कुणाच्या सांगण्यावरुन

कुणाच्या सांगण्यावरुन आपल्या मनात 
एखाद्या व्यक्तीबाबत चांगले वा वाईट 
मत बनवण्यापेक्षा, 
आपण स्वतः चार पावले चालुन 
समोरासमोर त्या व्यक्तीशी संवाद साधुन 
मगच खात्री करा. 
नाती जपण्यासाठी संवाद आवश्यक आहे ... 
बोलताना शब्दांची उंची वाढवा 
आवाजाची उंची नाही. 
कारण.. पडणाऱ्या पावसामुळे शेती पिकते, 
विजांच्या कडकडाटामुळे नाही..
आणि वाहतो तो झरा असतो 
आणि थांबतं ते डबकं असतं..
डबक्यावर डास येतात 
आणि झऱ्यावर राजहंस!! 
“निवड आपली आहे.." 
कुणा वाचून कुणाचे काहीच आडत नाही 
हे जरी खरे असले तरी कोण कधी उपयोगी पडेल 
हे सांगता येत नाही. 
डोक शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत, 
अन्... भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा