powada लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
powada लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शिवाजी महाराजांचा पोवाडा - शाहिर: महात्मा ज्योतिबा फुले

शिवाजी महाराजांचा पोवाडा - शाहिर: महात्मा ज्योतिबा फुले

चौक १

कुळवाडी-भूषण पवाडा गातो भोसल्याचा । छत्रपती शिवाजीचा ॥ध्रु०॥

लंगोटयांस देई जानवीं पोषींदा कूणब्याचा । काल तो असे यवनांचा ॥

शिवाजीचा पिता शहाजी पुत्र मालोजीचा । असे तो डौल जहागिरीचा ॥

पंधराशें एकूणपन्नास साल फळलें । जुन्नर तें उदयासी आलें ॥

शिवनेरी किल्ल्यामध्यें बाळ शिवाजी जन्मलें । जिजीबाईस रत्न सांपडलें ॥

हातापायांचीं नखं बोटं शुभ्र प्याजी रंगीलें । ज्यांनीं कमळा लाजिवलें ॥

वरखालीं टिर्याख पोटर्याय गांठी गोळे बांधले । स्फटिकापरि भासले ॥

सान कटी सिंहापरी छाती मांस दुनावलें । नांव शिवाजी शोभलें ॥

राजहौंसी उंच मान माघें मांदे दोंदीलें । जसा का फणीवर डोले ॥

एकसारखे शुभ्र दंत चमकूं लागले । मोतीं लडीं गुंतविलें ॥

रक्तवर्ण नाजूक होटीं हासूं छपिवले । म्हणोन बोबडें बोले ॥

सरळ नीट नाक विशाळ डोळ्या शोभलें । विषादें मृग वनीं गेले ॥

नेत्र तीखे बाणी भवया कमठे ताणीले । ज्यांनी चंद्रा हाटिवलें ॥

सुंदर विशाळ भाळवटी जावळ लोंबलें । कुरळे केंस मोघीले ॥

आजानबाहू पायांपेक्षां हात लांबलेले । चिन्ह गादिचें दिसलें ॥

जडावाचीं कडीं तोडे सर्व अलंकार केले । धाकटया बाळा लेविवलें ॥

किनखाबी टंकोचें मोतीं घोसानें जडलें । कलाबतुचे गोंडे शोभले ॥

लहान कुंची पैरण बिरडी बंद लावले । डाग लाळीचे पडलेले ॥

हातापायांचे आंगठे चोखी मुखामधी रोळे । पायीं घुंगरुं खुळखुळे ॥

मारी पाठोपाठ लाथाबुक्या आकाश शोभले । खेळण्यावर डोळे फिरवीले ॥

मजवर हा कसा खेळणा नाहीं आवडले । चिन्ह पाळणीं दिसलें ॥

टाहीपेटे रडूं लागला सर्व घाबरले । पाळण्या हलवूं लागले ॥

धन्य जिजाबाई जिनें जो जो जो जो जो केलें । गातों गीत तिनें केलें ॥

चाल 

जो जो जो जो जो जो गाऊ, जी जी जी जी जीजी गाऊं । 

चला वेरुळास जाऊं, दौलताबादा पाहूं ॥

मूळ बाबाजीस ध्याऊं, कीर्ति आनंदाने गाऊं ।

सरदारांत उमराऊ, सोबतीस जाधवराऊ ॥

पाटील होते गांवोगाऊ, पुत्रावरी अती जीऊ ।

थोर विठोजी नांव घेऊं, सान मालोजी त्याचा भाऊ ।

दीपाबाई त्यास देऊं, छंदाजोगा गिती गाऊं ॥

चाल 

मालोजी राजा । तुझा बा आजा ॥

यवनी काजा । पाळिल्या फौजा ॥

लाविल्या ध्वजा । मारिल्या मौजा ॥

वेळेस मुक्का । साधल्या बुक्का ॥

विचारी पक्का । जाधवा धक्का ॥शेशाप्पा नायका । ठेविचा पैका ।

द्रव्याची गर्दी । चांभारगोंदी ॥

देवळें बांधी । तळीं ती खांदी ॥

आगळी बुद्धि । गुणानें निधि ॥

लिहिलें विधि । लोकांस बोधी ॥

संधान साधी । जसा पारधी ॥

भविषी भला । कळलें त्याला ॥

सांगोनी गेला । गादी बा तुला ॥

चाल 

उपाय नाहीं जाणोन चाकर झाला यवनाचा । शिपाई होता बाणीचा ॥

खोटया दैवा कोण खोडी बेत देवाजीचा । पवाडा गातो शिवाजीचा ॥

कुळवाडी-भूषण पवाडा गातो भोसल्याचा । छत्रपती शिवाजीचा ॥१॥

चौक २

वडील बंधु संभाजीनें लळे पुरवीले । धाकटयासवें खेळले ॥

उभयतांचें एक चित्त तालमींत गेले । फरीगदग्या शिकले ॥

आवडीनें खमठोकीं कुस्ती पेंचानें खेळे । पवित्रे दस्तीचे केले ॥

द्वादशवर्षी उमर आली नाहीं मन धालें । घोडी फिरवूं लागले ॥

आट्टल घोडेस्वार भाला बोथाटी शीकले । गोळी निशान साधले ॥

कन्या वीर जाधवाची जिनें भारथ लावलें । पुत्रा नीट ऐकविलें ॥

अल्पवयाचे असतां शिकार करुं लागले । माते कौतुक वाटलें ॥

नित्य पतीचा आठव डोंगर दुःखाचे झाले । घर सवतीनें घेतले ॥

छाती कोट करुन सर्व होतें साटिवलें । मुखमुद्रेनें फसविले ॥

चतुर शिवाजीनें आईचें दुःख ताडिले । पित्यास मनीं त्यागिले ॥

पुत्राचे डोळे फिरले माते भय पडलें । हीत उपदेशा योजिलें ॥

मनीं पतिभक्ति पुता बागेमधीं नेलें । वृक्षछायीं बसीवलें ॥

पूर्वजांचे स्मरण करुन त्यास न्याहाळीलें । नेत्रीं पाणी टपटपलें ॥

या क्षेत्राचे धनी कोणकोणी बुडविले । सांगतें मुळीं कसें झालें ॥

क्षेत्रवासी म्हणोन नांव क्षत्रिय धरलें । क्षेत्रीं सुखी राहिले ॥

अन्यदेशिचे दंगेखोर हिमालयीं आले । होते लपून राहिले ॥

पाठीं शत्रु भौती झाडी किती उपासी मेले । गोमासा भाजून धाले ॥

पाला फळें खात आखेर ताडपत्रा नेसले । झाडी उल्लंघून आले ॥

लेखणीचा धड शीपाया सैनापति केलें । मुख्य ब्रह्मा नेमलें ॥

बेफाम क्षत्रिय होते अचूक टोळ उतरले । कैदी सर्वांस केलें ॥

सर्व देशीं चाल त्याचें गुलाम बनीवले । डौलानें क्षुद्र म्हणाले ॥

मुख्य ब्रह्म राजा झाला जानें कायदे केले । त्याचे पुढें भेद केले ॥

ब्रह्मा मेल्यावर परशराम पुंड माजले । उरल्या क्षत्रिया पिडीले ॥महारमांग झाले किती देशोधडी केले । ब्राह्मण चिरंजीव झाले ॥

देश निक्षत्रिय झाल्यामुळें यवना फावलें । सर्वांस त्यांहीं पिडीलें ॥

शुद्र म्हणती तुझ्या हृदयीं बाण टोचले । आज बोधाया फावलें ॥

गाणें गातें ऐक बाळा तुझ्या आजोळीं शिकले । बोलीं नाहीं मन धालें ।

चाल 

क्षेत्र क्षत्रियांचें घर, तुझे पितृ माहावीर । सुखा नसे त्यांच्या पार, 

आल्या गेल्याचें माहेर ॥ शीखराकार डोंगर, नानावल्ली तरुवर ॥

परीं खोरीं वाहे नीर खळखळे निरंतर । झाडा फुलें झाला भार, 

सुगंधी वाहे लहर । पक्षी गाती सोळा स्वर, मंजूळ वाणी मनोहर ॥

नदी नाले सरोवर, शोभे कमळांचा भार । भूमी अती काळसर, 

क्षेत्र देई पीका फार ॥ धाव घेती दंगेखोर, दिला क्षेत्रियास मार ।

दास केले निरंतर, ब्रह्मा झाला मनीं गार ॥ लोभी मेले येथें फार, विधवा झाल्या घरोघर ।

उपाय नाहीं लाचार, स्त्रिया वंदी पाटावर ॥ दुसरा झाला शीरजोर, परशा तोबा कठोर ।

मार त्याचा अनीवार, केला क्षत्रियां संव्हार ॥ क्षत्रिय केले जरजर, भये कांप थरथर ।

दुःखा नाहीं त्यांच्या पार, ठाव नाहीं निराधार ॥ बहु केले देशापर, बाकी राहि मांगमाहार ।

निःक्षेत्रीं झाल्यावर, म्लेंच्छें केलें डोकें वर । आले सिंधुनदावर, स्वार्याि केल्या वारोंवार । 

गातें कटावांत सार, लक्ष देई अर्थावर ।

चाल 

काबुला सोडी । नदांत उडी ॥

ठेवितो दाढी । हिंदूस पीडी ॥

बामना बोडी । इंद्रियें तोडी ॥

पिंडीस फोडी । देवळें पाडी ॥

चित्रास तोडी । लेण्यास छेडी ॥

गौमांसी गोडी । डुकरां सोडी ॥

खंडयास ताडी । जेजूरी गडी ॥

भुंग्यास सोडी । खोडीस मोडी ॥

मूर्तीस काढी । काबूला धाडी ॥

झाडीस तोडी । लुटली खेडीं ॥

गडास वेढी । लावली शीडी ॥

हिंदूस झोडी । धर्मास खोडी ॥

राज्यास बेडी । कातडी काढी ॥

गर्दना मोडी । कैलासा धाडी ॥

देवळें फोडी । बांधीतो माडी ॥

उडवी घोडी । कपाळा आढी ॥

मीजास बडी । ताजीम खडी ॥

बुरखा सोडी । पत्नीखस पीडी ॥

गायनीं गोडी । थैलीतें सोडी ॥

चाल 

माताबोध मनीं हसतां राग आला यवनांचा ।

बेत मग केला लढण्याचा ॥ तान्हाजी मालुसरे बाजी फसलकराचा ।

स्नेह येशजी कंकाचा ॥ मित्रा आधीं ठेवी जमाव केला मावळ्यांचा ।

पूर करी हत्यारांचा ॥ मोठया युक्तीनें सर केला किल्ला तोरण्याचा ।

रोविला झेंडा हिंदूचा ॥ राजगड नवा बांधला उंच डोंगराचा ।

भ्याला मनीं विजापुरचा । दुसरा भ्याला मेला बेत नव्हता पूर्वीचा ।

दादोजी कोंडदेवाचा ॥ मासा पाणीं खेळे गुरु कोण असे त्याचा । 

पवाडा गातो शिवाजीचा ॥ कुळवाडी-भूषण पवाडा गातो भोसल्याचा ।

छत्रपती शिवाजीचा ॥२॥

चौक ३

जाहागीरचा पैसा सारा लावी खर्चास । चाकरी ठेवी लोकांस ॥

थाप देऊन हातीं घेई चाकण किल्ल्यास । मुख्य केले फिङ्‌र्गोजीस ॥

थोडया लोकांसहीत छापा घाली सुप्यास । कैद पाहा केलें मामास ॥

सुप्यासोबत हातीं घेतलें तीनशें घोडयास । करामत केली रात्रीस ॥

मुसलमानां लाच देई घेई कोंडाण्यास । सिंहगड नांव दिलें त्यास ॥

पुरंधरी जाई जसा भला माणूस न्यायास । कैद पाहा केलें सर्वांस ॥

गांव इनाम देऊन सर्वां ठेवी चाकरीस । मारलें नाहीं कोणास ॥

वाटेमधीं छापा घालून लुटी खजीन्यास । सांठवी राजगडास ॥

राजमाचीं लोहगडीं लढे घेई तिकोण्यास । बाकी चार किल्ल्यांस ॥

मावळ्यांस धाडी कोकणीं गांव लुटायास । धूर्त योजी फितूरास ॥ 

सन्मान कैद्यां देई पाठवि वीजापूरास । मुलान्या सुभेदारास ॥

विजापुरीं मुसलमाना झाला बहु त्रास । योजना केली कपटास ॥

करनाटकीं पत्र पाठवी बाजी घोरपडयास । कैद तुम्ही करा शहाजीस ॥

भोजनाचें निमित्त केलें नेलें भोसल्यास । दग्यानें कैद केलें त्यास ॥

थेट शहाजी कैदी आणिला विजापूरास । खुशी मग झाली यवनास ॥

चिरेबंदी कोठडीमध्यें बंद केलें त्यास । ठेविलें भोक वार्या स ॥

शहाजीला पिडा दीली कळलें शिवाजीस । ऐकून भ्याला बातमीस ॥

पिताभक्ति मनीं लागला लागला शरण जायास । विचारी आपला स्त्रियेस ॥

साजे नांव सईबाई स्त्री सुचवी पतीस । ताडा दंडीं दुसमानास ॥

स्त्रीची सुचना सत्य भासली लिहिलें पत्रास । पाठवी दिल्ली मोगलास ॥

चाकर झालों तुमचा आतां येतों चाकरीस । सोडवा माझ्या पित्यास ॥

मोलग थैली गेली थेट मुसलमानास ठेविले किल्ल्यावर त्यास ॥

बाजी शामराज का लाजला जात सांगायास । धरुं पाही शिवाजीस ॥

धेड म्हणावा नाक नाही द्यावा कोणास । अडचण झाली बखरीस ॥

सिद्धिस बेत गेला नाहीं अंतीं भ्याला जिवास । काळें केलें महाडास ॥

शाहाजीचा बाजी आखेर घेईल बक्षीस । हा पाजी मुकला जातीस ॥

करनाटकीं आज्ञा झाली शाहाजीस । यवन भ्याला सिंहास ॥ 

वर्षे चार झालीं शिवला नाहीं कबजास । पिताभक्ति पुत्रास ॥

चंद्रराव मोर्या स मारी घेई जावळीस । दुसरे वासोटा किल्ल्यास ॥

प्रतापगड बांधी पेशवा केला एकास । नवे योजी हुद्यास ॥

आपली बाकी काढी धाडी पत्र तगाद्यास । चलाखी दावी मोंगलांस ॥

रात्रीं जाऊन एकाएकीं लुटी जुन्नरास । पाठवी गडी लुटीस ॥

आडमाग करी हळूंच गेला नगरास । लुटी हत्तीघोडयांस ॥

उंच वस्त्रे, रत्नेंु होन कमती नाहीं द्रव्यास । चाकरि ठेवि बारगिरांस ॥

समुद्रतीरीं किल्ले घेई पाळी गलबतांस । चाकरी ठेवि पठाणास ॥

सिद्दि पेशव्या आपेश देई घेई यशास । उदासी लाभ शिवाजीस ॥

आबझूलखान शूर पठाण आला वांईस । शोभला मोठा फौजेस ॥

हातीं बारा हजार घोडा त्याचे दिमतीस । कमी नाहीं दारुगोळीस ॥

कारकुनाला वचनीं दिलें हिवरें बक्षीस । फितविलें लोभी ब्राह्मणांस ॥

गोपीनाथ फसवी पठाणा आणि एकांतास । चुकला नाहीं संकेतास ॥

मातेपायीं डोई ठेवी, लपवी इत्यारास । बरोबर आला बेतास ॥

समीप येतां शिवाजी जसा भ्याला व्याघ्रास । कमी करी आपल्या चालीस ॥

गोपीनाथ सुचना देई भोळ्या यवनास । भ्याला तुमच्या शिपायांस ॥

वर भेटभाव वाघनख मारीं पोटास । भयभित केलें पठाणास ॥

पोटीं जखम सोसी केला वार शिवाजीस । झोंबती एकमेकांस ॥

हातचलाखी केली बिचवा मारी शत्रूस । पठाण मुकला प्राणास ॥

स्वामीभक्ती धाव घेई कळले शिपायास । राहिला उभा लढण्यास ॥

त्याची धोप घेई शिवाजी बचवी आपल्यास । तान्हाजी भिडे बाजूस ॥

दांती दाढी चावी तोडी घेई धनी सूडास । घाबरें केलें दोघांस ॥नांव सय्यदबंधू साजे शोभा आणी बखरीस । लाथाळी जीवदानास ॥

तान्हाजीला हूल देई मारी हात शिवाजीस । न्याहाळी प्रेतीं धण्यास ॥

उभयतांसीं लढतां मुकला आपल्या प्राणास । गेला जन्नत स्वर्गास ॥

छापा घाली मारी करी कैद बाकी फौजेस । पठाणपुत्र खाशा स्त्रियेस ॥

चार हजार घोडा लूट कमी नाहीं द्रव्यास । दुसर्याख सरंजामास ॥

अलंकार वस्त्रें देई सर्व कैदी जखम्यांस । पाठवि विजापूरास ॥

वचनीं साचा शिवाजी देई हिवरें बक्षीस । फितुर्या गोपीनाथास ॥

नाचत गात सर्व गेले प्रतापगडास । उपमा नाहीं आनंदास ॥

चाल 

शिवाचा गजर जयनामाचा झेंडा रोविला ॥ 

क्षेत्र्याचा मेळा मावळ्याचा शिकार खेळला ॥

मातेपायीं ठेवी डोई गर्व नाहीं काडीचा ।

आशिर्वाद घेई आईचा ॥ आलाबला घेई आवडता होता जिजीचा ।

पवाडा गातो शिवाजीचा ॥ कुळवाडी-भूषण पवाडा गातो भोसल्याचा ।

छत्रपती शिवाजीचा ॥३॥

चौक ४

लढे रांगणीं विशाळगडीं घेई पन्हाळ्यास । केले मग शुरु खंडणीस ॥

रुस्तुल जमाना आज्ञा झाली विजापूरास । नेमिला कोल्हापूरास ॥

स्वार तीन हजार घेई थोडया पायदळास । आला थेट पन्हाळ्यास ॥

मार देत शिवाजी पिटी कृष्णा पैलतडीस । अती जेर केलें त्यास ॥

खंडणी घेत गेला भिडला विजापूरास । परत मग आला गडास ॥

राजापुर दाभोळ लुटी भरी खजीन्यास । मात गेली विजापुरास ॥

सिद्दी जोहरा नेमी मोठी फौज दिमतीस । सावंत सिद्दी कुमकेस ॥

बंदोबस्त करी शिवाजी राही पन्हाळ्यास । करी मग जमा बेगमीस ॥

वारंवार छापे घाली लुटी भौंती मुलखास । केलें महाग दाण्यास ॥

त्रासानें खवळून वेढा घाली शिवाजीस । कोंडिले गडीं फौजेस ॥

चार मास लोटले शिवाजी भ्याला वेढयास । योजना करी उपायास ॥

कोंकणामधीं सिद्दी झोडी रघुनाथास । उपद्रव झाला रयतेस ॥

फासलकर बाजीराव पडले वाडीस । दुःख मग झालें शिवाजीस ॥

सिद्दी जोहरा निरोपानें गोंवी वचनास । खुशाल गेला भेटीस ॥

वेळ करुन गेला उरला नाहीं आवकास । कच्चा मग ठेवी तहास ॥

सिद्दीस लाडी गोडी मधी मान डुकलीस । गेला थाप देऊन गडास ॥

सिद्धया पोटीं खुष्याली जाई झोपीं सावकास । हयगय झाली जप्तीस ॥

तों शिवाजी पळून गेला घेई पाठी रात्रीस । फसविलें मुसलमानास ॥

सिद्दी सकाळीं खाई मनीं लाडू चुरमुर्या्स । स्वार दळ लावी पाठीस ॥

चढत होता खिंड शिवाजी गांठलें त्यास । बंदुका लावी छातीस ॥

बाजीपरभु मुख्य केला ठेवि मावळ्यास । एकटा गेला रांगण्यास ॥

स्वामीला वेळ दिला बाजी भिडला शत्रूस । हरवी नित्य मोगलास ॥

दोन प्रहर लढे वाट दिली नाहीं त्यास । धन्य त्याच्या जातीस ॥

मोठी मोगल फौज दाखल झाली साह्यास । खवळला बाजी युद्धास ॥

अर्धे लोक उरले सरला नाहीं पाउलास । पडला परभू भूमीस ॥तो शिवाजी सुखी पोहंचला कान सुचनेस । अंती मनीं हाच ध्यास ॥

बार गडीं ऐकून सुखी म्हणे आपल्यास । नीघून गेला स्वर्गास ॥

सय्यद मागें सरे जागा देई बाजीरावास । पाहून स्वामीभक्तीस ॥

विजापुरीं मुसलमान करी तयारीस । खासा आला लढण्यास ॥

कराडास डेरे दिले घेई बहू किल्ल्यांस । वश करी चाचे लोकांस ॥

दळव्यासीं लडून घेई शृंगारपुरास । मारलें पाळेगारांस ॥

लोकप्रीतिकरितां करी गुरु रामदासास । राजगडीं स्थापी देवीस ॥

मिष्ट अन्न भोजन दिलें सर्वां बक्षीस । केली मग मोठी मजलस ॥

तानसैनी भले गवय्या बसवी गायास । कमी नाहीं तालस्वरास ॥

चाल 

जीधर उधर मुसलमानी । बीसमिलाही हिंमानी ॥

सच्चा हरामी शैतान आया । औरंगजीब नाम लिया ॥

छोटे भाइकूं कैद हूल दिया । बडे भाईकी जान लिया ॥

छोटेकूंबी कैद किया । लोक उसके फितालिया ॥

मजला भाई भगा दिया । आराकानमें मारा गया ॥

सगे बापकूं कैद किया । हुकमत सारी छिनलीया ॥

भाईबंदकूं इजा दिया । रयत सब ताराज किया ॥

मार देके जेर किया । खाया पिया रंग उडाया ॥

आपण होके बेलगामी । शिवाजीकू कहे गुलामी ॥

आपण होके ऐशआरामी । शिवाजीकूं कहे हरामी ॥

बरे हुवा करो सलामी । हिंदवाणी गाव नामी ॥

चाल 

आदी आंत न । सर्वां कारण ॥ 

जन्ममरण । घाली वैरण ॥

तोच तारण । तोच मारण ॥

सर्व जपून । करी चाळण ॥

नित्य पाळण । लावी वळण ॥

भूतीं पाहून । मनीं ध्याईन ॥

नांव देऊन । जगजीवन ॥ 

सम होऊन । करा शोधन ॥

सार घेऊन । तोडा बंधन ॥

चाल 

सरनौबती डंका हुकूम पालेकराचा । घेई मुजरा शाईराचा ॥

सुखसोहळे होतां तरफडे सावंत वाडीचा । पवाडा गातो शिवाजीचा ॥

कुळवाडी-भूषण पवाडा गातो भोसल्याचा । छत्रपती शिवाजीचा ॥४॥

चौक ५

सावंत पत्र लिही पाठवी विजापूरास । मागे फौज कुमकेस ॥

बाजी घोरपडा बल्लोळखान येती साह्यास । शिवाजी करी तयारीस ॥

त्वरा करुन गेला छापा घाली मुधोळांस । मारिलें बाजी घोरपडयास ॥

भाऊबंद मारिलें बाकी शिपाई लोकांस । घेतलें बाप सूडास ॥

सावंताची खोड मोडून ठेवी चाकरीस । धमकी देई पोर्च्युग्यास ॥

नवे किल्ले बांधी डागडुजी केली सर्वांस । बांधिलें नव्या जाहाजास ॥

जळीं सैनापती केले ज्यास भीती पोर्च्युग्यीस । शोभला हुद्दा भंडार्याीस ॥

विजापूरचा वजीर गुप्त लिही शिवाजीस । उभयतां आणलें एकीस ॥

व्यंकोजी पुत्रा घेई शाहाजी आला भेटीस । शिवाजी लागे चरणास ॥

शाहाजीचे सद्‌गुण गाया नाहीं आवकास । थोडेसे गाऊ अखेरीस ॥

सुखसोहळे झाले उपमा लाजे मनास । उणें स्वर्गी सुखास ॥

अपूर्व वस्तू घेऊन जाई विजापूरास । भेट मग देई यवनास ॥

पराक्रमी शिवाजी पाळी पाऊण लक्षास । साजे यवनी स्नेहास ॥

विजापूरचा स्नेह होता लढे मोगलास । घेतले बहूतां किल्ल्यास ॥

सर्व प्रांतीं लूट धुमाळी आणिलें जेरीस । घावरें केलें सर्वांस ॥

संतापानें मोंगल नेमी शाइस्तेखानास । जलदि केली घेई पुण्यास ॥

चाकणास जाऊन दावी भय फिङ्‌र्गोजीस । फुकट मागे किल्ल्यास ॥

मास दोन लढला घेऊन सर्व फौजेस । खान खाई मनास ॥

अखेर दारु घालून उडवी एका बुर्जास । वाट केली आंत जायास ॥

वारोंवार हल्ले गर्दी करुं पाहे प्रवेश । शाइस्ता पठाण पाठीस ॥

मागें पळति सर्व कोणी मानिना हुकूमास । भीति आंतल्या मर्दास ॥

लागोपाठ मार देत हटवि पठाणास । खचला खान हिंमतीस ॥

प्रातःकाळीं संतोषानें खाली केले किल्ल्यास । देई मुसलमानास ॥

फिङर्गोजीला भेट देती खुषी झाली यवनास । देऊन मान सोडी सर्वांस ॥

शिवाजीची भेट घेतां सन्मान दिला त्यास । वाढवी मोठया पदवीस ॥

फिड्‌र्गोजीचें नांव घेतां मनीं होतो उल्हास । पीढीजाद चाकरीस ॥ 

येशवंतशिंग आले घेऊन मोठया फौजेस । मदत शाईस्तेखानास ॥

सरनौबत भौती लुटी नगरी मुलखास । जाळून पाडिला ओस ॥

पाठी लागून मोंगल भारी त्याच्या स्वारांस । जखमा केल्या नेटाजीस ॥

राजगड सोडून राहीला सिंव्हगडास पाहून मोगलसेनेस ॥

जिजाबाईचें मुळचें घर होतें पुण्यास । खान राही तेथें वस्तीस ॥

मराठयांस चौकी बंदी गांवांत शिरण्यास । होता भीत शिवाजीस ॥

लग्नवर्हाचडी रुपें केला पुण्यांत प्रवेश । मावळे सोबत पंचवीस ॥

माडीवर जाऊन फोडी एका खिडकीस । कळालें घरांत स्त्रीयांस ॥

शाइस्त्यास कळतां दोर लावी कठडयास । लागला खालीं जायास ॥

शिवाजीनें जलदी गांठून वार केला त्यास । तोडीलें एका बोटास ॥

स्त्रिपुत्रां सोडून पळे पाठ दिली शत्रूस । भित्रा जपला जिवास ॥

आपल्या पाठिस देणें उणें शिपायगिरीस । उपमा नाहीं हिजडयास ॥

सर्व लोकांसहित मारिलें खानपुत्रास । परतला सिंहगडास ॥

डौलानें मोंगल भौती फिरवी तरवारीस । दावी भय शिवाजीस ॥

समीप येऊं दिले हुकूम सरबत्तीस । शत्रू पळाला भिऊन मारास ॥

करनाटकी बदली धाडी शाइस्तेखानास । मुख्य केलें माजमास ॥

राजापुरीं जाई शिवाजी जमवी फौजेस । दावी भय पोर्च्यूग्यास ॥

सर्व तयारी केली निघाला नाशिक तीर्थास । हुल कसी दिली सर्वांस ॥

मध्यरात्रीं घेई बरोबर थोडया स्वारांस । दाखल झाला सुर्तेस ॥

यथासांग साहा दिवस लुटी शहरास । सुखी मग गेला गडास ॥

बेदनूराहून पत्र आलें देई वाचायास । आपण बसे ऐकायास ॥

शिपायाचे बच्चे शाहाजी गेले शिकारीस । लागले हरणापाठीस ॥

घोडया ठेंच लागे उभयतां आले जमीनीस । शाहाजी मुकला प्राणास ॥

पती कैलासा गेले कळलें जिजीबाईस । पार मग नाहीं दुःखास ॥

भुमी धडपडे बैसे रडून गाई गुणांस । घेई पुढे शिवाजीस ॥

चाल 

अतीरुपवान बहु आगळा । जैसा रेखला चित्री पूतळा ॥

सवतीवर लोटती बाळा । डाग लाविला कुणबी कुळा ॥

सवतीला कसें तरी टाळा । कज्जा काढला पती मोकळा ॥

खर्याा केंसानें कापि का गळा । नादीं लागला शब्द कोकिळा ॥

मूख दुर्बळ राही वेगळा । अती पिकला चिंतेचा मळ ॥

झाला शाहाजी होता सोहळा । मनीं भूलला पाहूनी चाळा ॥

बहुचका घेती जपमाळा । जाती देऊळा दाविती मोळा ॥

थाट चकपाक नाटकशाळा । होती कोमळा जशा निर्मळा ॥

खर्याा डंखिणी घाली वेटोळा । विषचुंबनीं देती गरळा ॥

झाला संसारीं अती घोटाळा । करी कंटाळा आठी कपाळा ॥

मनीं भिऊन पित्याच्या कुळा । पळ काढला गेले मातुळा ॥

छातीवर ठेवल्या शिळा । नाहीं रुचला सवत सोहळा ॥

चाल 

कमानीवर । लावले तीर ॥

नेत्रकटार । मारी कठोर ॥

सवदागर । प्रीत व्यापार ॥

लावला घोर । सांगतें सार ॥

शिपाई शूर । जुना चाकर ॥

मोडक्या धीर । राखी नगर ॥

आमदानगर विजापूरकर ॥ मंत्री मुरार ॥

घेई विचार ॥ वेळनसार ।

देई उत्तर ॥ धूर्त चतुर ।

लढला फार ॥ छाती करार ॥

करी फीतूर ॥ गुणगंभीर ।

लाविला नीर ॥ होता लायक ।

पुंडनायक ॥ स्वामीसेवक ।

खरा भाविक ॥

चाल

सिंहगडावर गेला बेत केला क्रियेचा । बजावला धर्म पुत्राचा ॥

रायगडी जाई राही शोक करी पित्याचा । शत्रु होता आळसाचा ॥

दुःखामधीं सुरु बंदोबस्त करी राज्याचा । पवाडा गातो शिवाजीचा ॥

कुळवाडी-भूषण पवाडा गातो भोसल्याचा ॥ छत्रपती शिवाजीचा ॥५॥

चौक ६

सर्व तयारी केली राजपद जोडी नांवास । शिक्का सुरु मोर्तबास ॥

अमदानगरीं नटून पस्त केलें पेठेस । भौतीं औरंगाबादेस ॥

विजापूरची फौज करी बहुत आयास । घेई कोकणपट्टीस ॥सावध शिवाजी राजे आले घेऊन फौजेस । ठोकून घेई सर्वांस ॥

जळीं फौज लढे भौती मारी गलबतास । दरारा धाडी मक्केस ॥

माल्वणीं घेऊन गेला अवचित फौजेस । पुकारा घेतो मोगलास ॥

जाहाजावर चढवी फौज गेला गोव्यास । लुटलें बारशिलोरास ॥

जलदी जाऊन गोकर्णी घेई दर्शनास । लुटलें मोंगल पेठांस ॥

पायवाटेनें फौज पाठवी बाकी लुटीस । आज्ञा जावें रायगडास ॥

स्वतां खासी स्वारी आज्ञा लोटा जाहाजास । निघाला मुलखीं जायास ॥

मोठा वारा सुटला भ्याला नाहीं तुफानास । लागले अखेर कडेस ॥

औरंगजीब पाठवी राजा जयशिंगास । दुसरे दिलीरखानास ॥

ठेवले मोगल अमीर येऊन पुण्यास । वेढिलें बहुतां किल्ल्यांस ।

मानकरी शिवाजी घेई बसे मसलतीस । सुचेना कांहीं कोणास ॥

बाजी परभू भ्याला नाहीं दिलीरखानास । सोडिलें नाहीं धैर्यास ॥

हेटकरी मावळे शिपाइ होते दिमतीस । संभाळी पुरंधरास ॥

चातुर्यानें लढे गुंतवी मोगल फौजेस । फुरसत दिली शिवाजीस ॥

फार दिवस लोटले पेटला खान इर्षेस । भिडला किल्लया माचीस ॥

बुर्जाखालीं गेला लागे सुरंग पाडायास । योजी अखेर उपायास ॥ 

हेटकरी मावळे जाती छापे घालण्यास । पिडीलें फार मोगलास ॥

मोगलाने श्रम केले बेत नेला सिद्धीस । काबीज केलें माचीस ॥

यशस्वी भोसले लागले निर्भय लुटीस । चुकले सावधपणास ॥

हेटकर्यांसचा थाट नी मारी लुटार्यावस । मोगल हटले नेटास ॥

बाजी मावळ्यां जमवी हातीं घेई खांडयास । भिडून मारी मोगलास ॥

मोगल पळ काढी पाठ दिली मावळ्यास । मर्द पाहा भ्याले उंद्रास ॥

लाजे मनीं दिलीरखान जमवी फौजेस । धीर काय देई पठाणास ॥

सर्व तयारी पुन्हा केली परत हल्ल्यास । जाऊन भिडला मावळ्यास ॥

बाजी मार देई पठाण खचले हिमतीस । हटती पाहून मर्दास ॥

पराक्रम बाजीचा पाही खान खोच मनास । लावीला तीर कमानीस ॥

नेमानें तीर मारी मुख्य बाजी परभूस । पाडिला गबरु धरणीस ॥

सय्यद बाजी ताजीम देती घेती बाजूस । सरले बालेकिल्ल्यास ॥

मोगल चढ करती पुन्हा घेती माचीस । धमकी देती मावळ्यास ॥

हेटकरी मारी गोळी फेर हटवि शत्रूस । पळवी इशानी कोणास ॥

वज्रगडाला शिडी लाविली आहे बाजूस । वरती चढवी तोफांस ॥

चढला मोगल मारी गोळे बालेकिल्ल्यास । आणले बहू खराबीस ॥

हेटकरी मावळे भ्याले नाहीं भडिमारास । मोगल भ्याला पाऊसास ॥

मोगल सल्ला करी शिवाजी नेती मदतीस । घेती यवनी मुलखास ॥

कुलद्रोही औरंगजीब योजी कपटास । पाठवि थैली शिवाजीस ॥

शिवाजीला वचन देऊन नेई दिल्लीस । नजरकैद करी त्यास ॥

धाडी परत सर्व मावळे घोडेस्वारांस । ठेविले जवळ पुत्रास ॥

दरबार्यांस घरीं जाई देई रत्नव भेटीस । जोडिला स्नेह सर्वांस ॥

दुखणें बाहाणा करी पैसा भरी हकीमास । गूल पाहा औरंगजीबास ॥

आराम करुन दावी शुरु दानधर्मास । देई खाने फकीरास ॥

मोठे टोकरे रोट भरी धाडी मशीदीस । जसा का मुकला जगास ॥

दानशूर बनला हटवि हातिमताईस । चुकेना नित्यनेमास ॥

औरंगजीबा भूल पडली पाहून वृत्तीस । विसरला नीट जप्तीस ॥

निरास कैदी झाला शिवाजी भास मोगलास । चढला मोठया दिमाखास ॥

पितापुत्र निजती टोकरी बदली रोटास । बाकी सोपी चाकरास ॥

जलदी करीती चाकर नेती टोकरास । करामत केली रात्रीस ॥

दिल्ली बाहेर गेले खुलें केले शिवाजीस । नेली युक्ती सिद्धीस ॥

मोगल सकाळीं विचकी दांत खाई होटांस । लावी पाठी माजमास ॥

चाल 

औरंगजीबा धूर दीला । पुत्रासवें घोडा चढला ॥

मधींच ठेवी पुत्राला । स्वतां गोसावी नटला ॥

रात्रिचा दिवस केला । गाठलें रायगडाला ॥

माते चरणीं लागला । हळूच फोडी शत्रूला ॥

स्नेह मोगलाचा केला । दरारा देई सर्वांला ॥

चाल 

हैद्राबादकर । विजापूरकर ॥

कापे थरथर । देती कारभार ॥

भरी कचेरी । बसे विचारी ॥

कायदे करी । निट लष्करी ॥

चाल 

शिवाजीचा बेत पाहून जागा झाला गोव्याचा । बंदोबस्त केला किल्ल्याचा ॥

वेढा घालून जेर केला सिद्दी जंजिर्याचचा । पवाडा गाती शिवाजीचा ॥

कुळवाडी-भूषण पवाडा गातो भोसल्याचा । छत्रपती शिवाजीचा ॥६॥

चौक ७

शिवाजी तों मसलत देई मित्र तान्हाजीला । बेत छाप्याचा सुचवीला ॥

तान्हाजीनें भाऊ धाकटा सोबत घेतला । मावळी हजार फौजेला ॥

सुन्या रात्रीं सिंहगड पायीं जाऊन ठेपला । योजिलें दोर शिडीला ॥

दोरीची शिडी बांधली शिपाई कमरेला । हळुच वर चढवीला ॥

थोडी चाहूल कळली सावध उदेबानाला । करी तयार लोकांला ॥

थोडया लोकांसवें तान्हाजी त्यांवर पडला । घाबरा गडकरी केला ॥

रणीं तान्हाजी पडे मावळे पळती बाजूला । सूर्याजी येऊन ठेपला ॥

धीर मोडक्या देई परत नेई सर्वांला । उगवी बंधू सूडाला ॥

उदेबान मारिला बाकिच्या राजपुत्राला । घेतलें सिंहगडाला ॥

गड हाती लागला तान्हाजी बळी घेतला । झालें दुःख शिवाजीला ॥

सिंहगडीं मुख्य केलें धाकटया सुर्याजीला । रुप्याचीं कडीं मावळ्याला ॥

पुरंधर माहूली घेई वरकड किल्ल्याला ॥ पिडा जंजिरी सिद्दयाला ॥

सुरत पुन्हां लुटी मार्गी झाडी मोगलाला । मोगल जेरदस्त केला ॥

कैद करी शिवाजी बाकी उरल्या फौजेला । त्यांमधीं अनेक स्त्रीयाला ॥

सुंदर स्त्रीया परत पाठवी नाहीं भाळला । लाजवी औरंगजीबाला ॥

सरनौबत वीर पाठवी खानदेशाला । शुरु केलें चौथाईला ॥

जलदी मोगल धाडी मोहबतखानाला । देई मोठया फौजेला ॥

औंढापट्टा घेऊन वेढी साल्हेर किल्ल्याला । धिंगाणा दक्षिणेंत केला ॥

गुजर उडी घाली सामना शत्रूचा केला । मोरोबा पठाण पंक्तीला ॥

लढतां पळ काढी दावी भ्याला मोगलाला । जसा खरा मोड झाला ॥

तों मराठे पळती मोगल गर्वानें फुगला । आळसानें ढिला पडला ॥

गुजर संधी पाहून परत मुरडला । चुराडा मोगलाचा केला ॥

बेवीस उमराव पाडले रणभूमीला । नाहीं गणती शिपायांला ॥

लहान मोठे कैदी बाकी सर्व जखम्यांला । पाठवी रायगडाला ॥

मोगल वेढा झोडून मार देत पिटीला । खिदाडी औरंगाबादेला ॥रायगडीं नित्य शिवाजी घेई खबरेला । गोडबोल्या गोवी ममतेला ॥

एकसारखें औषधपाणी देई सर्वांला । निवडलें नाहीं शत्रुला ॥

जखमा बर्याष होतां खुलासा सर्वांचा केला । राहिले ठेवी चाकरीला शिवाजीची कीर्ती चौमुलखीं डंका वाजला ।

शिवाजी धनी आवडला ॥ मोगल यवनी शिपायी सोडी चाकरीला । 

हाजरी देती शिवाजीला ॥ पोर्च्युग्यास धमकी देई मागे खंडणीला ।

बंदरी किल्ला वेढीला ॥ मधींच इंग्रज भ्याला जपे मुंबै किल्ल्याला ।

बनया धर्मा आड झाला ॥ दिल्लीस परत नेलें सुलतान माजूमाला ।

दुजें मोहबतखानाला ॥ उभयतांचा बदली खानजाहान आला ।

मुख्य दक्षणेचा केला ॥ मोगलाला धूर देऊन लुटलें मुलखाला ।

गोवळकुंडीं उगवला ॥ मोठी खंडणी घेई धाकीं धरी निजामाला ।

सुखें मग रायगडीं गेला ॥ मोगलाचे मुलखीं धाडी स्वार लुटायाला ।

लुटलें हुबळी शहराला ॥ समुद्रकांठीं गावें लुटी घेई जाहाजांला ।

केलें खुलें देसाईला ॥ परळी सातारा किल्ले घेई पांडवगडाला ।

आणिक चार किल्ल्यांला ॥

चाल 

हुकूम विजापुरी झाला । सोडिलें बहुत फौजेला ॥

द्यावा त्रास शिवाजीला । घ्यावें त्याचे मुलखाला ॥

शिवाजी सोदी गुजराला । कोंडी आबदुल करीमाला ॥

केला माहग दाण्याला । शत्रु अती जेर केला ॥

आर्जव करणें शिकला । भोंदिलें सैनापतीला ॥

निघून विजापुरीं गेला । क्रोध शिवाजीस आला ॥

रागाऊन लिहिलें पत्राला । निषेधी प्रतापरावाला ॥

गुजर मनांत लाजला । निघून वराडांत गेला ॥

चाल 

आबदुल्यानें । बेशर्म्यानें ॥

फौज घेऊन । आला निघून ॥

रावा प्रताप । झाला संताप ॥

आला घाईनें । गांठी बेतानें ॥

घुसे स्वतानें । लढे त्वेषानें ॥

घेई घालून । गेला मरुन ॥

चाल 

प्रतापराव पडतां मोड फौजेचा झाला । पाठलाग मराठयाचा केला ॥

तोफ गोळया पोटीं दडती भिडती पन्हाळयाला । गेले नाहीं शरण शत्रूला ॥

अकस्मात हंसाजी मोहिता प्रसंगीं आला । हल्ला शत्रूवर केला ॥

गुजर दल मागें फिरुन मारी यवनाला । पळीवलें विजापुराला ॥

शिवाजीनें हंसाजीला सरनौबत केला । मोठा अधिकार दिला ॥

हंबिरराव पद जोडलें त्याच्या नांवाला । शिवाजी मनीं सुखी झाला ॥

सेनापतीचे गुण मागें नाहीं विसरला । पोशी सर्व कुटुंबाला ॥

प्रतापराव-कन्या सून केली आपल्याला । व्याही केलें गुजराला ॥

काशीकर गंगाभट घाली डौल धर्माचा । केला खेळ गारुडयाचा ॥

लुटारु शिवाजी सुटला धाक गृह फौजेचा । खर्च नको दारुगोळीचा ॥

बहुरुपी सोंग तूलदान सोनें घेण्याचा । पवाडा गातो शिवाजीचा ॥

कुळवाडी-भूषण पवाडा गातो भोसल्याचा । छत्रपती शिवाजीचा ॥७॥

चौक ८

विश्वासू चाकर नेमी मुलखीं लुटायाला । शिवाजी कोकणांत गेला ॥

छोटे मोठे गड घेई बांधी नव्या किल्ल्याला । जमाव फौजेचा केला ।

गोवळकुंडीं जाई मागुन घेई तोफांला । फितीवलें कसें निजामाला ॥

करनाटकीं गेला भेटे सावत्र भावाला । वाटणी मागे व्यंकोजीला ॥

लोभीं व्यंकोजी हिस्सा देईना बळासी आला । आशेनें फिरवी पगडीला ॥

बंधू आज्ञा मोडून गर्वानें हट्टीं पेटला । बिर्हाेडीं रागाऊन गेला ॥

शिवाजीला राग आला कोट छातीचा केला । कैदी नाहीं केलें भावाला ॥

तंजोर बाकी ठेवी घेई सर्व मुलखाला । खडा कानाला लावला ॥

दासीपुत्र संताजी बंधु होता शिवाजीला । करनाटकीं मुख्य केला ॥

हंबीरराव सेनापती हाताखालीं दिला । निघाला परत मुलखाला ॥

वाटेमधी लढून घेई बिलरी किल्ल्याला । तेथें ठेवी सुमंताला ॥

शिवाजीचे मागें व्यंकोजीने छापा घातला । घेतलें स्वतां अपेशाला ॥

जेर झाला व्यंकोजी देई उरल्या हिश्याला । शिवाजी रायगडीं गेला ॥

विजापूरचा साह्य नेई राजे शिवाजीला । मोगल मुलखीं सोडला ॥

मुलखीं धिंगाणा धुळीस देश मिळीवला । सोडिलें नाहीं पिराला ॥

वाटेमधीं मोगल गांठी राजे शिवाजीला । घाबरा अतिशय केला ॥

भिडला शिवाजी मोगल मागें हाटीवला । वाट पुढें चालूं लागला ॥

दुसरी फौज आडवी माहाराज राजाला । थोडेसें तोंड दिलें तिजला ॥

काळ्या रात्रीं हळुच सुधरी आडमार्गाला । धूळ नाहीं दिसली शत्रूला ॥

फौजसुद्धां पोंहचला पटा किल्ल्याला । फसिवलें आयदि मोगलाला ॥

विजापूरचा आर्जव करी धाडी थैलीला । आश्रय मागे शिवाजीला ॥

हांबीरराव मदत पाठवी विजापुराला । बरोबर देई फौजेला ॥

नऊ हजार मोंगलांचा पराभव केला । त्यांनीं मार्ग अडीवला ॥

विजापुरीं जाऊन जेर केलें मोंगलाला । केला महाग दाण्याला ॥

शत्रूला पिडा होतां त्रासून वेढा काढला । मोगल भिऊन पळाला ॥

दिल्लीचा परत बोलवी दिलीरखानाला । पाठवी शाहाजाहानाला ॥

जलदी करुन शिवाजी वळवी पुत्राला । लाविला नीट मार्गाला ॥

तह करुन शिवाजी नेती विजापुरला । यवन घेती मसलतीला ॥

शिवाजीचें सोंवळें रुचले नाहीं भावाला । व्यंकोजी मनीं दचकला ॥

निरास मनीं होऊन त्यागी सर्व कामाला । निरा संन्यासी बनला ॥

शिवाजीने पत्र लिहिलें बधुं व्यंकोजीला । लिहितों पत्र अर्थाला ॥

वीरपुत्र म्हणवितां गोसावीअ कसे बनलां । हिरा कां भ्याला कसाला ॥

आपल्या पित्याचा ठसा कसा जलदी वीटला । मळावांचून काटला ॥

कनिष्ठ बंधू माझ्या लाडक्या पाठी साह्याला । तुम्ही कां मजवर रुसला ॥

बोध घ्या तुम्ही माझा लागा प्रजापालनाला । त्यागा ढोंगधतोर्यारला ॥

मन उत्तम कामीं जपा आपल्या फौजेला । संभाळा मुळ आब्रूला ॥

कीर्ति तुझी ऐकूं यावी ध्यास माझ्या मनाला । नित्य जपतों या जपाला ।

कमी पडता तुम्ही कळवा माझ्या लोकांला । सोडा मनच्या आढीला ॥

सुभोधाचें पत्र ऐकता शुद्धीवर आला । व्यंकोजी लागे कामाला ॥

शिवाजीला रायगडीं गुडघी रोग झाला । रोगानें अती जेर केला ॥

त्याचे योगें नष्ट ज्वर फारच खवळला । शिवाजी सोसी दुःखाला ॥

यवनीं बिरास भिडतां नाहीं कुचमला । शिवाजी रोगाला भ्याला ॥

सतत सहा दिवस सोसी ताप दाहाला । नाहीं जरा बरळला ॥

सातव्या दिवशीं शिवाजी करी तयारीला । एकटा पुढें आपण झाला ॥

काळाला हूल देऊन स्वतां गेला स्वर्गाला । पडले सुख यवनाला ॥

कुळवाडी मनीं खचले करती शोकाला । रडून गाती गुणांला ॥

चाल 

महाराज आम्हासीं बोला । धरला कां तुम्ही अबोला ॥

मावळे गडी सोबतीला । शिपाई केले उघडयाला ॥

सोसिलें उन्हातान्हाला । भ्याला नाहीं पाउसाला ॥

डोंगर कंगर फिरलां । यवन जेरीस आणला ॥

लुटलें बहुत देशांला । वाढवी आपुल्या जातीला ॥

लढवी अचाट बुद्धीला । आचंबा भुमीवर केला ॥

बाळगी जरी संपत्तीला । तरी बेताने खर्च केला ॥

वांटणी देई शिपायांला । लोभ द्रव्याचा नाहीं केला ॥

चतुर सावधपणाला । सोडिलें आधीं आळसाला ॥

लहान मोठया पागेला । नाहीं कधीं विसरला ॥

राजा क्षेत्र्यांमध्यें पहिला । नाहीं दुसरा उपमेला ॥

कमी नाहीं कारस्तानीला । हळूच वळवी लोकांला ॥

युक्तीहनें बचवी जीवाला । कधीं भिईना संकटाला ॥

चोरघस्ती घेईअ किल्ल्याला । तसेंच बाकी मुलखांला ॥

पहिला झटे फितुराला । आखेर करी लढाईला ॥

युद्धीं नाहीं विसरला । लावी जीव रयतेला ॥

टळेना रयत सुखाला । बनवी नव्या कायद्याला ॥

दाद घेईअ लहानसानाची । हयगय नव्हती कोणाची ।

आकृती वामनमुर्तीची । बळापेक्षां चपळाईची ॥

सुरेख ठेवण चेहर्या ची । कोंदली मुद्रा गुणरत्नालची ॥

चाल 

भिडस्त भारी । साबडा घरीं ॥ 

प्रिय मधुरी । भाषण करी ॥

मोठा विचारी । वर्चड करी ॥

झटून भारी । कल्याण करी ॥

आपासोयरीं। ठेवी पदरीं ॥

लाडावरी । रागावे भारी ॥

चाल 

इंग्लीश ज्ञान होतां म्हणे मी पुत्र क्षेत्र्याचा । उडवी फट्टा ब्रह्मयाचा ॥

जोतीराव फुल्यानें गाईला पुत क्षुद्राचा । मुख्य धनी पेशव्याचा ॥

जिजीबाईचा बाळ काळ झाला यवनाचा । पवाडा गातो शिवाजीचा ॥

कुळवाडी-भूषण पवाडा गातो भोसल्याचा । छत्रपती शिवाजीचा ॥८॥

शिव जयंती पोवाडा

 शिवदर्शन (पोवाडा) – शाहीर आत्माराम पाटील

(चाल : अलंकार)


अलंकार दिव्य पृथ्वीचा, विश्व मोलाचा,


कीर्ति किरणांचा । संगती सूर्य चंद्रमाचा,


छत्रपति वंद्य हिन्दभूचा । प्राण शिवराया मराठयांचा ॥


इतिहास काळाला गती, देई उगवतीं, ज्याची संस्कृती ।


प्रथमतः लोक स्वराज्याची, अतुल अवनी युगपुरुषाची ।सांगतों जन्मकथा त्याची ॥ ती धन्य वीर माऊली,


वनीं प्रसवली, ’हिन्द भू मौली’, पतिवर असतां रणघाई,


रणीं गर्भाचा भार साही । स्वराज्यमाता जिजाबाई ॥


(चाल : दौड )


त्या शूर जनक जननीचा त्रिलोकी डंका ॥


ज्यांनीं दिला शिवाजी राजा आम्हांला बांका ॥


हा त्रिवार मुजरा करुन हिन्दी लोकां ॥


गातो ’आत्माराम’ इतिहास पवाडा ऐका ॥


बहामनी राज्य मोडले, त्याचं पांच तुकडं जाहलं, नांव त्यांचं एक एक भलं ।


कुतूबशाही ? गोबळकोंडयाची ! बारीदशाही ? बिदर शहराची ! इमादशाही ?


वर्‍हाडी मुलखाची ! आदिलशाही ? विजापूराची ! आणि पांचवी ?


आणि पांचवी निजामशाही ती अहमदनगराची ॥


जिथं चांदबीबी झुंजली महाराष्ट्राची ॥


चाल : अलंकार


हें राज्य अहमदनगर, सुलतान गादीवर, कवळं होतं पोर ।


इसवी सोळाशें सव्वीस साला । कारभारी मलिकंबर मेला ।


शहाजी भोंसला त्राता उरला ॥


(चाल : दौड)


इतक्यांत गिळाया निजामशाही मुलखाला ॥


उलटून आला दिल्लीचा मोंगली हल्ला ॥


जो शहाजीनं एकदां होता चोपला ॥


डिवचला साप वळचणींत होता टपलेला ॥


डाव जुना होता शत्रूचा, मुत्सद्दी भेट नीतिचा ।


संकटी घाला घालण्याचा । शूरवीर शहाजी राजाचा ।


सासरा सख्या नात्याचा । जागीरदार सिंदखेडचा ।


माजी नोकर निजामशाहीचा । त्याचं नांव लखुजी जाधव बाप जिजाईचा ॥


ज्याचं धन, त्याच्यावर मनं ! अशा द्यानतीचा ॥ मोंगलांनीं कारस्थान केलं ।


जाधवाला त्यांनीं फितवलं । ’चोवीस हजार’ मनसुबा केला बहाल ॥


मोठया सरंजामदारीचे डबोलं दिलं ॥ पाहून म्हातारं चुटकन्‌ लाल चावलं ॥


दक्खनचे मीठ विसरलं, जाधव आक्खं घसरलं । शत्रूनं कासरं लावून सासरं बांधलं ॥


सासर्‍यानं जांवई सोडून बंड उचललं ॥ जावयानं सासर्‍यासंगं दंड थोपटलं ॥


चाल : स्फूर्ति


सासरा लखुजी जाधव मिळे मोंगलां ।


जांवई शहाजीराजा त्राता निजामाला ।


दारच्या शत्रुंनीं घरांत दावा लाविला ।


राखाया बाळ निजामाला, शहाजी भोंसला,


पणा लागला, ऐका कवनाला ॥


चाल : वीरश्री


महाराष्ट्राची मुस्लीमगादी वांचविण्यासाठीं ।


हिन्दु-मुस्लीम ऐक्य साधलें ध्येय हें मराठी ॥


शहाजीनं विचार मग केला । घेतलं बाळा निजामाला ।


आणि त्याच्या विधवा मातेला ।


चाल : दौड


घेऊन फौज दरबार त्यानं सोडला ॥


वीर-पत्‍नी बाई जिजाई होती संगतीला ॥


पुढं पति मागं दुश्मन बाप लागला ॥


काय करावं अशा समयाला ?


सुपारीवर आडकित्ता आला !


चाल : वीरश्री


दुजी रुक्मिणी विदर्भाची ती महाराष्ट्रमानी ॥


भ्रष्ट पिता विसरुन पतीसह निघे स्वाभिमानी ॥


चाल : दौड


दर मजल करीत हा सेनासिंधु चालला ॥


चाललं लाव लष्कर बांधूनी ढाला ॥


ठाणें जिल्ह्यांत थेट माहुलीचा किल्ला गांठला ॥


चाल : अलंकार


ठाणें जिल्ह्यात शहापूरवरला, कडेकोट भला, माहुली किल्ला ।


कसारा घाटाच्या डोंगराला । काळा पाषाण आहे मढला ।


निळ्या गगनाला उभा भिडला ॥ शूरवीर शहाजी राजानं,


मांडलं सैन्य, दाणावैरण । दारुगोळा समदा वरती भरला ।


शत्रुचीं मुंडकीं उडविण्याला । ठेवला चौफेर खडा भाला ॥


चाल : रणघाई


आलं, आलं ! आलं मोंगल सैन्य माघारीं आलं धडधडा ॥रं मर्दा॥


घेरलं ! घेरलं रान चौफेरी ! चौफेरी घेरलं गडा ॥


रणशिंग ! रणशिंग वाजे रणभेरी !


रणभेरी तोफा धडाधडा ॥ खणखणती ! खणखणती ढालतलवारी !


तलवारी पट्टा फडफडा ॥


खिंकाळे ! खिंकाळे घोडा लष्करी ! लष्करी दणाणे कडा ॥


लावी सुरुंग शत्रु खालीं । तटावरची आग ये भालीं ।


साथ


त्याचा जिताच भाजून हुरडा झाला खालीं ॥


शत्रुची तटाला शिडी । शिडीसहित ढकलावा गडी ॥


साथ


त्याची उभ्या कडयाच्या दरींत तिरडी गेली ॥


जो शत्रु पायाला भिडला । उकळता पाणी वर पडला ॥


साथ


पाण्याची धार मुडद्याच्या हाडांना चढली ॥


जो शत्रु तटावर चढला । आरपार कंठांतून भाला ॥


साथ


त्याच्या मुंडकं आणि देहाची फाळणी झाली ।


चाल : विजया


आगीचे लोळ किती यावं । थबकावून धूळ विझवावं ॥हे दाजी र॥


किल्ल्याला उलटं फेकावं । रानसिंग शत्रु जाळावं ॥


शत्रुच्या वेढया बाहेर । अंधारांत आमचं हेर ॥


जाळीतनं चंद्र निघणार । शीर छाठून गारोगार ॥


दोन्हींकडून खाऊनी मार । झालं मोंगल जर्जर फार ॥


खालीं वणवा वरती धूर । आंत रणाचा हाहाःकार ॥


चाल : स्फूर्ति


घनघोर चाले संग्राम किल्ल्याच्या भंवतीं ।


तोफांनीं हादरे ठाणें जिल्ह्याची धरती ।


नरमांस खावया गगनीं गिधाडें फिरती ।


सहा महिने चालला लढा, उठेना वेढा, किल्लाहि खडा, झुंजवी छाती ॥


पाहून शहाजीचा जोर, सासरा चोर, मोंगल सरदार, लखुजी जाधव गार झाला ।


लढाई करण्याचा जोम सरला । कपटाचा खेळ सुरु झाला ॥


चाल : हळहळ


जाधवानं डाव फिरविला ॥जी॥


भेटे निजामाच्या आईला ॥जी॥


लाघवी बोल बोलला ॥जी॥


"बाईसाहेब ! कां सोसतां यातना जीवाला ?


करा तह मिळा मोंगलां । तुम्ही अहमदनगरला चला,


देतों राज्य तुमचं तुम्हांला । मी रहातों तुमच्या दिमतीला ।


माझा शब्द लाखाच्या मोला । हा स्वार्थि शहाजी भोंसला ॥जी॥


तो गिळील तुमच्या मुलखाला ॥जी॥


त्याचा काळा डाव साधण्याला ॥जी॥


तुमच्या आमच्यांत तंटा लावला ॥जी॥


फंसूं नका ! फंसूं नका, अशा प्रसंगाला ! सावधान !


देतों इशार्‍याला !" अशी ऐकून बात, काय सांगूं मर्दा मात,


भोळी बायांची जात । पाघळून देई हात लखुजीला ॥ जी॥


परक्यांचा शब्द ऐकला, टोचून बोले घरच्याला । तिचा शब्द विषारी आला,


झोंबला शहाजी राजाला । झाली फितूर शत्रूला बाई, धन्याची आई,


बघा धन्यापायीं । शहाजी, दुष्मनाशीं लढला । धनीच तो शत्रुस वश झाला ।इमानाची दुनिया नाहीं बोला ॥ माहूली डोंगरी किल्ला ।


घनदाट रान भंवताला । रणरंग भंग जाहला ।


किल्ल्याभंवतीं लढाई, तटावर हातघाई, आंत होती जिजाबाई ।


सात महिनं गेलं होतं तिला ॥जी॥


गरोदर जिजाबाईला । जरि सातवा महिना चालला ।


तरी दगड, माती, चिंचा खा नव्हता असा डोहाळा ॥जी॥


ऐका हो, डोहाळं कसं जिजाबाईला ॥


चाल : दामिनी


बुरजावर झुंजे भरतार, तिरकमठं चालवी नार ॥


चिलखतं तंग अंगाला, कुठं बत्ति देई तोफेला ॥


धुमधडाम धूर गगनाला, त्या धुरांत चमके चपला ॥


आईची माया घायाळा, दे स्फूर्ति लढणार्‍याला ॥


चाल : वीरश्री


मूर्तिमंत ती समर वीरश्री चेतविते किल्ला ।


मुक्ति रणाचे शौर्य डोहाळे तिथें जिजाईला ॥


मातृगुणांची कूस घडविते उदरीं बाळाला ।


स्वराज्यकर्ता रणमर्दिनीच्या कुशींत गुण शिकला ॥


चाल : चिंता


फितुरीनं केला घात, राजावर शत्रुचा दांत ॥


आलं मरण उद्यांच्या आंत । कशी टळत आजची रात ॥


झालीं दोघं चिंताक्रांत । सटकायचा केला बेत ॥


चाल : समता


सटकायचा बेत जरी केला शहाजी राजानं ।


तरी इतिहासकार होतं वीरांचं ध्यान ।


थांबतां इथं किल्ल्यांत निकामी मरण ।


पण फरार होतां म्हणतील बेईमान ॥


बेईमान ॥ सांकडं सोडवायला, राजानं मार्ग काढला,


आपुल्या सख्या भावाला ॥ शरभोजी भोंसला याला,


हा प्रसंग समजाविला । भावानं हात पुढं केला,


लक्ष्मण बोले रामाला । तुम्ही खुशाल लागा वाटेला,


ही स्वामिनिष्ठेची तुला, भारोभार पुरी करण्याला ।


वाहीन प्राण आपुला ।


चाल : दौड


बोलतां दोन्ही भावांचा गहिंवरे गळा ॥


शरभोजी राही किल्ल्यांत स्वामिनिष्ठेला ॥


आगींत एक; फोफाटा नेई दुसर्‍याला ॥


माउली जिजाबाईला, एक बाळ पहिला चिमुकला,


होता चार वर्षांचा झाला । नांव होतं संभाजी त्याला !


तोही छावा संगं घेतला, निवडक वीर जोडीला ।


तलवार, भालं हातांत ! पाठीला ढाला ॥


एक त्यांत वायुवेगाचा वारु निवडीला ॥


जाहली जिजाई स्वार घोडा नाचला ॥


अन् समद्या वीरांनीं लगाम तंग ओढला ॥


फुरफुरलं घोडं ! दरवाजा जरा करकरला ॥


चाल : अलंकार


रणधीर शहाजी राजानं, केलं उड्डाण, रात्र भिणभिणं ।


वेढा फोडून घोडा सुटला । टापांच्या विजेत मार्ग दिसला ।


आडवा फिरला तो उभा चिरला ॥ भरधांव वारुवर स्वार ।


जिजाबाई शूर, कटीं तलवार । रिकिबींत पाय लगाम हातीं ।


हिन्दस्वराज्याचा ठेवा पोटीं । घेऊन दौडली सांबशक्ति ॥


घोडयांनीं तुडविती अंगा, शत्रु झाला जागा, जो तो करी त्रागा ।


’पकडो रे दौडो शहाजी भागा ।’ लेक-जांवई गेल्या मागा ।


सासरा लागला पाठलागा ॥


चाल : दौड


धडधडा शहाजी राजा पुढें चालला ॥


विजापूरच्या आदिलशहाची साथ घेण्याला ॥


माहुली विजापूर पल्ला । तीनशें मैल तो भला ।


दिसरात नाहीं पाहिलं ! मार्ग तुडविला ॥


महाराष्ट्र-धरणीचा रोमरोम शहराला ॥


तरुकडी कपारीनं आड पहारा दिला ॥


तितक्यांत आडवाटेनं पल्ला काटला ॥


पण घरचा बगळा पांढरा उडतो गगनाला ॥


त्याला हेरुन मोंगल सेनेनं माग काढिला ॥


चाल : वीरश्री


पुढं चालला महाराष्ट्राचा शहाजी रणधीर ।


मागं लागली मोंगलसेना प्रचंड दळभार ॥


पतीसवें ती फेकीत घोडा जिजाई गर्भवती ।


दौडत होती फर्लांग मारीत सह्याद्रीवरती ॥


घौडदौड शिकविली बाळाला आईनें उदरीं ।


अश्वपाळणा झोकित होती शौर्याची दोरी ॥


चाल : स्फूर्ति


लागला पाठीला क्रूर शत्रु सेनानी । पुढें उभे दरी डोंगर उतरणी ।त्या ओलांडीत दौडली राष्ट्रनंदिनी । रखरखीत उन्हाच्या झळा,


नाहीं सवड पाणी पिण्याला । किती दगड धोंडा तुडवीला ।


दौडली मैल शंभर, दुखावे उदर, थांबले वीर, खुल्या मैदानीं ॥


चाल : गजगामिनी


बाईचा अश्व थांबला कांस कंठाला, श्वास कोंडला, आली अंधारी ॥


डबडबला घाम अंगाला, जोम संपला, लगामहि सुटला, राजा सांवरी ॥


पाठीस शत्रुचें दळ, उडवितें धूळ, भरलें आभाळ, पाही माघारी ॥


पोटास गर्भाची कळ । चालवेना एक पाऊल । झाली जिजाबाई व्याकुळ ।


जर भिडला शत्रु येऊन, अटळ त्यातून, पतीचें मरण, आठवे नारी ॥


काळजाचें पाणी झालें । डोळ्यांचे इंगळ बनले । धगधगते अश्रु गळले ।


चाल : वीरश्री


क्रोध अनावर वीरांगनेची थरथरते काया ।


तप्ताश्रूंत दाखवीते पतीला गर्भाची माया ॥


ती महाराष्ट्र रागिणी, हा कठिण समय देखुनी ।


बोलली वीराला रमणी ।


चाल : स्वयंसिद्धा


तुम्ही चला पुढें प्रिय नाथा । सोडून पंथिं मज आतां ॥


सौभाग्य वांचवा माझें । वांचवा महाराष्ट्राचें ॥


ग्रासाया येती काळ । चुकवा हो चुकवा वेळ ॥


चाल : मौलिक


ते जिजाबाईचे बोल । मोलाचे, मोलाचे ॥


संकटांत सेनानीच्या । तोलाचे, तोलाचे ॥राखती तिथें अवधान । राजाचें, राजाचें ॥


चाल : अलंकार


राजाला सुचला विचार । जवळ एक शहर,होतं जुन्नर ।


तिथं एक होता मित्र दिलदार । नांव श्रीनिवासराव सरदार ।


स्वतंत्र होता मुलूख परिवार ॥ मित्राला हवाला दिला ।


जवळ आहे भला । शिवनेरी किल्ला । उंच कडणीच्या डोंगराला ।


किल्ल्यांत ठेवलं जिजाईला । धन्य तो मित्र तैनातीला ॥


चाल : समता


सोबती ठेविला बाळकृष्ण हणमंत ।


सोनाजीपंत नी शामराव नीलकंठ ।


रघुनाथराव बल्लाळ मर्द गुणवंत ।


सैनिक पांच पंधरा धीराला देत ॥


गर्भार अस्तुरी ठेवुन शिवनेरींत ।


गांठणें विजापूर केला पुढचा बेत ॥


परि वियोग दुःखें व्याकुळ बनले चित्त ।


अन प्राण उभे राहिले चार डोळ्यांत, चार डोळ्यांत ॥


चाल : वीरांगना


त्या मरणाच्या मार्गांत । जिवनाचे निरोप झाले ॥


संभाजी सवे घेऊन । राजश्री स्वार निघाले ॥


दाटला कंठ बाईचा । अश्रूंतून शब्द उमटले ॥


’सांभाळून जाहो नाथा । भेटूं किं न भेटूं आतां ।


तारील भवानी माता ॥’ ते दोन जिवांचे बोल ।


तिसर्‍या हृदयाला पटले ॥ धरणींत बीज अंकुरतां ।


अभ्रानें सूर्या गिळलें ॥ लतिकेला फळ जों धरलें ।


वृक्षावर वादळ आलें ॥ तें स्वराज्य गर्भी असतां ।


पारतंत्र्य भंवतीं फिरलें ॥ तोडाया त्याचा पेंच ।


सोसून दुःखाची आंच । घोडयास मारिली टांच ।


तोडून बेडी मोहाची । कर्तव्य फरारी झालें ॥


चाल : अलंकार


गेले सोडून शहाजीराजे, तडफ ऐसाजे, विजापूर मौजे ।


राजाची नव्हती पाठ फिरली । तोंच मागं मोंगल फौज आली ।


जुन्नर गांवाची जिद्द कळली ॥


चाल : छक्कड


सासर्‍याच्या हातावर तुरी, दिल्या शिवनेरी, ठेवुन अस्तुरी, फरार जांवई ।


हे कळलं सासरोबाला । लखू जाधवाला । चेहरा उतरला, देतो जांभई ॥


रग जिरली पाठलागाची । वैरी बापाची, आतां लेकीची आठवण झाली ।


भेटाया जिजाबाईला । किल्ल्यावर गेला । पाहून पोरीला । आंसवं आलीं ॥


त्या उंच डोंगरी गडांत, तटाच्या फडांत जिजाई होती ।


किल्ल्यांत नव्हे म्यानांत रक्त समशेर कोंबली होती ॥


पाहून तिथें लेकीला, उमाळा आला, पुढें जाण्याला, पाय लटपटती ।


जरि पोटीं मायेची ओढ, काळं थोबाडं, थांबलं घुबडं, देखतां ज्योती ॥


ती खंबीरतेची गंभीर मुद्रा खोंचक भेदक दृष्ठी ।


जणुं व्याधासाठीं जखमी वाघीण जाळींत टपली होती ॥


थरथरे बापाची काया । उफाळे माया, हांक माराया, फुटेना कंठ ।


ती स्वाभिमानी नंदिनी, पिता पाहुनी, संतोषे मनीं, झाली आरक्त ॥


ती पतिविरहाची विव्हल संध्या सु-रक्तलोचन दिसली ।


अन् गर्भित रविची अरुण गुलाली मिश्रित विलसे गालीं ॥


बापाला हुंदका आला, अनावर झाला, बोले लेकीला, शब्द अडखळले ।


बोलतां कंप कंठांत, कंप ओठांत । अश्रु नयनांत । मायेचे भरले ॥


(लखुजी जाधव---) जीजाऊ ! बाळ गुणवंती । धन्य तूं सती, फिरली माझी मती,


कष्ट तुज पडले । युद्धाचा कैफ विषारी, जाहलों वैरी, क्रोध आवरीं, क्षमा कर बाळे ॥


मी पिता निर्दयी क्रूर । विसरुनी पोर, शत्रूचें घर, स्वहस्तें भरलें ।


तूं पतिपितयांचें कूळ । केलें उज्ज्वल, मीच चांडाळ क्षमा कर बाळे ॥


तूं गर्भवती अति कोमलं माझ्या वनांतली कर्दळी गे ।


परी मीच तुला गांजिलें हाय ! परचक्राच्या वादळी ॥ क्षमा कर बाळे ॥


तूं सिंहीण महाराष्ट्राची व्याकुळ उदरीं प्रसूति कळ गे ।


मी तुझ्याभोंवती सह्यवनाला झालों वडवानळ ॥


क्षमा कर बाळे ॥ गे तुझ्या अर्धवचनांत ठेविल्या अनंत सजणी दासी गे ।


पण मीच आज डोंगरीं गडावर केलें तुज वनवासी ॥क्षमा०॥


तूं चंद्र-कलेंतील सुहास्य शालीन चंद्रमुखी कामिनी गे ।


परि आ गमे संतप्त मेघलक्तरांत सौदामिनी ॥क्षमा०॥


तूं मखमाली गादी गिर्द्यांची लाडीक राजस युवती गे ।


परि गगनाखालीं इथें मोकळ्या भेसूर दगडी भिंती ॥क्षमा०॥


चल नेतो तुला माहेरीं, ऊठ लवकरीं, लाडक्या पोरी, नको रागाऊं ।


बापानें केला अपराध, घेईं पदरात, बोल एक शब्द, बाळ जीजाऊ ॥


या शिवनेरी किल्ल्यांत, घोर रानांत, भरल्या महिन्यांत, नको तूं राहूं ।


माहेरीं आईची माया, रोप निपजाया, निंबाची छाया, बाळ जीजाऊ ॥


(पडद्या आडून शाहीर गात आहे---)


चाल : कोंकवती


अजुनी नव्हता शब्द निघाला जिजाबाईच्या वदनीं । हो॥


तप्त गालावर वितळत होतें काळीज गंगा-जमुनी ।हो॥


असह्य आतां दोन लोचनां अलोट माया पाणी ।हो॥


थरथरल्या अधरांची झांपण खुलली उसळे वाणी ।हो॥


घेतली दोन्हीं तळ हातांवर तलवार । टाकलीं पाऊलें पित्यासमोर चार ।


ठाकली उभी नजरेस भिडवुनी नजर । सद्गदित निघाले तीव्र शब्द झणकार ॥


(जिजाबाई म्हणते----)


चाल : मानिनी


जें सौभाग्यावर उठले । तें माहेर माझें तुटलें ॥


तुम्हीं चंद्र सूर्य अरि बनले । देशावर नभ कोसळलें ॥


तुम्हीं रण परकारण धरलें । रामावर भार्गव उठले ॥


हे तात ! मागणे उरलें । द्या मरण पतीच्या पहिलें ॥


घ्या खङग हातीं हे उभी पुढें मी लेक । महाराष्ट्र-ब्रिदाच्या अभिमानाची नेक ।


ही गर्दन झुकली वार करा बस एक । कीं सासर माहेर फिटलें ।


धड ठेवा शीर न्या अपुले ॥ जें सौभाग्य०॥


जा तरि, ना गळसरीवरची ॥ चुकवून तलवार पित्याची ॥


उरली सहचारीण पतीची । पण मेली कन्या तुमची ॥


वनवासी वनराजाची । मी वनराणी वनीं राजी ॥


मी राष्ट्रोद्धारक मराठमोळं कलत्र । स्वातंत्र्य आमुचें अमोल मंगलसूत्र ।


मत्प्राणपति नि सत्‍पुत्र सकल गणगोत्र । देशाला अर्पण केलें ।


तुम्हीं देशद्रोही बनले ॥ जें सौभाग्या०॥गड माझा श्रीशिवनेर । हें मायेचें माहेर ॥अंगण महाराष्ट्र समोर । वृंदावन गिरि कांतार ॥


हें कृष्णशिलासन सदर । पुष्पलता भरतील पदर ॥


चांदण्या झुंबरें रातकिडे स्वरकिन्नर । ही आई शिवाई देवी करील सुयेर ।


या कडणी शमवतील प्रसवकळांचे सूर । हें स्वराज्य मन्मनीं भरलें ।


डोहाळे यांतच पुरलें ॥ जें सौभाग्या०॥


या फुलत्या वनवेलीचा । आईला निरोप सांगा ॥


तुटलें मूळ माहेराचें । नको शिंपूं अश्रू गंगा ॥


दे वर अमृतवाणीचा । या रणरंगांतील भांगा ।


या पुढें न वदणें ! तात ! वंदितें चरणें । बोललें वेंचणें कीं गृहकंदन करणें ।


पण तुटल्या वेलीस तिच्या तरुवर मरणें। द्या सौख्य हेच शेवटलें ।


जा उतरा गड जो चढले ॥जे०॥


(जिजाऊ एका बाजूनें व खिन्न पावलानें लखूजी दुसर्‍या बाजूनें जातात---पुढें शाहिराचा पोवाडा सुरु---)


चाल : कोंकवंती


नच शब्द टाकिला पुन्हां पित्यानें ! टाकित जड पाउलें ।


उतरले, लखुजी गड उतरले ॥ नच वळून पाहिलें पुन्हां बिजलीनें !


गगन किती फाटलें । तेज तें शिवनेरींत बिंबलें ।


ती दगड कडी गडवाट वांकडी तिनें हुंदके दिले ।


उतरले, लखुजी गड उतरले ॥ वर कठोरता कर्तव्य देवता शोकाकुल तळमळे ।


तेंज तें शिवनेरींत बिंबलें ॥ त्या शिवनेरीच्या कढणीवरुनी पारतंत्र्य घसरलें ।


उतरले, लखुजी गड उतरले ॥ वर ’पूर्णमास’ वेदना सोसुनी स्वातंत्र्य जन्मलें ।


तेंज तें ब्रह्मांडी फांकलें ॥


साथ : टाहोचा आवाज


टाहो फोडतां शिवनेर, गगनामाजीं घुमला सूर ।


विश्वांत झाला चमत्कार । सांगतो ’आत्मा’ शाहीर ।


ऐका सारे नारीनर । गगन निळें हें गार ।


ग्रह तारे खालींवर । मध्यभागीं सूर्य स्थिर ।


धरणीपति परमेश्वर । धरणी आमुची गोलाकार ।


भंवर्‍यावाणी गर्र गर्र गर्र । गिरक्या मारीत चक्राकार ।


पति सभोती फिरते नार । एका गिरकींत आठ प्रहर ।


आठ प्रहरांचा एक वार । तीनशें साठ गिरकींत पार ।


प्रदक्षिणेचा एक घेर । खेळ मेनका-विश्वामित्र, चालला असे अधांतर ।


अनादि अंत निरंतर । एका गिरकींत चमत्कार । पाही स्थिर प्रभाकर ।


गिरकी होती पाठ म्होरं । दिसत होता छानदार; कपोलाचा अरुण मोहोर ।


तोंच घडला प्रकार । शके १५४९ शुभंकर, प्रभव नाम संवत्सर, वैशाख शु.१ वासर ।


उत्तररात्र गुरुवार, अश्विन नामें नक्षत्र ६ एप्रिल दिनक्षर, १६२७ सुंदर ।


असतां सालमजकूर, दिव्यध्वज फडकणार, घेऊन पृथ्वीनें खांद्यावर ।


गिरकी मारली पूर्णाकार, पति सन्मुख ती आली नार । ध्वज पाहतां झोकदार ।


नेत्रीं दीपला प्रभाकर । सूर्य विचारी धरणीला, पति अपुल्या भार्येला,


सांग प्रिये सांग मला । दीपववीता माझा डोळा, तळपणारा अंतराळा,


झांक देवा ब्रह्मांडाला । दिव्य झेंडा ऐसा भला, काल नव्हता देखियेला,


आज कैसा गे आणिला ॥ कशी गमे स्त्री जातीला ?


एका गिरकीत एक कला । सांग प्रिये सांग मला ॥


मुक्त छंद


धरणी सांगे सूर्याला । ऐका नाथा सांगता हे ।


मंगळसूत्र तुमचें मला निसर्गानें दिलें आहे ॥ध्रु०॥


भूगोलाची हिरवी साडी । श्यामलांगी ल्यालें आहे ।


रामकृष्ण पैगंबर, येशू बुद्ध यांनीं वर, अबदागीर धरलें आहे ॥धरणी०॥


स्त्री जातीचा जीव सारा । दागिन्यांत अडला आहे ।


इतिहास सोनारानें एकेक नग घडला आहे ॥धरणी०॥


कोलंबस कमरपट्टा । तंग अंगी जडला आहे ।


अलेक्झांडर--सिकंदर वज्रचुडा मढला आहे ॥धरणी०॥


अकबर आणि चंद्रगुप्त । चंद्राहार चढला आहे ।


नेपोलियन सोनाराच्या । अलमारींत पडल आहे ॥धरणी० ॥ जगभर थाट आहे । राजपाट अर्थ आहे ।


परि जेथें समता नाहीं । तेथें सारें व्यर्थ आहे ॥धरणी ०॥


वारुळाचा साप सम्राट मोठा असून खोटा आहे ।


स्वराज्याचा छत्रपति छोटा असून मोठा आहे ॥धरणी ०॥


सम्राटांच्या शृंगारांना गुलामींत विटलें आहे ।


स्वराज्याचा झेंडा आज हातीं घेऊन उठलें आहे ॥धरणी ०॥


तुम्हीं म्हणाल, "वसुंधरे, तुझें सारे खोटें आहे" ।


डोकावून पहा नाथा, शिवनेरींत बेटें आहे ॥धरणी०॥


जिजाईच्या कुशीमाजीं शहाजीचा बंडा आहे ।


भारताचा शिवाजी या वसुधेचा झेंडा आहे ॥धरणी ०॥


आजपासून रायाभंवतीं झेंडयावांचून फिरणार नाहीं ।


शास्त्रज्ञांना झेंडा माझा कवि वाचून कळणार नाहीं ॥धरणी० ॥


काय म्हणतां प्रिये थांब ! इश्श ! मला वेल नाहीं ।


शिवनेरीला टाहो फुटला साधासुधा खेळ नाहीं ॥धरणी० ॥


(टाहोचा आवाज--पुढें पोवाडा)


फुटला टाहो शिवनेरीला हिंद-स्वराज्याचा ।


पश्चिमेसही प्रकाश पडला प्रदीप्त पूर्वेचा ॥


शिवनेरीच्या माळ्यावरुनी शेत राखणीचा ।


सुटला धोंडा भिरभिरता त्या सह्य गोफणीचा ॥


धन्य माउली जिजाई ॥ दुनियेला साम्राज्य लांडगे असतां भंवतालीं ।


मराठी जाळींत जिजाई सिंहीण स्वराज्यास व्याली ॥युगपुरुषाच्या जगजननीचे फिटतील का पांग ।


हिन्द देवीनें हिमाद्रि वरुनी दिली जरी बांग ॥


फुटतां टाहो शिवनेरींत, ऐकतां सख्याचा साद,


संवंगडी आलं दुनियेंत । तानाजी उठवी उमराठं,


खाई पासलकर कोलांट, डोकावला हिरोजी फर्जंद ।


नेताजी बाजी दणकट, जिव्या महाल्या वळवी मूठ,


दिला फिरंगोजीनं नेट । आलं बहिर्जीचं सोंगाट ।


कुठं येसाजीचा गोंगाट । कुठं रामजन्म पावत !


कुठं झाला अंजनी सुत ! कुणी भालदार पुढं येत ।


कुणी हडपी माघं धांवत । एकदांच फुलवूं महाराष्ट्र ।


होता सगळ्या आयांचा बेत । वटवृक्षावाणी महाराष्ट्र ।


फांदोफांदीं पाळणा फुटं । केली रानमातीची तीट ।


पंचगंगांना चिरगूट । सूर्यासंगें किरणें यावीं धरणी दिपवीत ।


शिवबासंगें तसे जन्मले महाराष्ट्र दूत ॥


चाल : अलंकार


शिवनेरीं बाळ जन्मलें । विजापुरीं कळलें ।


राजे तोषले । कंठा अर्पिला जासूदाला ।


हात जोडिले भवानीला । सोहळा चाले शिवनेरीला ॥


आवतनं केलं मुलखाला, मांडला जन्म सोहाळा,


नरनारी जमला मावळा । आनंदी आनंद झाला,


पूजिलें शिवाई मातेला, वंदिलें सूर्य देवाला ।


प्रार्थिलें हिन्द देशाला, उद कापराच्या गंधाला ।


सह्याद्रि लुब्ध जाहला, साजणी सुवासिनीला ।


वायणं वाटलीं सर्वांल । बाळतिणीसंगें बाळराज भूषविला ।


सजवितां पाळणा जिजाईंनीं गाईला । शाहीर ’आत्माराम’ तोच गातो आजला ।


ऐका हो आयाबायांनों, मराठमोळ्यांनो, भारतीयांनो झोंका घातला ॥


शाहिस्तेखानाचा पराभव पोवाडा

 शाहिस्तेखानाचा पराभव (पोवाडा) - शाहीर पां.द.खाडिलकर


नाश कराया शिवरायाचा आला शाहिस्ताखान ॥


छाटुन बोटें दूर पळविला; । धन्य शिवाजी भूरमण ! ॥ध्रु०॥


चौक १


केला धुमाकूळ शिवरायानं संकट मोंगल-राज्याला ।


स्वातंत्र्याच्या मुळ्या भेदिती अभेद्य मोंगल-भिंतीला ! ॥


चिरे धडाधड पडूं लागले, बुरुज कोसळे धरणीला ! ।


शिवशक्तीच्या तोफेमधुनी सुटला भीषणसा गोळा ! ॥


शिवतेजाची वीज देतसे झटके औरंगजेबाला ! ।


कांहीं सुचेना, अन्न रुचेना, झोपहि ये ना नयनाला ! ॥


भगवा झेंडा फडफड फडके भूषण वार्‍याला झाला ।


फडफड करुनी गगनी बोले, ’धन्य शिवाजी अवतरला !’ ॥


दर्‍याखोर्‍यांतुन मैदानांतुन पाउल टाकी शिव जेव्हां ।


विजयश्रीचीं फुलें उमलती त्या त्या स्थानीं मग तेव्हां ॥


फिरंग फिरवी शिवबा इकडे, तिकडे मोंगल गडबडला ! ।


टाप घोडिची ऐकुनि तिकडे शाहा कासाविस झाला !! ॥


दर्प असा हा शिवशक्तीचा सहन होइना दिल्लीला ।


रात्र्म्दिन नच झोप कुणाला, काय करावें शिवबाला ! ॥


विचार ठरला, दूत निघाला आला दख्खन देशाला ।


बादशाहाचं पत्र दिलं मग त्यानं शाहिस्ताखानाला ! ॥


"चला, मरा, तुम्हि कांहि करा, पण धराच या शिवचोराला ।


सरा न मागें, घरा न जावें, चराचरा शिवचोर चिरा !" ॥


बादशहाचं पत्र असं हे वाचुन शास्ताखान जरा ।


मनीं चरकला, विषण्ण झाला क्षणिं कोमेजुन ही गेला ! ॥


शुभ्र लोंबत्या दाढीवरचा रंग लगोलग पालटला ! ।


हात मस्तकावरती ठेवुन करि तो घोर विचाराला ॥


"काम असे हें अवघड मोठें शिवा न सोपा धरण्याला ।


पिशाच्च चेटुक अनुकुल त्याला कसें धरुं सैतानाला !!" ॥


स्वारीचा पण निश्चय केला शूर शिपाई जमवीला ।


फौज घेउनी खान चालला शिवरायाला धरण्याला ॥


जातां जातां बेत ठरवला चाकण किल्ला घेण्याला ।


वेढा दिधला मग खानानं सत्वर, चाकण किल्ल्याला ॥


प्रकार पुढचा काय जाहला सांगिन पुढच्या चौकाला ।


धन्य शिवाजी रसिकजनांनो ! ऐका श्रीशिवकीर्तीला ॥१॥


चौक २


नरसाळा फिरंगोजी वर । होता किल्लेदार ।


मोठा बाणेदार । झाला तय्यार संग्रामाला ।


केले घनघोर लढाईला । अस्मानांत धुरळा सारा भरला ! ॥


आटोकाट झगडा त्यानं केला । किल्ला लढविला ।


उपाय पर थकला । खानानं केलं कैद त्याला ।


किल्ला खानाच्या हातीं गेला । नरसाळा धन्य धन्य झाला ! ॥


चाल


शाहिस्ताखान मग त्याला । काय बोलला सांगतों तुम्हांला ।


"र्‍हा आतां आमच्या चाकरीला । चढवीन मोठया हुद्याला ।


शिवा काय देणार तुला ? । शिवाजीचा नाश करण्याला खान हा आला ॥


शिवाजीचा नाश खास झाला । असं समज आज या वेळा ॥


कोल्ह्यानं सिंहाशीं झगडा कधीं काय केला ? ॥


शिवा चोर बंडखोर झाला । चल माझ्यासंग या वेळा ।


पकडुया बंडखोराला !!" । असं बोलला खान हो त्याला ।


फिरंगोजी लालेलाल झाला ! । फिरंगोजी बोलला खानाला ॥


चाल


"शिवाजीचा बंदा नोकर । नरसाळा अस्सा राहणार ! ॥


शिवाजीच्या पायावर शीर । ठेविन मी, तोच मज प्यार ॥


शिवराय माझा रे मोर । शिवराय चंद्राची कोर ॥


चाल


बडबडसी व्यर्थ या वेळा । जंवा पाहशी खाना !


तूं त्याला । तंवा दरदरेल घाम अंगाला ।


दांतखिळी बसेल तोंडाला । शिवराय सिंह रे झाला ।


लोळविले कैक भूमिला । करुं नको त्याच्या निंदेला ।


जाऊं नको त्याच्या वाटेला । माझ्यासारखे कैक रे वीर त्याच्या पदराला ॥


परतून जा जा माघारा । अन् सांग बादशाहाला ।


कीं शिवाजीला कैद करण्याला । गेलों होतों---आलो माघारा ! ।


जो करील कैद शिवाजीला । असा एवढा सार्‍या दुनियेंत कोण हि न झाला !!" ॥


चाल


ऐकुनी बोल वीराचे । खान मनीं गारेगार झाला !


पाहून स्वामिभक्तीला । खानाला संतोष झाला ! ।


खानानं सोडलं मग त्याला । अन् त्याचा मोठा गौरव केला ॥


चाल


शिवरायाकडं पाठवलं त्यानं मग त्याला ॥


चाल


चाकणचा किल्ला घेऊन । चालला जल्दीनं ।


मोठया ऐटीनं । पुण्यामंदि थेट खान आला ।


शिवाजीचा वाडा त्यानं घेतला । ऐका प्रकार काय झाला ॥२॥


चौक ३


शिवाजीच्या महालामधिं खान । राहिला येऊन ।


बंदोबस्तानं । जागजागीं ठेवलं शिपायाला ।


हुकुम मनाईचा हत्त्याराला । वेशीवर पहारा रोज बसला ! ॥


खानाच्या परवान्यावीन । फिरकेना कोण ।


पाखरुंहि लहान । एवढा त्यानं बंदोबस्त केला ।


धाक शिवाजीचा वाटे त्याला । रात्रींही झोंप न डोळ्यांला ! ॥


सिंहाच्या गुहेमधिं जसा । ससा कसाबसा ।


शिरावा तसा । शिरला पुण्यामंदि खान ते वेळा ।


मगराच्या दाढेला हात । हात लावला त्यानं निभ्रांत ।


निभ्रांत जाहला भ्रांत । झाला काय वात ।


कळेना मजला ! ॥ शिवराय होता सिंहगडीं ।


घेउन सवंगडी । विचार घडोघडी । घडविती किल्ल्यावरती ते वेळा ॥


शाहिस्ता आला चालून । पुण्यामंदि राहिला येऊन ।


काढावा कसा हुसकून । विचार जोरानं असला हा झाला ॥


पाठवला एक ब्राह्मण । शिवरायाने । पुण्यामंदि त्यानं ।


जाऊन वश केलं एका मराठयाला ॥ एक खोटया लग्नाचा घाट ।


घाट घातला बीनबोभाट । वरातीचा रात्रीला थाट ।


कैला ऐटींत । लोक किति जमला ! ॥


चाल


घाट कात्रजचा जवळ झाला । तीन कोसाच्या अंतराला ।


शक्कल सुचली शिवाजीला । खानाची फौज चकविण्याला ।


पोत बांधवले हो झुडपाला ! । कात्रज घाटांत ते वेळा ।


पोत बैलांच्या हो शिंगाला ! । बांधले खानाला ठकविण्याला ।


झुडपं झालीं साहाय्य शिवाजीला । पशुपक्षी झाले साहाय्य त्याला ।


दुसरा जणु रामचंद्र आला ! । नंदी झाले साहाय्य शंकराला ! ।


गाऊं किती त्याच्या पोवाडयाला ? । इकडं असा त्यानं बेत केला ।


अन्‌ एका बोलावलं मावळ्याला । गवताचा भारा दिला त्याला ।


भार्‍यामंदि घातलं तलवारीला ! । मावळा पुण्यामंदि घेउन गेला ।


तंवा शिवाजीनं । दहा वीस जण । मावळे घेऊन ।


वेष पालटून । सोडला गड, पुण्यामंदि आला ।


काळोख काळा कुट्ट भरला । वरात आली होती गणपतीला ।


गर्दिमंदि शिवराय हो शिरला । ऐकावं र दादा ॥३॥


चौक ४


लाल महालामधीं येऊन राहिला जरि खान । तरि हालचाल होईना शत्रुपासून ।


खानाला वाटलं शिवराय गेला घाबरुन । बंदोबस्त मोठा पाहून ।


खानाचं मन । होतं प्रसन्न ॥ चहुकडं सामासूम झाली ।माणसं झोंपली । गाढ झोंप आली । खानाला, नव्हतं त्याला देहभान ।


भररात्रीं खिडकी उघडून । शिवराय आणि चार जण । गेले घुसून ! ॥


खानाचा मुलगा ठार केला । झाला गलबला । खान जागा झाला !


पाहतो तों दिसला काय प्रकार । शिवाजी झाला छातीवर स्वार ।


तय्यार झाला कराया वार ॥ बायकांनीं दुःखी होऊन ।


अति गहिवरुन । हात जोदून । विनवणी केली शिवाजीला ।


"आमच्याकडं बघुन या वेळेला । जीवदान द्यावं-थोर झाला !" ॥


चाल


शिवराय बोलला खानाला । "बायकांनीं आक्रोश केला ।


म्हणुन देतों जीवदान तुला । पण ऐक माझ्या बोलाला ।


इथं राहणं योग्य नाहीं तुला । शिवाजीचा मुलुख हा झाला ।


तो घेईल तुझ्या जीवाला । जीवदान देतों आज तुला ।


जर ऐकशील एका गोष्टीला । माझ्या संगं गोटाबाहेर चला; ।


आलं पाहिजे तुम्हां सर्वाला" । खानसाहेब घाबरुन गेला ! ।


हा कोण आदमी घरिं आला । समजेना कांहीं हें त्याला ।


खानसाहेब चालले शिवाजीच्या संग ते वेळा ! ॥


गोटाच्या बाहेर जंवा गेला । तंवा बोलला राजा खानाला ॥


चाल


"धाक ज्याचा बादशाहीला । शिवाजी तोच हा आला ! ॥


जाऊं नको याच्या वाटेला । वाघनखं लाविलं पोटाला ॥


पण आठवण रहावी रे तुजला’ म्हणून छाटतों तुझ्या बोटाला ! ॥


आजपासून ऐक बोलाला । म्हण ’शास्ताखान । आपणांला" ॥असं म्हणून बोट छाटून शिवबा पार झाला !! ॥ मग खान गेला माघारा ।


लाज मोठी वाटली त्याला । तय्यार केलं फौजेला ।


अन् पाठविली पाठलागाला ॥ इकडं शिवाजीनें काय बेत केला ।


धोक्याचा करणा फुंकला । कात्रजच्या घाटांतिल पोत पेटले ते वेळा ! ॥


शिवाजी गेला त्या स्थळा । असं वाटलं यवनी फौजेला ।


अन् कात्रजच्या घाटाकडं गेली पाठलागाला ! ! ॥ ततं जाऊन पाहती त्या वेळा ।


अन् परतले सारे माघारा !! ॥ पर इकडं सिंहगडावरी शिवा पार झाला ॥


चाल


गेला खान फार घाबरुन । पुणं सोडून ।


तळ हालवून । भवानी साहाय्य शिवाजीला ।


यश राजाचं वर्णायाला । शाहीर पांडुरंग झाला ॥४॥


वीराग्रणी मुरारबाजी देशपांडे अर्थात्‌ पुरंदरचा वेढा --- पोवाडा


शाहीर पां.द.खाडिलकर


ज्याच्या कबंधानं भूतळी । तीनशें जण बळी ।


घेतले पुरंदरीं । मुरारबाजी धन्य धन्य सरदार ॥


झाला तीन लोकां वीर तो प्यार । शाहीर पांडुरंग गाणार ॥ध्रु०॥


चौक १


शाहिस्तेखानाची केली पार धुळदाण ।


जरी आला होता एक लक्ष फौज घेऊन ।


बोटें तोडुन शाहिस्ता केला फार हैराण ।


हैराण फार होऊन । पुणें सोडून । गेला जल्दीनं ॥


जसा पाला पाचोळा उडवि पवन लीलेनं ।


किंवा ढग मोठमोठाले एका लहरीनं ।


मेंढयांचा कळप उधळावा जसा सिंहानं ।


तशि थोडी युक्ति योजून । दिला हांकलून । शाहिस्ताखान ॥


केल्या स्वार्‍या अवरंगजेबाच्या मुलखामधून ।


चार दिवस सुरत शहराची लूट मारुन ।


अगणित द्रव्य जवाहीर मोतीं घेऊन ।


भयभीत केला यवन । यवनांची झाली गाळण ।


ध्यानीं मनीं दिसतो सैतान । झोंप ही न छान ! ॥


कोण रात्रीं झोंपेंतून उठती बरळ बरळून ।


पाहती स्वप्न आणि त्यांत शिवा सैतान ! ।


भिंतीला जाऊन थडकती वेगवेगानं ।


आरडती किंचाळून कोण । सैरावैरा धांवती कोण । वस्त्र सोडून ! ॥


’शिवाजी डोंगई उंदीर फार लहान ।


तो करतो काय चिरडून त्याला टाकीन---’ ।


असा होता बादशहाचा वेडा हो भ्रम । शिवाजीनं केली धामधूम ।


धामधूम झाली पाहून । शाहाचं मन । झालं हो खिन्न ॥


उंदीर नव्हे हा, असे रे जहरी बाण । आला ! आला ! जाइल छातित्‌नं पार घुसून ।


पादशाही करिल हैराण, काळ दारुण ! । दारुण करुनिया रण ।


कणिं करिल यवनकंदन । करिल धुळदाण ॥ चाल ॥


अवरंगजेबाला शत्रु प्रबळ हा झाला ॥ शाहिस्त्याची फजिती ऐकून शाहा लाल झाला ॥


शिवाजीचा कांटा काढण्याचा बेत त्यानं केला ॥ मग बोलला जयसिंगाला ।


"शिवा मोठा पुंड हो झाला । त्यानं मुलूख हैराण केला ॥


हा कांटा मोंगलशाहीला । जर असा वाढूनच दिला ।


तर होईल भारी आम्हांला । मामाचा मोड त्यानं केला ।


प्रतापगडीं खान ठार केला । लुटालूट केली सुरतेला ।


त्यानं केल जेर शिद्दीला ॥ दरारा त्याचा मुलखाला ।


हें विघ्न आमच्या राज्याला । तुम्ही जावं पारिपत्याला ।


दिल्लीरखान तुमच्या मदतीला । कांटा हा काढा या वेळा" ॥


असं बोलला जयसिंगाला । मग शाहा बोलला एकांतीं दिल्लीरखानाला ॥


’तुम्ही जावं जयसिंगराजाच्या संगें मदतीला’ ॥


पण कानमंत्र हा दिला । "नीट ठेवा तुमच्या लक्ष्याला ।


जयसिंग हिंदु हा होईल फितुर शिव्याला ! ॥


हिंदु हिंदु एक होतील होइल घोंटाळा ॥


बारीक सारीक सार्‍या बातमीला । नीट काढा आतां या वेळा ।


नीट ठेवा त्याच्यावर डोळा । आणि स्वारी फत्ते करुन यावं दिल्लीला" ॥१॥


चौक २


मग फौज ऐंशीं हज्जार । पायदळ, स्वार ।


घेऊन पेंढार । मिर्झा राजा आणि दिल्लीर आला ॥


वेगानंच दख्खन देशाला । हिंदवी राज्य चिरडण्याला ॥


मिर्झा राजा आणि दिल्लीरखान । राहु केतु जाण ।


आले जोडीनं । ग्रासाया सूर्यशिवाजीला । हिंदू हिंदूला काळ झाला ।


निखारा अस्तनींत पडला ! ॥ हत्ती घोडे बैल आणि उंट ।


होते अफाट । तोफा घनदाट । थाट माट तेव्हां फार केला ।


आकाशीं धुरळा दाट भरला । सूर्याला पार लोपवीला ॥


चाल


विजापूरच्या आदिलशहाला । अवरंगजेबानं धाडलं पत्र ते वेळा ॥


कीं "करा मदत आतां या वेळा । शिवाजीनं पुंडावा केला ।


अफझुलखान तुमचा ठार केला । देतो हा पीडा मुलखाला ।


हा शत्रु तुम्हां आम्हाला । दोघं मिळून चिरडूंया त्याला ।


मी फौज मोठा धाडली हो दख्खन देशाला ॥


तुम्ही पाठवा फौज या वेळा । दोघं उचल खाऊं या वेळा ।


आणि करुं ठार हो त्याला । सापाचं पिल्लु हा झाला ॥


वेळींच डोकं ठेचुं या आज या वेळा" ॥ आदिलशहा पत्र वाचून खूष फार झाला ॥


फाजलखान फौज देऊन धाडला मदतीला ॥ आणि गेली पत्र कितिकांला ।


जावळीच्या मोर्‍याचे मुलगे-बाजी, अंबाजी-गेले मदतीला ॥


शिवप्पा नाईक बेदनुरचा । जहागिरदार बसवपट्टणचा आला मदतीला ॥


माणकोजी धनगरही आला । कोळीराजे गेले मदतीला ।


शिवाजीचा नाश करण्याला । कुर्‍हाडीचा दांडा गोत्याला काळ हो झाला ॥


कुंपणानं खाल्लं शेताला ! । भावानं मारलं भावाला ! ।


असो असे राजे यवनांच्या गेले मदतीला ॥ जयसिंग दक्षिणेंत आला ।


सासवड गांवीं तळ त्यानं दिला । आणि पुढच्या स्वारीचा विचार त्यानं सुरु केला ! ॥२॥


चाल


"जे वीर पुरुष जाहले । आर्य आपुले ।


सर्व बिघडले । दास ते बनले ।


मनिं मानलालसा धरुनी अंकित झाले ! ॥


चाल


हें असें मला बघवेना, या पुढें ॥


पाहुनी चित्त हें माझें तडतडे ! ॥


निशिदिनीं हृदय हें माझें धडधडे ॥


चाल


क्षणभर मजला चैन देइना क्षात्रधर्म हा भला ।


देह हा या कामीं वहिला ! ॥


चाल


पर राजे आज तुम्ही दया दाखवा मला ॥


हा तुमच्या शब्दाबाहेर नाहीं राहिला ।


जसे वडील माझे तस्सेच तुम्ही हो मला ! ॥


दोन शब्द सांगणं तुम्हांला । हा अधिकार ना मला ! ।


हें धरा पोर पोटाला । आणि क्षमा करा हो मला ।


परचक्र मोठं हें आलं हिंदू राज्याला ॥ हा वृक्ष आम्हीं लावला ।


आतां तुम्ही वाढवा त्याला । मोंगलाचा मुलुख मी देतों परत मोंगलाला ॥


द्या तुमचा सल्ला या वेळां । मी येतों तुमच्या भेटीला" ।असं पत्र धाडलं शिवानं हो जयसिंगाला ॥३॥


चौक ४


ही बातमी ऐकून मोंगल दिल्लीरखान ।


लाल झाला रागानं म्हणे ’हा जयसिंग कोण ? ।


तह करणार शिवाजी संगें मोठया ऐटीनं ।


हिंदु हिंदु एक होऊन । मला आतां दूर वगळून ।


शाहाशीं झाला बेइमान । आज संपूर्ण ॥


मग मिर्झा राजाला बोलला दिल्लीरखान ।


"तह नका करुं शाहाच्या हुकमावीण ।


कायमचा कांटा काढायची संधि सोडून ।


कां असें मनीं बिचकतां आज हो आतां ।


धीर सोडून" ॥ जयसिंग बोलला "ऐका हो दिल्लीरखान ! ।


उंदीर नसे हा शिवा, सिंह भीषण । कितिकांना खडे चारुन केलं हैराण ।


कितीकांची मान फाडून । कितीकांचीं बोटं तोडून ।


धूळ चारुन गेला वेगानं !" ॥ मग बोलला राजाला मिया दिल्लीरखान ॥


दाढीवरन्म मोठया तोर्‍यानं हात फिरवून ।


"शिवाजीला झाला सामील तुम्ही आंतून । केला घात फंदफितुरीनं ।


हिंदुला घेरलं हिंदूनं । असं मला सांगतय मन । बोला आपण ! ॥


चाल


वाटेल तें तुम्ही हो करा । बेत तुमचा आवडेना मला ।


मी जातो पुरंदराला । सर करतों पुरंदर किल्ला ।


तुम्ही जावं सिंहगडाला । शिव्याचा धाक नको मला ।


मी धरीन त्याच्या कानाला । अन् फरफटत नेइन दिल्लीला ।


तो कुत्रा करतो काय मला ? । तुम्ही खास फितुर हो झाला ।


म्हणुनि बोलता असल्या बोलाला" । असं म्हणुन चालला दिल्लीर पुरंदराला ॥


डोईची पगडी काढून ठेवली भूमीला । अन् बोलला खान आपणाला ।


’सर करिन पुरंदर किल्ला । तरच घालीन पगडी डोक्याला’ ।


असा त्यानं निश्चय केला ! अन् मग मोठी फौज घेऊन तिकडं चालला ॥४॥


चौक ५


गडामध्यें पुरंदर गड । मोठा अवघड ।


भयंकर चढ । धडधडे ऊर बघुन त्याला ।


दिल्लीरखान खिन्न झाला । निराशा झडपी हृदयाला ! ॥


पर मोठी हिय्या धरुन । फौज घेऊन । चाल्‌ला जल्‌दीनं ।


पुरंदर किल्ल्याखालीं आला । देश जाळून फस्त केला ।


किल्ल्याला वेढा त्यानं दिधला ॥


चाल


इकडं शत्रु पन्नास हजार । वर मावळे दोन हजार ! ॥


इकडं वेढा घाली दिल्लीर । वर होता बाजी मुरार ॥


पसरला सेनासागर । मधें पुरंदर कमळ ॥


पुरंदर कमळ सुंदर । वर शोभे देव मुरार ॥


चाल


मुरारबाजी शूर सरदार । योद्धा घनघोर ।


शिवबाचा प्यार । झाला तय्यार झुंजण्याला ।


फिकीर जीवाची नव्हती त्याला । किल्ल्याचा बंदोबस्त केला ॥


धान्याची तरतूज केली । किल्ल्यावर भली ।


शस्त्रं जमविली । तोफ चढविली हो बुरुजाला ।


कडेकोट बंदोबस्त केला । झाला तय्यार झुंजण्याला ॥


चाल


मुरारबाजीनं बेत केला । गनीमाचा लोक फार आला ।


भेडसवावं दिल्लीरखानाला । म्हणून पठाणाचा वेष केला ।


मावळा पांचपन्नास मदतीला । रात्री किल्ल्याच्या खालीं केला ।


शत्रुच्या छावणीमंदि शिरला । रखवालदार ठार केला ।


दारुगोळा सारा लुटून नेला । अन् चट्‌कन किल्ल्यावरती गेला ! ।


यवन मग उठला पहांटेला । बघतो दारुच्या कोठाराला ।


अन् मारतोय हात कपाळाला । आज काय दारुगोळा नेला ।


उद्यां काय चोरटा हल्ला केला । परवां ठार केला शिपायाला ।


बभ्रा हा रोजच्या रोज झाला ! । एकदां रात्रीच्या समयाला ।


मुरारबाजीनं, पंचवीस जणं, मावळे घेऊन, वेश बदलून हल्ला केला ।


पठाण सार होता झिंगलेला । मुरारसिंहानं हल्ला केला ।


तलवारीनं चिरलं कितीकाला । यवन खडबडून जागा झाला ।


हात मग मारतोय तोंडाला । तोबा ! तोबा ! सैतान हा आला ।


पळतो वाचवायला जीवाला । कितिक दरीमंदि खाली पडला ! । ऐकावं र दादा ॥


चाल


मग झाला रागानं लाल दिल्लीरखान ।


म्हणे ’ठार करिन सैतान तलवारीनं ।


उद्यां शर्थ करुन हा खास गड जिंकीन’ ।


वर्णन पुढच्या चौकांत पुढं सांगीन ॥५॥


चौक ६


निकराचा हल्ला मग केला । सुरुंग लावला ।


गडाच्या बुरुजाला । तोफांचा मारा वरनं झाला ।


सुरुंग लावणारा ठार केला । मुडद्यांचा मोठा ढिगारा पडला !।


धडधडा धुम् धुम् धडधडा । आवाज कडकडा ।


गोळे धडधडा । धडकती येऊन बुरुजाला ।


बुरुज कोसळला धरणीला । आणीबाणीचा काळ आला ! ॥


चाल


शत्रु होता पन्नास हजार । वर मावळे दोन हजार ॥


तरी त्यांनीं केलं बेजार । दिल्लीर झाला दिलगीर ! ॥


परि फौज होती अनिवार । मुरारबाजी काय करणार ? ।


तरी त्यानं केला बहु जोर । कितीकांना केलं हो ठार ! ॥


चाल


ढांसळला बुरुज किल्ल्याचा ! मुरारबाजीचा ।


बुरुज हृदयाचा । त्वेषानं लालेलाल झाला ! ।


मावळे घेऊन हल्ला केला । गातों मी त्याच्या पोवाडयाला ॥


शत्रूंचा हल्ला उधळला । मुरार परतला ।


खान वेडा झाला । बघून मुराराच्या प्रतापाला ।


मग त्यानं दुसरा बेत केला । पुरंदर किल्ला जिंकण्याला ! ॥


चाल


पुरंदरच्या एका बाजूला । एक किल्ला होता दुसरा ।


वज्रगड म्हणती हो त्याला । त्या किल्ल्यावरनं डागाव्या तोफा या वेळा ॥


मग पुरंदर किल्ल्याला । थडकेल जोरानं गोळा ।


असा बेत खानानं केला । अन् तिकडं मोर्चा फिरविला ।


बाबाजी बोवाजी वरती होता त्या वेळा । यशवंतराव त्याचा हो भाऊ धावला मदतीला ॥


दोघांनीं नेट फार केला । धारातीर्थीं देह टाकला ।


खानानं किल्ला सर केला । तोफखाना वरती चढविला ।


काळ मोठा कठिण हा आला । आतां पुरंदर खास गेला ।


असं वाटलं मुरारबाजीला । निकाराचा विचार त्यानं केला ।


मग बोलला आपल्या बायकोला । सांगेल शाहीर आतां पुढच्या चौकाला ॥६॥


चौक ७


मुरारबाजी बोले बायकोला । "आला हा घाला ।


आज किल्ल्याला । शिकस्तीचा यत्‍न मी केला ! ॥


किल्ल्याचा बुरुज तडकला । ढांसळून गेला ।


शत्रु हा आला । निकराचा काळ ग आला ।


थोडासा उशीर जर झाला । होईल घोंटाळा ।


आज या वेळा । सर करील शत्रु हा किल्ला,


लाज आम्हांला ॥ जर किल्ला हातचा हा गेला ।


डाग कीर्तीला । जन्मभर जडला ।


कसं काळं तोंड दाखवूं मी शिवरायाला ॥


जावं अस्सं याच घटकेला । शत्रु चिरण्याला ।


वाटतंय मजला । धारातीर्थी देह टाकून जावं या वेळा ॥


चाल


पर पाश एक जीवाला । प्रेमाचा तुझ्या ग झाला ! ॥


कसं तोडू प्रेमपाशाला । ही एक चिंता ग मजला ॥


चाल


तव नेत्र सोडिती बाण । जाती भेदून ।


हृदय या वेळा । तव लाल अधर मोहती सखे !


हृदयाला ! ॥ करपाश तुझे बलवान ।


गुंतलों हरिण । तडफडे मीन ।


कर्तव्यकर्म परि असं आलं दारुण ॥


चाल


काळ इतक्या वर्षांचा गेला । सुख नसे तुझ्या वांटयाला ॥


सदानिदा जातों स्वारीला । सोडुनी सखे ! मी तुजला ॥


काय पाप पूर्वजन्मीला । केलस ग ठाव कोणाला ? ॥


म्हणुन पती असा हा आला । सखये ! ग तुझ्या दैवाला" ॥


चाल


बोलला असे हे बोल । प्रेम-कल्लोळ ।


हृदयिं खळखळले ! । भेटाया तिला नेत्रांतुन मग ते आले ! ॥


प्रेमानं मिठी मारुन । झाला एक क्षण ।


स्तब्ध ते वेळा । पण अश्रु टपटपा गालावर गळला ! ॥


चाल


प्रियपत्‍नी बोले मग त्याला । जरि जीव व्याकुळ झाला ॥


"नका होऊं खिन्न या वेळा । प्रेमाच्या तोडा पाशाला ॥


चाल


तुम्ही शूरवीर रणधीर । पंचानन रणझुंजार ! ॥


किती जन्म नवस मी केले । म्हणुनी मी भार्या झाले ॥


अजि नाथ ! भाग्य मम फुललें । म्हणुनी मी भार्या झालें ॥


अबलेला तुम्ही वरलें । हें शरीर पावन केलें ॥


चाल


कर्तव्यकर्म आचरतां । धर्मार्थ तनू ही पडतां ।होईल सौख्य मज नाथा ॥ झणी तोडा मम पाशाला ॥


हें राज्य नसे शिवबाचें । हें राज्य देव-धर्माचें ! ॥


माजलें बंड यवनाचें । होतात हाल अबलांचे ! ॥


पर्व हेंच स्वातंत्र्याचें । धन्य, जो रणावर नाचे ॥


चाल


मी वीरपत्‍नी, तुम्ही वीर । गाजवा रणीं समशेर ।


होउं द्या युद्ध घनघोर । जा पाशा तोडुनी सारा ! ॥


पण क्षण एक गडे ! थांबाबं ! मी पंचारती आणीन ॥


अक्षता भाळिं लावीन । प्रेमानं दृष्ट काढीन ॥


डोळाभर मग पाहीन । मग निरोप मी देईन" ॥


चाल


बोलली अशी ती अबला । डोळ्यांतुन अश्रु गळला ।


गद्‍गदा कंठ गहिंवरला । ओंवाळुनि मग नाथाला ।


जाहली धन्य ते वेळा ! ॥७॥


चौक ८


जगदंबा मातेचं सत्वर करुनी स्मरण ।


प्रिय पत्‍नीकडे शेवटली दृष्टि टाकून ।


शेंपाचशें मावळे रणवीर संगें घेऊन ।


ढाल फिरंग करिं घेऊन । चालला वेगानं । शिवाचा बाणा ॥


जसा सिंह चवताळुन दरीमधुन तो यावा ।


एकाच झडपेनं मस्त हत्ती फाडावा ।


तसा दिसला डोळ्याला मुरारिचा देखावा ।


तो प्रसंग कविला कां न च स्फूर्तिद व्हावा ? ॥


का वीर्यवृत्तिचा मूर्तिमंत हा पुतळा ! ।


अभिमन्यु बाळ हा किंवा दुसरा नटला ! ।


कां प्रलयसिंधु हा शिखरावरुनी सुटला ! ।


यवनांचा कराया अंत । जोरानं जात ।


तेज उधळीत । आज या वेळा ! ।


तंवा बसला होता हत्तीवर दिल्लीरखान ।


त्यानं पाहला वरनं येतांना मुरार खवळून ।


थरथरलं ऊर खानाचं त्याला पाहून ! ।


म्हणे, "सिंह आला रे आला । फाडाया मला । जबडा उघडून" ॥


खणखणले भाले तलवार । झुंजती वीर ।


म्हणती ’हर हर महादेव’ वीर गुंग झाला ।


लढाईचा कैप त्यांना चढला । प्रेतांचा ढीगच्या ढीग पडला ।


हाडकारक्तांचा काला झाला ! ॥ केली शर्थ मुरारबाजीनं ।


कितीक कापून । आला जोरानं । खानानं पाहिलं समोर त्याला ।


होता रक्तानं मुरार न्हाला । जणूं काय सूर्य उगवणारा ! ॥


चाल


खान बोलला मुरारबाजीला । "पाहुन रे तुझ्या शौर्याला ।


हा खान खूष फार झाला । घे कौल आज या वेळा ।


अन् ये शरण आज खानाला । शिफारस करीन शाहाला ।


अन् चढवीन मोठया हुद्याला । नाहींतर मरशील व्यर्थ या वेळा" ॥


ऐकून शब्द खानाचे मुरार लाल झाला ॥ मग बोलला वीर खानाला ।


"काय येऊं शरण तुर्काला ? । काय विकूं देह मानाला ।


हा देह दिला धर्माला । हा मुरार बळी पडणार नाहीं मोहाला ॥


एक वेंळ गळेल भूमिला अढळ ध्रुव तारा ॥


पण मुरारबाजी हा सदा अढळ रे झाला ! ॥


देहाचा चूर जरि झाला । तरि फिकीर नाहीं रे मला" ।


असं बोलला वीर खानाला । खान हत्तीवरनं उतरला ।


अन् दोघांचा संग्राम झाला । गर्जती वीर ते वेळा ।


कानठळी बसली कानाला ! । दैवाचा घाला पण आला ! ।


मुराराच्या हातावर वार जोराचा झाला । ढाल पडली खालीं भूमिला ।


मग शेला बांधला हाताला । आणि वीर गर्जूं लागला ।


खानावर वार त्यानं केला । पण तो वार निसटून गेला ।


इतक्यांत खानानं सोडलं एका तीराला ! ॥ तीर लागला मुरारबाजीला ।


तीरानं तोडलं डोक्याला । शिरकमळ पडलं धरणीला ! ॥


तरी धडानं कहर तो केला । धूळ चारली तीनशें यवनाला ।


मग कोसळलं धड धरणीला ॥ जीवानं सोडलं देहाला ।


’स्वातंत्र्यदेविच्या गळ्यांमधुन मणि गळला !" ॥


धर्मार्थ देह खर्चून धन्य तो झाला !! ॥८॥


चौक ९


देहाचे तुकडे जमविले । किल्ल्यावर नेले ।


मावळा मग बोले । मुरारबाजीच्या बायकोला ।


"बाईसाहेब ! मोठा घात झाला । जिवाचा मोहरा ठार झाला ! ॥


प्राण आमुचा सोडुन गेला ॥ झाला घोटाळा ऐन वेळेला ।


खान घेईल आतां किल्ल्याला ॥ काय आम्ही करावं बोला ।


अशा निकराच्या समयाला ? ॥ नाथाचं प्रेत पाहून ।


साध्वीचं मन । भरलं दुःखानं । एक क्षण आली घेरी तिजला ।


डोळ्यांतुन अश्रु फार गळला । अंगाला कंप सारा सुटला ! ॥


चाल


पण दुःख सारं आवरुन । त्वेषानं लाल होऊन ॥


बोलली साध्वी जोरानं । पळतांना मावळा पाहून ॥


"कुठं जातां धीर सोडून । मी आलें खड्‌ग घेऊन ।


द्या दुष्ट शत्रु हांकलून । जा ! मरा ! झुंज झुंजून" ॥


चाल


असं बोलली साध्वी मावळ्यांला । नवर्‍याच्या प्रेतावर शेला ।


टाकून गेली युद्धाला । मावळ्यांना चेव तंवा आला ।


अन् करती घोर युद्धाला । खानानं पाहिलं वर तिला ।


अन् तोंडात घातलं बोटाला । मग बोलला आपला आपणाला ।


"सैतानखाना हा झाला । आतां औरत आली लढण्याला ! ।


सोडावं आतां नादाला । काढावं आतां वेढयाला ।


सर करणं असल्या किल्ल्याला । फार बिकट काम हें मला" ।


असं म्हणून वेढा काढून खान चालला ॥ मग साध्वी आली माघारा ।


पालखींत घातलं प्रेताला । अन् पालखी घेऊन चालली रायगडाला ॥


शिवराज आले सामोरा । गडावर नेलं पालखीला ।


शिवराज व्याकुळ झाला ! । खालीं काढलं त्यानं प्रेताला ।


अन् ढळढळां रडूं लागला ! । जिजाबाई बोलली साध्वीला ।


"बाई ! उपमा नाहीं ग तुला । देशाला प्राणपति दिलास् ।


अन् राखलस् ग तूं ही किल्ल्याला ॥


चाल


त्वत्समान शंभर अबला । जर मिळतिल या देशाला ॥


जाईल दुःख विलयाला । चमकेल सुखाचा तारा ॥


चाल


तव पती जाहला धन्य ! । या समान कोणी न अन्य ।


चिरकाल जोडलं पुण्य । हा वंद्य तीनि लोकांला" ॥९॥

शिव चरित्र पोवाडा

पुरोगामी छत्रपती (पोवाडा) – शाहीर आत्माराम पाटील

हिंदवी स्वराज्याचा जनक । लोकनायक ।


राष्ट्रपाईक । छत्रपति शिवाजी महाराज ॥


जगत् युग पुरुषाचा ताज । महामानवी आत्मतेज ॥


तो सत्त्वगुणांचा चंद्र । जनीं राजेंद्र ।


रणीं महारुद्र । त्रिगुणसंपन्न तीव्रबुद्धी ॥


राजकर्तव्य दक्ष नृपती । जगांतिल महान् मुत्सद्दी ॥


चाल


साम्राज्यशाहीचें प्रस्थ उभ्या अवनीत ।


आन् आदिलशाही मोगलाई देशांत ।


ह्या राहुकेतूंच्या जबरदस्त ग्रहणांत ।


हा भारताचा भास्कर । सह्याद्रीवर ।


खुले प्रखर । स्वराज्य नाथ ॥


चाल


जमिनदारी जहागिरदारीला दिली मूठमाती ।


समता निर्मून समर सिद्धिला केली सैन्य भरती ॥


चाल


पकडला मोहिते मामा । नात्याची धरली नाहीं तमा ॥


तो चंद्रराव सासरा । लावला त्याला कासरा ॥


सोडला नाहीं फितूर सगा सोयरा ॥ तो कठोर कर्तव्याचा होता मोहरा ॥


चाल


घरभेदे शासिले घेतले जन विश्वासांत ।


जनता युग निर्माता शिवबा पहिला विश्वांत ॥


चाल


ती सुभेदाराची सून । असहाय बंदिनी असून ॥


ते मुसमुसतें तारुण्य । तें रसरसतें लावण्य ॥


शिवनीति कराया हरण । मदनानें मारला बाण ॥


पण शिवराया नितिमान । मदनास आणले शरण ॥


चाल


देऊनी वसनें अरिसुंदरीला मानियली माता ।


शत्रुच्याहि अब्रूचा रक्षक शिवराया होता ॥


चाल


सैन्यांत होते रणवीर । ते सर्वं धर्माचे वीर ॥


तानाजी, बाजी झुंजार । नेताजी नि पासलकर ।


तसे होते आरमारावर । नेकीचे मराठे वीर ॥:


इब्राहिम खान बहादुर । दौलतखान रणशूर ॥


आग्र्र्‍याच्या संकटावर । सुटकेची मात करणार ।


शिवबाला साथ देणार । ते राम रहीम मैतर ।


हिरोजी नि मदारी मेहेतर ॥


चाल


स्वराज्य कामीं पणीं लाविले सर्व पंथ धर्म ।


महान राष्ट्रीयतेचा केला महाराष्ट्रधर्म ॥


चाल


तो प्रतापगडचा खटका । पन्हाळी सटका ।


आग्र्‍याहून सुटका । शक्ति बुद्धि न् युक्तिवान ॥


दाखवी शिवबाची शान । विवेकी प्रसंग अवधान ॥


चाल


तो दास होता संताचा...संताचा । हव्यास गुणी पंथाचा ॥ जी जी जी ॥


तो हरहर रणवंताचा....वीरांचा । तो ऋणी सदा शहीदांचा ॥जी जी जी ॥


गावया पवाडा त्याचा....अहो त्याचा । तो प्रेरक डफतंताचा ॥जी जी जी ॥


चाल


वीर रसानें खडा कराया अवघा सह्यकडा ।


तानाजीच्या वीर-गतीचा वदवी पोवाडा ॥


चाल


जयसिंग स्वारीचा बदला । सुरतेवर चढवी हल्ला ॥


नाडीलें नाहीं कोणाला । अन् सज्जन गुणवानाला ।


नाडीलें न महिलां बालां ॥


चाल


दानशूर स्वर्गीय शेठ तो परीख मोहनलाल ।


कीर्ति ऐकुनी सुखी राखला विधवेचा महाल ॥


चाल


कृष्णेची दौड तुफान । शत्रूचे उडवी भान ॥


ती बघतां खडग भवानी । शत्रूची दाणादाणी ॥


सिद्दीचा उतरे माज । शरणीले पोर्तुगीज ॥


इंग्रज राहिले चूप । पाहूनी शिव प्रताप ॥


दिल्लीला आला ताप । दुनियेची उडाली झोंप ॥


चाल


सह्याद्रीच्या कडेकपारीं लढला शिवराया ।


हिमालयाच्या स्वातंत्र्याचा घडला मूळ पाया ॥


चाल


श्रीछत्रपती शिवराय । हिंद सरताज ।


अवनीचा साज । आठवा शौर्य स्वरुप गुण ॥


आत्मारामाची तुम्हा आण । चालवा नवा हिन्दुस्थान ॥

शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम

महाराजांची, शिवाजी महाराजांची कीर्ती, बेफाम होती 

महाराजांची कीर्ती बेफाम, दरबारी पुसती बेगम 

भल्या भल्यांना फुटला घाम, याला कोण घालिल येसन 

दरबारी पुसती बेगम, बडी बेगम म्हणजे अली आदिलशहाची आई बर का!


