दिवस संपतात
don divas marathi kavita
दोन दिवस वाट पाहण्यात गेले, दोन दुःखात गेले
हिशोब करतो आहे आता किती राहिलेत डोईवर उन्हाळे
शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली
भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली
हे हात माझे सर्वस्व, दारिद्र्याकडे गहाणच राहिले
कधी माना उंचावलेले, कधी कलम झालेले पाहिले
हरघडी अश्रू वाळविले नाहीत; पण असेही क्षण आले
तेव्हा अश्रूच मित्र होऊन साहाय्यास धावून आले
दुनियेचा विचार हरघडी केला अगा जगमय झालो
दुःख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे, याच शाळेत शिकलो
झोतभट्टीत शेकावे पोलाद तसे आयुष्य छान शेकले
दोन दिवस वाट पाहण्यात गेले दोन दुःखात गेले।
- नारायण सुर्वे
राजमाता जिजाऊ
छञपती शिवाजी महाराज
छञपती शिवाजी महाराज म्हणजे काय ?
लाकडाचा शिवाजी बनवल्यावर त्याचा मान जातो सुताराला
सोन्याचा शिवाजी बनवल्यावर त्याचा मान जातो सोनाराला
मातीचा शिवाजी बनवल्यावर मान जातो कुंभाराला.
अरे पण शिवाजी या नावाची तीन अक्षरे उलटी केल्यावर
असे समजते कि
जो जिवाशी खेळतो तो शिवाजी...
जय भवानी..जय शिवाजी
जय महाराष्ट्र.
don fulapakhare premat padali hoti
दोन फुलपाखरे प्रेमात पडली होती...एके दिवशी ते लपा-छपि खेळत होते, खेळताना .......
मुलगा फुलपाखरू :- चल एक छोटासा नवीन खेळ आपल्या दोघांच्यात ....
मुलगी फुलपाखरू :- हो चालेल !!
मुलगा फुलपाखरू :- आपल्या दोघांमध्ये, सकाळी सकाळी ह्या समोरच्या फुला मध्ये जो सर्वात प्रथम बसलेला असेल तो दुसऱ्या पेक्षा जास्त प्रेम करतो ....
मुलगी फुलपाखरू :- हो चालेल !!
दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी, मुलगा फुलपाखरू त्या फुलाच्या जवळ येऊन उभा राहिला आणि ते फुल उमलण्याची वाट पाहू लागला जेणेकरून तो तिच्या आधी त्या फुलामध्ये बसेल आणि तिला दाखवून देईल कि त्याचे तिच्यावर खूप खूप प्रेम आहे ....
थोड्याच वेळात फुल उमलले ........ पाहतो तर काय ????????????
.
.
.
.
ती मुलगी फुलपाखरू त्या उमलेल्या फुला मध्ये मरून पडली होती ........ कारण, रात्रभर ती त्या फुला मधेच राहिली होती फक्त ह्या वेड्या अपेक्षेने कि सकाळ होताच आणि ते फुल उमलताच ती त्या मुलगा फुलपाखरू कडे आनंदाने झेप घेईल आणि त्याला दाखवून देईल कि ती त्याच्यावर जीवापाड प्रेम करते ते ..........
मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा
मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा
प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा
राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा
नाजुक देशा, कोमल देशा, फुलांच्याहि देशा
अंजन कांचन करवंदीच्या काटेरी देशा
बकुलफुलांच्या प्राजक्तीच्या दळदारी देशा
भावभक्तिच्या देशा आणिक बुद्धीच्या देशा
शाहीरांच्या देशा कर्त्या मर्दांच्या देशा
ध्येय जे तुझ्या अंतरी, निशाणावरी, नाचते करी;
जोडी इह पर लोकांसी, व्यवहारा परमार्थासी,
वैभवासि, वैराग्यासी
जरिपटक्यासह भगव्या झेंड्याच्या एकचि देशा
प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा ॥१॥
अपार सिंधुच्या भव्य बांधवा, महाराष्ट्र देशा
सह्याद्रीच्या सख्या, जिवलगा, महाराष्ट्र देशा
पाषाणाच्या देही वरिसी तू हिरव्या वेषा
गोदा, कृष्णा, भीमा तुझिया ललाटिंच्या रेषा
तुझिया देही करी प्रतिष्ठा प्रथम प्राणांची
मंगल वसती जनस्थानिंची श्रीरघुनाथांची
ध्येय जे तुझ्या अंतरी….. ॥२॥
एक मैत्रीण
'ती ' नसताना असण्याचा आभास
चिंब पावसात भीजतांनाच ते आकाश,
'ती ' नसताना असण्याचा आभास,
मोहरून सोडतो तो स्वप्नांचा सहवास,
अरुंद वाटांवरून एकत्र केलेला तो प्रवास,
तिच्या मिठीतील तो हवा असणारा स्पर्श,
थोडा वेळ का असेंना विसरवून टाकतो
जीवनाशी केलेला प्रत्येक संघर्ष,
तीचं ते लाजनं आणि लाजून गालात हसनं,
गालांमधील खळी आणि ओठांवरील हास्य,
नेहमीच कायम ठेवतं तिच्या मनातील रहस्य,
'ती" आत्ता येईल ही नेहमीचीच आस,
'ती' आली की मिठीत
घेऊन घेतलेला दीर्घ श्वास,
'ती' जवळ नसतानचा तिच्या आठवणींचा
प्रत्येक क्षण असतो खास
त्यामुळेच माझे जगणे झाले आहे
फक्त तिच्या साठी खास.....
प्रेम
प्रेम Prem(Love)
एका गावात एक मुलगी राहात असते. तिला चार मित्र असतात.
त्यापैकी चौथ्या मित्रावर ती जिवापाड प्रेम करत असते. त्याला ती नेहमी
मोठमोठ्या भेटवस्तू देत असते. जगातली सर्वांत महत्त्वाची गोष्ट त्याला मिळायला
हवी, असा तिचा कटाक्ष असे.
त्या खालोखाल तिसऱ्या मित्रावरही ती प्रेम करत असते. त्याला ती नेहमी शेजारची
राज्ये दाखवत असते; मात्र, ते बघून तो आपल्याला कधीतरी सोडून जाईल अशी भीती
तिच्या मनात नेहमीच असते.
दुसऱ्या मित्रावरही ती प्रेम करत असते. त्याचा आत्मविश्वास वाखाणण्यासारखा
असतो. मनाने तो खूप प्रेमळ, दयाळू आणि संयमी असतो. तो तिला नेहमी समजून घेत
असतो. ती जेव्हा कधी संकटात सापडते, काही समस्या तिला भेडसावतात; तेव्हा तेव्हा
ती आपले मन त्याच्याकडे मोकळे करते. तोही तिला समजून घेतो, त्यातून बाहेर
पडण्याचा मार्ग सांगतो.
तिचा पहिला मित्र अतिशय निष्ठावान असतो. तिची संपत्ती, तिची मालमत्ता राखण्यात
त्याचा मोठा सहभाग असतो. तरीही, तिला तो फारसा आवडत नसतो. तो मात्र तिच्यावर
खूप मनापासून प्रेम करत असतो. ती क्वचितच त्याची दखल घेत असते.
एक दिवस ती मुलगी आजारी पडते. उपचारांचाही काही परिणाम होत नाही. आपल्याकडे खूप
कमी वेळ आहे, हे तिच्या लक्षात येते. तिच्या मनात विचार येतो, ""माझ्याकडे
भरपूर संपत्ती आहे. माझे जिवाभावाचे चार मित्र आहेत; पण जेव्हा माझा मृत्यू
होईल, तेव्हा मी एकटीच असेन.'' या विचारांनी ती अस्वस्थ होते.
ती आपल्या सर्वांत आवडत्या चौथ्या मित्राला म्हणते, ""मी तुझ्यावर सर्वाधिक
प्रेम केले. जगातल्या सर्वांत मौल्यवान भेटी मी तुला सतत दिल्या. तुझी खूप
काळजी घेतली. आता माझा अंतकाळ जवळ आला आहे. तू माझ्याबरोबर येशील ना? माझी साथ
करशील ना?''
""अजिबात नाही,'' असे म्हणून आणखी काहीही न बोलता तो मित्र निघून जातो.
त्याचे हे बोलणे तिचे काळीज चिरत जाते.
त्यानंतर ती मुलगी तिसऱ्या मित्राकडे येते. ""आयुष्यभर मी तुझ्यावर प्रेम केले.
आता मी काही दिवसांचीच सोबती आहे. तू माझ्याबरोबर येशील ना?''
तिच्या या बोलण्यावर तो थंडपणे "नाही' म्हणतो. ""जीवन खूप सुंदर आहे. तू
गेल्यानंतर मी दुसऱ्या मुलीबरोबर लग्न करीन.''
त्याच्या या बोलण्यावर ती निराश होते.
आपली निराशा लपवत ती दुसऱ्या मित्राकडे येते. ""मी नेहमीच तुझ्याकडे मदतीच्या
अपेक्षेने येते. तूही मला मदत करतोस. माझ्या सुख-दुःखात सहभागी होतोस. यावेळीही
तसाच वागशील ना? येशील ना माझ्याबरोबर?''
""मी तुझ्याबरोबर जास्तीत जास्त दफनभूमीपर्यंत येऊ शकेन. त्यापुढे नाही.''
त्याच्या या उत्तराने ती मुलगी पुरती कोलमडून जाते. काय करावे तिला कळत नाही.
.. तेवढ्यात एक आवाज येतो, ""मी येईन तुझ्याबरोबर. तू जिथे जाशील, तिथे मी
येईन.''
ती मुलगी आवाजाच्या दिशेने बघते, तर समोर तिचा पहिला मित्र असतो.. पोषणाअभावी,
दुर्लक्षामुळे खूप अशक्त झालेला.
मुलगी म्हणते, ""मी खरेतर तुझी खूप काळजी घ्यायला हवी होती; पण आता वेळ निघून
गेली आहे.''
वास्तवातही, या मुलीप्रमाणे आपलेही चार मित्र असतात.
आपला चौथा मित्र म्हणजे शरीर. त्याचे आपण कितीही कौतुक केले, कितीही चोचले
पुरवले, तरीही मरणाच्या वेळी ते आपले साथ सोडते. आपला तिसरा मित्र म्हणजे, आपली
मालमत्ता, संपत्ती, आपली पत- प्रतिष्ठा. आपल्या मरणानंतर हे सगळे आपोआप
दुसऱ्याचे होते. दुसरा मित्र म्हणजे, आपले कुटुंबीय आणि मित्रपरिवार. ते आपल्या
कितीही जवळचे असले, तरी आपली सोबत ते जास्तीत जास्त दफनभूमीपर्यंतच करू शकतात.
आणि पहिला मित्र म्हणजे कोण? ........
... पहिला मित्र म्हणजे आपला 'अंतरात्मा' (परमेश्वेर) ज्याच्याकडे आपण जास्त
लक्ष देत नहीं अणि तोच आपला शेवटपर्यंत सोबती असतो.... :)
फक्त तुला भेटण्यासाठी!!!!!!
आता पुन्हा पाऊस येणार - संदीप खरे
आता पुन्हा पाऊस येणार - संदीप खरे
आता पुन्हा पाऊस येणार,
तुझ्याविना आता जगणेच नाही
तुझ्याशी कळलेच नाही,
प्रितीत विसावतो क्षण माझा,
कोणी मला खुणावलेच नाही...
स्वप्नंसदृश्य आयुष्य
माझे जाहले होते,
तुझ्या येण्याने नंदनवन
कधी फुलले कळलेच नाही...
दुखाच्या क्षणात डुबत
चालली होती नाव माझी,
हात तू कधी धरलास
माझा कळलेच नाही...
आशाच सोडली होती मी
परत आयुष्य सजवायची,
कशी जगण्याची उमेद
तुझ्यासवे मिळाली कळलेच नाही...
कधीच अलग होऊ नकोस
प्रिये आता माझ्यापासून,
गेलीस सोडून तर
तुझ्याविना आता जगणेच नाही...
प्रीतीचे धागे
प्रीतीचे धागे
डोळ्यांमधील दोन आसवे,
बरेच काही सांगून गेली
घूसमटलेले भाव मनीचे,
सहजपणे समजावून गेली
किती फिरवशी मान आणखी,
किती हुंदके उरी कोंडशी
हसुनी आणिक डोळे पुसुनी,
किती स्वताला असे फसवशी
विसरायचे म्हटलेस तरीही,
विसरशील का माझी प्रीती
कशी तुटतील जरी तोडशील,
अनाम संबंधाची नाती
वळणावरती मान फिरवुनी,
कशास बघशी मागे मागे
गेलीस कितीही दूर तरी,
विसरशील का हे प्रीतीचे धागे .......
कसं विसरू मी तुला
तुझ ऐकण्यासाठी तुला विसरीन ,
पण हृदयात असतो ना सहवास तुझा.
सांग ना कसं विसरू मी तुला.
माझ्या अश्रूंनाही ठाऊक आहे मी किती भावूक आहे,
विसरायचा प्रयन्त केल्यावर पापण्या ओल्या करतात,
काहीतरी सांगतात ते मला,
सांग ना कसं विसरू मी तुला.
