कळत नाहीत वाटा,

कळत नाहीत वाटा,
तिकडे कशाला जायचं..?
आपले नव्हते जे,
त्यांना का आठवायचं..?

ज्यांना विश्वास कधी,

समजला नाही..
त्यांना का आपण,
खास काही सांगायचं..?

आहेत आपल्याकडे 

शब्द मांडायला,
न ऐकनार्यांसाठी,
का ओरडायचं..?

भावना आहेत मनी,

त्यांना फक्त मांडायचं,
आपला काही चुकतं,
म्हणून गप्प का राहायचं..?

नाही सापडलं उत्तर,

तर प्रश्नांना नाही टाळायचं,
जगासमोर एक,
आपलं उदाहरण ठेवायचं..!!


 विरहात जगून काय सिद्ध करू पाहताहेत ? तुमचं प्रेम किती महान होत ते ? प्रेम म्हणजे एका वाहत्या नदी प्रमाणे असतं.. प्रवाहात नेहमीच पुढे वाहत असतं.. एका ठिकाणी थांबलं तर त्याचं अस्तित्व नष्ट होतं.. ..आणि पुढे सरकत राहिलं तरच सागराशी मिळतं..... 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा