मराठी उखाणे भाग ३

नमस्कार करता येतो मला, छान वाकून
...चं नाव घेते तुमचा मान राखून

शंकराला वाहिलं बेलाचं पान
...चं नाव घेते हं, ऐका देऊन कान

गुलाबाच्या फुलांचा येतो मंद सुगंध
...बरोबर राहताना मला होईल आनंद

गोकुळातील मेळाव्यात श्रीकृष्ण वाजवतो पावा
...सारखा जोडीदार मला जन्मोजन्मी हवा

आहे चैत्र-वैशाख महिना, सुरात कोकिळा गाते
...चं नाव ... घेते

रामाची सीतामाई झाली होती लुप्त
... अन्‌ मी राहू नेहमी तृप्त

रजिस्टर केलं लग्न, नाही चौघडा-सनई
... आता खाऊ या, मस्त मेवा मिठाई

पोळी-भाजी नको, नको वरण-भात
..., पाव-भाजी खात, करू या छान बात

नवरोजी म्हणतात -

...भोवती आहे सतत मैत्रिणींचा घोळका
पैठणी का शालू दिलाय ते सर्वांनी ओळखा

नका करू आरडाओरड तुम्ही सर्व जणी
... आहे माझी खरंच पट्टराणी

मोठ्यांसमोर सर्वच गोष्टींत मी झालो पास
....ला देतो गुलाबजामचा घास

कॉम्प्युटर-मोबाईलचा उपयोग झाला छान
... आता प्रत्यक्ष गप्पा मार, ऐकते देऊन कान

श्रावणात पडतात सरीवर सरी
-----रावा्ंचे नाव घेते ---- हि बावरी

श्रावण जलधारांनी शांत होते धरती,
..... च्या पुढे कर माझ्हे जुऴती

सौभाग्यकांक्षिणी करतात गौरईची पुजा,
..... चे नाव घेऊन घेते मी रजा.


लागलाय श्रावण कर्ते मी महादेवाची महोभावे पुजा,
.... च्या जीवावर कर्ते मी मजा.

रिमझिम जलधारा बरसतात धरतीच्या कलशात,
..... चे नाव घेते असु द्या लक्षात.


हिरवा श्रावण बहरलाय दरवळली माती,
..... च्या जीवनात सदैव मिळो शांती.


श्रावणात बरसतात धुंद जलधारा,
.....च्या नावात फुलावा माझा सौभाग्याचा फुलोरा.

श्रावणात पडतोय रोज पारिजातकांचा सडा,
.... ना आवडतो गरम गरम बटाटेवडा.

अर्धनारी नटेश्वराच्या मुर्तीप्रमाणे पति पत्नीच्या
एकरुपतेने बनत असतो संसार,
..... चे नाव घेते आज आहे श्रावणी सोमवार.

भाद्रपद महिन्यात गोकुळ अष्टमीला पाळणा हलला श्रीकृष्णाचा,
..... चे नाव घेऊन निरोप घेते माहेरचा.

श्रावण महिन्यात सर्वजण करतात श्रवणी सोमवार,
.... सह केले मी हरिद्वार किंवा आहेत दिलदार.

वसंत ऋतुत कोकीळा गाती गोड,
.....गेले गावाला तर त्यांच्या येण्याची लागते ओढ.





  गुलाबाच्या झाडाला कळ्या येतात दाट
----- नाव घेते सोडा माझी वाट


आई बापाने वाढवले मैत्रिणीने घडवले
--- चं नाव घ्यायला --- अडवले


हंड्यावर हंडे सात त्यावर ठेवली परात
---- बसले दारात मी जाऊ कशी घरात


घराच्या पुढे अंगण अंगणात सजलाय बोगनवेल ,
प्रवेश करते गृहलक्ष्मी , वाजवून ...च्या घराची बेल


गीत गोविंदात श्रीकृष्णाने खेळीला राधेशी रास,
.... चे नाव घेते सुनमुख प्रसंगी सासुबाई पुढे घातली धान्याची रास


माझ्या धान्याचे माप आज शिगोशीग भरले,
म्हणून ........ रावांची मी सॉभाग्यवती झाले


गृहप्रवेश करतांना साठविले मायेचे मोती भरभर,
..... च्या हातात हात देउन झाले मी निर्भर


माझ्या जीवनरुपी अंगणात काढीन रांगोळीच्या सुबक रेषा.
... नी त्यात विविध रंग भरावे हीच माझी मनिषा.


रुसलेल्या ज्योतीला पवन म्हणतो हास,
------ ना भरवते मी श्रीखण्ड-पुरीचा घास


अत्रावळ पत्रावळ , पत्रावळीवर होती वान्ग्याची फोड
***** हसतात गोड, पण डोळे वटारायची भारीच खोड्


मुंबई ते पुणे १५०कि.मी. आहे अंतर,
-- हयांचं नाव घेते, घास भरवते नंतर

गावठी गुलाबाला सुगंधी सुवास,
.....ना भरवते मी श्रिखंड-पुरीचा घास

सांगीतलेल्या कामात मी सदैव राहीन दक्ष,
....ना भरवीते गोड घास,तुम्ही भरा साक्ष

आदर्श पती-पत्नी म्हनुन सांगतात नल दमयंती,
....नी घास घ्यावा ही माझी पहिलीच विनंती


प्रत्येक क्षण येतो अनुभव घेऊन आगळा,
....नी लाडु खावा एक सोबत सगळा

आता घास घेतला त्याला वेगळीच होती गोडी,
....ना घास भरवतो त्यातलीच चव थोडी

मोह नसावा पैशाचा,गर्व नसावा रुपाचा
...ना घास घालते श्रीखंडपुरीचा

शेतात नांगरता नांगरता सापडली कवडी ||
.....................माझ्या गुडघ्या एवढी ||

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा