जी माणसे हवी हवीशी वाटतात

जी माणसे हवी हवीशी वाटतात
ती माणसे भेटत नाहीत,

जी माणसे नकोशी वाटतात
त्यांचा सहवास संपत नाही,

ज्यांच्याकडे जावेसे वाटते
त्यांच्याकडे जायला जमत नाही,

ज्यांच्याकडे जाऊ नये असे वाटते
त्यांच्याकडे जावेच लागते,

जेव्हा जीवन नकोसे वाटते
तेव्हा काळ संपत नाही,

जेव्हा जीवनाचा खरा अर्थ कळतो
तेव्हा काळ संपलेला असतो,

नशिब हे असेच असत
त्याच्याशी ज़पून वागाव लागत,

तिथे कोणाचेच चालत नाही
जिकडे नेईल तिकडे जावेच लागते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा