला घाईनें । गांठी बेतानें ॥

घुसे स्वतानें । लढे त्वेषानें ॥

घेई घालून । गेला मरुन ॥

चाल 

प्रतापराव पडतां मोड फौजेचा झाला । पाठलाग मराठयाचा केला ॥

तोफ गोळया पोटीं दडती भिडती पन्हाळयाला । गेले नाहीं शरण शत्रूला ॥

अकस्मात हंसाजी मोहिता प्रसंगीं आला । हल्ला शत्रूवर केला ॥

गुजर दल मागें फिरुन मारी यवनाला । पळीवलें विजापुराला ॥

शिवाजीनें हंसाजीला सरनौबत केला । मोठा अधिकार दिला ॥

हंबिरराव पद जोडलें त्याच्या नांवाला । शिवाजी मनीं सुखी झाला ॥

सेनापतीचे गुण मागें नाहीं विसरला । पोशी सर्व कुटुंबाला ॥

प्रतापराव-कन्या सून केली आपल्याला । व्याही केलें गुजराला ॥

काशीकर गंगाभट घाली डौल धर्माचा । केला खेळ गारुडयाचा ॥

लुटारु शिवाजी सुटला धाक गृह फौजेचा । खर्च नको दारुगोळीचा ॥

बहुरुपी सोंग तूलदान सोनें घेण्याचा । पवाडा गातो शिवाजीचा ॥

कुळवाडी-भूषण पवाडा गातो भोसल्याचा । छत्रपती शिवाजीचा ॥७॥

चौक ८

विश्वासू चाकर नेमी मुलखीं लुटायाला । शिवाजी कोकणांत गेला ॥

छोटे मोठे गड घेई बांधी नव्या किल्ल्याला । जमाव फौजेचा केला ।

गोवळकुंडीं जाई मागुन घेई तोफांला । फितीवलें कसें निजामाला ॥

करनाटकीं गेला भेटे सावत्र भावाला । वाटणी मागे व्यंकोजीला ॥

लोभीं व्यंकोजी हिस्सा देईना बळासी आला । आशेनें फिरवी पगडीला ॥

बंधू आज्ञा मोडून गर्वानें हट्टीं पेटला । बिर्हाेडीं रागाऊन गेला ॥

शिवाजीला राग आला कोट छातीचा केला । कैदी नाहीं केलें भावाला ॥

तंजोर बाकी ठेवी घेई सर्व मुलखाला । खडा कानाला लावला ॥

दासीपुत्र संताजी बंधु होता शिवाजीला । करनाटकीं मुख्य केला ॥

हंबीरराव सेनापती हाताखालीं दिला । निघाला परत मुलखाला ॥

वाटेमधी लढून घेई बिलरी किल्ल्याला । तेथें ठेवी सुमंताला ॥

शिवाजीचे मागें व्यंकोजीने छापा घातला । घेतलें स्वतां अपेशाला ॥

जेर झाला व्यंकोजी देई उरल्या हिश्याला । शिवाजी रायगडीं गेला ॥

विजापूरचा साह्य नेई राजे शिवाजीला । मोगल मुलखीं सोडला ॥

मुलखीं धिंगाणा धुळीस देश मिळीवला । सोडिलें नाहीं पिराला ॥

वाटेमधीं मोगल गांठी राजे शिवाजीला । घाबरा अतिशय केला ॥

भिडला शिवाजी मोगल मागें हाटीवला । वाट पुढें चालूं लागला ॥

दुसरी फौज आडवी माहाराज राजाला । थोडेसें तोंड दिलें तिजला ॥

काळ्या रात्रीं हळुच सुधरी आडमार्गाला । धूळ नाहीं दिसली शत्रूला ॥

फौजसुद्धां पोंहचला पटा किल्ल्याला । फसिवलें आयदि मोगलाला ॥

विजापूरचा आर्जव करी धाडी थैलीला । आश्रय मागे शिवाजीला ॥

हांबीरराव मदत पाठवी विजापुराला । बरोबर देई फौजेला ॥

नऊ हजार मोंगलांचा पराभव केला । त्यांनीं मार्ग अडीवला ॥

विजापुरीं जाऊन जेर केलें मोंगलाला । केला महाग दाण्याला ॥

शत्रूला पिडा होतां त्रासून वेढा काढला । मोगल भिऊन पळाला ॥

दिल्लीचा परत बोलवी दिलीरखानाला । पाठवी शाहाजाहानाला ॥

जलदी करुन शिवाजी वळवी पुत्राला । लाविला नीट मार्गाला ॥

तह करुन शिवाजी नेती विजापुरला । यवन घेती मसलतीला ॥

शिवाजीचें सोंवळें रुचले नाहीं भावाला । व्यंकोजी मनीं दचकला ॥

निरास मनीं होऊन त्यागी सर्व कामाला । निरा संन्यासी बनला ॥

शिवाजीने पत्र लिहिलें बधुं व्यंकोजीला । लिहितों पत्र अर्थाला ॥

वीरपुत्र म्हणवितां गोसावीअ कसे बनलां । हिरा कां भ्याला कसाला ॥

आपल्या पित्याचा ठसा कसा जलदी वीटला । मळावांचून काटला ॥

कनिष्ठ बंधू माझ्या लाडक्या पाठी साह्याला । तुम्ही कां मजवर रुसला ॥

बोध घ्या तुम्ही माझा लागा प्रजापालनाला । त्यागा ढोंगधतोर्यारला ॥

मन उत्तम कामीं जपा आपल्या फौजेला । संभाळा मुळ आब्रूला ॥

कीर्ति तुझी ऐकूं यावी ध्यास माझ्या मनाला । नित्य जपतों या जपाला ।

कमी पडता तुम्ही कळवा माझ्या लोकांला । सोडा मनच्या आढीला ॥

सुभोधाचें पत्र ऐकता शुद्धीवर आला । व्यंकोजी लागे कामाला ॥

शिवाजीला रायगडीं गुडघी रोग झाला । रोगानें अती जेर केला ॥

त्याचे योगें नष्ट ज्वर फारच खवळला । शिवाजी सोसी दुःखाला ॥

यवनीं बिरास भिडतां नाहीं कुचमला । शिवाजी रोगाला भ्याला ॥

सतत सहा दिवस सोसी ताप दाहाला । नाहीं जरा बरळला ॥

सातव्या दिवशीं शिवाजी करी तयारीला । एकटा पुढें आपण झाला ॥

काळाला हूल देऊन स्वतां गेला स्वर्गाला । पडले सुख यवनाला ॥

कुळवाडी मनीं खचले करती शोकाला । रडून गाती गुणांला ॥

चाल 

महाराज आम्हासीं बोला । धरला कां तुम्ही अबोला ॥

मावळे गडी सोबतीला । शिपाई केले उघडयाला ॥

सोसिलें उन्हातान्हाला । भ्याला नाहीं पाउसाला ॥

डोंगर कंगर फिरलां । यवन जेरीस आणला ॥

लुटलें बहुत देशांला । वाढवी आपुल्या जातीला ॥

लढवी अचाट बुद्धीला । आचंबा भुमीवर केला ॥

बाळगी जरी संपत्तीला । तरी बेताने खर्च केला ॥

वांटणी देई शिपायांला । लोभ द्रव्याचा नाहीं केला ॥

चतुर सावधपणाला । सोडिलें आधीं आळसाला ॥

लहान मोठया पागेला । नाहीं कधीं विसरला ॥

राजा क्षेत्र्यांमध्यें पहिला । नाहीं दुसरा उपमेला ॥

कमी नाहीं कारस्तानीला । हळूच वळवी लोकांला ॥

युक्तीहनें बचवी जीवाला । कधीं भिईना संकटाला ॥

चोरघस्ती घेईअ किल्ल्याला । तसेंच बाकी मुलखांला ॥

पहिला झटे फितुराला । आखेर करी लढाईला ॥

युद्धीं नाहीं विसरला । लावी जीव रयतेला ॥

टळेना रयत सुखाला । बनवी नव्या कायद्याला ॥

दाद घेईअ लहानसानाची । हयगय नव्हती कोणाची ।

आकृती वामनमुर्तीची । बळापेक्षां चपळाईची ॥

सुरेख ठेवण चेहर्या ची । कोंदली मुद्रा गुणरत्नालची ॥

चाल 

भिडस्त भारी । साबडा घरीं ॥ 

प्रिय मधुरी । भाषण करी ॥

मोठा विचारी । वर्चड करी ॥

झटून भारी । कल्याण करी ॥

आपासोयरीं। ठेवी पदरीं ॥

लाडावरी । रागावे भारी ॥

चाल 

इंग्लीश ज्ञान होतां म्हणे मी पुत्र क्षेत्र्याचा । उडवी फट्टा ब्रह्मयाचा ॥

जोतीराव फुल्यानें गाईला पुत क्षुद्राचा । मुख्य धनी पेशव्याचा ॥

जिजीबाईचा बाळ काळ झाला यवनाचा । पवाडा गातो शिवाजीचा ॥

कुळवाडी-भूषण पवाडा गातो भोसल्याचा । छत्रपती शिवाजीचा ॥८॥

शिव जयंती पोवाडा

 शिवदर्शन (पोवाडा) – शाहीर आत्माराम पाटील

(चाल : अलंकार)


अलंकार दिव्य पृथ्वीचा, विश्व मोलाचा,


कीर्ति किरणांचा । संगती सूर्य चंद्रमाचा,


छत्रपति वंद्य हिन्दभूचा । प्राण शिवराया मराठयांचा ॥


इतिहास काळाला गती, देई उगवतीं, ज्याची संस्कृती ।


प्रथमतः लोक स्वराज्याची, अतुल अवनी युगपुरुषाची ।सांगतों जन्मकथा त्याची ॥ ती धन्य वीर माऊली,


वनीं प्रसवली, ’हिन्द भू मौली’, पतिवर असतां रणघाई,


रणीं गर्भाचा भार साही । स्वराज्यमाता जिजाबाई ॥


(चाल : दौड )


त्या शूर जनक जननीचा त्रिलोकी डंका ॥


ज्यांनीं दिला शिवाजी राजा आम्हांला बांका ॥


हा त्रिवार मुजरा करुन हिन्दी लोकां ॥


गातो ’आत्माराम’ इतिहास पवाडा ऐका ॥


बहामनी राज्य मोडले, त्याचं पांच तुकडं जाहलं, नांव त्यांचं एक एक भलं ।


कुतूबशाही ? गोबळकोंडयाची ! बारीदशाही ? बिदर शहराची ! इमादशाही ?


वर्‍हाडी मुलखाची ! आदिलशाही ? विजापूराची ! आणि पांचवी ?


आणि पांचवी निजामशाही ती अहमदनगराची ॥


जिथं चांदबीबी झुंजली महाराष्ट्राची ॥


चाल : अलंकार


हें राज्य अहमदनगर, सुलतान गादीवर, कवळं होतं पोर ।


इसवी सोळाशें सव्वीस साला । कारभारी मलिकंबर मेला ।


शहाजी भोंसला त्राता उरला ॥


(चाल : दौड)


इतक्यांत गिळाया निजामशाही मुलखाला ॥


उलटून आला दिल्लीचा मोंगली हल्ला ॥


जो शहाजीनं एकदां होता चोपला ॥


डिवचला साप वळचणींत होता टपलेला ॥


डाव जुना होता शत्रूचा, मुत्सद्दी भेट नीतिचा ।


संकटी घाला घालण्याचा । शूरवीर शहाजी राजाचा ।


सासरा सख्या नात्याचा । जागीरदार सिंदखेडचा ।


माजी नोकर निजामशाहीचा । त्याचं नांव लखुजी जाधव बाप जिजाईचा ॥


ज्याचं धन, त्याच्यावर मनं ! अशा द्यानतीचा ॥ मोंगलांनीं कारस्थान केलं ।


जाधवाला त्यांनीं फितवलं । ’चोवीस हजार’ मनसुबा केला बहाल ॥


मोठया सरंजामदारीचे डबोलं दिलं ॥ पाहून म्हातारं चुटकन्‌ लाल चावलं ॥


दक्खनचे मीठ विसरलं, जाधव आक्खं घसरलं । शत्रूनं कासरं लावून सासरं बांधलं ॥


सासर्‍यानं जांवई सोडून बंड उचललं ॥ जावयानं सासर्‍यासंगं दंड थोपटलं ॥


चाल : स्फूर्ति


सासरा लखुजी जाधव मिळे मोंगलां ।


जांवई शहाजीराजा त्राता निजामाला ।


दारच्या शत्रुंनीं घरांत दावा लाविला ।


राखाया बाळ निजामाला, शहाजी भोंसला,


पणा लागला, ऐका कवनाला ॥


चाल : वीरश्री


महाराष्ट्राची मुस्लीमगादी वांचविण्यासाठीं ।


हिन्दु-मुस्लीम ऐक्य साधलें ध्येय हें मराठी ॥


शहाजीनं विचार मग केला । घेतलं बाळा निजामाला ।


आणि त्याच्या विधवा मातेला ।


चाल : दौड


घेऊन फौज दरबार त्यानं सोडला ॥


वीर-पत्‍नी बाई जिजाई होती संगतीला ॥


पुढं पति मागं दुश्मन बाप लागला ॥


काय करावं अशा समयाला ?


सुपारीवर आडकित्ता आला !


चाल : वीरश्री


दुजी रुक्मिणी विदर्भाची ती महाराष्ट्रमानी ॥


भ्रष्ट पिता विसरुन पतीसह निघे स्वाभिमानी ॥


चाल : दौड


दर मजल करीत हा सेनासिंधु चालला ॥


चाललं लाव लष्कर बांधूनी ढाला ॥


ठाणें जिल्ह्यांत थेट माहुलीचा किल्ला गांठला ॥


चाल : अलंकार


ठाणें जिल्ह्यात शहापूरवरला, कडेकोट भला, माहुली किल्ला ।


कसारा घाटाच्या डोंगराला । काळा पाषाण आहे मढला ।


निळ्या गगनाला उभा भिडला ॥ शूरवीर शहाजी राजानं,


मांडलं सैन्य, दाणावैरण । दारुगोळा समदा वरती भरला ।


शत्रुचीं मुंडकीं उडविण्याला । ठेवला चौफेर खडा भाला ॥


चाल : रणघाई


आलं, आलं ! आलं मोंगल सैन्य माघारीं आलं धडधडा ॥रं मर्दा॥


घेरलं ! घेरलं रान चौफेरी ! चौफेरी घेरलं गडा ॥


रणशिंग ! रणशिंग वाजे रणभेरी !


रणभेरी तोफा धडाधडा ॥ खणखणती ! खणखणती ढालतलवारी !


तलवारी पट्टा फडफडा ॥


खिंकाळे ! खिंकाळे घोडा लष्करी ! लष्करी दणाणे कडा ॥


लावी सुरुंग शत्रु खालीं । तटावरची आग ये भालीं ।


साथ


त्याचा जिताच भाजून हुरडा झाला खालीं ॥


शत्रुची तटाला शिडी । शिडीसहित ढकलावा गडी ॥


साथ


त्याची उभ्या कडयाच्या दरींत तिरडी गेली ॥


जो शत्रु पायाला भिडला । उकळता पाणी वर पडला ॥


साथ


पाण्याची धार मुडद्याच्या हाडांना चढली ॥


जो शत्रु तटावर चढला । आरपार कंठांतून भाला ॥


साथ


त्याच्या मुंडकं आणि देहाची फाळणी झाली ।


चाल : विजया


आगीचे लोळ किती यावं । थबकावून धूळ विझवावं ॥हे दाजी र॥


किल्ल्याला उलटं फेकावं । रानसिंग शत्रु जाळावं ॥


शत्रुच्या वेढया बाहेर । अंधारांत आमचं हेर ॥


जाळीतनं चंद्र निघणार । शीर छाठून गारोगार ॥


दोन्हींकडून खाऊनी मार । झालं मोंगल जर्जर फार ॥


खालीं वणवा वरती धूर । आंत रणाचा हाहाःकार ॥


चाल : स्फूर्ति


घनघोर चाले संग्राम किल्ल्याच्या भंवतीं ।


तोफांनीं हादरे ठाणें जिल्ह्याची धरती ।


नरमांस खावया गगनीं गिधाडें फिरती ।


सहा महिने चालला लढा, उठेना वेढा, किल्लाहि खडा, झुंजवी छाती ॥


पाहून शहाजीचा जोर, सासरा चोर, मोंगल सरदार, लखुजी जाधव गार झाला ।


लढाई करण्याचा जोम सरला । कपटाचा खेळ सुरु झाला ॥


चाल : हळहळ


जाधवानं डाव फिरविला ॥जी॥


भेटे निजामाच्या आईला ॥जी॥


लाघवी बोल बोलला ॥जी॥


"बाईसाहेब ! कां सोसतां यातना जीवाला ?


करा तह मिळा मोंगलां । तुम्ही अहमदनगरला चला,


देतों राज्य तुमचं तुम्हांला । मी रहातों तुमच्या दिमतीला ।


माझा शब्द लाखाच्या मोला । हा स्वार्थि शहाजी भोंसला ॥जी॥


तो गिळील तुमच्या मुलखाला ॥जी॥


त्याचा काळा डाव साधण्याला ॥जी॥


तुमच्या आमच्यांत तंटा लावला ॥जी॥


फंसूं नका ! फंसूं नका, अशा प्रसंगाला ! सावधान !


देतों इशार्‍याला !" अशी ऐकून बात, काय सांगूं मर्दा मात,


भोळी बायांची जात । पाघळून देई हात लखुजीला ॥ जी॥


परक्यांचा शब्द ऐकला, टोचून बोले घरच्याला । तिचा शब्द विषारी आला,


झोंबला शहाजी राजाला । झाली फितूर शत्रूला बाई, धन्याची आई,


बघा धन्यापायीं । शहाजी, दुष्मनाशीं लढला । धनीच तो शत्रुस वश झाला ।इमानाची दुनिया नाहीं बोला ॥ माहूली डोंगरी किल्ला ।


घनदाट रान भंवताला । रणरंग भंग जाहला ।


किल्ल्याभंवतीं लढाई, तटावर हातघाई, आंत होती जिजाबाई ।


सात महिनं गेलं होतं तिला ॥जी॥


गरोदर जिजाबाईला । जरि सातवा महिना चालला ।


तरी दगड, माती, चिंचा खा नव्हता असा डोहाळा ॥जी॥


ऐका हो, डोहाळं कसं जिजाबाईला ॥


चाल : दामिनी


बुरजावर झुंजे भरतार, तिरकमठं चालवी नार ॥


चिलखतं तंग अंगाला, कुठं बत्ति देई तोफेला ॥


धुमधडाम धूर गगनाला, त्या धुरांत चमके चपला ॥


आईची माया घायाळा, दे स्फूर्ति लढणार्‍याला ॥


चाल : वीरश्री


मूर्तिमंत ती समर वीरश्री चेतविते किल्ला ।


मुक्ति रणाचे शौर्य डोहाळे तिथें जिजाईला ॥


मातृगुणांची कूस घडविते उदरीं बाळाला ।


स्वराज्यकर्ता रणमर्दिनीच्या कुशींत गुण शिकला ॥


चाल : चिंता


फितुरीनं केला घात, राजावर शत्रुचा दांत ॥


आलं मरण उद्यांच्या आंत । कशी टळत आजची रात ॥


झालीं दोघं चिंताक्रांत । सटकायचा केला बेत ॥


चाल : समता


सटकायचा बेत जरी केला शहाजी राजानं ।


तरी इतिहासकार होतं वीरांचं ध्यान ।


थांबतां इथं किल्ल्यांत निकामी मरण ।


पण फरार होतां म्हणतील बेईमान ॥


बेईमान ॥ सांकडं सोडवायला, राजानं मार्ग काढला,


आपुल्या सख्या भावाला ॥ शरभोजी भोंसला याला,


हा प्रसंग समजाविला । भावानं हात पुढं केला,


लक्ष्मण बोले रामाला । तुम्ही खुशाल लागा वाटेला,


ही स्वामिनिष्ठेची तुला, भारोभार पुरी करण्याला ।


वाहीन प्राण आपुला ।


चाल : दौड


बोलतां दोन्ही भावांचा गहिंवरे गळा ॥


शरभोजी राही किल्ल्यांत स्वामिनिष्ठेला ॥


आगींत एक; फोफाटा नेई दुसर्‍याला ॥


माउली जिजाबाईला, एक बाळ पहिला चिमुकला,


होता चार वर्षांचा झाला । नांव होतं संभाजी त्याला !


तोही छावा संगं घेतला, निवडक वीर जोडीला ।


तलवार, भालं हातांत ! पाठीला ढाला ॥


एक त्यांत वायुवेगाचा वारु निवडीला ॥


जाहली जिजाई स्वार घोडा नाचला ॥


अन् समद्या वीरांनीं लगाम तंग ओढला ॥


फुरफुरलं घोडं ! दरवाजा जरा करकरला ॥


चाल : अलंकार


रणधीर शहाजी राजानं, केलं उड्डाण, रात्र भिणभिणं ।


वेढा फोडून घोडा सुटला । टापांच्या विजेत मार्ग दिसला ।


आडवा फिरला तो उभा चिरला ॥ भरधांव वारुवर स्वार ।


जिजाबाई शूर, कटीं तलवार । रिकिबींत पाय लगाम हातीं ।


हिन्दस्वराज्याचा ठेवा पोटीं । घेऊन दौडली सांबशक्ति ॥


घोडयांनीं तुडविती अंगा, शत्रु झाला जागा, जो तो करी त्रागा ।


’पकडो रे दौडो शहाजी भागा ।’ लेक-जांवई गेल्या मागा ।


सासरा लागला पाठलागा ॥


चाल : दौड


धडधडा शहाजी राजा पुढें चालला ॥


विजापूरच्या आदिलशहाची साथ घेण्याला ॥


माहुली विजापूर पल्ला । तीनशें मैल तो भला ।


दिसरात नाहीं पाहिलं ! मार्ग तुडविला ॥


महाराष्ट्र-धरणीचा रोमरोम शहराला ॥


तरुकडी कपारीनं आड पहारा दिला ॥


तितक्यांत आडवाटेनं पल्ला काटला ॥


पण घरचा बगळा पांढरा उडतो गगनाला ॥


त्याला हेरुन मोंगल सेनेनं माग काढिला ॥


चाल : वीरश्री


पुढं चालला महाराष्ट्राचा शहाजी रणधीर ।


मागं लागली मोंगलसेना प्रचंड दळभार ॥


पतीसवें ती फेकीत घोडा जिजाई गर्भवती ।


दौडत होती फर्लांग मारीत सह्याद्रीवरती ॥


घौडदौड शिकविली बाळाला आईनें उदरीं ।


अश्वपाळणा झोकित होती शौर्याची दोरी ॥


चाल : स्फूर्ति


लागला पाठीला क्रूर शत्रु सेनानी । पुढें उभे दरी डोंगर उतरणी ।त्या ओलांडीत दौडली राष्ट्रनंदिनी । रखरखीत उन्हाच्या झळा,


नाहीं सवड पाणी पिण्याला । किती दगड धोंडा तुडवीला ।


दौडली मैल शंभर, दुखावे उदर, थांबले वीर, खुल्या मैदानीं ॥


चाल : गजगामिनी


बाईचा अश्व थांबला कांस कंठाला, श्वास कोंडला, आली अंधारी ॥


डबडबला घाम अंगाला, जोम संपला, लगामहि सुटला, राजा सांवरी ॥


पाठीस शत्रुचें दळ, उडवितें धूळ, भरलें आभाळ, पाही माघारी ॥


पोटास गर्भाची कळ । चालवेना एक पाऊल । झाली जिजाबाई व्याकुळ ।


जर भिडला शत्रु येऊन, अटळ त्यातून, पतीचें मरण, आठवे नारी ॥


काळजाचें पाणी झालें । डोळ्यांचे इंगळ बनले । धगधगते अश्रु गळले ।


चाल : वीरश्री


क्रोध अनावर वीरांगनेची थरथरते काया ।


तप्ताश्रूंत दाखवीते पतीला गर्भाची माया ॥


ती महाराष्ट्र रागिणी, हा कठिण समय देखुनी ।


बोलली वीराला रमणी ।


चाल : स्वयंसिद्धा


तुम्ही चला पुढें प्रिय नाथा । सोडून पंथिं मज आतां ॥


सौभाग्य वांचवा माझें । वांचवा महाराष्ट्राचें ॥


ग्रासाया येती काळ । चुकवा हो चुकवा वेळ ॥


चाल : मौलिक


ते जिजाबाईचे बोल । मोलाचे, मोलाचे ॥


संकटांत सेनानीच्या । तोलाचे, तोलाचे ॥राखती तिथें अवधान । राजाचें, राजाचें ॥


चाल : अलंकार


राजाला सुचला विचार । जवळ एक शहर,होतं जुन्नर ।


तिथं एक होता मित्र दिलदार । नांव श्रीनिवासराव सरदार ।


स्वतंत्र होता मुलूख परिवार ॥ मित्राला हवाला दिला ।


जवळ आहे भला । शिवनेरी किल्ला । उंच कडणीच्या डोंगराला ।


किल्ल्यांत ठेवलं जिजाईला । धन्य तो मित्र तैनातीला ॥


चाल : समता


सोबती ठेविला बाळकृष्ण हणमंत ।


सोनाजीपंत नी शामराव नीलकंठ ।


रघुनाथराव बल्लाळ मर्द गुणवंत ।


सैनिक पांच पंधरा धीराला देत ॥


गर्भार अस्तुरी ठेवुन शिवनेरींत ।


गांठणें विजापूर केला पुढचा बेत ॥


परि वियोग दुःखें व्याकुळ बनले चित्त ।


अन प्राण उभे राहिले चार डोळ्यांत, चार डोळ्यांत ॥


चाल : वीरांगना


त्या मरणाच्या मार्गांत । जिवनाचे निरोप झाले ॥


संभाजी सवे घेऊन । राजश्री स्वार निघाले ॥


दाटला कंठ बाईचा । अश्रूंतून शब्द उमटले ॥


’सांभाळून जाहो नाथा । भेटूं किं न भेटूं आतां ।


तारील भवानी माता ॥’ ते दोन जिवांचे बोल ।


तिसर्‍या हृदयाला पटले ॥ धरणींत बीज अंकुरतां ।


अभ्रानें सूर्या गिळलें ॥ लतिकेला फळ जों धरलें ।


वृक्षावर वादळ आलें ॥ तें स्वराज्य गर्भी असतां ।


पारतंत्र्य भंवतीं फिरलें ॥ तोडाया त्याचा पेंच ।


सोसून दुःखाची आंच । घोडयास मारिली टांच ।


तोडून बेडी मोहाची । कर्तव्य फरारी झालें ॥


चाल : अलंकार


गेले सोडून शहाजीराजे, तडफ ऐसाजे, विजापूर मौजे ।


राजाची नव्हती पाठ फिरली । तोंच मागं मोंगल फौज आली ।


जुन्नर गांवाची जिद्द कळली ॥


चाल : छक्कड


सासर्‍याच्या हातावर तुरी, दिल्या शिवनेरी, ठेवुन अस्तुरी, फरार जांवई ।


हे कळलं सासरोबाला । लखू जाधवाला । चेहरा उतरला, देतो जांभई ॥


रग जिरली पाठलागाची । वैरी बापाची, आतां लेकीची आठवण झाली ।


भेटाया जिजाबाईला । किल्ल्यावर गेला । पाहून पोरीला । आंसवं आलीं ॥


त्या उंच डोंगरी गडांत, तटाच्या फडांत जिजाई होती ।


किल्ल्यांत नव्हे म्यानांत रक्त समशेर कोंबली होती ॥


पाहून तिथें लेकीला, उमाळा आला, पुढें जाण्याला, पाय लटपटती ।


जरि पोटीं मायेची ओढ, काळं थोबाडं, थांबलं घुबडं, देखतां ज्योती ॥


ती खंबीरतेची गंभीर मुद्रा खोंचक भेदक दृष्ठी ।


जणुं व्याधासाठीं जखमी वाघीण जाळींत टपली होती ॥


थरथरे बापाची काया । उफाळे माया, हांक माराया, फुटेना कंठ ।


ती स्वाभिमानी नंदिनी, पिता पाहुनी, संतोषे मनीं, झाली आरक्त ॥


ती पतिविरहाची विव्हल संध्या सु-रक्तलोचन दिसली ।


अन् गर्भित रविची अरुण गुलाली मिश्रित विलसे गालीं ॥


बापाला हुंदका आला, अनावर झाला, बोले लेकीला, शब्द अडखळले ।


बोलतां कंप कंठांत, कंप ओठांत । अश्रु नयनांत । मायेचे भरले ॥


(लखुजी जाधव---) जीजाऊ ! बाळ गुणवंती । धन्य तूं सती, फिरली माझी मती,


कष्ट तुज पडले । युद्धाचा कैफ विषारी, जाहलों वैरी, क्रोध आवरीं, क्षमा कर बाळे ॥


मी पिता निर्दयी क्रूर । विसरुनी पोर, शत्रूचें घर, स्वहस्तें भरलें ।


तूं पतिपितयांचें कूळ । केलें उज्ज्वल, मीच चांडाळ क्षमा कर बाळे ॥


तूं गर्भवती अति कोमलं माझ्या वनांतली कर्दळी गे ।


परी मीच तुला गांजिलें हाय ! परचक्राच्या वादळी ॥ क्षमा कर बाळे ॥


तूं सिंहीण महाराष्ट्राची व्याकुळ उदरीं प्रसूति कळ गे ।


मी तुझ्याभोंवती सह्यवनाला झालों वडवानळ ॥


क्षमा कर बाळे ॥ गे तुझ्या अर्धवचनांत ठेविल्या अनंत सजणी दासी गे ।


पण मीच आज डोंगरीं गडावर केलें तुज वनवासी ॥क्षमा०॥


तूं चंद्र-कलेंतील सुहास्य शालीन चंद्रमुखी कामिनी गे ।


परि आ गमे संतप्त मेघलक्तरांत सौदामिनी ॥क्षमा०॥


तूं मखमाली गादी गिर्द्यांची लाडीक राजस युवती गे ।


परि गगनाखालीं इथें मोकळ्या भेसूर दगडी भिंती ॥क्षमा०॥


चल नेतो तुला माहेरीं, ऊठ लवकरीं, लाडक्या पोरी, नको रागाऊं ।


बापानें केला अपराध, घेईं पदरात, बोल एक शब्द, बाळ जीजाऊ ॥


या शिवनेरी किल्ल्यांत, घोर रानांत, भरल्या महिन्यांत, नको तूं राहूं ।


माहेरीं आईची माया, रोप निपजाया, निंबाची छाया, बाळ जीजाऊ ॥


(पडद्या आडून शाहीर गात आहे---)


चाल : कोंकवती


अजुनी नव्हता शब्द निघाला जिजाबाईच्या वदनीं । हो॥


तप्त गालावर वितळत होतें काळीज गंगा-जमुनी ।हो॥


असह्य आतां दोन लोचनां अलोट माया पाणी ।हो॥


थरथरल्या अधरांची झांपण खुलली उसळे वाणी ।हो॥


घेतली दोन्हीं तळ हातांवर तलवार । टाकलीं पाऊलें पित्यासमोर चार ।


ठाकली उभी नजरेस भिडवुनी नजर । सद्गदित निघाले तीव्र शब्द झणकार ॥


(जिजाबाई म्हणते----)


चाल : मानिनी


जें सौभाग्यावर उठले । तें माहेर माझें तुटलें ॥


तुम्हीं चंद्र सूर्य अरि बनले । देशावर नभ कोसळलें ॥


तुम्हीं रण परकारण धरलें । रामावर भार्गव उठले ॥


हे तात ! मागणे उरलें । द्या मरण पतीच्या पहिलें ॥


घ्या खङग हातीं हे उभी पुढें मी लेक । महाराष्ट्र-ब्रिदाच्या अभिमानाची नेक ।


ही गर्दन झुकली वार करा बस एक । कीं सासर माहेर फिटलें ।


धड ठेवा शीर न्या अपुले ॥ जें सौभाग्य०॥


जा तरि, ना गळसरीवरची ॥ चुकवून तलवार पित्याची ॥


उरली सहचारीण पतीची । पण मेली कन्या तुमची ॥


वनवासी वनराजाची । मी वनराणी वनीं राजी ॥


मी राष्ट्रोद्धारक मराठमोळं कलत्र । स्वातंत्र्य आमुचें अमोल मंगलसूत्र ।


मत्प्राणपति नि सत्‍पुत्र सकल गणगोत्र । देशाला अर्पण केलें ।


तुम्हीं देशद्रोही बनले ॥ जें सौभाग्या०॥गड माझा श्रीशिवनेर । हें मायेचें माहेर ॥अंगण महाराष्ट्र समोर । वृंदावन गिरि कांतार ॥


हें कृष्णशिलासन सदर । पुष्पलता भरतील पदर ॥


चांदण्या झुंबरें रातकिडे स्वरकिन्नर । ही आई शिवाई देवी करील सुयेर ।


या कडणी शमवतील प्रसवकळांचे सूर । हें स्वराज्य मन्मनीं भरलें ।


डोहाळे यांतच पुरलें ॥ जें सौभाग्या०॥


या फुलत्या वनवेलीचा । आईला निरोप सांगा ॥


तुटलें मूळ माहेराचें । नको शिंपूं अश्रू गंगा ॥


दे वर अमृतवाणीचा । या रणरंगांतील भांगा ।


या पुढें न वदणें ! तात ! वंदितें चरणें । बोललें वेंचणें कीं गृहकंदन करणें ।


पण तुटल्या वेलीस तिच्या तरुवर मरणें। द्या सौख्य हेच शेवटलें ।


जा उतरा गड जो चढले ॥जे०॥


(जिजाऊ एका बाजूनें व खिन्न पावलानें लखूजी दुसर्‍या बाजूनें जातात---पुढें शाहिराचा पोवाडा सुरु---)


चाल : कोंकवंती


नच शब्द टाकिला पुन्हां पित्यानें ! टाकित जड पाउलें ।


उतरले, लखुजी गड उतरले ॥ नच वळून पाहिलें पुन्हां बिजलीनें !


गगन किती फाटलें । तेज तें शिवनेरींत बिंबलें ।


ती दगड कडी गडवाट वांकडी तिनें हुंदके दिले ।


उतरले, लखुजी गड उतरले ॥ वर कठोरता कर्तव्य देवता शोकाकुल तळमळे ।


तेंज तें शिवनेरींत बिंबलें ॥ त्या शिवनेरीच्या कढणीवरुनी पारतंत्र्य घसरलें ।


उतरले, लखुजी गड उतरले ॥ वर ’पूर्णमास’ वेदना सोसुनी स्वातंत्र्य जन्मलें ।


तेंज तें ब्रह्मांडी फांकलें ॥


साथ : टाहोचा आवाज


टाहो फोडतां शिवनेर, गगनामाजीं घुमला सूर ।


विश्वांत झाला चमत्कार । सांगतो ’आत्मा’ शाहीर ।


ऐका सारे नारीनर । गगन निळें हें गार ।


ग्रह तारे खालींवर । मध्यभागीं सूर्य स्थिर ।


धरणीपति परमेश्वर । धरणी आमुची गोलाकार ।


भंवर्‍यावाणी गर्र गर्र गर्र । गिरक्या मारीत चक्राकार ।


पति सभोती फिरते नार । एका गिरकींत आठ प्रहर ।


आठ प्रहरांचा एक वार । तीनशें साठ गिरकींत पार ।


प्रदक्षिणेचा एक घेर । खेळ मेनका-विश्वामित्र, चालला असे अधांतर ।


अनादि अंत निरंतर । एका गिरकींत चमत्कार । पाही स्थिर प्रभाकर ।


गिरकी होती पाठ म्होरं । दिसत होता छानदार; कपोलाचा अरुण मोहोर ।


तोंच घडला प्रकार । शके १५४९ शुभंकर, प्रभव नाम संवत्सर, वैशाख शु.१ वासर ।


उत्तररात्र गुरुवार, अश्विन नामें नक्षत्र ६ एप्रिल दिनक्षर, १६२७ सुंदर ।


असतां सालमजकूर, दिव्यध्वज फडकणार, घेऊन पृथ्वीनें खांद्यावर ।


गिरकी मारली पूर्णाकार, पति सन्मुख ती आली नार । ध्वज पाहतां झोकदार ।


नेत्रीं दीपला प्रभाकर । सूर्य विचारी धरणीला, पति अपुल्या भार्येला,


सांग प्रिये सांग मला । दीपववीता माझा डोळा, तळपणारा अंतराळा,


झांक देवा ब्रह्मांडाला । दिव्य झेंडा ऐसा भला, काल नव्हता देखियेला,


आज कैसा गे आणिला ॥ कशी गमे स्त्री जातीला ?