झोपेतही तुझीच आठवण येते,
सारख तुझंच नाव घेते,
तुझ्या स्वप्नात नेतात त्या मला.
सांग ना कसं विसरू मी तुला.
एक वेळ कविता करायचे सोडेन,
माझ्या कवितेच झाड तुझ्यासाठी मोडेन.
पण नाही विसरू शकत मी तुला,
सांग ना कसं विसरू मी तुला.
तुझ्या तो कोमल हाताचा स्पर्श,
मनात रुजून आहे कित्येक वर्ष.
कसा जाणार सहवास तुझा सांग मला,
सांग ना कसं विसरू मी तुला.
मी तिच्यात नव्हतो ...पण ती माझ्यात होती
ती चमकणा-या ता-यांच्या प्रकाशात होती
माझी ती बिचारी लहान पायवाट होती
माझी कधीही सुटणारी निसरति गाठ होती
माझ्या वाट्याला दुःखंच भरमसाठ होती.
मी डोळे मिटले नाही माझी सदा पहाट होती.
माझ्या डोळ्यानां नेहमी आसवांची साथ होती
तीच्यासाठी देवळात नेहमी माझीच वरात होती
खरच फ़ार उशीरा तीची ही साद होती.
आज म्हणे ती दिवसभर देवळात होती
त्यानं प्रेम केलं किंवा तिनं प्रेम केल
करु दे की...
मला सांगा तुमचं काय गेलं ?
तो तिला बागेमधे एकांतात भेटला,
नको इतक्या जवळ जाउन अंगाशी खेटला,
लाल लाल गुलाबाचं फ़ुल होवुन पेटला,
भेटला तर भेटुदे की,पेटला तर पेटुदे की,
तुमच्या घरचं बोचकं त्यांनी उचलुन थोडचं नेलं?
त्यानं प्रेम केलं किंवा तिनं प्रेम केलं,
करु दे की...
मला सांगा तुमचं काय गेलं ?
एकदा ती त्याच्यासाठी वेडीपिशी झाली,
पाउस होता तरी भिजत त्याच्या घरी गेली,
घरात तेव्हा कोणी नव्हतं म्हणुन त्यांचं फ़ावलं,
आणि त्यानी तिला घरात घेउन चक्क दार लावलं,
लावलं तर लाउदे की,व्हायचं ते हो उदे की,
खिडकीतुन फ़ुकट सगळं बघता तर आलं,
त्यानं प्रेम केलं किंवा तिनं प्रेम केलं,
करु दे की...
मला सांगा तुमचं काय गेलं ?
घरात जागा नसते,त्यांचं चालणारच टॅक्सित प्रकरणं,
ते थोडेच बसणार आहेत,पाणिनीचं घोकीत व्याकरणं,
गुलाबी थंडीचे परीणाम हे होणारचं,
कुणितरी कोणालातरी घट्ट मिठितं घेणारचं
घेतलं तर घेउ दे की,व्हायचं ते हो उदे की,
तुमच्या आमच्या पूर्वजांनी आणखी वेगळं ते काय केलं,
त्यानं प्रेम केलं किंवा तिनं प्रेम केलं,
करु दे की...
मला सांगा तुमचं काय गेलं ?
माणसावर जेवढं प्रेम करावं तेवढीच माणसं दूर जातात......?
फुलांना जास्त कवटाळल्यावर
ज्याला मनापासुन आपलं मानल
फुले गळु लागली की
आपन जे मागितले
माझ्या स्वप्नातली ती
माझ्या स्वप्नातली "ती "
खूप भनाट आहे
जिच्या विना माझ्या जीवनात
नुसता शुकशुकाट आहे
स्वप्नात सुधा पाहतो
मी तिची वाट आहे
कल्पना माझ्या तिच्या
बाबतीत शंभर-साठ आहे
जणू "ती" विहीर
आणि मी राहत आहे
मनात तिच्या बदल
प्रेम अफाट आहे
आता देवालाच माहित
कधी तिची माझी गाठ आहे
--- सत्यजित प.
माझ्या स्वप्नातली "ती "
खूप भनाट आहे
जिच्या विना माझ्या जीवनात
नुसता शुकशुकाट आहे
स्वप्नात सुधा पाहतो
मी तिची वाट आहे
कल्पना माझ्या तिच्या
बाबतीत शंभर-साठ आहे
जणू "ती" विहीर
आणि मी राहत आहे
मनात तिच्या बदल
प्रेम अफाट आहे
आता देवालाच माहित
कधी तिची माझी गाठ आहे
--- सत्यजित प.