नजरेत तिच्या अंगार, दरबार झाला गपगार,

कुणी घेईना पुढाकार, साऱ्यांनीच मानली हार,

इतक्यात अचानक एक सरदार उठला बोलला 

हम लायेंगे शिवाजी को, अन त्याने विडा उचलला

नाव त्याच अफजलखान …२


जिता जागता जणू शैतान 

खान बोलला छाती ठोकून,

शिवबाला टाकतो ठोकून

मरहबा, सुभानअल्लाह 

कौतिक झाले दरबारात 

खान निघाला मोठ्या गुरमित 

त्याच घोडदल पायदळ 

फौजा फाटा लई बक्कल

अंगी दहा हत्तीच बळ,


पाहणारा कापे चळचळ

वाटेत भेटेल त्याला चिरडीत,

ठेचीत खानाची सेना निघाली 

गाव लुटली, देऊळ उद्ध्वस्त केली 

आया बहि‍णींची आब्रू लुटली

कोण कोण रोखणार हे वादळ


आता शिवबाच काही खर नाही

इकडे निजाम, तिकडे मोगल

पलीकडे इंग्रज, जो ते हेच बोलू लागला

राज्याची सेना मुठभर, खानाला कसा थोपणार

काय लडवावा हुन्नर, चिंतेत पंत सरदार


अश्या वाघिणीचा तो छावा…. २


गनिमाला कसा ठेचावा, डोक्यात गनिमी कावा 

भेटीचा धाडला सांगावा, प्रतापगडावर,

प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा खानान

हसत हसत कबूल केला, दिवस ठरला …

दिवस ठरला, आणि ठरल्या प्रमाणे

प्रतापगडाच्या पायथ्याशी खान …३


आला बेगुमान नाही त्याला जाण

शिवाजी राजाच्या करामतिची…..२

अन त्यास नाही जाणीव शक्तिची……२

अन करील काय कल्पना युक्तिची

हा जी जी जी …३

महाराजानी निरोप घेतला …२

न दंडवत घातला भावानीला


तसाच आई जिजाऊला

वकुत ह्यो वंगळ त्यों कसला


पानी आल आईच्या डोळ्याला

न सरदार लागला रडायला

अहो हे हे हे सरदार तर रडतीलच

पण हत्ती घोड़ शिव ना चार्याला

अन गाई बघा लागल्या हम्बराया

असला बेहुद वकुत आला

दुश्मनाच्या गोटामधी चालला मराठ्याचा राजा

अहो राजा हो जी र दाजी र जी जी …३


खानाच्या भेटीसाठी …२

महाराजानी एक शानदार शामियाना उभारला होता

भेटीसाठी छान उभारीला

नक्षीदार शामियान्याला

अन अशा ह्या शामियान्यात

खान डौलत डुलत आला …२


सय्यद बंडा त्याच्या संगतीला

शिवबाच्या संगती महाला

म्हणतात ना होता जीवा म्हणुन वाचला शिवा

राजाला पाहून खान म्हणतो

आओ आओ शिवाजी आओ हमारे गले लग जाओ

खान हाक मारीतो हसरी …२


रोखून नजर गगनी

जी र जी जी …

पण आपला राजा …२

काही कच्च्या गुरुचा चेला नव्हता

राजा गोर पहात त्याची न्यारी

चाल चित्याची सावध भारी

जी र जी जी …


खानान राजाला आलिंगन दिल

अन दगा केला

खान दाबी मानी मान्याला …२

कट्यारीचा वार त्यान केला …२

गर खरा आवाज झाला

चिलाखत व्हत अंगाला

खानाचा वार फुका गेला

खान यडबडला


इतक्यात महाराजानी

पोटामधी पिसवा ढकलला

वाघनखांचा मारा केला

हे टरटरा फाडल पोटाला

हे तडा गेला खानाचा कोथळा

बाहिर आला जी र जी जी …३


प्रतापगडाचे युद्ध जाहले …३

रक्त सांडले पाप सारे गेले

पावन केला क्रुष्णेचा घाट …२

लावली गुलामिची हो वाट …२

मराठे शाहिचा मांडला थाट हो जी जी …३


महाराजांची, शिवाजी महाराजांची कीर्ती, बेफाम होती 

महाराजांची कीर्ती बेफाम, दरबारी पुसती बेगम 

भल्या भल्यांना फुटला घाम, याला कोण घालिल येसन 

दरबारी पुसती बेगम, बडी बेगम म्हणजे अली आदिलशहाची आई बर का!


नजरेत तिच्या अंगार, दरबार झाला गपगार,

कुणी घेईना पुढाकार, साऱ्यांनीच मानली हार,

इतक्यात अचानक एक सरदार उठला बोलला 

हम लायेंगे शिवाजी को, अन त्याने विडा उचलला

नाव त्याच अफजलखान …२


जिता जागता जणू शैतान 

खान बोलला छाती ठोकून,

शिवबाला टाकतो ठोकून

मरहबा, सुभानअल्लाह 

कौतिक झाले दरबारात 

खान निघाला मोठ्या गुरमित 

त्याच घोडदल पायदळ 

फौजा फाटा लई बक्कल

अंगी दहा हत्तीच बळ,


पाहणारा कापे चळचळ

वाटेत भेटेल त्याला चिरडीत,

ठेचीत खानाची सेना निघाली 

गाव लुटली, देऊळ उद्ध्वस्त केली 

आया बहि‍णींची आब्रू लुटली

कोण कोण रोखणार हे वादळ


आता शिवबाच काही खर नाही

इकडे निजाम, तिकडे मोगल

पलीकडे इंग्रज, जो ते हेच बोलू लागला

राज्याची सेना मुठभर, खानाला कसा थोपणार

काय लडवावा हुन्नर, चिंतेत पंत सरदार


अश्या वाघिणीचा तो छावा…. २


गनिमाला कसा ठेचावा, डोक्यात गनिमी कावा 

भेटीचा धाडला सांगावा, प्रतापगडावर,

प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा खानान

हसत हसत कबूल केला, दिवस ठरला …

दिवस ठरला, आणि ठरल्या प्रमाणे

प्रतापगडाच्या पायथ्याशी खान …३


आला बेगुमान नाही त्याला जाण

शिवाजी राजाच्या करामतिची…..२

अन त्यास नाही जाणीव शक्तिची……२

अन करील काय कल्पना युक्तिची

हा जी जी जी …३

महाराजानी निरोप घेतला …२

न दंडवत घातला भावानीला


तसाच आई जिजाऊला

वकुत ह्यो वंगळ त्यों कसला


पानी आल आईच्या डोळ्याला

न सरदार लागला रडायला

अहो हे हे हे सरदार तर रडतीलच

पण हत्ती घोड़ शिव ना चार्याला

अन गाई बघा लागल्या हम्बराया

असला बेहुद वकुत आला

दुश्मनाच्या गोटामधी चालला मराठ्याचा राजा

अहो राजा हो जी र दाजी र जी जी …३


खानाच्या भेटीसाठी …२

महाराजानी एक शानदार शामियाना उभारला होता

भेटीसाठी छान उभारीला

नक्षीदार शामियान्याला

अन अशा ह्या शामियान्यात

खान डौलत डुलत आला …२


सय्यद बंडा त्याच्या संगतीला

शिवबाच्या संगती महाला

म्हणतात ना होता जीवा म्हणुन वाचला शिवा

राजाला पाहून खान म्हणतो

आओ आओ शिवाजी आओ हमारे गले लग जाओ

खान हाक मारीतो हसरी …२


रोखून नजर गगनी

जी र जी जी …

पण आपला राजा …२

काही कच्च्या गुरुचा चेला नव्हता

राजा गोर पहात त्याची न्यारी

चाल चित्याची सावध भारी

जी र जी जी …


खानान राजाला आलिंगन दिल

अन दगा केला

खान दाबी मानी मान्याला …२

कट्यारीचा वार त्यान केला …२

गर खरा आवाज झाला

चिलाखत व्हत अंगाला

खानाचा वार फुका गेला

खान यडबडला


इतक्यात महाराजानी

पोटामधी पिसवा ढकलला

वाघनखांचा मारा केला

हे टरटरा फाडल पोटाला

हे तडा गेला खानाचा कोथळा

बाहिर आला जी र जी जी …३


प्रतापगडाचे युद्ध जाहले …३

रक्त सांडले पाप सारे गेले

पावन केला क्रुष्णेचा घाट …२

लावली गुलामिची हो वाट …२

मराठे शाहिचा मांडला थाट हो जी जी …३


महाराजांची कीर्ती बेफाम, दरबारी पुसती बेगम 

भल्या भल्यांना फुटला घाम, याला कोण घालिल येसन 

दरबारी पुसती बेगम, बडी बेगम म्हणजे अली आदिलशहाची आई बर का!


नजरेत तिच्या अंगार, दरबार झाला गपगार,

कुणी घेईना पुढाकार, साऱ्यांनीच मानली हार,

इतक्यात अचानक एक सरदार उठला बोलला 

हम लायेंगे शिवाजी को, अन त्याने विडा उचलला

नाव त्याच अफजलखान …२


जिता जागता जणू शैतान 

खान बोलला छाती ठोकून,

शिवबाला टाकतो ठोकून

मरहबा, सुभानअल्लाह 

कौतिक झाले दरबारात 

खान निघाला मोठ्या गुरमित 

त्याच घोडदल पायदळ 

फौजा फाटा लई बक्कल

अंगी दहा हत्तीच बळ,


पाहणारा कापे चळचळ

वाटेत भेटेल त्याला चिरडीत,

ठेचीत खानाची सेना निघाली 

गाव लुटली, देऊळ उद्ध्वस्त केली 

आया बहि‍णींची आब्रू लुटली

कोण कोण रोखणार हे वादळ


आता शिवबाच काही खर नाही

इकडे निजाम, तिकडे मोगल

पलीकडे इंग्रज, जो ते हेच बोलू लागला

राज्याची सेना मुठभर, खानाला कसा थोपणार

काय लडवावा हुन्नर, चिंतेत पंत सरदार


अश्या वाघिणीचा तो छावा…. २


गनिमाला कसा ठेचावा, डोक्यात गनिमी कावा 

भेटीचा धाडला सांगावा, प्रतापगडावर,

प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा खानान

हसत हसत कबूल केला, दिवस ठरला …

दिवस ठरला, आणि ठरल्या प्रमाणे

प्रतापगडाच्या पायथ्याशी खान …३


आला बेगुमान नाही त्याला जाण

शिवाजी राजाच्या करामतिची…..२

अन त्यास नाही जाणीव शक्तिची……२

अन करील काय कल्पना युक्तिची

हा जी जी जी …३

महाराजानी निरोप घेतला …२

न दंडवत घातला भावानीला


तसाच आई जिजाऊला

वकुत ह्यो वंगळ त्यों कसला


पानी आल आईच्या डोळ्याला

न सरदार लागला रडायला

अहो हे हे हे सरदार तर रडतीलच

पण हत्ती घोड़ शिव ना चार्याला

अन गाई बघा लागल्या हम्बराया

असला बेहुद वकुत आला

दुश्मनाच्या गोटामधी चालला मराठ्याचा राजा

अहो राजा हो जी र दाजी र जी जी …३


खानाच्या भेटीसाठी …२

महाराजानी एक शानदार शामियाना उभारला होता

भेटीसाठी छान उभारीला

नक्षीदार शामियान्याला

अन अशा ह्या शामियान्यात

खान डौलत डुलत आला …२


सय्यद बंडा त्याच्या संगतीला

शिवबाच्या संगती महाला

म्हणतात ना होता जीवा म्हणुन वाचला शिवा

राजाला पाहून खान म्हणतो

आओ आओ शिवाजी आओ हमारे गले लग जाओ

खान हाक मारीतो हसरी …२


रोखून नजर गगनी

जी र जी जी …

पण आपला राजा …२

काही कच्च्या गुरुचा चेला नव्हता

राजा गोर पहात त्याची न्यारी

चाल चित्याची सावध भारी

जी र जी जी …


खानान राजाला आलिंगन दिल

अन दगा केला

खान दाबी मानी मान्याला …२

कट्यारीचा वार त्यान केला …२

गर खरा आवाज झाला

चिलाखत व्हत अंगाला

खानाचा वार फुका गेला

खान यडबडला


इतक्यात महाराजानी

पोटामधी पिसवा ढकलला

वाघनखांचा मारा केला

हे टरटरा फाडल पोटाला

हे तडा गेला खानाचा कोथळा

बाहिर आला जी र जी जी …३


प्रतापगडाचे युद्ध जाहले …३

रक्त सांडले पाप सारे गेले

पावन केला क्रुष्णेचा घाट …२

लावली गुलामिची हो वाट …२

मराठे शाहिचा मांडला थाट हो जी जी …३

हे राजे जी रं जी रं जी राजे हे जी जी

हे राजे जी रं जी रं जी राजे हे जी जी

झटकून टाक ती राख, नव्याने जाग, पेटू दे आग मराठी आता
डोळ्यांत फुटे अंगार भगवा, रक्तात जागू दे आज भवानी माता
हे राजे जी रं जी रं जी राजे हे जी जी

हृदयात जागू दे पुन्हा आता रांगडा जोश
दाही दिशीं घुमू दे शिवछत्रपतींचा घोष
लढण्या संग्राम आज हा
बळ दे या मनगटी अम्हां
करण्या संहार शत्रूचा, जन्म घे पुन्हा आता
हे राजे जी रं जी रं जी राजे हे जी जी

तलवार नाचते रणी, ऐसा पेटतो राग
जगो मरो जीव हा, फुले महाराष्ट्राची बाग
जगण्या सिद्धांत आज हा, शक्ती दे शतपटी अम्हां
चल चल रे ऊठ घालिते साद मराठी आता
हे राजे जी रं जी रं जी राजे हे जी जी


He raje ji r ji r ji ji ji,
Har mahadev har mahadev har mahadev har mahadev,
Har mahadev,
He raje ji r ji r ji ji ji,

Zatakun tak ti rakh navyane jaag petu de aag marathi aata,
Dolyane fute angaar bhadak raktaat jagude bhavani maata,

He raje ji r ji r ji ji ji,
Har mahadev har mahadev har mahadev har mahadev,

Hrydayat jagude punha ata rangada josh,
Dahi dishi ghumude shiv chatrapaticha gosh,

Jay bhavani jay shivaji,
Ladhnya sangram aaj ha,
Bal de ya mangati amha,
Karnya sanhar shtruchya janma ghe punha ata,

He raje ji r ji r ji ji ji,

Talvaar nachate rani aisa petato raag,
Jaga mara jiv ha fule maharashtrachi baag,
Jaganya sidhant aaj ha,
Shakti de shat pati amha,
Salsalte oth ghalate saad marathi aata,

He raje ji r ji r ji ji ji,

Zatakun tak ti rakh navyane jaag petu de aag marathi aata,
Dolyane fute angaar bhadak raktaat jagude bhavani maata.
Email Thi

मी शिवाजी राजे भोसले बोलतोय - Powada

चित्रपट : मी शिवाजी राजे भोसले बोलतोय
गीत : शाहीर अद्न्यातदास
संगीत : सुहास बावडेकर
गायक : नंदेश विठ्ठल उमप

प्रतापगडाच्या पायथ्याशी खान …(३)
आला बेगुमान नाही त्याला जाण
शिवाजी राजाच्या करामतिची
त्याशी नाही जाणीव शक्तिची
करील काय कल्पना युक्तिची हा जी जी जी …(३)
महाराजानी निरोप घेतला …(२)
न दंडवत घातला भावानीला
तसाच आई जिजाऊला
वकुत ह्यो वंगळ त्यों कसला
पानी आल आईच्या डोळ्याला
न सरदार लागला रडायला
अहो हे हे हे सरदार तर रडतीलच
पण हत्ती घोड़ शिव ना चार्याला
अन गाई बघा लागल्या हम्बराया
असला बेहुद वकुत आला
दुश्मनाच्या गोटामधी चालला मराठ्याचा राजा
अहो राजा हो जी र दाजी र जी जी …(३)
खानाच्या भेटीसाठी ...(२)
महाराजानी एक शानदार शामियाना उभारला होता
भेटीसाठी छान उभारीला
नक्षीदार शामियान्याला
अन अशा ह्या शामियान्यात
खान डौलत डुलत आला …(२)
सय्यद बंडा त्याच्या संगतीला
शिवबाच्या संगती महाला
म्हणतात ना होता जीवा म्हणुन वाचला शिवा
राजाला पाहून खान म्हणतो
आओ आओ शिवाजी आओ हमारे गले लग जाओ
खान हाक मारीतो हसरी …(२)
रोखून नजर गगनी
जी र जी जी …
पण आपला राजा ...(२)
काही कच्च्या गुरुचा चेला नव्हता
राजा गोर पहात त्याची न्यारी
चाल चित्याची सावध भारी
जी र जी जी ...
खानान राजाला आलिंगन दिल
अन दगा केला
खान दाबी मानी मान्याला …(२)
कट्यारीचा वार त्यान केला …(२)
गर खरा आवाज झाला
चिलाखत व्हत अंगाला
खानाचा वार फुका गेला
खान यडबडला
इतक्यात महाराजानी
पोटामधी पिसवा ढकलला
वाघनखांचा मारा केला
हे टरटरा फाडल पोटाला
हे तडा गेला खानाचा कोथळा
बाहिर आला जी र जी जी …(३)
प्रतापगडाचे युद्ध जाहले ...(३)
रक्त सांडले पाप सारे गेले
पावन केला क्रुष्णेचा घाट …(२)
लावली गुलामिची हो वाट …(२)
मराठे शाहिचा मांडला थाट हो जी जी …(३)


English Version :

Movie : Mi Shivaji Raje Bhosale Bolatoy
Lyricist : Shahir Adnyatdas
Music Director : Suhas Bavdekar
Singer : Nandesh Vithal Umap

Pratapgadachya payathyashi khan …(3)
Aala beguman nahi tyala jaan
Shivaji rajachya karamatichi
Tyashi nahi janiv shaktichi
Karil kay kalpana yuktichi ha ji ji ji …(3)
Maharajani nirop ghetala …(2)
n dandawat ghatala bhavani
Tasach aai jijau la
Waqut hyo wangal tyo kasala
Pani aala aaichya dolyala
n sardar lagala radayala
Aho he he he sardar tar radatilach
Pan hatti ghoda shiv na charyala
An gayee bagha lagalya hambaraya
Asla behud waqut aala
Dushamanachya gota madhi chalala marathyacha raja
Aho raja ho ji ra daji ra ji ji …(3)
Khanachya bhetisathi 2 maharajani ek shanadar shamiyana ubharala hota
Bhetisathi chan ubharila
Nakshidar shamiyanyala
An asha hya shamiyanyat
Khan daulat dulat aala …(2)
Sayad anda tyachya sangatila
Shivabachya sangati mahala
Mhanatat na Hota jiva mhanun wachala shiva
Rajala pahun khan mhanato
Aao aao shivaji aao hamare gale lag jao
Khan hak marito hasari …(2)
Rokhun najar gagani
Ji ra…
Pan apala raja 2 kahi kachya gurucha chela navhata
Raja gora pahat tyachi nyari
Chal chityachi sawadh bhari
Ji ra
Khanan rajala alingan dil
An daga kela
Khan dabi mani manyala …(2)
Katyaricha waar tyan kela …(2)
Gar khara awaj jhala
Chilakhat whata angala
Khanacha waar fuka gela
Khan yadabadala
Itakyat maharajani
Potamadhi pisawa dhakalala
Waghanakhancha maara kela
He tartara fadala potala
He tada gela khanacha kothala
Bahir aala ji ra ji ji …(3)
Pratapgadache yudha jahale….(3)
Rakta sandale pap sare gele
Pawan kela krushnecha ghat …(2)
Lawali gulamichi ho waat …(2)
Marathe shahicha mandala that ho ji ji …(3)