एका गिरकीत एक कला । सांग प्रिये सांग मला ॥


मुक्त छंद


धरणी सांगे सूर्याला । ऐका नाथा सांगता हे ।


मंगळसूत्र तुमचें मला निसर्गानें दिलें आहे ॥ध्रु०॥


भूगोलाची हिरवी साडी । श्यामलांगी ल्यालें आहे ।


रामकृष्ण पैगंबर, येशू बुद्ध यांनीं वर, अबदागीर धरलें आहे ॥धरणी०॥


स्त्री जातीचा जीव सारा । दागिन्यांत अडला आहे ।


इतिहास सोनारानें एकेक नग घडला आहे ॥धरणी०॥


कोलंबस कमरपट्टा । तंग अंगी जडला आहे ।


अलेक्झांडर--सिकंदर वज्रचुडा मढला आहे ॥धरणी०॥


अकबर आणि चंद्रगुप्त । चंद्राहार चढला आहे ।


नेपोलियन सोनाराच्या । अलमारींत पडल आहे ॥धरणी० ॥ जगभर थाट आहे । राजपाट अर्थ आहे ।


परि जेथें समता नाहीं । तेथें सारें व्यर्थ आहे ॥धरणी ०॥


वारुळाचा साप सम्राट मोठा असून खोटा आहे ।


स्वराज्याचा छत्रपति छोटा असून मोठा आहे ॥धरणी ०॥


सम्राटांच्या शृंगारांना गुलामींत विटलें आहे ।


स्वराज्याचा झेंडा आज हातीं घेऊन उठलें आहे ॥धरणी ०॥


तुम्हीं म्हणाल, "वसुंधरे, तुझें सारे खोटें आहे" ।


डोकावून पहा नाथा, शिवनेरींत बेटें आहे ॥धरणी०॥


जिजाईच्या कुशीमाजीं शहाजीचा बंडा आहे ।


भारताचा शिवाजी या वसुधेचा झेंडा आहे ॥धरणी ०॥


आजपासून रायाभंवतीं झेंडयावांचून फिरणार नाहीं ।


शास्त्रज्ञांना झेंडा माझा कवि वाचून कळणार नाहीं ॥धरणी० ॥


काय म्हणतां प्रिये थांब ! इश्श ! मला वेल नाहीं ।


शिवनेरीला टाहो फुटला साधासुधा खेळ नाहीं ॥धरणी० ॥


(टाहोचा आवाज--पुढें पोवाडा)


फुटला टाहो शिवनेरीला हिंद-स्वराज्याचा ।


पश्चिमेसही प्रकाश पडला प्रदीप्त पूर्वेचा ॥


शिवनेरीच्या माळ्यावरुनी शेत राखणीचा ।


सुटला धोंडा भिरभिरता त्या सह्य गोफणीचा ॥


धन्य माउली जिजाई ॥ दुनियेला साम्राज्य लांडगे असतां भंवतालीं ।


मराठी जाळींत जिजाई सिंहीण स्वराज्यास व्याली ॥युगपुरुषाच्या जगजननीचे फिटतील का पांग ।


हिन्द देवीनें हिमाद्रि वरुनी दिली जरी बांग ॥


फुटतां टाहो शिवनेरींत, ऐकतां सख्याचा साद,


संवंगडी आलं दुनियेंत । तानाजी उठवी उमराठं,


खाई पासलकर कोलांट, डोकावला हिरोजी फर्जंद ।


नेताजी बाजी दणकट, जिव्या महाल्या वळवी मूठ,


दिला फिरंगोजीनं नेट । आलं बहिर्जीचं सोंगाट ।


कुठं येसाजीचा गोंगाट । कुठं रामजन्म पावत !


कुठं झाला अंजनी सुत ! कुणी भालदार पुढं येत ।


कुणी हडपी माघं धांवत । एकदांच फुलवूं महाराष्ट्र ।


होता सगळ्या आयांचा बेत । वटवृक्षावाणी महाराष्ट्र ।


फांदोफांदीं पाळणा फुटं । केली रानमातीची तीट ।


पंचगंगांना चिरगूट । सूर्यासंगें किरणें यावीं धरणी दिपवीत ।


शिवबासंगें तसे जन्मले महाराष्ट्र दूत ॥


चाल : अलंकार


शिवनेरीं बाळ जन्मलें । विजापुरीं कळलें ।


राजे तोषले । कंठा अर्पिला जासूदाला ।


हात जोडिले भवानीला । सोहळा चाले शिवनेरीला ॥


आवतनं केलं मुलखाला, मांडला जन्म सोहाळा,


नरनारी जमला मावळा । आनंदी आनंद झाला,


पूजिलें शिवाई मातेला, वंदिलें सूर्य देवाला ।


प्रार्थिलें हिन्द देशाला, उद कापराच्या गंधाला ।


सह्याद्रि लुब्ध जाहला, साजणी सुवासिनीला ।


वायणं वाटलीं सर्वांल । बाळतिणीसंगें बाळराज भूषविला ।


सजवितां पाळणा जिजाईंनीं गाईला । शाहीर ’आत्माराम’ तोच गातो आजला ।


ऐका हो आयाबायांनों, मराठमोळ्यांनो, भारतीयांनो झोंका घातला ॥